Sunday 19 February, 2023

ग्रेट भेट - आण्णा हजारे

 23 जून 2022 रोजी आदरणीय श्री आण्णा हजारे यांची राळेगण मध्ये भेट झाली. हॉल मध्ये येताच मी त्यांच्या पाया पडलो.आरे नको नको, राहूद्या , म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. काय देवकर साहेब खूप दिवसांनी येणं केलंत. मी जेव्हा जेव्हा सोलापूरला गेलो तेव्हा तेव्हा लोणी देवकर गाव दिसले कि मी सोबतच्या कार्यकर्त्यांना सांगायचो,आपले देवकर साहेब या गावचे आहेत. या गावात माझा कार्यक्रम झाला आहे. मी एकदम आश्चर्यचकित झालो,मी म्हटले आण्णा, साध्या माणसाला पण तुम्ही किती लक्षात ठेवले आहे .


मी आण्णांच्या प्रकृतिची चौकशी केली, तर ते म्हणाले, पाठीचे दुखणे त्रास देत आहे. पायाच्या शिरा दुखतात,डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मी म्हणालो, आण्णा,तुम्हाला लाखो लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठलाचे आशीर्वाद आहेत, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही Self realize व्यक्ती आहात. डॉक्टरांचे उपचार तर घ्याच पण सद्या वेळ आहेच तर लक्ष टाळुवार ठेऊन ध्यान करत जा. तुम्हाला आराम मिळेल. आण्णा सांगत होते कि, सध्या 85 वय चालू आहे. दोन किलोमीटर चालतो, प्राणायाम, योगा करतो, वाचन, पत्र व्यवहार करतो. मी फार आनंदी आणि समाधानी आहे. आयुष्यात मी काही तत्व पाळली आहेत, निष्कलंक जीवन जगायचे,स्वतःला कसला डाग लागू द्यायचा नाही,बँक बॅलन्स करायचा नाही,

पैशाचा मोह ठेवायचा नाही,सत्ता मिळवायची नाही,समजसेवेसाठी नेहमी त्याग करायचा,मोह ठेवायचा नाही,40 वर्ष झाली, समाजसेवेसाठी जसं घर सोडलंय तसं पुन्हा घरी गेलो नाही, पुतण्यांची नावं सुद्धा लक्षात नाहीत.

म्हणूनतर लोकांची साथ मिळाली आणि इतके मोठे काम करता आले.

मी म्हटले,आण्णा तुम्ही फार मोठा आदर्श निर्माण केला आहे. माझ्यासारखे लाखो लोक आहेत जे तुम्हाला फॉलो करतात.


आण्णांना बरे नसताना देखील त्यांनी गप्पासाठी बराच वेळ दिला. त्यांच्याशी बोलून नेहमीच छान वाटते.


मी म्हटले, आण्णा, माझ्या ट्रेनिंग मध्ये 40 प्रशिक्षनार्थी आहेत, त्यांनाही तुम्हाला भेटून फोटो घ्यायचा आहे.ते यासाठीही तयार झाले. बाहेर येताच त्यांनी सर्वांना विचारले,तुम्ही सगळे उद्याचे उद्योजक आहात,असे मी समजू का? सगळे हो म्हणाले. मग आण्णांनी त्यांना पण उद्योजक झाल्यावर कसे समाजउपयोगी जीवन जगावे असा सल्ला दिला.


कृषी महाविद्यालयाच्या आवारात सावंत आयोगाचे कामकाज(सुरेश जैन विरुद्ध आण्णा हजारे खटला )चालू होते तेव्हा माझे भाग्य कि आण्णा आमच्या तत्कालीन कार्यालयात दुपारचे जेवण करायला बसण्यासाठी येत असत.तेव्हा आम्हाला अण्णांची थोडीफार सेवा करायची संधी मिळाली.


आपले किती मोठे भाग्य आहे कि, आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक आदर्श व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्यामुळे समाज योग्य प्रकारे वाटचाल करीत आहे.

No comments: