Monday 1 August, 2011

सुदैवाने अपघातातून वाचलो.

     ३१ जुलै २०११ रोजी रात्री ८ वाजता कासुर्डी, यवत जवळ माझ्या गाडीचा अपघात झाला. आय आर बी संस्थेचा हलगर्जीपणामुळे जिथे दोन पदरी रस्ता संपून चार पदरी रस्ता सुरु होतो त्या ठिकाणी जो रस्ता दुभाजक तयार केलेला आहे तिथे कसलाही बोर्ड लावलेला नाही. गाडी दुभाजकावर चढून उलटली त्यानंतर फरफरत जाऊन पुन्हा पलटी झाली. गाडीचे भरपूर नुकसान झाले पण सुदैवाने मला कसलीही इजा झाली नाही.
     परमेश्वर, माझे हितचिंतक, नातेवाईक आणि मित्र तसे ज्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे मी वाचलो.
श्री. सोमेश्वर ठोंबरे, सरपंच, कासुर्डी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मला तात्काळ मदत केली. त्यांचा मी आभारी आहे.
या अपघातातून बोध घेऊन आय आर बी ने रस्ता दुभाजकावर बोर्ड बसवावेत. त्यामुळे यानंतर तरी तेथे अपघात होणार नाहीत.

No comments: