*गिरीश–सुनीता : आयुष्याची सुंदर कविता*
बत्तीस वर्षांपूर्वी बांधली नाती,
विश्वास, प्रेम आणि स्वप्नांच्या गाठी।
मुंढव्याच्या ' मातोश्री' त रुजली प्रेम कहाणी,
गायकवाड नावाशी जोडली पुण्याची शान ही।
मुंढवा आणि गायकवाड — वेगळेच समीकरण,
लोकांच्या मनात घर, हृदयात स्थान।
शिकले, सवरले, उभा केला संसार,
बांधकाम, उद्योग, यशाचा विस्तार।
‘हॉटेल चूल मटण’ची दरवळती ख्याती,
पुण्याभर शाखा, मसालेदार चवीची नाती।
लोकं गोळा करणारे,
सदैव शुद्ध नीती ,
मुत्सद्दी गिरीश —
माणुसकीची प्रचिती ।
गार गावात घडले सुनीतेचे बालपण,
दौंडमध्ये शिक्षण, संघर्षाचे वळण।
भीमा नदी ओलांडत, पायात धैर्य घेऊन,
स्वप्नांच्या वाटेवर चालल्या अडथळे झेलून।
अपार कष्टांनी घडवले शिक्षण पूर्ण,
संघर्षातून उमलले व्यक्तिमत्त्व सुगंधी, संपन्न।
घरातली राणी, स्वयंपाकात जादू,
हसतमुख सुनीता — प्रेमाची साधू।
चवीलाही प्रेमाची दिली ओळख,
ताटात वाढले समाधान, सुख।
रुचिरा, दिग्विजय — संस्कारांची देणगी,
आईवडिलांच्या छायेत वाढली दोन सोन्याची फुलं रंगी।
रुचिरा अमेय देवकर — संसारात रमली,
नव्या घरात आनंदाची पालवी फुलली।
दिग्विजय स्वप्न पाहतो आकाशाएवढे,
UPSC, उद्योजकता — ध्येय डोळ्यांत साठले।
अशी ही गोष्ट प्रेमाची, परिश्रमांची शान,
गिरीश–सुनीता म्हणजे एक जिवंत प्रेरणागाथा महान।
नात्यांत गोडवा, आयुष्यात उजेड,
हीच खरी कविता — माणुसकीचा वेध। 🌼
No comments:
Post a Comment