Tuesday, 14 October 2025

बदलाला (Change) सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.

 बदलाला (Change) सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.

बेडकावर एक प्रयोग करण्यात आला. एका पातेल्यात पाणी घेतले, त्यात एक बेडूक सोडला, पातेले शेगडीवर ठेवून खालून मंद उष्णता देणे सुरु केले, शेवटी काय घडले तर उष्णता वाढून बेडूक उकडून मेले. दुसऱ्या प्रयोगात बदल केला. पातेल्यातील पाण्याचे उष्णतामान थोडे वाढलेले असताना त्यात बेडूक सोडला. पाणी गरम आहे हे जाणवल्याबरोबर बेडकाने पातेल्याबाहेर उडी मारली आणि स्वतःला वाचविले. 


पहिल्या प्रयोगातील बेडकाप्रमाणे काही उद्योजक बाह्यवातावरणातील बदलाकडे दुर्लक्ष करतात,सहनशील वागतात,परिस्थितीशी जुळवून घेतात आणि नामशेष होतात. 

काही उद्योजक मात्र लवचिक असतात, बदलासोबत बदलायला तयार असतात.


'या जगात केवळ एकच गोष्ट निश्चित आहे,ती म्हणजे बदल, बदल हा होतच राहणार.'


कोणताही उद्योग,संस्था माणसे,टीम,परस्परांमधील संबंध,टीम्समधील संबंध याने निर्माण होते. परंतु या जगात उद्योग, तुमचा उद्योग,संस्था एकटीच नसते. संस्थेच्या बाह्य वातावरणात असतात... ग्राहकांच्या गरजा,पसंती आणि अपेक्षा ,स्पर्धक,तंत्रज्ञान,शासन, सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक , पर्यावरणातील बदल,इ. मध्ये सतत बदल होत असतात. यावर कोणाचेच काही नियंत्रण नसते. उलट बदलाचेच उद्योगावर,संस्थेवर नियंत्रण राहते. माझ्यासोबत रहा नाहीतर तुमचे काही खरे नाही.


बाह्यवातावरणातील बदलासोबत रहायचे असेल तर स्वतः उद्योजक, संस्थेतील अधिकारी,कर्मचारी, नेटवर्क मधील यंत्रणा, यांना प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही.


यशाचा एक पंचकोन सांगितला जातो. एक - माहिती,ज्ञान. दोन - हार्ड व सॉफ्ट कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य. तीन -  उद्योजकीय प्रतिभा . चार - दृष्टीका (Vision ). पाच - सवयी. या पाचही लेवलवर सतत शिकणे आणि सुधारणा करणे आवश्यक ठरते.


पूर्वी बदलाचा वेग कमी होता. एक सेवा मार्केटमध्ये आली तर तिला पर्यायी दुसरी सेवा मार्केटमध्ये यायला बराच काळ जात असे. आता सेवा,व्यापार,उत्पादन प्रत्यक प्रकारात बदल व्हायला काळ सोडा थोडाही वेळ लागत नाही. इतक्या झपाट्याने हे सर्व बदलत आहे.


व्यवहारिक जगात उद्योगांचे, संस्थांचे खालील प्रकार आढळतात...


*काही उद्योग, संस्था निरर्थक, कुचकामी असतात* - आजारी पडण्याच्या मार्गांवर असतात. संस्थेतील आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि अशा संस्था बंद पडतात, नामशेष होतात.


*काही उद्योग,संस्था असमाधानकारक कार्य करत असतात*- संस्थेतील अंतर्गत, बाह्य गरजा, ग्राहकांच्या गरजा यांचे समाधान करण्यात त्या असमर्थ ठरतात. त्या बंद पडण्याच्या मार्गांवर असतात.


*काही उद्योग,संस्था समाधानकारक कार्य करत असतात*- ग्राहक, लाभधारक, भाग भांडवलधारक, इ. यांच्या अपेक्षा पूर्ण करतात. खर्च, नफा, मालमत्ता, वेळ, इ.घटकांचा परिणामकारक वापर करतात. यांची मार्केटमध्ये टिकून राहण्याची शक्यता वाढते.


*काही उद्योग,संस्था समव्यावसायिक किंवा वर्गवारीत अतिउत्तम संस्था असतात*- ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतात, थेट स्पर्धेत  सर्व स्पर्धकांपेक्षा उत्तम कामगिरी करतात, तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेत अव्वल ठरतात.


*काही उद्योग,संस्था जागतिक दर्जाच्या असतात*- सर्वोत्तम, अतिउत्तम कार्यपद्धतीसाठी ओळखली जातात. अशा आदर्श संस्थेच्या यशाचे निकष समोर ठेवून इतर संस्था मार्गाक्रमण करत असतात. 


महाराष्ट्रातील, भारतातील, प्रत्यक उद्योग,संस्थेचा लोकल टू ग्लोबल असा प्रवास व्हायला हवा.


सर्व आदरणीय उद्योजक  भारतरत्न जे आर डी टाटा, रतन टाटा, बाबा कल्याणी, आनंद देशपांडे, प्रमोद चौधरी, इ. यांच्या सिद्धीचा वा

प्रवास वाचायला हवा,जाणायला हवा. नीलकंठराव कल्याणी त्यांच्या आत्माचरित्रात त्यांनी आयुष्यात किती तास विमान प्रवास केला, किती सेमिनार्स, वर्कशॉप्स, मिटींग्स अटेंड केल्या, त्यामुळे जॉईंट व्हेंचर, टेकनॉलॉजि ट्रान्सफर, एक्स्पोर्ट्स साठी कसा फायदा झाला याचा उल्लेख करतात. मी 1 एप्रिल 2003 रोजी बाबा कल्याणी यांनी 'बीटिंग चायना ' नावाच्या सेमिनारमध्ये भारत फोर्ज कंपनीचे दिलेले प्रेजेंटेशन ऐकले होते. 1997 साली कंपनीचा आर्थिक परफॉर्मन्स खराब झाला होता. सगळे खडबडून जागे झाले आणि मग त्यांनी कंपनीत उत्पादन दर्जा सुधार,कार्यक्षमता वाढ,मनुष्यबळ व्यवस्थापन, तंत्रज्ञान, इ. खूप काही सुधारणा केल्या , प्रशिक्षण दिले , इ. गोष्टी केल्या . ते म्हणाले याचा परिणाम स्वरूप, "2003 साली, Bharat Forge is  the third largest company in the world." त्यांची यशाची ही घोडदौड अशीच चालू राहिली आणि 2005 मध्येच Bharat Forge became the first largest company in the world.हे असं सर्व पाहिलं की पटतं बदलांना सामोरा जाणारा मार्ग प्रशिक्षणातून जातो.


प्रशिक्षणाने बौद्धिक अंधंकार दुर व्हायला मदत होते. माणसाचे अनेक मेंटल ब्लॉक असतात. वर्तणूक, मनोवृत्ती, भावना, सर्वसाधारण दृष्टीकोन, स्व: च्या जाणीवा, या कोणत्याही पातळीवर हे ब्लॉक असू शकतात.याला ब्लाइंड स्पॉट असे म्हणता येईल. प्रशिक्षणाने अशा ब्लाइंड स्पॉटवर लख्ख प्रकाश पडतो. माणूस Self actualized, Self realized व्हायला मदत होते.


शरद काळे  पाटील यांची अहिल्यानगर येथे दिशा मॅनेजमेंट ही संस्था आहे.  दिशा मॅनेजमेंट महाराष्ट्रात उद्योग, संस्थांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, वर्कशॉप, सेमिनार्स आयोजित करीत असते. आजपर्यंत त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे अहिल्यानगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, इ. ठिकाणच्या उद्योजकांना, संस्थाचालकांना मोठ्याप्रमाणावर लाभ झालेला आहे. दिशा मॅनेजमेंटकडे विजय बात्रा, योगीराज देवकर, सतीश केरकळ  ,डॉ. संगीता देशपांडे अशा तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांची मोठी फळी उपलब्ध आहे. दिशा मॅनेजमेंट Leadership, Skills base, Attitudinal & Motivational, Sales & Services, Quality & Technical, Accounts & Finance, IT & AI, Health & Fitness, Organization Development, Entrepreneurial Motivation अशा अनेक विषयावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते.उद्योग, संस्था विकास, व्यक्तिमत्व विकास हे शरद काळे पाटील यांचे ध्येय आहे.


नाशिक मध्ये 21 व 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान श्री .विजय बात्रा यांचा TWO DAYS OPEN HOUSE WORKSHOP ON LEADERSHIP SKILLS आयोजित केला आहे. 


नाशिक मधील उद्योजकांनी या वर्कशॉपचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


संपर्क : शरद 98500 18200, दिशा मॅनेजमेंट 80555 18200


सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


योगीराज देवकर.पुणे.

9307133134

No comments: