Tuesday, 14 October 2025

बदलाला (Change) सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.

 बदलाला (Change) सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.

बेडकावर एक प्रयोग करण्यात आला. एका पातेल्यात पाणी घेतले, त्यात एक बेडूक सोडला, पातेले शेगडीवर ठेवून खालून मंद उष्णता देणे सुरु केले, शेवटी काय घडले तर उष्णता वाढून बेडूक उकडून मेले. दुसऱ्या प्रयोगात बदल केला. पातेल्यातील पाण्याचे उष्णतामान थोडे वाढलेले असताना त्यात बेडूक सोडला. पाणी गरम आहे हे जाणवल्याबरोबर बेडकाने पातेल्याबाहेर उडी मारली आणि स्वतःला वाचविले. 


पहिल्या प्रयोगातील बेडकाप्रमाणे काही उद्योजक बाह्यवातावरणातील बदलाकडे दुर्लक्ष करतात,सहनशील वागतात,परिस्थितीशी जुळवून घेतात आणि नामशेष होतात. 

काही उद्योजक मात्र लवचिक असतात, बदलासोबत बदलायला तयार असतात.


'या जगात केवळ एकच गोष्ट निश्चित आहे,ती म्हणजे बदल, बदल हा होतच राहणार.'


कोणताही उद्योग,संस्था माणसे,टीम,परस्परांमधील संबंध,टीम्समधील संबंध याने निर्माण होते. परंतु या जगात उद्योग, तुमचा उद्योग,संस्था एकटीच नसते. संस्थेच्या बाह्य वातावरणात असतात... ग्राहकांच्या गरजा,पसंती आणि अपेक्षा ,स्पर्धक,तंत्रज्ञान,शासन, सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक , पर्यावरणातील बदल,इ. मध्ये सतत बदल होत असतात. यावर कोणाचेच काही नियंत्रण नसते. उलट बदलाचेच उद्योगावर,संस्थेवर नियंत्रण राहते. माझ्यासोबत रहा नाहीतर तुमचे काही खरे नाही.


बाह्यवातावरणातील बदलासोबत रहायचे असेल तर स्वतः उद्योजक, संस्थेतील अधिकारी,कर्मचारी, नेटवर्क मधील यंत्रणा, यांना प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही.


यशाचा एक पंचकोन सांगितला जातो. एक - माहिती,ज्ञान. दोन - हार्ड व सॉफ्ट कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य. तीन -  उद्योजकीय प्रतिभा . चार - दृष्टीका (Vision ). पाच - सवयी. या पाचही लेवलवर सतत शिकणे आणि सुधारणा करणे आवश्यक ठरते.


पूर्वी बदलाचा वेग कमी होता. एक सेवा मार्केटमध्ये आली तर तिला पर्यायी दुसरी सेवा मार्केटमध्ये यायला बराच काळ जात असे. आता सेवा,व्यापार,उत्पादन प्रत्यक प्रकारात बदल व्हायला काळ सोडा थोडाही वेळ लागत नाही. इतक्या झपाट्याने हे सर्व बदलत आहे.


व्यवहारिक जगात उद्योगांचे, संस्थांचे खालील प्रकार आढळतात...


*काही उद्योग, संस्था निरर्थक, कुचकामी असतात* - आजारी पडण्याच्या मार्गांवर असतात. संस्थेतील आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि अशा संस्था बंद पडतात, नामशेष होतात.


*काही उद्योग,संस्था असमाधानकारक कार्य करत असतात*- संस्थेतील अंतर्गत, बाह्य गरजा, ग्राहकांच्या गरजा यांचे समाधान करण्यात त्या असमर्थ ठरतात. त्या बंद पडण्याच्या मार्गांवर असतात.


*काही उद्योग,संस्था समाधानकारक कार्य करत असतात*- ग्राहक, लाभधारक, भाग भांडवलधारक, इ. यांच्या अपेक्षा पूर्ण करतात. खर्च, नफा, मालमत्ता, वेळ, इ.घटकांचा परिणामकारक वापर करतात. यांची मार्केटमध्ये टिकून राहण्याची शक्यता वाढते.


*काही उद्योग,संस्था समव्यावसायिक किंवा वर्गवारीत अतिउत्तम संस्था असतात*- ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतात, थेट स्पर्धेत  सर्व स्पर्धकांपेक्षा उत्तम कामगिरी करतात, तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेत अव्वल ठरतात.


*काही उद्योग,संस्था जागतिक दर्जाच्या असतात*- सर्वोत्तम, अतिउत्तम कार्यपद्धतीसाठी ओळखली जातात. अशा आदर्श संस्थेच्या यशाचे निकष समोर ठेवून इतर संस्था मार्गाक्रमण करत असतात. 


महाराष्ट्रातील, भारतातील, प्रत्यक उद्योग,संस्थेचा लोकल टू ग्लोबल असा प्रवास व्हायला हवा.


सर्व आदरणीय उद्योजक  भारतरत्न जे आर डी टाटा, रतन टाटा, बाबा कल्याणी, आनंद देशपांडे, प्रमोद चौधरी, इ. यांच्या सिद्धीचा वा

प्रवास वाचायला हवा,जाणायला हवा. नीलकंठराव कल्याणी त्यांच्या आत्माचरित्रात त्यांनी आयुष्यात किती तास विमान प्रवास केला, किती सेमिनार्स, वर्कशॉप्स, मिटींग्स अटेंड केल्या, त्यामुळे जॉईंट व्हेंचर, टेकनॉलॉजि ट्रान्सफर, एक्स्पोर्ट्स साठी कसा फायदा झाला याचा उल्लेख करतात. मी 1 एप्रिल 2003 रोजी बाबा कल्याणी यांनी 'बीटिंग चायना ' नावाच्या सेमिनारमध्ये भारत फोर्ज कंपनीचे दिलेले प्रेजेंटेशन ऐकले होते. 1997 साली कंपनीचा आर्थिक परफॉर्मन्स खराब झाला होता. सगळे खडबडून जागे झाले आणि मग त्यांनी कंपनीत उत्पादन दर्जा सुधार,कार्यक्षमता वाढ,मनुष्यबळ व्यवस्थापन, तंत्रज्ञान, इ. खूप काही सुधारणा केल्या , प्रशिक्षण दिले , इ. गोष्टी केल्या . ते म्हणाले याचा परिणाम स्वरूप, "2003 साली, Bharat Forge is  the third largest company in the world." त्यांची यशाची ही घोडदौड अशीच चालू राहिली आणि 2005 मध्येच Bharat Forge became the first largest company in the world.हे असं सर्व पाहिलं की पटतं बदलांना सामोरा जाणारा मार्ग प्रशिक्षणातून जातो.


प्रशिक्षणाने बौद्धिक अंधंकार दुर व्हायला मदत होते. माणसाचे अनेक मेंटल ब्लॉक असतात. वर्तणूक, मनोवृत्ती, भावना, सर्वसाधारण दृष्टीकोन, स्व: च्या जाणीवा, या कोणत्याही पातळीवर हे ब्लॉक असू शकतात.याला ब्लाइंड स्पॉट असे म्हणता येईल. प्रशिक्षणाने अशा ब्लाइंड स्पॉटवर लख्ख प्रकाश पडतो. माणूस Self actualized, Self realized व्हायला मदत होते.


शरद काळे  पाटील यांची अहिल्यानगर येथे दिशा मॅनेजमेंट ही संस्था आहे.  दिशा मॅनेजमेंट महाराष्ट्रात उद्योग, संस्थांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, वर्कशॉप, सेमिनार्स आयोजित करीत असते. आजपर्यंत त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे अहिल्यानगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, इ. ठिकाणच्या उद्योजकांना, संस्थाचालकांना मोठ्याप्रमाणावर लाभ झालेला आहे. दिशा मॅनेजमेंटकडे विजय बात्रा, योगीराज देवकर, सतीश केरकळ  ,डॉ. संगीता देशपांडे अशा तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांची मोठी फळी उपलब्ध आहे. दिशा मॅनेजमेंट Leadership, Skills base, Attitudinal & Motivational, Sales & Services, Quality & Technical, Accounts & Finance, IT & AI, Health & Fitness, Organization Development, Entrepreneurial Motivation अशा अनेक विषयावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते.उद्योग, संस्था विकास, व्यक्तिमत्व विकास हे शरद काळे पाटील यांचे ध्येय आहे.


नाशिक मध्ये 21 व 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान श्री .विजय बात्रा यांचा TWO DAYS OPEN HOUSE WORKSHOP ON LEADERSHIP SKILLS आयोजित केला आहे. 


नाशिक मधील उद्योजकांनी या वर्कशॉपचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


संपर्क : शरद 98500 18200, दिशा मॅनेजमेंट 80555 18200


सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


योगीराज देवकर.पुणे.

9307133134

Wednesday, 8 October 2025

आभासी मुलं, वास्तव गेलं.

 आभासी मुलं, वास्तव गेलं.


एक पिढी अशी होती जेव्हा पालक मुळगावी रहात होते आणि त्यांची मुलं नोकरी निमित्त शहरात.

पुढच्या पिढीत ही मुलं पालक बनून शहरात स्थिरावली आणि त्यांची मुलं नोकरी निमित्त परदेशात.

आता त्या पुढच्या पिढीची मुलं कुठे असतील ? तर कदाचित स्पेस स्टेशनवर जॉब करतील. एका पिढीला राज्य,देश ठेंगना वाटला , मुलांच्या पिढीला जग ठेंगनं वाटत आहे. त्या पुढच्या पिढीला आकाश ठेंगनं वाटेल .असं पिढी दर पिढी लोकांचे स्थलांतर आणि सो कॉल्ड प्रगती सुरु आहे.जग हे असे लहान झाले आहे आणि माणसं मात्र दुर दुर गेली आहेत.


आपल्यापेक्षा आपली मुलं नामवंत, यशवंत , कीर्तिमंत व्हावी आणि त्यांनी आपल्यापेक्षा अधिक चांगलं आयुष्य जगावं अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. मुलांचे यश हे पालकांचा अभिमान आणि समाजातील मान, सन्मान वाढविते.


विविध अँप्समुळे चॅटिंग,ऑडिओ, व्हिडीओ कॉलिंग शक्य झाले आहे.हवं तेव्हा एकमेकांशी बोलता येत असल्यामुळे माणसं जवळपासच असल्याचा भास होतो. ही या आभासी विश्वाची देणगी आहे . इतकच नाही तर सध्याच एआयचा उपयोग करून कोणाचाही आवाज, चेहरा याचा बेमालूम उपयोग करून फॉल्स ऑडिओ, रील्स, फिल्म्स तयार केले जात आहेत. मला तर असं वाटतं की, उद्या लोकं हयात नसलेल्या आप्तांचे  देखील रिल्स करतील किंवा त्यांच्याशी वर्च्युअली बोलतील. लोकं इहलोकी गेलेल्या लोकांच्या बाबतीत पण ते वर्च्युअली जिवंत असल्याचा भास निर्माण करतील. काय बाबा हे टेक्नॉलॉजिवाले लोकं काय करतील याचा भरोसा राहिलेला नाही.


तेव्हा खेड्यातल्या पालकांसाठी शहरातली मुलं आभासी झाली असतील, तर आता शरातल्या पालकांसाठी परदेशातली मुलं आभासी झाली आहेत.तेव्हा ठिकाणांमधील आंतर कमी होतं, प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होता,त्यामुळे प्रत्यक्ष भेटी जास्त होत असत. आता आंतर, वेळ, खर्च वाढला आणि प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत.


सध्याची मुलं मग ती खेड्यातली असो की, शहरातली असो की, परदेशातली असो,जास्त वेळ सोशल मीडियावरच असतात आणि ऑनलाईनच  भेटतात. सारखं सारखं फोनमध्ये काय असतं असं विचारलं तर म्हणतात, महत्वाचं काम चालू आहे, आमचं ऑफिस काम फोनवरच चालतं . सुट्टीत स्वतःच्या देशात सारखं सारखं काय यायचं असं म्हणत परदेशातूनच परदेशात फिरायला जातात.नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना भेटायला भारतात येतात तेव्हा घरी बॅगा टेकवतात तेवढाच काय तो त्यांचा पालकांना सहवास.  सगळ्यांना वेळ देता यावा म्हणून गेट टुगेदर, पार्टी, करणे किंवा एखादी ट्रिप काढणे असे घडत असते. तेवढाच प्रियजणांचा मेळा.


त्याकाळी पालक शहरात मुलांकडे आले तर स्वतःच्या खेड्यातली साधी राहणी,काटकसरीपणा, मोकळंचोकळंपणा या विरुद्ध शहरी राहणीमान,सुधारणा,

शुद्ध भाषा आणि एकूणच क्रॉस कल्चरल पैलूमुळे

लाजरे बुजरे होवून जायचे .

आताचे पालक परदेशात मुलांकडे गेले तर स्वतःच्या शहरातली संस्कृती,परंपरा या विरुद्ध परदेशी भाषा, प्रगत तंत्रज्ञान,रुपयाच्या तुलनेतली महागाई आणि एकूणच क्रॉस कल्चरल पैलूमुळे संकोचून जातात .

 

तेव्हा गावच्या तुलनेत शहरात पालक अडाणी होते आता शहराच्या तुलनेत परदेशात पालक अडाणी आहोत. लोकांनी कितीही सुधारणा केली तरी आधीची आवृत्ती जुनी आणि पुढची आवृत्ती नवी हे असंच चालू आहे. दोन पिढ्यातला हा जनरेशन गॅप कधी भरून निघेल अशी सूतराम शक्यता नाही.


आभासावरुन सहज आठवले, मुलीने,सुनेने घरात खाद्य पदार्थ बनवावेत असं पालकांना वाटणे साहजिक आहे. पण पुन्हा ते इथे असले तरी वेळेअभावी हे घडत नाही. आता ही मुलं जगभर फिरत असतात .मग काय तर तिथं बनवलेल्या खाद्य पदार्थांचे फोटो पोस्ट करत असतात. या ऑनलाईन फोटोचे कौतुक केले जाते. जीभेला पाचकरस सुटल्याचा स्मायली  पाहणारे पोस्ट करत असतात आणि "मला पण", "मला पण", म्हणत या आभासी दुनियेचा भाग होत असतात . 


हल्ली सिंगल चाईल्ड आणि चौकोनी कुटुंबचा जमाना आहे.

मुलं लहान असतात तेव्हा आई त्यांच्या हवं-नकोची काळजी घेते. इथपर्यंत मुलांना आईच्या हातच्या खाद्यपदार्थांचे कौतुक असते. आता त्यांना देशविदेशातले पदार्थ समजलेले असतात. फास्टफूड,झोम्याटो,स्विगी त्यांच्या दिमतीला हजर आहे. त्यामुळे त्यांना घरचं खाणं आवडेनासे झाले आहे.


मुल परदेशातनं इथं आलं की, दिवसभर शहरभर याला भेट, त्याला भेट करत फिरतं, "आरे जरा घरात थांब, आम्हाला पण वेळ दे!", म्हटलं की, "इतके पैसे खर्च करून मी काय घरात थांबायला आलो आहे का?", असं म्हणतं . आता जिथं स्वतःच्या मुलाला घरात थांबवू शकत नाही तिथं दुसऱ्याच्या घरातनं इथं आलेल्या मुलीला कसं थांबवायचं. हेच तुझं सासर आहे हे तीच्या मनावर कसं बिंबवायचं.


पूर्वीच्या काळात सासर, माहेर आणि त्यामध्ये नोकरीचं शहर होतं.आता त्या शहराची जागा परदेशातल्या शहरानं घेतली आहे आणि पालकांचे मूळ घर मात्र भोंज्या झालं आहे.


पालकांना स्वावलंबन, कष्ट तर असं काही चिकटलं आहे की, ना त्यांना निवृत्ती आहे,ना त्यांना सुट्टी आहे. या आभासी जगात कधीतरी ही पोरं आपल्यासोबत रहायला येतील या आशेवर हसऱ्या मुखवट्याच्या चेहऱ्याने रहायचे आहे .


आजच्या या आभासी जगात मुलांना गूगल, एआय, ग्रोक, जेमिनी, चॅट जीपीटी असे अनेक ज्ञानी गुरु आहेत. अनुभवी, जास्त उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या प्रौढ पालकांनी काही सांगायचा,शिकवायचा प्रयत्न केलाच तर ते त्यांना आधीच माहित असतं, पण गंम्मत म्हणजे तसं वागायचं मात्र नसतं.


माणूस म्हणजे गुणदोषांचा पुतळा,देव नव्हे. माणसात गुण असो की दोष त्याचा मुख्य श्रोत कोण असणार तर साहजिकच आई - वडील आणि आधीच्या पिढीतील पूर्वज्यांचे संस्कार आणि सहवास . मित्र,साहित्य ही अफवा आहे. त्यामुळे मुलं आई - वडिला सारखी वागली तर धन्यच म्हणावे. त्यांच्या सारखी नाही वागली तर आश्चर्य समजावे. कारण मुलं रस्त्यावरच्या वाटसरू सारखी तर नक्कीच वागणार नाही ना. दुसऱ्याचे असो वा स्वतःचे,गुणांचं गुणगान गावं आणि दोषात सुधारणा करावी हे प्रत्यकाचं इप्सित असावं. आई-वडिलांची जुनी आवृत्ती सुद्धा शिकून शिकूनच इथपर्यंत आली आहे म्हणून समजून घ्यावं आणि टीका न करता मुलांनी त्यांची सुधारित आवृत्ती बनावं.


पूर्वी मुलं घरातल्या जेष्ठान्ना,आई वडिलांना आदरयुक्त घाबरायची , बायको नवऱ्याला आदरयुक्त घाबरायची, सुन सासू-सासऱ्याला आदरयुक्त घाबरायची.तेव्हा लोकं थोडीतरी एकमेकांवर अवलंबून असायची. आता अवलंबून असणं पण संपलं आहे, प्रत्यकजण स्वतंत्र झाला आहे. कोणच कोणाला  घाबरेनासे झाले आहे. आदर नावापुरता उरला आहे किंवा हे चित्र उलटे झाले आहे.

आधुनुकतेच्या नावाखाली हा मुक्त स्वातंत्र्याचा विकास आहे म्हणायचे, की ऱ्हास आहे म्हणायचे.


जग मग ते प्रत्यक्ष असो वा आभासी, जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले बनविणे हे शब्दशः मोबाईलमुळे ज्याच्या त्याच्या हाती आहे. 


एक मात्र सत्य आहे, येताना एकटे आलो आहोत, जाताना प्रत्येकाला एकटेच जायचे आहे. पण जिवंतपणी मुलं,कुटुंबीय, नातेवाईक, मित्र,हितचिंतक इतका गोतावळा असताना जगात असे आभासी का जगावे लागत आहे?  इथे असते वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा शहरात एखादी सदनिका,पालक ते सांभाळण्यातच अडकतात. ते ना धड इकडचे ना तिकडचे होतात. मुलांना असे सांगावेसे वाटते की,

'भारत देश बदल रहा हैं l '  हे जर सत्य असेल तर भारतात पण Ease of leaving अनुभवता येईलच ना . बाळांनो तुम्ही खरंतर Non Residential Indian (NRI) आहात Non Returning Indians (NRI) बनू नका .  पालकांना असं वाटतं की, मुलांनी लवकरात लवकर एकाचे दोन व्हावे आणि दोनाचे तीन,चार व्हावे. करिअरसाठी स्वतःच्या देशात यावे,कुटुंबाच्या जबाबदारीची धुरा सांभाळावी, पालकांना त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा त्यांना हवा तसा जगू द्यावं, हीच पालकांच्या वास्तव जीवनाची आस आहे.


आयुष्याच्या शेवटी अशी नको वेळ यायला की, आमची मुलं  करिअरकरिता परदेशी राहिल्याने आमच्यासाठी आभासी  राहिली आणि पालकांवर आभासी मुलं आणि वास्तव गेलं म्हणायची वेळ आली.


लेखक...

योगीराज देवकर.

Tuesday, 30 September 2025

सातारा, कास पठार.

 सह्याद्रीच्या कुशीत सातारा कास पठार -एक नंबर ट्रिप.


लहान मुलाला आईच्या कुशीत जायला आवडते अगदी तसंच मोठ्या माणसांना निसर्गाच्या कुशीत जायला आवडते.  माणूस हा निसर्गाचाच अंश असल्यामुळे तो निसर्गाकडे नेहमीच आकर्षित होत असतो .निसर्गात गेलं की माणसाला मायेची उब लाभते. महाराष्ट्रातील लोक निसर्गाच्या बाबतीत किती सुदैवी आहेत पहा. त्यांना महाराष्ट्राच्या पश्चिमला सह्याद्री तर उत्तरेला सातपुडा पर्वतांची रांग लाभलेली आहे. सह्याद्रीचा पश्चिम घाट म्हटलं की नजरेसमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, हिलस्टेशन्स,समुद्र किनारे,नद्या,धरणे,अभयारण्ये,देवस्थाने, घाटरस्ते आणि कितीतरी ठिकाणे.सातारा जिल्ह्यातील असंच एक ठिकाण म्हणजे कास पठार,यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. 


साताऱ्याचे पण सध्या पुणे निवासी आम्हा सर्वांचे मित्र विकी परदेशी सर यांच्या आले मना की,सर्वांची सातारा कास पठार ट्रिप एक नंबर घडवून आणायची.आमच्या सरांचे सगळे एक नंबर असते, साताऱ्यातील इतर मित्रमंडळी प्रकाश मुजुमदार, प्रताप देशमुख,अविनाश जाधव, महेश पवार, संदीप कोंडे, प्रशांत जाधव, विजय बाचूळकर, संदीप भुंजे, गणेश काटे, सुहास शिंदे, पोपट गडदे,अविनाश जगताप इ.यांनीही विकी सरांच्या कल्पनेला होकार दिला. बघता बघता होस्ट आणि गेस्टची संख्या बत्तीसवर जावून पोहोचली. विकी सरांचा ट्रिप आयटीनरी बनविण्यात एक नंबर आहे . सातारकरांनी रिसॉर्ट्सची पाहणी केली आणि सरांनी सगळ्यांना डायरेक्ट सातारा-बामणोली रस्त्यावरील फाळणी येथील 'लगोरी ' दी अर्बन नेस्ट फूड अँड स्टे बुक केल्याचे ,दोन दिवसांची आयटीनरी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे सोबत घ्यावयाच्या आवश्यक साहित्याच्या यादीसह कळविले. मग काय ठरल्या दिवशी बावीस पुणेकर पाच, सहा कार्समधून सातारा सहलीला निघाले. सकाळी सगळे कैलास भेळला ब्रेकफास्टसाठी जमले.तिथं ब्रेकफास्टला आम्हाला धवल आपटे भेटले पण ते रात्रीच कझाकीस्थानला नवीन ट्रिपची आखणी करायला जाणार असल्यामुळे आमच्या सोबत येणार नसल्याचे सांगून निघून गेले.इथूनच आमच्या गप्पा,गोष्टी,ग्रुप फोटोजला सुरुवात झाली . 


विकी सरांनी साताऱ्यातले नियोजन जरा हटके केले होते.

सुरुवातीलाच आम्ही संदीप कोंडे यांच्या पुष्प कन्स्ट्रक्शन्सच्या साईटला भेट देवून त्यांच्या नवीन बांधकामाची पाहणी केली. तिथून सातारा एमआयडीसी मध्ये प्रशांत जाधव यांचे आर्ट इफेक्ट स्टुडिओ पहायला गेलो. त्यांच्याकडे CNC/ Laser cutting, LED signage, Print media, Digital display branding, Graphics design solutions, इ. प्रकारच्या सेवा दिल्या जातात.पुढचं युनिट होतं प्रताप देशमुख यांचे अश्वमेघ किचन अँड इंटिरियर्स. त्यानंतर विजय बाचूळकर यांच्या वृद्धी इन्व्हेस्टमेंट्सला भेट झाली. या दोघांच्या युनिटच्या नावावरूनच ते काय व्यवसाय करतात ते समजले असेल. बाचूळकरांनी प्रत्येकाला एक वस्तू भेट दिली. माणसांत गुंतवणूक केली की सर्व प्रकारची वृद्धी होते हेच त्यांनी दाखवून दिले.


दुपारी दीड नंतर आमचा सातारा-कास पठार प्रवास सुरु झाला. साताऱ्यातल्या बोगद्यापासून उजवीकडे वळालो आणि घाटरस्ता सुरु झाला. थोडं वर गेलं की, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खाली दरीत  कन्हेर आणि उरमोडी धरणांचे जलाशये दिसतात . ही जलाशये आपलं  स्वागत करत आहेत असे भासते . थोडंच पुढे गेलो आणि गाड्या जेवणासाठी थांबल्या. उंबरकर नावाचे एक अवलिया खानसामा आहेत. त्याचं एक शेडवजा बांधकाम असलेलं घरगुती वाटावे असे हॉटेल आहे. इथं मोठमोठी लोकं खास जेवायला येतात असं आम्हाला सांगण्यात आलं. सातारकर मित्रांनी त्यांना मटण आणून दिले होते आणि उंबरकरांनी आमच्या ग्रुपसाठी खास मटणाच्या जेवणाचा बेत तयार ठेवला होता. खूप छान जेवण झाले.तिथं जवळच एक छान व्ह्यू  पॉईंट आहे. तिथून सातारा शहराचे आणि अजिक्यतारा किल्ल्याचे विहंगम दृष्य दिसते. गेल्या पाच-सात वर्षात सातारा शहरात बराच बदल घडल्याचे दिसले . भुयारी मार्ग, सतरा मजली गगनचुंबी इमारत,शॉपिंग मॉल. साताराच काय तर एकूणच जगभरात बदलाचा वेग फार वाढला आहे. हा वेग पाहुन माझ्या मनात विनाकारण लोळत पडणाऱ्या किंवा झोपा काढणाऱ्या माणसांच्या बाबतीत एक विचार आला. माणसांनी विनाकारण झोपायला नाही पाहिजे राव, कारण जागी असणारी माणसं फार बदल घडवत असतात. तुम्हांला जाग येते तोवर जगात खूप काही बदललेलं असतं. या व्ह्यू पॉईंटवर आम्ही बरेच फोटो काढले.


तिथून कासच्या दिशेने प्रवास सुरु झाला तसं वातावरण अचानक आल्हाददायक झाले . आमच्या रस्त्यावर ढग उतरले आणि तापमान एकदम डावून झाले. कास पठार वरूनच आम्ही कास तलावापाशी पोहोचलो. कास तलावाच्या सांडव्यावर कृत्रिम वॉटरफॉल तयार केला आहे. वॉटरफॉल मग तो कृत्रिम असो की नैसर्गिक माणसं त्याच्या प्रेमात पडतात हेच खरं. तिथं खूप गर्दी होती, त्यात थोडा पाऊस सुरु होता. लोक वॉटरफॉलच्या आणि पावसाच्या पाण्यात चिंब  होण्याचा आनंद घेत होते. 


साधारण पाच वाजता आम्ही 'लगोरी ' स्टे वर पोहोचलो होतो. गेल्याबरोबर चहा - पाणी झाले, रूम्स अ्लॉट झाल्या. तिथं लगोरी,भोवरा,टेबलटेनिस, कॅरम असे खेळ, लॉन,चिल्ड्रेन प्ले एरिया, कॅन्टीन अशा सुविधा आहेत. मग कोण टीटी, तर कोण कॅरम खेळायला लागले. लॉनवर एक फुटबॉल पडला होता आणि दोन्ही बाजूला दोन-दोन टायर टाकून गोलपोस्ट तयार केल्याचे दिसत होते. पाऊस पडल्यामुळे लॉन ओली होती,काही भागात शेवाळ आणि चिखल पण होता. हे बघून आमच्या ग्रुपला फुटबॉल खेळायची खुमखूमी आली. दोन टीम पाडल्या गेल्या,राज मुरकुटे आणि प्रवीण जावळकर गोल कीपर झाले तसा फुटबॉल गेम सुरु झाला. एकूणच लॉनचा अवतार बघता थोड्याच वेळात तो फुटबॉल नसून रग्बी फुटबॉल असल्याचे दिसायला लागले.संग्राम निम्हण, विनायक हजारे, सुरेश उनेचा,प्रल्हाद सायंभार  आणि मी तर  असला खेळ हे आपले काम नाही म्हणून प्रेक्षक होणे पसंत केले. प्रवीण जावळकर, विकी परदेशी, प्रवीण लांडे, शंतनू वाघमोडे,श्रीकांत आणि चेतन मते,सचिन कोळेकर, गोपी मानकर, प्रकाश मुजुमदार, अभिजित मुरकुटे,गणेश मोडक, अमोल मोडक, यांची शरीरयष्टी आजही खेळाडूसारखी आहे. पण प्रमोद धुरपदे, किरण पवार, राज मुरकुटे असे काही खेळाडू आहेत जे सरळ उभे राहिले तर त्यांना पायाजवळचा फुटबॉल दिसणार नाही.पण खेळायचा उत्साह दांडगा.काय तर म्हणे आम्ही विद्यार्थीदशेत असताना फुटबॉल खेळायचो. त्यांना फुटबॉल खेळताना बघणं फारच मनोरंजक होतं. विशेषतः किरण पवार यांना स्वतःला सावरत पायांच्या हालचाली करताना, फुटबॉलवर कंट्रोल ठेवताना पाहणं सुखद होतं . खेळताना यातलं कोण पडलं नाही ते विचारा.शंतनू वाघमोडे, प्रमोद धुरपदे,सचिन कोळेकर , विकी परदेशी,चेतन आणि श्रीकांत मते ,अभीजीत मुरकुटे ,राज मुरकुटे ,प्रवीण लांडे , गणेशमोडक ,प्रकाश मुजुमदार,सगळे नुसते रपारप पडत होते. फुटबॉल मारला तर पाठीवर पडत होते आणि आडवायला गेले तर पोटावर पडत होते. आशिष मानकरांची तर अशी स्ट्रॅटेजि होती की,खेळायचं कमी आणि नुसता आरडाओरडा करायचा. सुरुवातीला जावळकरांच्या टीमचे गोल होताना दिसले. पण राजच्या लक्षात आले की त्यांनी दोन टायर मधले आंतर कमी करून गोलपोस्ट लहान केला आहे.  मग त्यांनी पण गोलपोस्ट लहान केला. मग राजच्या टीमची गोल संख्या वाढली. खेळताना यांनी इतका दंगा,मजा,मस्ती केली की, पाहणाराला वाटावे हेच का ते ध्यान धारणा करणारे सहजयोगी आहेत. इतकी पडापडी होवूनही कोणाला दुखापत झाली नाही हे विशेष.अक्षय मोरेचे खेळ वगैरे संपल्यावर 'लगोरी'वर आगमन झाले. फोनाफोनी झाल्यावर ते फलटणहुन निघाले. आज ट्रिपला जायचंय हेच ते विसरले होते. पण नंतर त्यांनी ट्रिप एन्जॉय केली. 


रात्री मटण बिर्याणीचा बेत होता. साताऱ्यातले बशीर भाई खानसामा महाराज मटण बिर्याणी बनविण्यासाठी फेमस आहेत. आज त्यांना खास मटण बिर्याणी तयार करायला 'लगोरी'वर बोलावले होते.त्यामुळे हा बेत तर एकच नंबर झाला.


भल्या सकाळी सहा वाजता आम्ही कास पठारवरील रानफुले, फुलपाखरं पहायला निघालो. पार्किंग नंबर दोनवर गाड्या पार्क केल्या आणि शहाण्यासारखे गेट नंबर चारमधून 'कुमदिनी पुष्प लेकच्या' दिशेने चालायला सुरुवात केली.तिथे एकूण चार गेट आहेत. आमच्यापैकी काहीजण गेट नंबर एक मधून आत गेले. कास पठारची निर्मिती ज्वालामुखीजन्य  बसाल्ट खडकापासून झाली आहे. साधारणपणे दहा चौरस किमीच्या खडकाळ पठारावर पावसाळ्यात गवत, फुलझाडे वाढली की साडेआठसे प्रकारची फुले येतात. दोन-तीन महिन्यांचा हा सिझन असतो. सगळी फुले एकाच वेळी येतात असे नाही. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी फुलझाडे वाढतात तशी ती येतात. पाठरावर कुमदिनी,कंदील पुष्प, गवती दवबिंदू, कासा, टूथब्रश ऑर्किड, अंजनी, छोटी/मोठी सोनकी, पांढरा सापकांदा, सीतेची आसवे, इ.अशी शेकडो प्रकारची फुले येतात. इथं फुलांचे गालिछे , ताटवे पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद असतो. इथं येणारी काही फुलं तर दुर्मिळ प्रकारची आहेत.पुढं तीन, साडेतीन तास आम्ही फुलांच्या विश्वात विहार करत होतो. काहीजण फुलांचे तर काहीजण स्वतःचे फोटो काढत होते.


'लगोरी'वर जावून मस्त ब्रेकफास्ट केला आणि कोयना धरण जलाशयात नौकाविहार करण्यासाठी बोट क्लब असलेल्या मुनावळे गावी गेलो . बोटीने दीड तासाचा मस्त नौकाविहार सुरु झाला.कोयनेच्या एका तिरावर मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा ही बोट क्लब असलेली गावे तर दुसऱ्या तिरावर वासोटा किल्ला आणि कोयना अभयारण्य आहे.बोट चालक आम्हाला कोयना-कांदाटी-सोळसी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घेवून गेला. लांबूनच त्यानं आम्हाला माजी सीएमचे दरे गाव दाखविले. त्यानं आम्हाला एक आगळीवेगळी माहिती दिली आणि कोयना अभयारण्यत असलेले खीरखंडी हे पाच, सहा घरांचे गाव दाखविले. या गावातील काही गावकऱ्यांनी पुनर्वसनास विरोध केला त्यामुळे हे लोक तिथेच वास्तव्यास आहेत.

मुलांसाठी गावात चौथी पर्यंत शाळा आहे. चौथीच्यापुढे मुलांना होडीने रोज अलीकडच्या तिरावरील शाळेत जावे लागते. विशेष म्हणजे या गावात निवडणूक मतदानकेंद्र असते. सध्या या जलाशयात एका पुलाचे काम चालू आहे. हा पुल झाल्यावर सातारा-कोकणातील खेडचे आंतर कमी होणार आहे. पात्रातील क्रिस्टल क्लीअर निळेशार पाणी, किनाऱ्यावर हिरवेगार जंगल,आकाशात ढगांची गर्दी,निसर्गातील शांतता आपल्याला निर्वीचार करते आणि आपण निसर्गाच्या कुशीत प्रेमाची उब अनुभवतो. 


'लगोरी'वर परतलो तर मटण,चिकन,फिशचे जेवण तयार होते. सातारकर मित्रांमुळे आमची खाण्याची चंगळ झाली.


संध्याकाळी सातारकरांचे आभार मानून आमचा परतीचा पुणे प्रवास सुरु झाला.प्रवीण जावळकार, विकी परदेशी, संग्राम निम्हण, विनायक हजारे, अमोल मोडक यांच्या कार्स आगे मागेच प्रवास करत होत्या. संग्राम निम्हण यांच्या गाडीत राज, किरण, सुरेश उनेचा यांच्यासह गप्पांच्या ओघात पुणे कधी आले ते समजले पण नाही.


प्रवासात आमची चर्चा सुरु होती आता पुढची एक नंबर ट्रिप कुठे काढायची.


लेखक - योगीराज देवकर, पुणे. 9307133134

Monday, 15 September 2025

आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर.

 सूक्ष्म शरीर यंत्रणेचा (Subtle body system's) दैवी स्कॅनर-आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर - सिबीडी- बेलापूर, नवी मुंबई.


जय श्री माताजी!


डॉक्टर्स स्थूल शरीराच्या बाबतीत ठराविक वयानंतर लोकांना रुटीन चेकअप करायला सुचवितात. यात ब्लड, युरीन टेस्ट, एक्सरे, सोनोग्राफी किंवा गरजेनुरूप स्कॅन असू शकतात. रिपोर्ट्स पाहुन स्थूल शरीराच्या आरोग्याचे निदान केले जाते.


जगात असा कुठे स्कॅनर आहे का, ज्याद्वारा  सूक्ष्म शरीर यंत्रणेचा स्कॅन केला जावू शकेल. 

हो आहे! 

हा स्कॅनर म्हणजे परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी मानवजातीस दिलेली अप्रतिम भेट आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर - सिबीडी - बेलापूर, नवी मुंबई. इथं सूक्ष्म शरीर यंत्रणा स्कॅन होते असं म्हटलं तरी वावगे होणार नाही. या प्रकारचे हे जगातील वैशिष्ट्यपूर्ण सेंटर आहे जिथे प्रत्यक्ष श्री माताजींनी सांगितलेल्या फक्त चैतन्य लहरीच्या जाणीवेवर आधारित सहजयोगा  प्रॅक्टिसेस प्रमाणे उपचार केले जातात. 


इडा नाडी जास्त थंड झाली तर किंवा पिंगला नाडी जास्त उष्ण झाली तर मानवी सूक्ष्म शरीर यंत्रणा असंतुलित होते. अहंकार किंवा प्रतीअहंकार वाढतो, सु्षुमना नाडीवर दाब येतो, चक्रांवर बिघाड होतात . असं काही घडलं की, व्यक्तीचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. हे इतकं सूक्ष्म लेवलवर घडते की, प्रत्येक सहजयोग्याला हे बारकावे कळतीलच असे नाही.


म्हणून असे म्हणावेसे वाटते की, आपण स्थूल शरीराच्या बाबतीत जसे निरोगी असतानाच रुटीन चेकअप करत असतो अगदी तसेच चेकअप सूक्ष्म शरीराच्या बाबतीत पण हेल्थ सेंटरला जावून का करू नये .असे केले तर शरीर निरोगी राहण्यास सहाय्य तर होईलच पण महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक प्रगती लवकर होईल. 


सहजयोगात महत्वाचे आहे ध्यान. ध्यानाने संतुलन प्राप्त होते , निर्वीचार ,निर्विकल्प स्थिती येते, आत्मविष्कार होतो, परमात्म्याशी योग घटित होतो. यासाठी दररोज दिवसातून किमान दोनदा दहा दहा मिनिटे निर्वीचार अवस्था लाभली आहे अशा स्थितीत ध्यान व्हायला हवे आहे. ध्यान घडतंच मुळात व्यक्ती संतुलित असेल तर. आध्यात्मिक प्रगतीसाठी श्री माताजींनी जसे दररोज ध्यान करायला सांगितले आहे तसेच संतुलन लाभण्यासाठी , ध्यान लागण्यासाठी पूरक ठरतील अशा क्लिअरन्स करिता गरजेनुसार करायला हव्यात अशा काही ट्रीटमेंट्स पण सांगितल्या आहेत. जशा की, मीठ- पाणी, जोडेपट्टी,कॅण्डल, आइस पॅक, घी- कापूर, सहस्त्रार मसाज,पेपर बर्निंग, थ्रेड नॉट बर्निंग, मटका,नाड्या व चक्र संतुलन व शुद्धीसाठी मंत्र व प्रार्थना,इ. हेल्थ सेंटरला गेलं की,तिथले डॉक्टर्स तुमच्या सूक्ष्म शरीर यंत्रणेचे व्हाब्रेशन्स पाहुन चेकअप करतात आणि तुम्हाला आवश्यक त्या सहजयोगा ट्रीटमेंट्स विनासायास मिळतात. इथे कोणतेही औपचारिक औषध दिले जात नाही.


मुळात हे हेल्थ सेंटर श्री माताजींनी स्वतः डिझाईन करून निर्माण केलेले आहे. इथे श्री माताजींची विश्रांतीची रूम , मेडिटेशन हॉल, OPD, IPD क्लिनिक हॉल्स, डॉरमेटरिज, प्रायव्हेट रूम्स, लायब्ररी, सहज मटेरील शॉप, स्टेज,बगीचा,कॅन्टीन अशा पुष्कळ सोई सुविधा उपलब्ध आहेत. त्याही एकदम वाजवी किंमतीत.नवी मुंबईत असूनही हेल्थ सेंटरच्या मागील भागात जंगल आहे. हेल्थ सेंटर मध्ये OPD ( आऊट डोअर पेशंट्स ) आणि IPD ( इन डोअर पेशंट्स )अशी सुविधा आहे . तुम्ही अर्धा/पूर्ण दिवस जावून उपचार घेऊ शकता किंवा तिथे काही दिवस राहून उपचार घेऊ शकता.


इथे OPD सेवा निशुल्क असते. पूर्ण दिवसासाठी प्रतिव्यक्ती 600 ₹ चार्जेस आहेत तर IPD  प्रतिव्यक्ती/ प्रतिदिन डॉरमेटरी 1000₹ आणि रूम 1500₹ आहे.एसी रूमसाठी थोडे जास्त. यात तीन वेळा चहा, ब्रेकफास्ट, दोन वेळचे जेवण , निवास याचा समावेश असतो. म्हणजे तुमचा पैसा तुमच्याच राहण्या- खाण्यावर खर्च होतो. इथं दिला जाणारा अजवाईन टी तर लाजबाब असतो. येथील चेकअप आणि सहजयोगा ट्रीटमेंट्स तर फ्री ऑफ कॉस्ट असतात. 


बरेच सहजयोगी असा विचार करतात की, हेल्थ सेंटरला कधी जावे? तिथे किती दिवस रहावे?सोबत काय घेवून जावे? तर प्रत्येक सहजयोग्याने निरोगी असतानाच हेल्थ सेंटरला वर्ष-दोन वर्षातून एकदा, किमान तीन-चार दिवसांसाठी जावे. कारण एक, दोन दिवस तर तुमची सर्विसिंग होण्यातच खर्च होतात, खरा अनुभव तर त्यानंतर सुरु होतो आणि शिवाय तीन दिवस राहिलात तर मटका ट्रीटमेंट घेता येते. हेल्थ सेंटरला वर्षभर भारतातल्या विविध राज्यातून आणि परदेशातून अनेक सहजयोगी येत असतात. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत परदेशी सहजयोगी अधिक असतात. परदेशी सहजयोगी तर केवळ आध्यात्मिक उत्थानासाठी महिना, महिना इथे येवून राहतात. हेल्थ सेंटरमधील वास्तव्याबद्दल सहजयोगिनी भगिनींची प्रतिक्रिया तर त्या माहेरी आलेल्या आहेत अशी असते. आपण चौकशी करून तुलनेने जेव्हा गर्दी कमी असते तेव्हा बुकिंग करून जावे. स्वतः सोबत 'निर्मल विद्या ', 'निर्मल स्वरांजली ' ही पुस्तके ठेवावीत. मंत्र, भजने म्हणण्यासाठी पुस्तकांचा उपयोग होतो. आरामदायकपणासाठी सुती, सैल कपडे वापरावेत. एकदा का आपण हेल्थ सेंटरच्या कॅम्पस मध्ये गेलो की,पहाटे उठून ध्यान करणे , सकाळचा चहा,सकाळी 8 ते 9 ध्यान, 9 वाजता ब्रेकफास्ट, 11 पासून डॉक्टरांची IPD सुरु होते,डॉक्टरांनी सांगितलेल्या ट्रीटमेंट करणे,1वाजता दुपारचे जेवण,4 वाजता सामूहिकते सोबत मीठ- पाणी, जोडेपट्टी ट्रीटमेंट, 5 वाजता चहा, 6 ते 7 सायंकाळचे ध्यान, 8 वाजता रात्रीचे जेवण, झोपण्यापूर्वी मीठ - पाणी ट्रीटमेंट आणि ध्यान.  तिथे आपण पूर्णवेळ सहजयोगी झालेलो असतो. आपला दिवस कसा संपला ते समजत सुद्धा नाही. 


हेल्थ सेंटर बाबत एक गैरसमज आहे की, इथे आजारी पडल्यावरच जावे. तर असे नाही. 'Prevention is better than cure.' असे म्हणतात, त्याप्रमाणे आपण निरोगी असतानाच इथे जावे म्हणजे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होईल. विशेषतः युवाशक्ती समन्वयक, सहजयोग साप्ताहिक ध्यान केंद्र समन्वयक, सहजयोग प्रचार प्रसार टीमचे सहजयोगी सदस्य , विविध ठिकाणच्या सहजयोग ट्रस्टचे ट्रस्टीज, इ. यांनी जरूर इथे येवून ट्रीटमेंट घ्यावी. कारण अनुभव हीच खात्री असते.  त्यामुळे ते इतर सहजयोग्यांना हेल्थ सेटरचे महत्व आणि आध्यात्मिक लाभ याबद्दल खात्रीने सांगू शकतील.


सहजयोग्यांच्या संतुलन आणि क्लिअरन्स बद्दल श्री माताजी असे सांगतात की, सहजयोगी हे मेंटल लेवलच्या खूप वरती आहेत,त्यामुळे त्यांचे संतुलन, क्लिअरन्स हे स्पिरिच्यूअल लेवलवर होत असते.भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश हे इलेमेंट्स नाड्यांचे,चक्रांचे क्लिअरन्स करण्यात मुख्य भूमिका बजावतात. त्यासाठी समोर श्री माताजींचा फोटो असावा आणि फोटो समोर दिवा लावलेला असावा. श्री माताजींवर श्रद्धा, विश्वास असावा. आपण हे जाणतो की, कर्ता, करवीत्या श्री माताजी आहेत.तरीही माध्यम किंवा साधन म्हणून इथं कार्यरत असलेले,"जय श्री माताजी!" बोलून हसतमुखाने स्वागत करणारे सेक्युरिटी गार्ड्स,स्टाफ आणि डॉक्टर्स,

लिव्हर साठी उपयुक्त रुचकर, स्वाधीष्ठ डायट फूड वेळेवर पुरविणारे कॅन्टीन मधील शेफ आणि इथे सेवा देणारे डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी आलेल्या प्रत्येक साधकाला अगदी मनापासून सेवा देतात . इथे कार्यरत डॉक्टर्स आणि कर्मचारी सर्व सहजयोगीच आहेत आणि ते सहजयोग पद्धतीने चैतन्य लहरी आणि  प्रॅक्टिसेस द्वारा पंचतत्वावर आधारित उपचार करतात. 


यापूर्वी जर तुम्ही हेल्थ सेंटरला गेले असाल तर तुम्ही सेंटरमधील 

डॉक्टरांच्या सेवेचा अनुभव तुम्ही घेतला असेल. साधकांसाठी खूप कष्ट घेतात हे डॉक्टर्स. इथं काम करणारे डॉक्टर्स नोकरी नव्हे तर श्री माताजींचे कार्य आणि सेवा करतात असे त्यांचे योगदान पाहिले की जाणवते. 


इडा नाडी संतुलित, स्वच्छ असेल तर पवित्रता,मांगल्य,ममत्व,शुद्ध इच्छा,भावना,

विचारविवेक,आनंद,नवनिर्मिती,'स्व'चे अस्तित्व, इ.सूक्ष्मगुण प्राप्त होतात .

इडा नाडीचा अगदी सहज विचार केला तरी ही नाडी का खराब होते हे लक्षात येईल. श्री गणेशांच्या, श्री महाकालीच्या गुणांविरुद्ध वागले की,डाव्या मुलाधारावर दोष निर्माण होतो ,श्री गणेश तत्व खराब होते,स्वाधीष्ठानवर अशुद्ध इच्छा, विचार निर्माण होतात, मणिपूरवरील गुरुतत्व खराब होते, अनाहतवर आत्मतत्व बिघडते, डाव्या विशुद्धीवर अपराधीपणाची भावना वाढते,भीती वाटायला लागते,आज्ञावर प्रतिअहंकार वाढतो.मनुष्य भूतकाळात रमतो, आळशी बनतो,चिंता करतो,मग निराश होतो आणि शेवटी नैराश्याचा बळी ठरतो. असे हे तमोगुण वाढले की, मनुष्य स्वतःहून आजरांना निमंत्रण देतो.


पिंगला नाडी संतुलित, स्वच्छ असेल तर स्वाभिमान, प्रयत्न,कृती,निर्मिती,उद्योगी, बौद्धिक व शारीरिक कष्ट, कार्यक्षमता, लढाऊ वृत्ती, इ.सूक्ष्मगुण प्राप्त होतात.

आता हीच पिंगला नाडी असंतुलित कधी होते तर श्री कार्तिकेयांच्या, श्री महासरस्वतीच्या गुणांविरुद्ध वागले की,उजवे मुलाधार चक्र खराब होते,राक्षसी,पशु, आक्रमक,विचार वाढतात, लिव्हरची उष्णता वाढते आणि ती इतर  चक्रापर्यंत जाते,चक्र खराब होतात, मनुष्य अती क्रियाशील होतो, मर्यादांचा विसर पडतो,अहंकार वाढतो. रजोगुण वाढतात तसे काही आजार आपोआप तुमच्यामध्ये येतात.


इडा, पिंगला संतुलित, स्वच्छ झाल्या तर मनुष्य वर्तमानात राहतो,श्री महालक्ष्मी तत्व जागृत होते, सुषुम्ना नाडीचे सूक्ष्मगुण  धर्म, उत्क्रांती, 'स्व' च्या अस्तित्वाचा शोध,आत्मज्ञान, आत्मविष्कार, परमात्मा भेटीचा योग आणि सर्व चक्रांचे दैवी गुण प्राप्त होतात.मनुष्य जर असा सत्वगुणी झाला तर तो निरोगी तर होईलच पण संत पद प्राप्त करेल.


श्री माताजींनी लिहलेल्या पुस्तकात चक्र आणि पाकळ्यांची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे श्री माताजींनी प्रत्येक पाकळी आणि त्याखाली येणाऱ्या अवयवाचे नांव दिले आहे.


उदाहरणार्थ 

मुलाधार चक्र.(Pelvic plexus)

पेटल सब प्लेक्सस आणि नियंत्रित अवयव.

पाकळी एक - इन्फेरिअर हेमोरॉइडल : अवयव - गुदाशय (Rectum)

पाकळी दोन - व्हेसिकल: अवयव – मूत्राशय, वीर्यकोष (Vesiculae seminalis) आणि वीर्यवाहिनी (Vas deferens)

पाकळी तीन - प्रोस्टॅटिक : अवयव-  पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांमध्ये योनिचा भाग

पाकळी चार - युटेरिन: अवयव - स्त्रियांमध्ये गर्भाशय, गर्भाशयमुख (Cervix) आणि फलोपियन नलिका (Fallopian tubes), पुरुषांमध्ये वीर्यकोष (Vesiculae seminalis) आणि वीर्यवाहिनी (Vas deferens)


मुलाधार चक्र खराब झाले तर या शारीरिक अवयवांशी संबंधित आजार होवू शकतात. 


अशीच माहिती स्वाधीष्ठान, माणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा  सर्व चक्रा बाबत दिलेली आहे. अहो विशुद्धी चक्रावरील सोळा पाकळ्यांची नांवे आणि त्याखाली येणाऱ्या सोळा शारीरिक अवयवांची नांवे श्री माताजींनी दिली आहेत. किती हे अद्भूत ज्ञान आहे. विज्ञानाच्या पुढचे हे ज्ञान आहे.


सहजयोगी डॉक्टर्सना व्हाब्रेशन्स पाहुन चेकअप करताना तुमच्या कोणत्या चक्रावर पकड आहे, असंतुलनाचे कारण काय आहे,आजाराचे कारण काय आहे हे समजते आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट करायला हवी ते समजते.  काही उपचार ते करतात काही उपचार करण्यासाठी तुम्हाला होमवर्क दिला जातो . मग काय तिथे बसून करत रहायचे स्वतःचे क्लिअरन्स.मुळात आपण सहजयोगी आहोत, सहजयोग थोडा समजून उमजून केला की, संतुलन, निर्वीचारता लाभते. खरंतर आपण आजारी पडण्याची वाट कशाला बघायला हवी, त्याआधीच हेल्थ सेंटर गेलात तर कधी आजारी पडण्याची वेळच येणार नाही.


हेल्थ सेंटर मध्ये येवून उपचार घेतल्या नंतर चिंताविकार, काळजी, अपराधीपणाची भावना, उच्च रक्तदाब, फिट्स, दमा, सांधेदुखी, हृदयविकार, डोकेदुखी, (पंडुरोग)रक्तक्षीणता, इ. आजार बरी झाल्याची हजारो उदाहरणे आहेत . नियमित सहजयोग करणारांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता दुरावते , सहजयोगात कर्करोग सारखा गंभीर आजार देखील बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.


श्री माताजींनी जगातल्या सर्व सहजयोग्यांसाठी हि सुविधा उभारलेली आहे.आदरणीय श्रीमती कल्पना दीदी आणि एलईटी मुंबईचे ट्रस्टीज्,स्वतः लक्ष घालून सेंटरचे व्यवस्थापन पाहतात.  तेव्हा अशा या श्री माताजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण  हेल्थ सेंटरला स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नक्की भेट द्यावी आणि हो नवीन साधकांना ते सहजयोगात सहा महिने, वर्षभर स्थिर होईपर्यंत तिकडे जाण्याचा सल्ला देऊ नये. सहजयोगात स्थिरवले की मग त्यांना पण पाठवायला काही हरकत नाही.

अधिक माहितीसाठी 

International Sahajayiga Research and  Health Centre असे गूगल सर्च करा. 


जय श्री माताजी!

लेखक - सहजयोगी साधक - योगीराज देवकर. पुणे.

Friday, 13 June 2025

घरातील ग्रंथालयात

 आमच्या घरातील ग्रंथालयात ...


A) ग्रंथ...

1) श्री ज्ञानेश्वरी.

2) सार्थ श्रीमत दासबोध.


B) कादंबरी...

1) राजा शिव छत्रपती - श्री. बाबासाहेब पुरंदरे.

2) मृत्युंजय- श्री. शिवाजी सावंत.

3) राऊ - श्री.ना.सं. इनामदार.

4) राधेय - श्री. रणजित देसाई.


C) आत्मचरित्र...

1) सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा- महात्मा मो.क. गांधी.

2) की नोट - भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या भाषणांचा संग्रह.

3) जे आर डी - मी पाहिलेले - डॉ.द.रा. पेंडसे.

4) कालापुढती चार पाउले - श्री.शांतनुराव किर्लोस्कर यांचे समग्र चरित्र - सविता भावे.

5)उंटावरचा प्रवास - श्री. काकासाहेब दांडेकर. कॅम्लीन.

6) 21 व्या शतकाकडे - डॉ नीलकंठ कल्याणी यांचे विचारधन - सविता भावे.भारत फोर्ज.

7) Forging Ahead - Dr Neelkanth Kalyani - Savita Bhave.

8) कर्म चाले संगती - श्री गजाननराव पेंढरकर. विको लॅबोरेटरीज्.

9) बिकट वाट यशाची - हुकमीचंद चोरडिया - प्रवीण मसालेवाले - मधुबाला चोरडिया.

10) उद्योग पर्व - श्री.बी. जी.शिर्के -शिर्के सिपोरेक्स.

-जिद्द - संक्षिप्त उद्योगपर्व.

11)निव्वळ जिद्दीतून - पद्मश्री आण्णासाहेब बेहरे - सविता भावे.

12) मी कसा झालो - आचार्य प्र.के.अत्रे.

13) Dreams Become Reality- Dr.R.J.Rathi - Sudarshan Chemicals.

14) जगाच्या पाठीवर - श्री.सुधीर फडके.

15) धोंडो केशव कर्वे - महर्षी कर्वे.

16)राळेगणसिद्धी - एक कायाकल्प - पद्मभूषण अण्णा हजारे.

17)राळेगणसिद्धीचा कर्मयोगी अण्णा हजारे - सुरेशचंद्र वारघडे.

18) राजश्री शाहू छत्रपती - प्रा.रा.तु. भगत.

19) लक्ष्मणरेषा - श्री. आर.के. लक्ष्मण.

20) प्राचार्य - श्री. शिवाजीराव भोसले - प्रा. मिलिंद जोशी.

21) आइन्स्टाईनचे विश्व - डॉ. निवास पाटील.

22) अग्नीपंख - डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम.

23) सृजनांचा सारथी - श्री. राजेंद्र देशपांडे.


D) यशस्वी उद्योजकांच्या, व्यक्तींच्या कथा...

1) थॉट लीडर्स - श्रीनिवास पंडित.

2) उद्योजक महाराष्ट्र - श्री.आ.रा.भट.

3) असे घडले उद्योजक - श्री.विलास आहेर.

4) शोध उद्यम शिलतेच्या प्रेरणाचा - श्री. जयंत रानडे.

5) उद्योग संपदा - सुधाकर जोशी.

6) पोलादी माणसं- दत्ता जोशी. नाशिक जिल्हा.

7) दीपस्तंभ - प्रा. शिवाजीराव भोसले.


E) उद्योजकता...

1) उद्योजक बना - डॉ. दिलीप सरवटे.

2) सहयोजक बना - डॉ. दिलीप सरवटे.

3) ज्ञानयोजक बना - डॉ. दिलीप सरवटे.

4) उद्योजकता विकास - डॉ. प्रभाकर देशमुख.

5) उद्योजकता - डॉ. दत्ता देशकर.


F) वक्ता - भाषण...

1) सभेत कसे बोलावे - श्री. माधव गडकरी.

2) भाषणे कशी करावीत - प्रा.वा.शि. आपटे.

3)कथा वक्तृत्वाची - प्रा. शिवाजीराव भोसले.


G) डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम...

1) भारत 2020.

2) मी देशाला काय देऊ शकतो? सृजन पाल सिंग.


H) श्री.अच्युत गोडबोले...

1)मनात-मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर.

2)बोर्डारूम-व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर.


I) श्री. शिवराज गोर्ले...

1) सामना.

2) मजेत जगावं कसं?

3) बदला तुमचं भविष्य.

4) यशस्वी व्हावं कसं?

5) मस्त राहावं कसं?

6) सांगा,कसं जगायचं..


J) कविता...

1) एल्गार - श्री. सुरेश भट.

2) मैं शायर - श्री. प्रदीप निफाडकर.

3) भारत कधी कधी माझा देश आहे - श्री. रामदास फुटाणे.

श्री. प्रकाश खोटे...

4) साधना.

5) शब्द जरी हेच होते.

6) माणसा सारखी माणसं.

7) दोन थेंब - खंडकाव्य.

8) मौनाची भाषांतरे - श्री. संदीप खरे


K) व्यक्तिमत्व विकास...

Edward D Bono's books

1) Opportunities.

2) Lateral Thinking.

3) Body Language - Allan Pease.

4) Realize Your Potential - V Pekelis.

5) 7 Habits of Highly Effective People.

6) 8th Habit - Stephen R. Covey.

7) Emotional Intelligence - Daniel Golman.

8) Think and Grow Rich - Napolean Hill.

9) घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती - डॉ.ह.वि. देसाई.

10) मनाचा शोध - डॉ. स्वर्णलता भिशीकर.

11) Rich Dad Poor Dad- Robert Kiyosaki.

12) How to win friends & influence people - Dale Carnegie.

13) What they don't teach you at harvard business school - Mark McCormark.

14) You Can Win.

15) Freedom is not free - Shri Shiv Khera.


L) Soft Skills...

1) Business Communication - Anjali Kalkar.

2) The skils of leadership - John Adair.

3) Solving your problems - Luis Vas

4) Decision making - 

5) Time management - Aarti Gurav.

6) Life Skills -


M) साहस आणि प्रवास वर्णन...

1) सागरमाथा - श्री श्रीहरी अशोक तापकीर.

2) माझी मुलुखगिरी - श्री. मिलिंद गुणाजी.

3)नवी दिशा - पोलीस प्रशासनाची नवी दिशा - श्री. सुरेश खोपडे.

4) बचतगटांच्या माध्यमातून गरिबीमुक्त विश्वाची निर्मिती - श्री. मोहंमद युनूस.

5) एक होता कार्व्हर - सौ. वीणा गवाणकर.

6) एका काडातून क्रांती - मासानोबु फुकुओका.


N) आध्यत्म...

1) सहजयोग - 50 पेक्षा अधिक पुस्तके.

2) आध्यात्मिक व्यवस्थापन शोध आणि बोध - डॉ. श्रीकृष्ण गजानन बापट.


O) इतर पुस्तके...

100 पेक्षा अधिक.

Tuesday, 10 June 2025

माझा साहित्य प्रवास

 माझा साहित्य प्रवास.


-महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिक रोड शाखेचे   श्री.उन्मेष गायधणी,कार्याध्यक्ष, श्री. रवींद्र मालुंजकर, कार्यवाह, श्री.सुदाम सातभाई, खजिनदार,सौ. तनपुरे मॅडम,इतर सर्व पदाधिकारी, सर्व सभासद आणि सृजन श्रोतेहो!

आपल्यासमोर माझा साहित्य प्रवास उलगडताना मला आनंद होत आहे.


माझे बालपण लोणी देवकर या गावी गेले. लहानपनापासून मला घरात आणि गावात वाढीसाठी पोषक वातावरण होते .


शिक्षणासाठी पाचवीला मला तालुक्याच्या ठिकाणी इंदापूरला पुढे 

सहावीपासून जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्याला पाठविण्यात आले.


सहावितला एक प्रसंग मला आठवतो. जून - जुलै महिना असेल, पुण्यात खूप पाऊस पडत होता. मुठा नदीला पूर आला होता. पुराचे पाणी लकडी पुलाच्या धोकादायक पातळी पर्यंत वाढले होते. लोकं नदीला आलेला पूर पहायला जात होते. आम्ही श्री शिवाजी मराठा होस्टेलमधील मुलं पण एका रविवारी पावसात भिजत पूर पहायला गेलो होतो. फार रोमांचक अनुभव होता तो.

दुसऱ्याच दिवशी वर्गात सरांनी आम्हाला ' मी पाहिलेला पाऊस ', या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता . 

मी लिहलेल्या उत्कृष्ट निबंधमुळे माझे वर्गात खूप कौतुक झाले होते .

सर म्हणाले होते, " तु मोठा झाल्यावर लेखक होशील. " मला असं वाटतं, त्यानंतर माझ्यात लिखाणाची गोडी उत्पन्न झाली.


महाविद्यालयीन जीवनात स्मरणीकामधे लेख लिहणे , प्रवास वर्णन लिहणे इतकच काय ते माझं साहित्य योगदान होतं.


-मिटकॉन, एमसिईडी नोकरी आणि त्यानिमित्ताने लिखाणाचे दालन उघडे झाले.


-आपले नांव वर्तमानपत्रात  छापून यावे अशी इच्छा असायची. तेव्हा पुण्यातील सकाळ, लोकसत्ता, वर्तमानपत्रात बातमी येणं ही फार मोठी बाब असायची . 


तुम्ही गुन्हा केला, तुमचा अपघात झाला तर तुमचे नांव आपोआप पेपर मध्ये छापून येते किंवा तुम्ही काहीतरी समाजउपयोगी कार्य करत असाल तर वर्तमानपत्र तुमची दखल घेतं. 


मिटकॉन आणि एमसिईडीच्या नोकरीमुळे मला अनेक नामवंत वर्तमानपत्रात लिखाणाची संधी मिळाली .


-पेपरमध्ये लेख प्रकाशित होण्याचा एक दिवस मला चांगलाच आठवतो. रत्नागिरीत - एकाच दिवशी माझे 'रत्नागिरी टाइम्स', 'रत्नभूमी', 'सागर ' या तीन वर्तमान पत्रात लेख छापून आले होते.


1986-87 असा काळ होता जेव्हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे वाचन साहित्य इंग्रजी भाषेत उपलब्ध असायचे. महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी ते मराठी भाषेत असणे आवश्यक होते. 


माझे योगदान...

1) EDP वाचन साहित्य भाषांतर केले.

2) MCED प्रशिक्षण कार्यक्रम वाचन साहित्य तयार केले. 


-EDP मध्ये वक्त्याचे सेशन सुरु झाल्यापासून संपेपर्यंत मी ट्रेनिंग हॉलमधे बसून सगळे सेशन्स पूर्ण ऐकायचो. कधीच थिएटरच्या डोअर कीपर सारखा वागलो नाही. यामुळे माझा सर्व विषयांचा अभ्यास होत गेला. 


3) श्री. मनोहर नाडकर्णी NIMID , श्री. रमेश दवे, EDII - Ahmedabad. यांचे AMT अटेंड केले आणि त्यावर आधारित  लिखाण केले.


4) AMT ट्रेनर्स मॅन्युअल निर्माण केले आणि रानडे साहेबांना आनंद झाला.


5) नावीन्यपूर्ण जाहिराती आणि स्लोगन्स - बालगंधर्व नाट्यगृहात नाटक पहात असताना सुचले. 

"प्रदर्शन नव उद्योजकांच्या उत्पादन वस्तूंचे 

पाहण्यासाठी आपण खात्रीशीर यायचे 

प्रयत्न आहेत हे आमचे आणि प्रशिक्षणार्थिंचे 

पाहुन ठरवा तुम्हीही उद्योजक बनायचे ."


6) आवडते विषयांचे भरपूर वाचन...200 पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन.


माझं जे काही साहित्य योगदान आहे ते केवळ उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, संस्था विकास या विषयांपुरतच मर्यादित आहे. 

पण उद्योजकता या विषयावर मराठीत पुस्तक लिहणारा मी पहिलाच लेखक आहे. माझ्या नंतर अनेकांनी लिहले आहे.


कधी कधी मला वाटते, मी जर कृषी,महसूल,पोलीस अशा दुसऱ्या कोणत्या विभागात नोकरी केली असती तर तिथेही असंच अभ्यासपूर्वक  लिखाण केलं असतं.


7) बारामती - उद्योजकता विकास कार्यक्रम प्रचार पुस्तिका लिहली.

-'मिटकॉन ते एमसिईडी',लेख लिहला. खरंतर हा लेख मिटकॉन च्या MD किंवा MCED च्या कार्यकारी संचालकाने लिहायला हवा होता. पण मी आणि विश्वास देवकरने तो 1988 च्या दिवाळीच्या सुट्टीत लिहला. 


-कोणताही लेख लिहताना त्या विषयाचा विषय प्रवेश - मुख्य भाग - उपयुक्त शेवट अशी रचना असते . लेखकाच्या डोक्यात हा विषय 24 तास  फिरत असतो . 

या विषयाचा शेवट मला भारदस्त वाक्यांनी करायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी संडासला बसलेलो असताना मला पुढील वाक्य सुचली...

... "उद्योजकता विकासाची घोडदौड जर अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्रात घराघरात उद्योजक ही स्थिती फार दुर नाही."


8) ठाणे, नांदेड, रत्नागिरी, बारामती, पुणे,  कार्यक्रमांच्या स्मरणीका प्रकाशित केल्या.


9) 'उद्योजक',' संपदा 'अशा मासिकमधून लेख प्रकाशित केले.


आतापर्यंत माझे वर्तमाणपत्र आणि मासिकमधून बरेच लिखाण झाले होते. 

आता आपण पुस्तक लिहावे असे मला सुचले. 


-'उद्योजकता',  यापहिल्या पुस्तकासाठी श्री.गंगाधर महांबरे  यांचे मार्गदर्शन लाभले.


10) 'उद्योजकता', पुस्तक लिखाण - 1987 ते 1991 पर्यंत मी Achievement Motivation Training या विषयात पुष्कळ काम केले होते. हा विषय मला आत्मसात झाला होता. उद्योजकीय संकल्पनांचा विचार केला तर हा विषय मला तोंडपाठ झाला होता. त्यावरच आता पुस्तक लिहायचे होते. 


श्री विश्वास देवकर याने शब्दांकन केले आणि श्री शशिकांत कुंभार याने पुनर्लेखन लेखन केले.

-श्री राजू देशपांडे यांनी पुस्तकाला illustrations दिले आहेत.

-श्री कै मनोहर नाडकर्णी  यांची पुस्तकास प्रस्तावना लाभली.


पुस्तक प्रकाशनासाठीचे दोन प्रयत्न...


-महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय, महाराष्ट्र राज्य यांनी माझे पुस्तक प्रकाशित करावे असा प्रयत्न.

त्यांनी 'उद्योग साधना ', हे पुस्तक प्रकाशित केले होते. 

60000 प्रती 50000 प्रती 5000 प्रती...


तेव्हा श्री विनय बन्सल हे विकास आयुक्त उद्योग आणि श्री विलासराव देशमुख, उद्योग मंत्री होते. 


मी माझे मोठे भाऊ कालिदास देवकर, श्री उल्हासदादा पवार, श्री. उत्तमराव आरडे, अशा आम्ही सर्वांनी मंत्रालयात खूप प्रयत्न केले.

पण श्री विनय बन्सल यांनी या प्रस्तावास नकार दिला.'उद्योग साधना', या विषयाची दुसरी बाजू म्हणजे 'उद्योजकता ', या विषयाचे महत्व समजून त्यांनी माझे पुस्तक प्रकाशित करायला काहीच हरकत नव्हती पण त्यांनी इगो पॉईंट केला.


-मिटकॉनचे तत्कालीन MD श्री एस पी रानडे आणि कॉन्टी्नेंटल प्रकाशनचे श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.


-पुस्तक एक, दीड वर्षे वेटिंग लिस्टवर होते.

-विषय कॅटेगरी - वाणिज्य.

11) दरम्यान दुसरे पुस्तक तयार झाले. 'व्यावसायिक उद्योजकता ', गाज प्रकाशनने प्रकाशित केले. 

-लेखकाला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. 

आता लेखकाचे लौकिक अर्थाने वजन वाढले होते, त्यामुळे पुस्तक वेटिंग लिस्ट मधून बाहेर आले. 

-कै. अनिरुद्ध कुलकर्णी, फार मोठ्या मनाचा माणूस होता.


प्रकाशन समारंभ - डॉ. आप्पासाहेब पवार, श्री. यशवंत भावे, विकास आयुक्त, उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य. कै. अनंतराव कुलकर्णी, श्री. उल्हासदादा पवार यांच्यासारखे दिग्गज पहिल्या रांगेत बसले होते.


-श्री. सुभाष दांडेकर, कॅम्लीन, डॉ. सुधीर गव्हाणे, जे पुढे मराठावडा विद्यापीठचे कुलगुरू झाले त्यांनी पुस्तक परीक्षण लिहले.


-'उद्योजकता' - पुस्तकातील शेवटच्या चार ओळी.

'हीच वेळ आहे, वाजवी साहस पत्करण्याची,

हीच वेळ आहे, अनेक समस्या सोडविण्याची,

हीच वेळ आहे, पुढाकार घेवून यशस्वी होण्याची,

हीच वेळ आहे, स्पष्ट ध्येय ठरविण्याची...उद्योग विश्वात पदार्पणाची!'


12) 'उद्योग संधी, शोधा म्हणजे सापडेल', पुस्तक. 

संकल्पना - Business Opportunity Search & Scanning.

'हे जग उद्योग संधीन्नी भरलेले आहे, तुम्हाला ती संधी दिसली तर.'

-पुण्यात दुसरे उद्योजकीय मराठी साहित्य संमेलन नियोजित होते, त्यात नवीन पुस्तक प्रकाशित करावे असा विचार मनात आला.

-पुणे- कोल्हापूर बस प्रवासात पुस्तकाचे नांव आणि अनुक्रमणिका तयार झाली आणि खूप कमी वेळात पुस्तक संहिता तयार झाली.


प्रस्तावना -

डॉ.बी.आर.साबडे, सेक्रेटरी, MCCI & ए

शब्दांकन - श्रीमती आनंदी कुलकर्णी काकू.

प्रकाशन - दुसरे मराठी उद्योजकीय साहित्य संमेलन -पुणे.

डॉ. गंगाधर गाडगीळ.


नावीन्यपूर्ण उद्योग संधी...

या पुस्तकात लिहलेल्या बिसनेस आयडिया वर पुढे उद्योग आले. 1) काउन्ट डाऊन सिग्नल. 2) सूर्यच जर पृथ्वीपासून 1000 किमी वर स्थिर केला तर. इ.


-पुणे विद्यापीठ स्टडी बोर्ड - विषय- व्यावसायिक उद्योजकता, सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

डॉ. श्रीपाद कडवेकर,डीन, वाणिज्य विभाग, पुणे विद्यापीठ,

डॉ. रवींद्र कोठावदे,C T Bora कॉलेज शिरूर.


13) Motivation Academy प्रकाशन - 

-'उद्योगी मेहनती व्यक्तिमत्व विकास", पुस्तक.

-एक स्वप्न पडलं आणि डॉ एलीस अल्बर्ट यांची REBT सोपी करून सांगण्यासाठी उदाहरण मिळालं.


14)'जीवन कौशल्ये',

15)'अविरत संस्था विकास',ही पुस्तके लिहून तयार आहेत.


ज्यांना लिहायची आवड आहे त्यांना सोशल मीडिया मुळे अनेक माध्यमं उपलब्ध झाली आहेत.

FB

www.yogirajdeokar.blogspot.com 

ब्लॉग लिखाण.


पण पेपर माध्यम सर्वांत प्रभावी माध्यम आहे. त्याची retention value  अधिक आहे.


तुमची अटीट्युड म्हणजे अभिवृत्ती...रुझान.


तुमची ॲपटीट्युड म्हणजे अभिरुची, प्रतिभा, योग्यता. स्वतःच्या या दोन्ही बाबी समजून घ्या.

स्वतःची प्रतिभा उभारणीसाठी वाचन करा , प्रशिक्षण घ्या, चिंतन आणि मनन करा.


-स्वतः अनुभव, अनुभूती घ्या. स्वतःचा समज, perception, awarness level वाढावा.


भाषांतर केल्याने शब्द संग्रह वाढतो.

समानार्थी शब्द संग्रह वाढावा.


प्रत्येकाची जन्माला आल्यानंतर 

ऐकणे 

बोलणे 

वाचणे 

लिहणे 

शिकणे आणि उपयोगात आणणे अशी वाटचाल होत असते. 

लेखक व्हायचे असेल तर हे चारही घटक आणि विषयाचे चिंतन, मनन उपयोगात आणणे महत्वाचे ठरते...


आपणाशी हितगुज साधण्याची संधी मला दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.


योगीराज देवकर.

Thursday, 10 April 2025

कालिदास (आप्पा ) देवकर यांचा 80 वा वाढदिवस

 देवकर कुटुंबियां तर्फे शुभेच्छा पत्र...


आ.मा.श्री.कालिदास हरिश्चंद्र देवकर उर्फ आप्पा तुम्ही 

लोणी देवकर गावाला आणि देवकर घराण्याला तुमच्या राजकीय, सामाजिक कार्य कर्तृत्वाने ओळख निर्माण केली आहे.


कै.हरिश्चंद्र उर्फ आण्णा आणि कै.हिराबाई उर्फ भाभी यांना कालिदास(आप्पा), पृथ्वीराज(बप्पा ), रत्नाकवी(बापू ), योगीराज(आबा ) ही चार मुलं आणि कै.मनोरमा(आक्का ) आणि सौ.शशिकला(ताई ) या दोन मुली अशी सहा अपत्य झाली.कै.मनोरमा (आक्का ) हे पहिले कन्यारत्न. कै. सुभाष आप्पासाहेब पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी पाटील घराण्याचा वारसा जपला आणि वाढवीला.कालिदास(आप्पा ) हे दुसरे अपत्य.दुसऱ्या भगिनी सौ. शशिकला( ताई ) यांचा श्री अरविंद संपतराव जामदार यांच्याशी विवाह झाला. त्यांनी जामदार घराण्याचा वारसा जपला आणि वाढविलेला आहे.


कालिदास आप्पा तुमचा जन्म 10/04/1945 रोजी झाला. तुम्ही वयाची 80 वर्षें पूर्ण करीत आहात. 80 वर्षाच्या आयुष्यात 80 गुणिले 12  म्हणजे 960 पौर्णिमा तसेच 32 अधिकमास महिन्यात 32 पौर्णिमा अशा 992 पौर्णिमा अनुभवल्या आहेत.81 व्या वर्षात 8 च महिन्यात तुमचे 1000 पौर्णिमांचे चंद्र दर्शन पूर्ण होणार आहे.तुमचे सहत्रचंद्र दर्शन हा तुमच्यासाठी आणि तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठी फार मोठा योग आहे.


सन 1967 मध्ये कालिदास आप्पा तुमची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सुरु झाली. तुमच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे...


सुरुवातीलाच तुम्ही लोणी देवकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन झाला आणि पुढे 25 वर्षें बिनविरोध चेअरमन पदी राहिलात .

सन 1975 मध्ये तुमची गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आणि पुढे तुम्ही 1995 पर्यंत वीस वर्षें गावच्या सरपंच पदी विराजमान राहिलात .

त्याच काळात इंदापूर तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमनपदही तुम्ही भूषविले.

सन 1984 पासून इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे सलग 15 वर्षें संचालक राहिलात.

पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे  सलग 15 वर्ष संचालक राहिलात.

याचदरम्यान इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे संचालक पदी पण राहिलात.

पुढे तुम्ही पुणे जिल्हा परिषदचे सदस्य झालात. आम्हा सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब होती.

खरंतर तुमची राजकीय वाटचाल इतकी चांगली होती की, तुम्हाला इंदापूर तालुका पंचायत समिती सभापती पद, पुणे जिल्हा परिषद, अध्यक्ष पद मिळायला हवे होते.असो!


आता तुम्ही राजकीय कुस्ती सोडली होती परंतु गावाला तुमची पुन्हा गरज भासली म्हणून तुमच्या वयाच्या 76 व्या वर्षी गावकऱ्यांनी तुम्हाला पुन्हा सरपंच होण्याचा आग्रह केला आणि तुमची पुन्हा निवडही केली आहे. आजच्या राजकीय वाटमारीच्या वातावरणात ही विशेष उल्लेखनीय बाब ठरावी.


आपले वडील कै.आण्णा आणि आई कै.भाभी यांनी सर्व मुलांवर फार चांगले संस्कार केले. कै.भाभी कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या.भावकी,गावकी चा आदर,पाहुणचार करण्यात आणि एकोपा ठेवण्यात त्यांचा हातभार होता. कै.आण्णा फार मोठा माणूस. त्याकाळात एक चांगला शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांचे नाव आणि दबदबा होता. 152 एकरांचा 7/12 देवकर कुटुंयाच्या नावावर होता. इतकी सर्व शेती ते एकटे सालकरी गड्यांच्या माध्यमातून करत होते. आजही भू दान चळवळ,खडकवासला कॉलनी आणि कालवा,MIDC ला दिलेली जमीन वगळता सर्व जमीन कुटुंबियांकडे आहे. असे हे भारदस्त आण्णा तुम्हाला नेहमी सांगायचे, "कालिदास, देवाने आपल्याला खूप काही दिले आहे. तुला सामान्य लोकांची सेवा करायची आहे. काम करताना आपले दोन पैसे खर्च झाले तरी होऊदे पण निस्वार्थपणे लोकांची सेवा कर." तुम्ही पण तसेच वागला म्हणून समाजात तुमचे नाव झालेले आहे.


तुमच्या या कार्यकाळात तुम्ही आमदार, खासदार, मंत्री यांच्या मदतीतून गावासाठी नळ पाणीपुरवठा योजना आणली. गावातील मुलांसाठी माध्यमिक हायस्कूल सुरु केले. गावातील प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेसाठी शासकीय फंडातून इमारती बांधून घेतल्या.

गावातील तरुणांना सहकारी,शासकीय क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिल्या.

गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आणली. त्यानंतरच्या कालावधीत गावात देना बँकेची म्हणजे आजची बँक ऑफ बडोदाची शाखा  आणली.

सर्वसामान्यांच्या दळणवळणाच्या सेवेसाठी गावात टेलिफोन एक्सचेंज सुरू केले. 

गावच्या सामाजिक उपक्रमात तुमचा सतत सहभाग राहिला आहे.

गावच्या गोरगरीब लोकांना शासनाच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ  मिळवून दिलेला आहे. 

उजनी जलाशयाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी गावात विद्युत महामंडळाचे केंद्र उपलब्ध केले.

गावात खडकवासला प्रकल्पाच्या  कॉलनीला एकत्रित असताना आपली जमीन दिली. लोणी देवकर एमआयडीसी साठी पुढाकार घेतला आणि स्वतःची पुष्कळ जमीन पण एमआयडीसीला दिली.  लोणी देवकर एमआयडीसी मुळे स्थानिकांना रोजगाराच्या, उद्योगाच्या शेकडो संधी तुमच्यामुळे उपलब्ध झाल्या.

गावात आरोग्य सेवा उपकेंद्र आणले.

ग्राम सचिवालय उभारले.

सद्यस्थितीत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल योजनेचे काम मंजूर आहे.


या आणि अशा अनेक कामांमुळे तुम्ही जनमानसात लोकप्रिय आहात.


तुम्हाला तुमची पत्नी सौ. प्रकाशबाई (वहिनी) यांची मौलिक साथ लाभली. तुम्हा उभायतांची मुलं,नानासाहेब आणि विद्यासागर(तात्या ), सुना,वैशाली आणि नूतन, नातवंडे तन्वी, राजवीर आणि साईराज, असा तुमचा संसाररूपी वृक्षवेल बहरला आहे.देवकर कुटुंबीय, भावकी आणि गावकीची साथ लाभली म्हणून तुम्ही हे सर्व करू शकला हे नक्की.


देवकर कुटूंबातले कोण जर कधी तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर एक अनुभव आम्हाला बऱ्याचदा आला आहे . एखादा अनोळखी माणूस आम्हाला विचारतो. "काय पाहुणे कुठून आलात तुम्ही?" आम्ही म्हणतो, "इंदापूर." त्यांचा पुढचा प्रश्न असतो, "प्रॉपर इंदापूर का?" आमचे उत्तर असते, "नाही, लोणी देवकर." मग त्यांचा पुढचा प्रश्न, "लोणी देवकर, मग कालिदास देवकरला ओळखता का?" आमचे उत्तर, "ते मोठे भाऊ आहेत माझे." मग काय त्या माणसाच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद तरळतो आणि आमची छाती अभिमानाने थोडी फुगते. ओळखीचे खूप मोठे जाळे तुम्ही विनलेले आहे.


वडील कै.आण्णा फार हुशार आणि धोरणी होते. अंकगणिताचे पाढे, पंचांग, पौराणिक माहिती, इ. त्यांना अगदी तोंडपाठ असायची.हिशेबाची वही ते मोडी लिपीत लिहायचे आणि सही पण मोडी लिपीतच करायचे,ते नेहमी म्हणायचे,"केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार l

शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार l 

याचा उपयोग तुम्ही देशाटन, मैत्री, सभा, हुशारी साठी केला. फार फिरलात तुम्ही.

खा.शंकरराव भाऊ कडे गावातले कार्यकर्ते गेले की, ते त्यांना तुमच्याबद्दल हमखास विचारायचे," काय मग, कुठे गेलाय आज तुमचा नेता,पुण्याला का मुंबईला." कारण तुम्ही उटसूट पुण्या, मुंबईला जायचे. असच एकदा भाऊंनी विचारले तर कार्यकर्ते म्हणाले, "आज आमचा नेता दिल्लीला गेलाय भाऊ.' खा.भाऊ एकदम चकित,"आsss, दिल्लीला कशाला गेलाय." असं तुमचं असायचं, आज इथं तर उद्या तिथं. अगदी थायलंड, इंडोनेशिया पण फिरून झालं तुमचं.


आप्पा,तुम्ही तुमच्या कार्य कर्तृत्वाने गावाला आणि देवकरांना चांगली ओळख दिली आहे. यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे.


तुमच्या आयुष्यात आलेल्या या सहत्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शतकपूर्तीसाठी अनंत शुभेच्छा.


आपणांस कुटुंबियांच्या वतीने हे शुभेच्छा पत्र देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.


आपले स्नेहांकित.

देवकर कुटुंबीय, लोणी देवकर.

शब्दांकन - योगीराज देवकर.