Monday, 15 September 2025

आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर.

 सूक्ष्म शरीर यंत्रणेचा (Subtle body system's) दैवी स्कॅनर-आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर - सिबीडी- बेलापूर, नवी मुंबई.


जय श्री माताजी!


डॉक्टर्स स्थूल शरीराच्या बाबतीत ठराविक वयानंतर लोकांना रुटीन चेकअप करायला सुचवितात. यात ब्लड, युरीन टेस्ट, एक्सरे, सोनोग्राफी किंवा गरजेनुरूप स्कॅन असू शकतात. रिपोर्ट्स पाहुन स्थूल शरीराच्या आरोग्याचे निदान केले जाते.


जगात असा कुठे स्कॅनर आहे का, ज्याद्वारा  सूक्ष्म शरीर यंत्रणेचा स्कॅन केला जावू शकेल. 

हो आहे! 

हा स्कॅनर म्हणजे परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी मानवजातीस दिलेली अप्रतिम भेट आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर - सिबीडी - बेलापूर, नवी मुंबई. इथं सूक्ष्म शरीर यंत्रणा स्कॅन होते असं म्हटलं तरी वावगे होणार नाही. या प्रकारचे हे जगातील वैशिष्ट्यपूर्ण सेंटर आहे जिथे प्रत्यक्ष श्री माताजींनी सांगितलेल्या फक्त चैतन्य लहरीच्या जाणीवेवर आधारित सहजयोगा  प्रॅक्टिसेस प्रमाणे उपचार केले जातात. 


इडा नाडी जास्त थंड झाली तर किंवा पिंगला नाडी जास्त उष्ण झाली तर मानवी सूक्ष्म शरीर यंत्रणा असंतुलित होते. अहंकार किंवा प्रतीअहंकार वाढतो, सु्षुमना नाडीवर दाब येतो, चक्रांवर बिघाड होतात . असं काही घडलं की, व्यक्तीचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. हे इतकं सूक्ष्म लेवलवर घडते की, प्रत्येक सहजयोग्याला हे बारकावे कळतीलच असे नाही.


म्हणून असे म्हणावेसे वाटते की, आपण स्थूल शरीराच्या बाबतीत जसे निरोगी असतानाच रुटीन चेकअप करत असतो अगदी तसेच चेकअप सूक्ष्म शरीराच्या बाबतीत पण हेल्थ सेंटरला जावून का करू नये .असे केले तर शरीर निरोगी राहण्यास सहाय्य तर होईलच पण महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक प्रगती लवकर होईल. 


सहजयोगात महत्वाचे आहे ध्यान. ध्यानाने संतुलन प्राप्त होते , निर्वीचार ,निर्विकल्प स्थिती येते, आत्मविष्कार होतो, परमात्म्याशी योग घटित होतो. यासाठी दररोज दिवसातून किमान दोनदा दहा दहा मिनिटे निर्वीचार अवस्था लाभली आहे अशा स्थितीत ध्यान व्हायला हवे आहे. ध्यान घडतंच मुळात व्यक्ती संतुलित असेल तर. आध्यात्मिक प्रगतीसाठी श्री माताजींनी जसे दररोज ध्यान करायला सांगितले आहे तसेच संतुलन लाभण्यासाठी , ध्यान लागण्यासाठी पूरक ठरतील अशा क्लिअरन्स करिता गरजेनुसार करायला हव्यात अशा काही ट्रीटमेंट्स पण सांगितल्या आहेत. जशा की, मीठ- पाणी, जोडेपट्टी,कॅण्डल, आइस पॅक, घी- कापूर, सहस्त्रार मसाज,पेपर बर्निंग, थ्रेड नॉट बर्निंग, मटका,नाड्या व चक्र संतुलन व शुद्धीसाठी मंत्र व प्रार्थना,इ. हेल्थ सेंटरला गेलं की,तिथले डॉक्टर्स तुमच्या सूक्ष्म शरीर यंत्रणेचे व्हाब्रेशन्स पाहुन चेकअप करतात आणि तुम्हाला आवश्यक त्या सहजयोगा ट्रीटमेंट्स विनासायास मिळतात. इथे कोणतेही औपचारिक औषध दिले जात नाही.


मुळात हे हेल्थ सेंटर श्री माताजींनी स्वतः डिझाईन करून निर्माण केलेले आहे. इथे श्री माताजींची विश्रांतीची रूम , मेडिटेशन हॉल, OPD, IPD क्लिनिक हॉल्स, डॉरमेटरिज, प्रायव्हेट रूम्स, लायब्ररी, सहज मटेरील शॉप, स्टेज,बगीचा,कॅन्टीन अशा पुष्कळ सोई सुविधा उपलब्ध आहेत. त्याही एकदम वाजवी किंमतीत.नवी मुंबईत असूनही हेल्थ सेंटरच्या मागील भागात जंगल आहे. हेल्थ सेंटर मध्ये OPD ( आऊट डोअर पेशंट्स ) आणि IPD ( इन डोअर पेशंट्स )अशी सुविधा आहे . तुम्ही अर्धा/पूर्ण दिवस जावून उपचार घेऊ शकता किंवा तिथे काही दिवस राहून उपचार घेऊ शकता.


इथे OPD सेवा निशुल्क असते. पूर्ण दिवसासाठी प्रतिव्यक्ती 600 ₹ चार्जेस आहेत तर IPD  प्रतिव्यक्ती/ प्रतिदिन डॉरमेटरी 1000₹ आणि रूम 1500₹ आहे.एसी रूमसाठी थोडे जास्त. यात तीन वेळा चहा, ब्रेकफास्ट, दोन वेळचे जेवण , निवास याचा समावेश असतो. म्हणजे तुमचा पैसा तुमच्याच राहण्या- खाण्यावर खर्च होतो. इथं दिला जाणारा अजवाईन टी तर लाजबाब असतो. येथील चेकअप आणि सहजयोगा ट्रीटमेंट्स तर फ्री ऑफ कॉस्ट असतात. 


बरेच सहजयोगी असा विचार करतात की, हेल्थ सेंटरला कधी जावे? तिथे किती दिवस रहावे?सोबत काय घेवून जावे? तर प्रत्येक सहजयोग्याने निरोगी असतानाच हेल्थ सेंटरला वर्ष-दोन वर्षातून एकदा, किमान तीन-चार दिवसांसाठी जावे. कारण एक, दोन दिवस तर तुमची सर्विसिंग होण्यातच खर्च होतात, खरा अनुभव तर त्यानंतर सुरु होतो आणि शिवाय तीन दिवस राहिलात तर मटका ट्रीटमेंट घेता येते. हेल्थ सेंटरला वर्षभर भारतातल्या विविध राज्यातून आणि परदेशातून अनेक सहजयोगी येत असतात. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत परदेशी सहजयोगी अधिक असतात. परदेशी सहजयोगी तर केवळ आध्यात्मिक उत्थानासाठी महिना, महिना इथे येवून राहतात. हेल्थ सेंटरमधील वास्तव्याबद्दल सहजयोगिनी भगिनींची प्रतिक्रिया तर त्या माहेरी आलेल्या आहेत अशी असते. आपण चौकशी करून तुलनेने जेव्हा गर्दी कमी असते तेव्हा बुकिंग करून जावे. स्वतः सोबत 'निर्मल विद्या ', 'निर्मल स्वरांजली ' ही पुस्तके ठेवावीत. मंत्र, भजने म्हणण्यासाठी पुस्तकांचा उपयोग होतो. आरामदायकपणासाठी सुती, सैल कपडे वापरावेत. एकदा का आपण हेल्थ सेंटरच्या कॅम्पस मध्ये गेलो की,पहाटे उठून ध्यान करणे , सकाळचा चहा,सकाळी 8 ते 9 ध्यान, 9 वाजता ब्रेकफास्ट, 11 पासून डॉक्टरांची IPD सुरु होते,डॉक्टरांनी सांगितलेल्या ट्रीटमेंट करणे,1वाजता दुपारचे जेवण,4 वाजता सामूहिकते सोबत मीठ- पाणी, जोडेपट्टी ट्रीटमेंट, 5 वाजता चहा, 6 ते 7 सायंकाळचे ध्यान, 8 वाजता रात्रीचे जेवण, झोपण्यापूर्वी मीठ - पाणी ट्रीटमेंट आणि ध्यान.  तिथे आपण पूर्णवेळ सहजयोगी झालेलो असतो. आपला दिवस कसा संपला ते समजत सुद्धा नाही. 


हेल्थ सेंटर बाबत एक गैरसमज आहे की, इथे आजारी पडल्यावरच जावे. तर असे नाही. 'Prevention is better than cure.' असे म्हणतात, त्याप्रमाणे आपण निरोगी असतानाच इथे जावे म्हणजे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होईल. विशेषतः युवाशक्ती समन्वयक, सहजयोग साप्ताहिक ध्यान केंद्र समन्वयक, सहजयोग प्रचार प्रसार टीमचे सहजयोगी सदस्य , विविध ठिकाणच्या सहजयोग ट्रस्टचे ट्रस्टीज, इ. यांनी जरूर इथे येवून ट्रीटमेंट घ्यावी. कारण अनुभव हीच खात्री असते.  त्यामुळे ते इतर सहजयोग्यांना हेल्थ सेटरचे महत्व आणि आध्यात्मिक लाभ याबद्दल खात्रीने सांगू शकतील.


सहजयोग्यांच्या संतुलन आणि क्लिअरन्स बद्दल श्री माताजी असे सांगतात की, सहजयोगी हे मेंटल लेवलच्या खूप वरती आहेत,त्यामुळे त्यांचे संतुलन, क्लिअरन्स हे स्पिरिच्यूअल लेवलवर होत असते.भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश हे इलेमेंट्स नाड्यांचे,चक्रांचे क्लिअरन्स करण्यात मुख्य भूमिका बजावतात. त्यासाठी समोर श्री माताजींचा फोटो असावा आणि फोटो समोर दिवा लावलेला असावा. श्री माताजींवर श्रद्धा, विश्वास असावा. आपण हे जाणतो की, कर्ता, करवीत्या श्री माताजी आहेत.तरीही माध्यम किंवा साधन म्हणून इथं कार्यरत असलेले,"जय श्री माताजी!" बोलून हसतमुखाने स्वागत करणारे सेक्युरिटी गार्ड्स,स्टाफ आणि डॉक्टर्स,

लिव्हर साठी उपयुक्त रुचकर, स्वाधीष्ठ डायट फूड वेळेवर पुरविणारे कॅन्टीन मधील शेफ आणि इथे सेवा देणारे डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी आलेल्या प्रत्येक साधकाला अगदी मनापासून सेवा देतात . इथे कार्यरत डॉक्टर्स आणि कर्मचारी सर्व सहजयोगीच आहेत आणि ते सहजयोग पद्धतीने चैतन्य लहरी आणि  प्रॅक्टिसेस द्वारा पंचतत्वावर आधारित उपचार करतात. 


यापूर्वी जर तुम्ही हेल्थ सेंटरला गेले असाल तर तुम्ही सेंटरमधील 

डॉक्टरांच्या सेवेचा अनुभव तुम्ही घेतला असेल. साधकांसाठी खूप कष्ट घेतात हे डॉक्टर्स. इथं काम करणारे डॉक्टर्स नोकरी नव्हे तर श्री माताजींचे कार्य आणि सेवा करतात असे त्यांचे योगदान पाहिले की जाणवते. 


इडा नाडी संतुलित, स्वच्छ असेल तर पवित्रता,मांगल्य,ममत्व,शुद्ध इच्छा,भावना,

विचारविवेक,आनंद,नवनिर्मिती,'स्व'चे अस्तित्व, इ.सूक्ष्मगुण प्राप्त होतात .

इडा नाडीचा अगदी सहज विचार केला तरी ही नाडी का खराब होते हे लक्षात येईल. श्री गणेशांच्या, श्री महाकालीच्या गुणांविरुद्ध वागले की,डाव्या मुलाधारावर दोष निर्माण होतो ,श्री गणेश तत्व खराब होते,स्वाधीष्ठानवर अशुद्ध इच्छा, विचार निर्माण होतात, मणिपूरवरील गुरुतत्व खराब होते, अनाहतवर आत्मतत्व बिघडते, डाव्या विशुद्धीवर अपराधीपणाची भावना वाढते,भीती वाटायला लागते,आज्ञावर प्रतिअहंकार वाढतो.मनुष्य भूतकाळात रमतो, आळशी बनतो,चिंता करतो,मग निराश होतो आणि शेवटी नैराश्याचा बळी ठरतो. असे हे तमोगुण वाढले की, मनुष्य स्वतःहून आजरांना निमंत्रण देतो.


पिंगला नाडी संतुलित, स्वच्छ असेल तर स्वाभिमान, प्रयत्न,कृती,निर्मिती,उद्योगी, बौद्धिक व शारीरिक कष्ट, कार्यक्षमता, लढाऊ वृत्ती, इ.सूक्ष्मगुण प्राप्त होतात.

आता हीच पिंगला नाडी असंतुलित कधी होते तर श्री कार्तिकेयांच्या, श्री महासरस्वतीच्या गुणांविरुद्ध वागले की,उजवे मुलाधार चक्र खराब होते,राक्षसी,पशु, आक्रमक,विचार वाढतात, लिव्हरची उष्णता वाढते आणि ती इतर  चक्रापर्यंत जाते,चक्र खराब होतात, मनुष्य अती क्रियाशील होतो, मर्यादांचा विसर पडतो,अहंकार वाढतो. रजोगुण वाढतात तसे काही आजार आपोआप तुमच्यामध्ये येतात.


इडा, पिंगला संतुलित, स्वच्छ झाल्या तर मनुष्य वर्तमानात राहतो,श्री महालक्ष्मी तत्व जागृत होते, सुषुम्ना नाडीचे सूक्ष्मगुण  धर्म, उत्क्रांती, 'स्व' च्या अस्तित्वाचा शोध,आत्मज्ञान, आत्मविष्कार, परमात्मा भेटीचा योग आणि सर्व चक्रांचे दैवी गुण प्राप्त होतात.मनुष्य जर असा सत्वगुणी झाला तर तो निरोगी तर होईलच पण संत पद प्राप्त करेल.


श्री माताजींनी लिहलेल्या पुस्तकात चक्र आणि पाकळ्यांची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे श्री माताजींनी प्रत्येक पाकळी आणि त्याखाली येणाऱ्या अवयवाचे नांव दिले आहे.


उदाहरणार्थ 

मुलाधार चक्र.(Pelvic plexus)

पेटल सब प्लेक्सस आणि नियंत्रित अवयव.

पाकळी एक - इन्फेरिअर हेमोरॉइडल : अवयव - गुदाशय (Rectum)

पाकळी दोन - व्हेसिकल: अवयव – मूत्राशय, वीर्यकोष (Vesiculae seminalis) आणि वीर्यवाहिनी (Vas deferens)

पाकळी तीन - प्रोस्टॅटिक : अवयव-  पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांमध्ये योनिचा भाग

पाकळी चार - युटेरिन: अवयव - स्त्रियांमध्ये गर्भाशय, गर्भाशयमुख (Cervix) आणि फलोपियन नलिका (Fallopian tubes), पुरुषांमध्ये वीर्यकोष (Vesiculae seminalis) आणि वीर्यवाहिनी (Vas deferens)


मुलाधार चक्र खराब झाले तर या शारीरिक अवयवांशी संबंधित आजार होवू शकतात. 


अशीच माहिती स्वाधीष्ठान, माणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा  सर्व चक्रा बाबत दिलेली आहे. अहो विशुद्धी चक्रावरील सोळा पाकळ्यांची नांवे आणि त्याखाली येणाऱ्या सोळा शारीरिक अवयवांची नांवे श्री माताजींनी दिली आहेत. किती हे अद्भूत ज्ञान आहे. विज्ञानाच्या पुढचे हे ज्ञान आहे.


सहजयोगी डॉक्टर्सना व्हाब्रेशन्स पाहुन चेकअप करताना तुमच्या कोणत्या चक्रावर पकड आहे, असंतुलनाचे कारण काय आहे,आजाराचे कारण काय आहे हे समजते आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट करायला हवी ते समजते.  काही उपचार ते करतात काही उपचार करण्यासाठी तुम्हाला होमवर्क दिला जातो . मग काय तिथे बसून करत रहायचे स्वतःचे क्लिअरन्स.मुळात आपण सहजयोगी आहोत, सहजयोग थोडा समजून उमजून केला की, संतुलन, निर्वीचारता लाभते. खरंतर आपण आजारी पडण्याची वाट कशाला बघायला हवी, त्याआधीच हेल्थ सेंटर गेलात तर कधी आजारी पडण्याची वेळच येणार नाही.


हेल्थ सेंटर मध्ये येवून उपचार घेतल्या नंतर चिंताविकार, काळजी, अपराधीपणाची भावना, उच्च रक्तदाब, फिट्स, दमा, सांधेदुखी, हृदयविकार, डोकेदुखी, (पंडुरोग)रक्तक्षीणता, इ. आजार बरी झाल्याची हजारो उदाहरणे आहेत . नियमित सहजयोग करणारांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता दुरावते , सहजयोगात कर्करोग सारखा गंभीर आजार देखील बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.


श्री माताजींनी जगातल्या सर्व सहजयोग्यांसाठी हि सुविधा उभारलेली आहे.आदरणीय श्रीमती कल्पना दीदी आणि एलईटी मुंबईचे ट्रस्टीज्,स्वतः लक्ष घालून सेंटरचे व्यवस्थापन पाहतात.  तेव्हा अशा या श्री माताजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण  हेल्थ सेंटरला स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नक्की भेट द्यावी आणि हो नवीन साधकांना ते सहजयोगात सहा महिने, वर्षभर स्थिर होईपर्यंत तिकडे जाण्याचा सल्ला देऊ नये. सहजयोगात स्थिरवले की मग त्यांना पण पाठवायला काही हरकत नाही.

अधिक माहितीसाठी 

International Sahajayiga Research and  Health Centre असे गूगल सर्च करा. 


जय श्री माताजी!

लेखक - सहजयोगी साधक - योगीराज देवकर. पुणे.

Friday, 13 June 2025

घरातील ग्रंथालयात

 आमच्या घरातील ग्रंथालयात ...


A) ग्रंथ...

1) श्री ज्ञानेश्वरी.

2) सार्थ श्रीमत दासबोध.


B) कादंबरी...

1) राजा शिव छत्रपती - श्री. बाबासाहेब पुरंदरे.

2) मृत्युंजय- श्री. शिवाजी सावंत.

3) राऊ - श्री.ना.सं. इनामदार.

4) राधेय - श्री. रणजित देसाई.


C) आत्मचरित्र...

1) सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा- महात्मा मो.क. गांधी.

2) की नोट - भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या भाषणांचा संग्रह.

3) जे आर डी - मी पाहिलेले - डॉ.द.रा. पेंडसे.

4) कालापुढती चार पाउले - श्री.शांतनुराव किर्लोस्कर यांचे समग्र चरित्र - सविता भावे.

5)उंटावरचा प्रवास - श्री. काकासाहेब दांडेकर. कॅम्लीन.

6) 21 व्या शतकाकडे - डॉ नीलकंठ कल्याणी यांचे विचारधन - सविता भावे.भारत फोर्ज.

7) Forging Ahead - Dr Neelkanth Kalyani - Savita Bhave.

8) कर्म चाले संगती - श्री गजाननराव पेंढरकर. विको लॅबोरेटरीज्.

9) बिकट वाट यशाची - हुकमीचंद चोरडिया - प्रवीण मसालेवाले - मधुबाला चोरडिया.

10) उद्योग पर्व - श्री.बी. जी.शिर्के -शिर्के सिपोरेक्स.

-जिद्द - संक्षिप्त उद्योगपर्व.

11)निव्वळ जिद्दीतून - पद्मश्री आण्णासाहेब बेहरे - सविता भावे.

12) मी कसा झालो - आचार्य प्र.के.अत्रे.

13) Dreams Become Reality- Dr.R.J.Rathi - Sudarshan Chemicals.

14) जगाच्या पाठीवर - श्री.सुधीर फडके.

15) धोंडो केशव कर्वे - महर्षी कर्वे.

16)राळेगणसिद्धी - एक कायाकल्प - पद्मभूषण अण्णा हजारे.

17)राळेगणसिद्धीचा कर्मयोगी अण्णा हजारे - सुरेशचंद्र वारघडे.

18) राजश्री शाहू छत्रपती - प्रा.रा.तु. भगत.

19) लक्ष्मणरेषा - श्री. आर.के. लक्ष्मण.

20) प्राचार्य - श्री. शिवाजीराव भोसले - प्रा. मिलिंद जोशी.

21) आइन्स्टाईनचे विश्व - डॉ. निवास पाटील.

22) अग्नीपंख - डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम.

23) सृजनांचा सारथी - श्री. राजेंद्र देशपांडे.


D) यशस्वी उद्योजकांच्या, व्यक्तींच्या कथा...

1) थॉट लीडर्स - श्रीनिवास पंडित.

2) उद्योजक महाराष्ट्र - श्री.आ.रा.भट.

3) असे घडले उद्योजक - श्री.विलास आहेर.

4) शोध उद्यम शिलतेच्या प्रेरणाचा - श्री. जयंत रानडे.

5) उद्योग संपदा - सुधाकर जोशी.

6) पोलादी माणसं- दत्ता जोशी. नाशिक जिल्हा.

7) दीपस्तंभ - प्रा. शिवाजीराव भोसले.


E) उद्योजकता...

1) उद्योजक बना - डॉ. दिलीप सरवटे.

2) सहयोजक बना - डॉ. दिलीप सरवटे.

3) ज्ञानयोजक बना - डॉ. दिलीप सरवटे.

4) उद्योजकता विकास - डॉ. प्रभाकर देशमुख.

5) उद्योजकता - डॉ. दत्ता देशकर.


F) वक्ता - भाषण...

1) सभेत कसे बोलावे - श्री. माधव गडकरी.

2) भाषणे कशी करावीत - प्रा.वा.शि. आपटे.

3)कथा वक्तृत्वाची - प्रा. शिवाजीराव भोसले.


G) डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम...

1) भारत 2020.

2) मी देशाला काय देऊ शकतो? सृजन पाल सिंग.


H) श्री.अच्युत गोडबोले...

1)मनात-मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर.

2)बोर्डारूम-व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर.


I) श्री. शिवराज गोर्ले...

1) सामना.

2) मजेत जगावं कसं?

3) बदला तुमचं भविष्य.

4) यशस्वी व्हावं कसं?

5) मस्त राहावं कसं?

6) सांगा,कसं जगायचं..


J) कविता...

1) एल्गार - श्री. सुरेश भट.

2) मैं शायर - श्री. प्रदीप निफाडकर.

3) भारत कधी कधी माझा देश आहे - श्री. रामदास फुटाणे.

श्री. प्रकाश खोटे...

4) साधना.

5) शब्द जरी हेच होते.

6) माणसा सारखी माणसं.

7) दोन थेंब - खंडकाव्य.

8) मौनाची भाषांतरे - श्री. संदीप खरे


K) व्यक्तिमत्व विकास...

Edward D Bono's books

1) Opportunities.

2) Lateral Thinking.

3) Body Language - Allan Pease.

4) Realize Your Potential - V Pekelis.

5) 7 Habits of Highly Effective People.

6) 8th Habit - Stephen R. Covey.

7) Emotional Intelligence - Daniel Golman.

8) Think and Grow Rich - Napolean Hill.

9) घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती - डॉ.ह.वि. देसाई.

10) मनाचा शोध - डॉ. स्वर्णलता भिशीकर.

11) Rich Dad Poor Dad- Robert Kiyosaki.

12) How to win friends & influence people - Dale Carnegie.

13) What they don't teach you at harvard business school - Mark McCormark.

14) You Can Win.

15) Freedom is not free - Shri Shiv Khera.


L) Soft Skills...

1) Business Communication - Anjali Kalkar.

2) The skils of leadership - John Adair.

3) Solving your problems - Luis Vas

4) Decision making - 

5) Time management - Aarti Gurav.

6) Life Skills -


M) साहस आणि प्रवास वर्णन...

1) सागरमाथा - श्री श्रीहरी अशोक तापकीर.

2) माझी मुलुखगिरी - श्री. मिलिंद गुणाजी.

3)नवी दिशा - पोलीस प्रशासनाची नवी दिशा - श्री. सुरेश खोपडे.

4) बचतगटांच्या माध्यमातून गरिबीमुक्त विश्वाची निर्मिती - श्री. मोहंमद युनूस.

5) एक होता कार्व्हर - सौ. वीणा गवाणकर.

6) एका काडातून क्रांती - मासानोबु फुकुओका.


N) आध्यत्म...

1) सहजयोग - 50 पेक्षा अधिक पुस्तके.

2) आध्यात्मिक व्यवस्थापन शोध आणि बोध - डॉ. श्रीकृष्ण गजानन बापट.


O) इतर पुस्तके...

100 पेक्षा अधिक.

Tuesday, 10 June 2025

माझा साहित्य प्रवास

 माझा साहित्य प्रवास.


-महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिक रोड शाखेचे   श्री.उन्मेष गायधणी,कार्याध्यक्ष, श्री. रवींद्र मालुंजकर, कार्यवाह, श्री.सुदाम सातभाई, खजिनदार,सौ. तनपुरे मॅडम,इतर सर्व पदाधिकारी, सर्व सभासद आणि सृजन श्रोतेहो!

आपल्यासमोर माझा साहित्य प्रवास उलगडताना मला आनंद होत आहे.


माझे बालपण लोणी देवकर या गावी गेले. लहानपनापासून मला घरात आणि गावात वाढीसाठी पोषक वातावरण होते .


शिक्षणासाठी पाचवीला मला तालुक्याच्या ठिकाणी इंदापूरला पुढे 

सहावीपासून जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्याला पाठविण्यात आले.


सहावितला एक प्रसंग मला आठवतो. जून - जुलै महिना असेल, पुण्यात खूप पाऊस पडत होता. मुठा नदीला पूर आला होता. पुराचे पाणी लकडी पुलाच्या धोकादायक पातळी पर्यंत वाढले होते. लोकं नदीला आलेला पूर पहायला जात होते. आम्ही श्री शिवाजी मराठा होस्टेलमधील मुलं पण एका रविवारी पावसात भिजत पूर पहायला गेलो होतो. फार रोमांचक अनुभव होता तो.

दुसऱ्याच दिवशी वर्गात सरांनी आम्हाला ' मी पाहिलेला पाऊस ', या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता . 

मी लिहलेल्या उत्कृष्ट निबंधमुळे माझे वर्गात खूप कौतुक झाले होते .

सर म्हणाले होते, " तु मोठा झाल्यावर लेखक होशील. " मला असं वाटतं, त्यानंतर माझ्यात लिखाणाची गोडी उत्पन्न झाली.


महाविद्यालयीन जीवनात स्मरणीकामधे लेख लिहणे , प्रवास वर्णन लिहणे इतकच काय ते माझं साहित्य योगदान होतं.


-मिटकॉन, एमसिईडी नोकरी आणि त्यानिमित्ताने लिखाणाचे दालन उघडे झाले.


-आपले नांव वर्तमानपत्रात  छापून यावे अशी इच्छा असायची. तेव्हा पुण्यातील सकाळ, लोकसत्ता, वर्तमानपत्रात बातमी येणं ही फार मोठी बाब असायची . 


तुम्ही गुन्हा केला, तुमचा अपघात झाला तर तुमचे नांव आपोआप पेपर मध्ये छापून येते किंवा तुम्ही काहीतरी समाजउपयोगी कार्य करत असाल तर वर्तमानपत्र तुमची दखल घेतं. 


मिटकॉन आणि एमसिईडीच्या नोकरीमुळे मला अनेक नामवंत वर्तमानपत्रात लिखाणाची संधी मिळाली .


-पेपरमध्ये लेख प्रकाशित होण्याचा एक दिवस मला चांगलाच आठवतो. रत्नागिरीत - एकाच दिवशी माझे 'रत्नागिरी टाइम्स', 'रत्नभूमी', 'सागर ' या तीन वर्तमान पत्रात लेख छापून आले होते.


1986-87 असा काळ होता जेव्हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे वाचन साहित्य इंग्रजी भाषेत उपलब्ध असायचे. महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी ते मराठी भाषेत असणे आवश्यक होते. 


माझे योगदान...

1) EDP वाचन साहित्य भाषांतर केले.

2) MCED प्रशिक्षण कार्यक्रम वाचन साहित्य तयार केले. 


-EDP मध्ये वक्त्याचे सेशन सुरु झाल्यापासून संपेपर्यंत मी ट्रेनिंग हॉलमधे बसून सगळे सेशन्स पूर्ण ऐकायचो. कधीच थिएटरच्या डोअर कीपर सारखा वागलो नाही. यामुळे माझा सर्व विषयांचा अभ्यास होत गेला. 


3) श्री. मनोहर नाडकर्णी NIMID , श्री. रमेश दवे, EDII - Ahmedabad. यांचे AMT अटेंड केले आणि त्यावर आधारित  लिखाण केले.


4) AMT ट्रेनर्स मॅन्युअल निर्माण केले आणि रानडे साहेबांना आनंद झाला.


5) नावीन्यपूर्ण जाहिराती आणि स्लोगन्स - बालगंधर्व नाट्यगृहात नाटक पहात असताना सुचले. 

"प्रदर्शन नव उद्योजकांच्या उत्पादन वस्तूंचे 

पाहण्यासाठी आपण खात्रीशीर यायचे 

प्रयत्न आहेत हे आमचे आणि प्रशिक्षणार्थिंचे 

पाहुन ठरवा तुम्हीही उद्योजक बनायचे ."


6) आवडते विषयांचे भरपूर वाचन...200 पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन.


माझं जे काही साहित्य योगदान आहे ते केवळ उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, संस्था विकास या विषयांपुरतच मर्यादित आहे. 

पण उद्योजकता या विषयावर मराठीत पुस्तक लिहणारा मी पहिलाच लेखक आहे. माझ्या नंतर अनेकांनी लिहले आहे.


कधी कधी मला वाटते, मी जर कृषी,महसूल,पोलीस अशा दुसऱ्या कोणत्या विभागात नोकरी केली असती तर तिथेही असंच अभ्यासपूर्वक  लिखाण केलं असतं.


7) बारामती - उद्योजकता विकास कार्यक्रम प्रचार पुस्तिका लिहली.

-'मिटकॉन ते एमसिईडी',लेख लिहला. खरंतर हा लेख मिटकॉन च्या MD किंवा MCED च्या कार्यकारी संचालकाने लिहायला हवा होता. पण मी आणि विश्वास देवकरने तो 1988 च्या दिवाळीच्या सुट्टीत लिहला. 


-कोणताही लेख लिहताना त्या विषयाचा विषय प्रवेश - मुख्य भाग - उपयुक्त शेवट अशी रचना असते . लेखकाच्या डोक्यात हा विषय 24 तास  फिरत असतो . 

या विषयाचा शेवट मला भारदस्त वाक्यांनी करायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी संडासला बसलेलो असताना मला पुढील वाक्य सुचली...

... "उद्योजकता विकासाची घोडदौड जर अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्रात घराघरात उद्योजक ही स्थिती फार दुर नाही."


8) ठाणे, नांदेड, रत्नागिरी, बारामती, पुणे,  कार्यक्रमांच्या स्मरणीका प्रकाशित केल्या.


9) 'उद्योजक',' संपदा 'अशा मासिकमधून लेख प्रकाशित केले.


आतापर्यंत माझे वर्तमाणपत्र आणि मासिकमधून बरेच लिखाण झाले होते. 

आता आपण पुस्तक लिहावे असे मला सुचले. 


-'उद्योजकता',  यापहिल्या पुस्तकासाठी श्री.गंगाधर महांबरे  यांचे मार्गदर्शन लाभले.


10) 'उद्योजकता', पुस्तक लिखाण - 1987 ते 1991 पर्यंत मी Achievement Motivation Training या विषयात पुष्कळ काम केले होते. हा विषय मला आत्मसात झाला होता. उद्योजकीय संकल्पनांचा विचार केला तर हा विषय मला तोंडपाठ झाला होता. त्यावरच आता पुस्तक लिहायचे होते. 


श्री विश्वास देवकर याने शब्दांकन केले आणि श्री शशिकांत कुंभार याने पुनर्लेखन लेखन केले.

-श्री राजू देशपांडे यांनी पुस्तकाला illustrations दिले आहेत.

-श्री कै मनोहर नाडकर्णी  यांची पुस्तकास प्रस्तावना लाभली.


पुस्तक प्रकाशनासाठीचे दोन प्रयत्न...


-महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय, महाराष्ट्र राज्य यांनी माझे पुस्तक प्रकाशित करावे असा प्रयत्न.

त्यांनी 'उद्योग साधना ', हे पुस्तक प्रकाशित केले होते. 

60000 प्रती 50000 प्रती 5000 प्रती...


तेव्हा श्री विनय बन्सल हे विकास आयुक्त उद्योग आणि श्री विलासराव देशमुख, उद्योग मंत्री होते. 


मी माझे मोठे भाऊ कालिदास देवकर, श्री उल्हासदादा पवार, श्री. उत्तमराव आरडे, अशा आम्ही सर्वांनी मंत्रालयात खूप प्रयत्न केले.

पण श्री विनय बन्सल यांनी या प्रस्तावास नकार दिला.'उद्योग साधना', या विषयाची दुसरी बाजू म्हणजे 'उद्योजकता ', या विषयाचे महत्व समजून त्यांनी माझे पुस्तक प्रकाशित करायला काहीच हरकत नव्हती पण त्यांनी इगो पॉईंट केला.


-मिटकॉनचे तत्कालीन MD श्री एस पी रानडे आणि कॉन्टी्नेंटल प्रकाशनचे श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.


-पुस्तक एक, दीड वर्षे वेटिंग लिस्टवर होते.

-विषय कॅटेगरी - वाणिज्य.

11) दरम्यान दुसरे पुस्तक तयार झाले. 'व्यावसायिक उद्योजकता ', गाज प्रकाशनने प्रकाशित केले. 

-लेखकाला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. 

आता लेखकाचे लौकिक अर्थाने वजन वाढले होते, त्यामुळे पुस्तक वेटिंग लिस्ट मधून बाहेर आले. 

-कै. अनिरुद्ध कुलकर्णी, फार मोठ्या मनाचा माणूस होता.


प्रकाशन समारंभ - डॉ. आप्पासाहेब पवार, श्री. यशवंत भावे, विकास आयुक्त, उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य. कै. अनंतराव कुलकर्णी, श्री. उल्हासदादा पवार यांच्यासारखे दिग्गज पहिल्या रांगेत बसले होते.


-श्री. सुभाष दांडेकर, कॅम्लीन, डॉ. सुधीर गव्हाणे, जे पुढे मराठावडा विद्यापीठचे कुलगुरू झाले त्यांनी पुस्तक परीक्षण लिहले.


-'उद्योजकता' - पुस्तकातील शेवटच्या चार ओळी.

'हीच वेळ आहे, वाजवी साहस पत्करण्याची,

हीच वेळ आहे, अनेक समस्या सोडविण्याची,

हीच वेळ आहे, पुढाकार घेवून यशस्वी होण्याची,

हीच वेळ आहे, स्पष्ट ध्येय ठरविण्याची...उद्योग विश्वात पदार्पणाची!'


12) 'उद्योग संधी, शोधा म्हणजे सापडेल', पुस्तक. 

संकल्पना - Business Opportunity Search & Scanning.

'हे जग उद्योग संधीन्नी भरलेले आहे, तुम्हाला ती संधी दिसली तर.'

-पुण्यात दुसरे उद्योजकीय मराठी साहित्य संमेलन नियोजित होते, त्यात नवीन पुस्तक प्रकाशित करावे असा विचार मनात आला.

-पुणे- कोल्हापूर बस प्रवासात पुस्तकाचे नांव आणि अनुक्रमणिका तयार झाली आणि खूप कमी वेळात पुस्तक संहिता तयार झाली.


प्रस्तावना -

डॉ.बी.आर.साबडे, सेक्रेटरी, MCCI & ए

शब्दांकन - श्रीमती आनंदी कुलकर्णी काकू.

प्रकाशन - दुसरे मराठी उद्योजकीय साहित्य संमेलन -पुणे.

डॉ. गंगाधर गाडगीळ.


नावीन्यपूर्ण उद्योग संधी...

या पुस्तकात लिहलेल्या बिसनेस आयडिया वर पुढे उद्योग आले. 1) काउन्ट डाऊन सिग्नल. 2) सूर्यच जर पृथ्वीपासून 1000 किमी वर स्थिर केला तर. इ.


-पुणे विद्यापीठ स्टडी बोर्ड - विषय- व्यावसायिक उद्योजकता, सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

डॉ. श्रीपाद कडवेकर,डीन, वाणिज्य विभाग, पुणे विद्यापीठ,

डॉ. रवींद्र कोठावदे,C T Bora कॉलेज शिरूर.


13) Motivation Academy प्रकाशन - 

-'उद्योगी मेहनती व्यक्तिमत्व विकास", पुस्तक.

-एक स्वप्न पडलं आणि डॉ एलीस अल्बर्ट यांची REBT सोपी करून सांगण्यासाठी उदाहरण मिळालं.


14)'जीवन कौशल्ये',

15)'अविरत संस्था विकास',ही पुस्तके लिहून तयार आहेत.


ज्यांना लिहायची आवड आहे त्यांना सोशल मीडिया मुळे अनेक माध्यमं उपलब्ध झाली आहेत.

FB

www.yogirajdeokar.blogspot.com 

ब्लॉग लिखाण.


पण पेपर माध्यम सर्वांत प्रभावी माध्यम आहे. त्याची retention value  अधिक आहे.


तुमची अटीट्युड म्हणजे अभिवृत्ती...रुझान.


तुमची ॲपटीट्युड म्हणजे अभिरुची, प्रतिभा, योग्यता. स्वतःच्या या दोन्ही बाबी समजून घ्या.

स्वतःची प्रतिभा उभारणीसाठी वाचन करा , प्रशिक्षण घ्या, चिंतन आणि मनन करा.


-स्वतः अनुभव, अनुभूती घ्या. स्वतःचा समज, perception, awarness level वाढावा.


भाषांतर केल्याने शब्द संग्रह वाढतो.

समानार्थी शब्द संग्रह वाढावा.


प्रत्येकाची जन्माला आल्यानंतर 

ऐकणे 

बोलणे 

वाचणे 

लिहणे 

शिकणे आणि उपयोगात आणणे अशी वाटचाल होत असते. 

लेखक व्हायचे असेल तर हे चारही घटक आणि विषयाचे चिंतन, मनन उपयोगात आणणे महत्वाचे ठरते...


आपणाशी हितगुज साधण्याची संधी मला दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.


योगीराज देवकर.

Thursday, 10 April 2025

कालिदास (आप्पा ) देवकर यांचा 80 वा वाढदिवस

 देवकर कुटुंबियां तर्फे शुभेच्छा पत्र...


आ.मा.श्री.कालिदास हरिश्चंद्र देवकर उर्फ आप्पा तुम्ही 

लोणी देवकर गावाला आणि देवकर घराण्याला तुमच्या राजकीय, सामाजिक कार्य कर्तृत्वाने ओळख निर्माण केली आहे.


कै.हरिश्चंद्र उर्फ आण्णा आणि कै.हिराबाई उर्फ भाभी यांना कालिदास(आप्पा), पृथ्वीराज(बप्पा ), रत्नाकवी(बापू ), योगीराज(आबा ) ही चार मुलं आणि कै.मनोरमा(आक्का ) आणि सौ.शशिकला(ताई ) या दोन मुली अशी सहा अपत्य झाली.कै.मनोरमा (आक्का ) हे पहिले कन्यारत्न. कै. सुभाष आप्पासाहेब पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी पाटील घराण्याचा वारसा जपला आणि वाढवीला.कालिदास(आप्पा ) हे दुसरे अपत्य.दुसऱ्या भगिनी सौ. शशिकला( ताई ) यांचा श्री अरविंद संपतराव जामदार यांच्याशी विवाह झाला. त्यांनी जामदार घराण्याचा वारसा जपला आणि वाढविलेला आहे.


कालिदास आप्पा तुमचा जन्म 10/04/1945 रोजी झाला. तुम्ही वयाची 80 वर्षें पूर्ण करीत आहात. 80 वर्षाच्या आयुष्यात 80 गुणिले 12  म्हणजे 960 पौर्णिमा तसेच 32 अधिकमास महिन्यात 32 पौर्णिमा अशा 992 पौर्णिमा अनुभवल्या आहेत.81 व्या वर्षात 8 च महिन्यात तुमचे 1000 पौर्णिमांचे चंद्र दर्शन पूर्ण होणार आहे.तुमचे सहत्रचंद्र दर्शन हा तुमच्यासाठी आणि तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठी फार मोठा योग आहे.


सन 1967 मध्ये कालिदास आप्पा तुमची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सुरु झाली. तुमच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे...


सुरुवातीलाच तुम्ही लोणी देवकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन झाला आणि पुढे 25 वर्षें बिनविरोध चेअरमन पदी राहिलात .

सन 1975 मध्ये तुमची गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आणि पुढे तुम्ही 1995 पर्यंत वीस वर्षें गावच्या सरपंच पदी विराजमान राहिलात .

त्याच काळात इंदापूर तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमनपदही तुम्ही भूषविले.

सन 1984 पासून इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे सलग 15 वर्षें संचालक राहिलात.

पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे  सलग 15 वर्ष संचालक राहिलात.

याचदरम्यान इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे संचालक पदी पण राहिलात.

पुढे तुम्ही पुणे जिल्हा परिषदचे सदस्य झालात. आम्हा सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब होती.

खरंतर तुमची राजकीय वाटचाल इतकी चांगली होती की, तुम्हाला इंदापूर तालुका पंचायत समिती सभापती पद, पुणे जिल्हा परिषद, अध्यक्ष पद मिळायला हवे होते.असो!


आता तुम्ही राजकीय कुस्ती सोडली होती परंतु गावाला तुमची पुन्हा गरज भासली म्हणून तुमच्या वयाच्या 76 व्या वर्षी गावकऱ्यांनी तुम्हाला पुन्हा सरपंच होण्याचा आग्रह केला आणि तुमची पुन्हा निवडही केली आहे. आजच्या राजकीय वाटमारीच्या वातावरणात ही विशेष उल्लेखनीय बाब ठरावी.


आपले वडील कै.आण्णा आणि आई कै.भाभी यांनी सर्व मुलांवर फार चांगले संस्कार केले. कै.भाभी कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या.भावकी,गावकी चा आदर,पाहुणचार करण्यात आणि एकोपा ठेवण्यात त्यांचा हातभार होता. कै.आण्णा फार मोठा माणूस. त्याकाळात एक चांगला शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांचे नाव आणि दबदबा होता. 152 एकरांचा 7/12 देवकर कुटुंयाच्या नावावर होता. इतकी सर्व शेती ते एकटे सालकरी गड्यांच्या माध्यमातून करत होते. आजही भू दान चळवळ,खडकवासला कॉलनी आणि कालवा,MIDC ला दिलेली जमीन वगळता सर्व जमीन कुटुंबियांकडे आहे. असे हे भारदस्त आण्णा तुम्हाला नेहमी सांगायचे, "कालिदास, देवाने आपल्याला खूप काही दिले आहे. तुला सामान्य लोकांची सेवा करायची आहे. काम करताना आपले दोन पैसे खर्च झाले तरी होऊदे पण निस्वार्थपणे लोकांची सेवा कर." तुम्ही पण तसेच वागला म्हणून समाजात तुमचे नाव झालेले आहे.


तुमच्या या कार्यकाळात तुम्ही आमदार, खासदार, मंत्री यांच्या मदतीतून गावासाठी नळ पाणीपुरवठा योजना आणली. गावातील मुलांसाठी माध्यमिक हायस्कूल सुरु केले. गावातील प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेसाठी शासकीय फंडातून इमारती बांधून घेतल्या.

गावातील तरुणांना सहकारी,शासकीय क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिल्या.

गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आणली. त्यानंतरच्या कालावधीत गावात देना बँकेची म्हणजे आजची बँक ऑफ बडोदाची शाखा  आणली.

सर्वसामान्यांच्या दळणवळणाच्या सेवेसाठी गावात टेलिफोन एक्सचेंज सुरू केले. 

गावच्या सामाजिक उपक्रमात तुमचा सतत सहभाग राहिला आहे.

गावच्या गोरगरीब लोकांना शासनाच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ  मिळवून दिलेला आहे. 

उजनी जलाशयाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी गावात विद्युत महामंडळाचे केंद्र उपलब्ध केले.

गावात खडकवासला प्रकल्पाच्या  कॉलनीला एकत्रित असताना आपली जमीन दिली. लोणी देवकर एमआयडीसी साठी पुढाकार घेतला आणि स्वतःची पुष्कळ जमीन पण एमआयडीसीला दिली.  लोणी देवकर एमआयडीसी मुळे स्थानिकांना रोजगाराच्या, उद्योगाच्या शेकडो संधी तुमच्यामुळे उपलब्ध झाल्या.

गावात आरोग्य सेवा उपकेंद्र आणले.

ग्राम सचिवालय उभारले.

सद्यस्थितीत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल योजनेचे काम मंजूर आहे.


या आणि अशा अनेक कामांमुळे तुम्ही जनमानसात लोकप्रिय आहात.


तुम्हाला तुमची पत्नी सौ. प्रकाशबाई (वहिनी) यांची मौलिक साथ लाभली. तुम्हा उभायतांची मुलं,नानासाहेब आणि विद्यासागर(तात्या ), सुना,वैशाली आणि नूतन, नातवंडे तन्वी, राजवीर आणि साईराज, असा तुमचा संसाररूपी वृक्षवेल बहरला आहे.देवकर कुटुंबीय, भावकी आणि गावकीची साथ लाभली म्हणून तुम्ही हे सर्व करू शकला हे नक्की.


देवकर कुटूंबातले कोण जर कधी तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर एक अनुभव आम्हाला बऱ्याचदा आला आहे . एखादा अनोळखी माणूस आम्हाला विचारतो. "काय पाहुणे कुठून आलात तुम्ही?" आम्ही म्हणतो, "इंदापूर." त्यांचा पुढचा प्रश्न असतो, "प्रॉपर इंदापूर का?" आमचे उत्तर असते, "नाही, लोणी देवकर." मग त्यांचा पुढचा प्रश्न, "लोणी देवकर, मग कालिदास देवकरला ओळखता का?" आमचे उत्तर, "ते मोठे भाऊ आहेत माझे." मग काय त्या माणसाच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद तरळतो आणि आमची छाती अभिमानाने थोडी फुगते. ओळखीचे खूप मोठे जाळे तुम्ही विनलेले आहे.


वडील कै.आण्णा फार हुशार आणि धोरणी होते. अंकगणिताचे पाढे, पंचांग, पौराणिक माहिती, इ. त्यांना अगदी तोंडपाठ असायची.हिशेबाची वही ते मोडी लिपीत लिहायचे आणि सही पण मोडी लिपीतच करायचे,ते नेहमी म्हणायचे,"केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार l

शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार l 

याचा उपयोग तुम्ही देशाटन, मैत्री, सभा, हुशारी साठी केला. फार फिरलात तुम्ही.

खा.शंकरराव भाऊ कडे गावातले कार्यकर्ते गेले की, ते त्यांना तुमच्याबद्दल हमखास विचारायचे," काय मग, कुठे गेलाय आज तुमचा नेता,पुण्याला का मुंबईला." कारण तुम्ही उटसूट पुण्या, मुंबईला जायचे. असच एकदा भाऊंनी विचारले तर कार्यकर्ते म्हणाले, "आज आमचा नेता दिल्लीला गेलाय भाऊ.' खा.भाऊ एकदम चकित,"आsss, दिल्लीला कशाला गेलाय." असं तुमचं असायचं, आज इथं तर उद्या तिथं. अगदी थायलंड, इंडोनेशिया पण फिरून झालं तुमचं.


आप्पा,तुम्ही तुमच्या कार्य कर्तृत्वाने गावाला आणि देवकरांना चांगली ओळख दिली आहे. यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे.


तुमच्या आयुष्यात आलेल्या या सहत्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शतकपूर्तीसाठी अनंत शुभेच्छा.


आपणांस कुटुंबियांच्या वतीने हे शुभेच्छा पत्र देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.


आपले स्नेहांकित.

देवकर कुटुंबीय, लोणी देवकर.

शब्दांकन - योगीराज देवकर.

Saturday, 5 April 2025

निर्मला नगरी -मालगुंड, गणपतीपुळे.

 आंतरराष्ट्रीय सहजयोग सेमिनार गणपतीपुळे विषयी श्री माताजींची अमृतवाणी....

💐💫🌟🎉🎊🌹🌈


मराठी अनुवाद , कृपया वाचा,सर्वांपर्यंत प्रसारित करा आणि 2024 गणपतीपुळे सेमिनारला या!


"...श्री माताजींचा गणपतीपुळेला येण्याचा एक विशेष उद्देश आहे . हे विश्रांतीयोग्य अतिशय सुंदर ठिकाण तर आहेच परंतु त्यांनी हे शोधले आहे की याठिकाणी चैतन्य आहे जे तुम्हाला अगदी सहज स्वच्छ करते ."

प.पू .श्री माताजी. ३१ डिसें १९८५.


"... गणपतीपुळेला एक विशेष अर्थ आहे कारण तो महागणेश आहे . गणेश जे मुलाधारात असतात  विराटात ते महागणेश बनतात, ते मस्तिष्कमधे असतात. याचे मुख्य मूळ आहे अबोधिता, श्री गणेश आणि तो गणपतीपुळेमध्ये महागणेश होतो. इथे तो पितृत्वाने घेरलेला आहे, समुद्राचे गुरुतत्व, त्यामुळे तो इथे गुरू बनतो .

  इथे श्री गणेश त्याच्या पूर्ण परिपक्व स्वरूपात आहे .त्यामुळे आपणसुद्धा आपल्यामध्ये महागणेश विकसित करतो ... 

  अष्टविनायकांमध्ये ( आठ स्वयंभू गणेश ) येथील महागणेश पिठाधिश आहेत, ( पिठांचा अधिपती ) जे या पिठावर बसलेले आहेत, जे आठ स्वयंभू गणेश्यांची काळजी घेतात, त्यांचे रक्षण करतात ."

प.पू.श्री माताजी. १ जाने १९८६.


"... गणपतीपुळे सेमिनार किंवा तुम्ही याला काहीही म्हणा, मला माहित नाही तुम्ही देव आणि देवी यांच्या पवित्र परिषदेला काय म्हणाल ,परंतु हा सेमिनार मला तसाच खूप सांकेतिक आहे ,कारण हा सर्व जगाचे प्रतिनिधित्व करतो.हा संपूर्ण जगाच्या समस्या आणि उपायांचे प्रतिनिधित्व करतो. ही अतिशय सुंदर कल्पना आहे,मला माहीत नाही ही माझ्या डोक्यात कशी उत्पन्न झाली आणि मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी या प्रकारची सुरेख परिषद सुरू केली ."

प.पू. श्री माताजी. २४ डिसें १९९०.


"... लोक अष्टविनायकाला जातात परंतु या महागणपतीला जात नाहीत.त्यांना याची कल्पना नाही . मी रत्नागिरीहून परत येत होते आणि मी खरेच खूप मोठा तारा या मंदिराच्या वरील भागात पाहिला .इतरांना तो दिसत नव्हता हा एक  प्रश्नच होता , त्यावेळी कोणताही सहजयोगी तो पाहू शकला नाही. तर मी त्यांना म्हणाले, त्या ताऱ्याचा पाठलाग करूया. तो खूप मोठा ,अतिशय मोठा,पण इतर ताऱ्या सारखा नव्हता,अगदी मोठा, खूप असामान्य होता ,परंतु त्यांना तो दिसला नाही.मी म्हणाले काही हरकत नाही. मी त्यांना हातखंब्यापासून वळण्यास आणि दुसऱ्या रस्त्याने जाण्यास सांगितले आणि आम्ही त्याचा बरोबर पाठलाग गेला ... आम्ही जेव्हा गणपतीपुळ्याला पोहोचलो तेव्हा उजाडले होते आणि सुरेख स्पष्ट दिसू लागले होते. मी हे विसरू शकत नाही आणि त्या सूर्योदयाच्या प्रकाशात आत्ता आपण आहोत ते खूप सुंदर ठिकाण पाहिले आणि मी म्हणाले , हीच ती जागा आहे जिथे असायला हवे , जिथे आपण सर्व सहजयोग्यांना सुद्धा आणायला हवे. खरेतर तुम्हाला हे माहीत आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी अगोदरच या ठिकाणचे वर्णन केलेले आहे, या ठिकाणी जगभरातून लोक येतील आणि हे भारताच्या सागरी किनाऱ्यावर  होईल, त्यांनी हे भाकीत केले होते. परंतु जसा आश्चर्यकारकपणे मी या जागेचा शोध लावला तो शोध, ज्या तीन श्रेष्ठ माणसांनी ख्रिसताचा शोध लावला तसाच खूप चकित करणारा आहे .

 हे ठिकाण खरेच खूप भाग्यवान आणि सुरेख चैतन्यमय आहे.मी या ठिकाणी दोन दिवस राहिले आणि मी ठरविले हेच ते ठिकाण आहे जिथे सेमिनार होतील ."

प.पू. श्री माताजी . २५ डिसें १९९९. गणपतीपुळे.


आंतरराष्ट्रीय सेमिनार आणि ख्रिसमस पूजा 2024 चे निमंत्रण .

  श्री माताजींच्या परम कृपेत गणपतीपुळे, मालगुंड येथे  'निर्मला नगरी,'  22 डिसें 2024 रोजी आपल्या स्वागतासाठी थाटात उभी आहे . गणपतिपुळे सेमिनारला असा हा दैवी पूर्वइतिहास आहे . एखादा सहजयोगी एकदा सेमिनारला आला की पुन्हा पुन्हा येत राहतो ते या जागेच्या महात्म्यामुळेच.

 श्री माताजींच्या पदस्पर्शाने  पावन झालेल्या या ठिकाणी प्रवेशद्वारातून प्रवेश केला की कल्पवृक्षांची दुतर्फा रांग,आमराई आणि बगीचा आपले स्वागत करतो .

कॅम्पसमधे पोहोचल्यावर सर्वप्रथम भेट द्यायला हवा तो याच वर्षी आत निर्माण केलेला मेडिटेशन हॉल,तिथे श्री माताजींचे दर्शन घ्यावे आणि ध्यानस्थ बसावे. कार्यालय, डॉरमेटरीज, सूट्स, कॅन्टीन,लॉकर, CCTV यंत्रणा, लाईट, आणि सर्वांत महत्त्वाचे सेमिनार आणि सेमिनार आणि पूजेसाठी  चैतन्यमय वातावरण असलेला भव्य स्टेज,पूजारूम,श्री माताजींची रूम आणि  सभागृह अशा एकएक वास्तु दृष्टीस पडतात.  

 हजारो सहजयोग्यांना सामावून घेतील असे टेन्ट्स, डायनिंग एरिया, प्रदर्शन जागा, पार्कींग, फिल्टरचे मुबलक स्वच्छ पाणी, टॉयलेट्स, इ. अश्या अनेक सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहेत . यामुळे सर्वांची निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था तर होतेच त्याशिवाय होणारा आध्यत्मिक योग म्हणजे सेमिनारचा कळसच ठरतो .एकूणच हा सर्व परिसर नयनरम्य आणि देखणा आहे . 

 निर्मल नगरी समोरच आहे सुरक्षित, शांत, स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्र किनारा, अरबी समुद्र जो सकाळ , संध्याकाळ आपल्याला स्वच्छ करण्यासाठी सेवेत असतो .

  श्री गणेश (मूलाधार),समुद्र (नाभी,भवसागर), ख्रिसमस पूजा( आज्ञा), श्री महागणेश(विराट) आणि साक्षात श्री आदिशक्ती श्री माताजी (सहस्रार )यांच्यामुळे जी परम चैतन्याची  ऊर्जा मिळते आणि आध्यत्मिक उत्थानाला गती लाभते ती केवळ अवर्णनीय . श्री माताजींचे शोधकार्य आणि या जागेला लाभलेले आशीर्वाद यामुळेच या जागेचे आध्यत्मिक महत्व निर्माण झालेले आहे .

  म्हणूनच वाटते ,प्रत्येक सहजयोगी, बाल युवा, युवा शक्ती-मुले,मुली आणि बंधू, भगिनींने गणपतीपुळे सेमिनारला हजेरी लावायलाच हवी आणि सामूहिकतेचा, आध्यात्मिक उन्नतीचा आनंद द्विगुणित करायलाच हवा आणि निरानंद मिळवायला हवा.

तुम्हीतर याच पण इतरांना पण निमंत्रित करा.

            जय श्री माताजी !💐🎊🎉🌟💫🌈🌹

जेनेरिक औषधे स्वस्थ.

 दवा इंडिया, जेनेरिक फार्मसीचे औषध ब्रँडेड औषधापेक्षा साडेसात पट स्वस्थ आहे .


दवा इंडिया, जेनेरिक फार्मसीच्या Rosuvastatin Tablets IP 10mg हा 50 टॅब्लेट्सचा बॉक्स 125₹ आहे. 


याच सेम Rosuvastatin Tablets IP, Rosumac 10mg  ब्रँडेडच्या फक्त 15 टॅब्लेट्सची स्ट्रीप 274₹ आहे. याचा अर्थ 50 टॅब्लेट्सची किंमत 912.50 ₹ आहे.


म्हणजे जेनेरिकची एक गोळी 2.50 ₹ आहे,तर ब्रँडेडच्या एक गोळी 18.25₹ आहे.


सदर टॅबलेट LDL (Low Density Lipoprotein ) साठी घेतली जाते. 


जेनेरिक औषधे आणि ब्रँडेडच्या औषधाचे कन्टेन्ट सारखेच असतात. तरी किंमत जास्त ठेवून औषध निर्माण करणाऱ्या ब्रँडेड कंपन्या असा *साडेसात पट* इतका भरमसाठ नफा कमवत आहेत. 


जेनेरिक औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि सरकारने नागरिकांमध्ये याविषयी  बरीच जाणीवजागृती केली आहे तरी लोकं जेनेरिक कडे वळत नाहीत. 


याविषयी अमीर खानने 'सत्यमेव जयते ' TV शो मध्ये एक एपिसोड केला होता. मध्यंतरी 'माझा कट्टा ' मध्ये एका तरुण उद्योजक मुलाची मुलाखत झाली आहे. हे दोन्ही कार्यक्रम YouTube वर उपलब्ध आहेत. 


लोकहो जागे व्हा.

ब्रँडेड औषधे खरेदी न करता जेनेरिक औषधे खरेदी करा आणि होणारे आर्थिक नुकसान टाळा.

राहुरी श्री माताजींचे माहेर.

 सहजयोग पद्धतीने कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम.

ठिकाण - श्रीरामपूर.

दिनांक - 18 आणि 20 एप्रिल 2025.

वेळ - सायंकाळी 6.30 वाजता. 


सहजयोग  प्रचार - प्रसार कार्याच्या निमित्ताने प.पू.श्री माताजींनी विश्वातील सहजयोगी साधकांना आत्मसाक्षात्काराची जी अनुभूती दिली आहे त्याबद्दल श्री माताजींना सहजयोग्यांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.


राहुरी,श्रीरामपूर श्री माताजींचे माहेर म्हणजेच सहजयोग्यांचे आजोळ.


सहजयोगाच्या संस्थापिका श्री माताजी निर्मला देवी यांचे राहुरी,  श्रीरामपूरशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. राहुरी हे श्री माताजींचे माहेर आहे. राजपरिवारातील केशवराव साळवे हे श्री माताजींचे आजोबा आणि सखुबाई या श्री माताजींच्या आजी . केशवराव साळवे हे शालिवाहन राजवंश, क्षेत्रीय घराण्याचे वंशज होते.यांच्याच पूर्वजात शालिवाहन नावाचा एक राजा होता. पैठण ही त्यांची राजभूमी होती. याच राजवंश घराण्याने शालिवाहन शक नावाच्या पंचांग कॅलेंडरची सुरुवात केली असा इतिहास सांगितला जातो. केशवराव साळवे यांचा राहुरी जवळ शिंगवे नाइक गावात एक वाडा होता. श्री माताजींच्या पूर्वज्यांचे  शिंगवे(श्री गांव ) सह राहुरी क्षेत्रावर शासन होते आणि हे साम्राज्य हैद्राबाद पर्यंत विस्तारलेले होते. श्री गांव शिंघवे नाइक या नावाने पण ओळखले जाते. हे गांव राहुरी रेल्वे स्टेशन पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे . केशवराव आणि सखुबाई यांचे पुत्र प्रसादराव साळवे हे श्री माताजींचे वडील आणि आईचे नांव कॉर्नलिया. श्री माताजींच्या आई कॉर्नलिया आणि आजी सखुबाई यांचा परिवार नंदगावचा. नंदगांव, शिंगवे नाइक ही दोन्ही गावे राहुरी तालुक्याच्या सीमेवर आहेत. त्यामुळे राहुरी हे श्री माताजींचे माहेर असे श्री माताजी आदराने सांगत असत.


श्री माताजींच्या सहजयोगाच्या महान योगदानामुळे आणि कर्तृत्ववान घराण्यामुळे पैठण, श्रीरामपूर, राहुरी, उज्जैन, छिंदवाडा, नागपूर, पुणे, कराची, लाहोर, वर्धा अशी अनेक शहरे इतिहासाच्या पानावर कोरली गेली आहेत.


श्रीमती सखुबाई यांना कौटुंबिक कलहामुळे मुलांबाळांना घेवून श्री गांव( शिंगवे ) सोडावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना होती पण या साहसी, श्रेष्ठ, अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारण्याची शक्ती, गहन पराक्रम, कुटुंबाप्रति प्रेम आणि करुणा,अशा गुणवत्ता असलेल्या सखुबाई पुढील पिढ्यांचे प्रेरणा स्रोत ठरल्या. त्यांच्याच माध्यमातून हे गुण त्यांच्या मुलांत आणि नातवंडात आले आहेत आणि यात श्री माताजींचे स्थान विशेष आहे.


कोणत्याही स्त्रीला स्वतःच्या माहेराबद्दल विशेष जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम असतेच त्यात राहुरी  तर साक्षात श्री आदिशक्तीचे माहेर आहे. त्यामुळे श्री माताजी जगभर विहरल्या तरी त्यांचे चित्त माहेराकडे राहिले असे त्यांच्या श्रीरामपूर, राहुरी प्रेमावरून आढळते.


22-23 मार्च 1975 ला श्री माताजींनी राहुरी कृषी विद्यापीठात सहजयोग प्रचार कार्यक्रम केला होता. शिंगवे, नंदगाव या माहेरच्या गावासह मुसळवाडी, अवदगाव, तकलीमिया या गावांना सहजयोगात विशेष महत्वाचे स्थान आहे. मुसळवाडीत देवीने राहू रक्षासाला मुसळाने मारले होते म्हणून त्या गावचे नांव मुसळवाडी पडले. नंतर राक्षस ज्या गावातून ओरडत पळाला त्या गावचे नांव आरडगाव पडले असे श्री माताजी सांगत असत. राहुरी,श्रीरामपूर भागात नवनाथ रहात होते. साईबाबांची शिर्डी इथून जवळच आहे. यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या या भागाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


1975 ते 1988 या कालावधीत दरवर्षी आरडगाव येथे श्री माताजींच्या साकार स्वरूपात पूजा झाल्या आहेत. 1982 मध्ये श्री माताजींनी मुसळवाडीत स्वयंभू एकादश रुद्र शिलान्यास केला. आज देशविदेशातील सहजयोगी साधक एकादश रुद्र दर्शन  आणि चैतन्याचा लाभ घेण्यासाठी मुसळवाडीला येतात. 


1987 मध्ये श्री माताजींनी सहजयोग आरडगाव आश्रमाची स्थापना केली. आज हा आश्रम निर्मला धाम आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच वर्षी श्री माताजींनी आरडगाव मध्ये सहज महिला कल्याण सोसायटीची स्थापना केली होती.


1985 दरम्यान श्रीरामपूर मध्ये सहजयोग ध्यान केंद्र सुरु झाले. श्री माताजींनी राहुरी कृषी विद्यापीठात सहजयोग पद्धतीने शेती कशी करावी याचे प्रत्येक्षित दिले होते. आज तीच पद्धत *सहज कृषी* म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे पुणतांबा येथे इंग्लिश मेडीयम स्कूलची स्थापना झाली. श्री माताजी परदेशी सहजयोग्यांना महाराष्ट्रातील दैवी भूमी  आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य असलेल्या ठिकाणांचे दर्शन व्हावे म्हणून महाराष्ट्र टूर आयोजित करत असत. या टूर मध्ये  राहुरी,आरडगावचा समावेश असे. श्री माताजींनी या भागात सहजयोग प्रचारसाठी बैलगाडीतून प्रवास केल्याची उदाहरणे आहेत . अस्तगांव, फत्याबद, श्रीरामपूर, लोणी प्रवरा, कोपरगाव, संगमनेर अशी अनेक शहरे आणि गावे श्री माताजींनी पिंजून काढली आहेत. या भागात श्री माताजींनी प्रचंड मेहनत घेवून परिसरातील नागरिकांच्या मनाची आध्यात्मिक मशागत केली आहे. आंतरराष्ट्रीय सहजयोग सेमिनार गणपतीपुळे येथे दरवर्षी सहज विवाह संपन्न होतात. सदर विवाह सोहळ्यात राहुरी, श्रीरामपूर भागातील शेकडो मुला मुलींची देश विदेशातील मुला मुलींशी लग्न झाली आहेत. दीडशे पेक्षा अधिक देशात सहजयोगी साधक सहजयोग प्रॅक्टिस करत असल्यामुळे आज सहजयोग आंतरराष्ट्रीय समुदाय झाला आहे.


महाराष्ट्र ही विश्वाची कुंडलिनी आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, नवनाथ, यांचा वारसा लाभलेला आहे. 


परमेश्वराच्या अस्तित्वाच्या शोधात असलेल्या श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर मधील नागरिकांसाठी कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षातकाराचा हा कार्यक्रम एक पर्वणी आहे. 


जगभरातील नागरिकांची कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी, त्यांना आत्मसाक्षात्कार लाभावा हाच तर श्री माताजींचा ध्यास आहे. तुमचा फायदा झाला, तुमची आध्यात्मिक प्रगती झाली तर श्री माताजींच्या घराण्याचा संघर्ष आणि त्याग सत्कारणी लागला असेच म्हणावे लागेल.


श्रीरामपूर मधील सहजयोग सामूहिकता महाराष्ट्रभर सहजयोगाचा  प्रचार प्रसार करण्यात अग्रेसर आहे.श्रीरामपूर मध्ये श्री माताजी एकोणीस वेळा येऊन गेलेल्या आहेत त्यामुळे श्रीरामपूरची भूमी श्री माताजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव , अशोक नगर , फत्याबाद येथे श्री माताजींचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम झालेले आहेत. श्रीरामपूर शहर आणि ग्रामीण भागात भरपूर सहजयोग सामूहिकता निर्माण झालेली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने दिलेल्या जागेत  प्रशस्त हॉल बांधून सध्या साप्ताहिक ध्यान केंद्र सुरु आहे. सदर केंद्रात  परम पूज्य श्री माताजी ज्या सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या ते सिंहासन आहे.

तेव्हा सहजयोग कार्यकर्त्यांचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून श्रीरामपूर मधील कार्यक्रमास नक्की उपस्थित रहावे ही विनंती.


जय श्री माताजी!

संकलक व लेखक - योगीराज देवकर.

सहजयोगी, पुणे.