Sunday, 25 January 2026

उत्तुंग दुबई

 उत्तुंग दुबई


आयुष्यात अनेकदा अचानक आनंददायक वळणे येत असतात, असे पण नव्हते की,दुबई आमच्या विश लिस्ट वर होते ,पण अमेयमुळे आम्हाला हा जपान सिंगापूर,युरोप ट्रिप नंतर आता दुबई प्रवासाचा योग आला .


अमेयची टोकियो, जपान येथून दुबई, यूएई येथे बदली झाली आणि अमेय–रुचिरा यांनी दुबई मरिना एरियात घर केले . लगेचच त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलावून घेतले. जरी आम्ही टुरिस्ट व्हिसावर आलो असलो, तरी यावेळी पर्यटन हा आमचा मुख्य अजेंडा नव्हता. कारण एक आनंदाची, हळवी बातमी—सुनबाईंकडे गुड न्यूज आहे आणि अमेयचे ऑफिस पण सुरू असणार होते.  त्यामुळे  ' मुलांबरोबर वेळ घालवणे,मुलांचा चाललेला सुखी संसार पाहणे' , हाच आमचा एकमेव विचार होता.


पण तरुणाईची हौस आणि  प्रेमळ  हट्ट—मुलांनी आम्हाला दुबई दाखवायचीच  ठरवले होते आणि मग सुरू झाला अनुभव उत्तुंग दुबईचा .


दुबई म्हणजे केवळ एक शहर नाही, तर मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम

राजाच्या आणि अनेक प्रसिद्ध वास्तुकारांच्या  कल्पनाशक्तीने उभारलेले  भव्य स्वप्न आहे.बुर्ज खलिफा - जगातली सर्वात उंच निवासी इमारत, ऐन दुबई - जगातील सर्वात मोठे जाइंट व्हील,दुबई मॉल - जगातला सर्वात मोठा मॉल,पाम जुमेराह - जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बेटं,दुबई  एअरपोर्ट - जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट उभारले जात आहे ,जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित वर्ल्ड आयलंडची  उभारणी सुरू आहे , प्रशस्त रस्ते आणि रात्री लखलखणारा प्रकाशाचा झगमगाट—सगळेच थक्क करणारे आहे. बरं ही उत्तुंग प्रगती म्हणाल तर तीस ,पस्तीस वर्षातील आहे. त्याआधी तर दुबई मासेमारी, मोती,बंदरे,सोन्याचा व्यापार आणि खनिज तेल यासाठी ओळखले जात होते.


बर दुबई , मिरॅकल  गार्डन,पाम आयलंड वरील अटलांटिस आणि रॉयल  अटलांटिस हॉटेल्स , मरिना, जुमेराह  बीच —ही ठिकाणे पाहताना प्रत्येक वेळी ' मानव किती अद्भुत 

गोष्टी साकारू शकतो ', याची जाणीव होत राहिते. दुबई फ्रेम, म्युझियम ऑफ द फ्युचर , बुर्ज अल अरब या वास्तू तर शेख झायद रोडवरून ये–जा करताना सतत नजरेत भरत होत्या—भविष्यात डोकावल्यासारखेच. बुर्ज खलिफा तर जवळपास शहरातल्या कोणत्याही भागातून दहा किलोमीटर वरूनच दिसायला लागतो . एव्हढ्या लवकर आपल्याला फ्रेम नको म्हणून मला तर अजिबात फ्रेम पहायला जायचे नव्हते.


एखादी ट्रिप लहानातून सुरू करून टॉपला कशी घेऊन जायची ते या मुलांकडून शिकावे.सुरुवातीला मरिना एरियात पायी फेरफटका मारणे, मॉल मध्ये जाणे सुरू झाले आणि शेवटच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता आम्ही बुर्ज खलिफा इमारतीच्या १२३/२४ व्या मजल्यावर पोहोचलो. बुर्ज खलिफा १६३ मजली उंच आहे. तिथे १२३/२४/४९ मजल्यावर observation deck आहेत.गेले तीन आठवडे जी ठिकाणे आम्ही त्यात्या ठिकाणी जाऊन पाहिली होती ती ठिकाणे आम्ही आता बुर्ज खलिफा वरून पहात होतो. जगातील सर्वात वेगवान लिफ्ट बुर्ज खलिफा इमारतीत आहेत. १२३ व्या 

मजल्यावर आम्ही एक मिनिटात पोहोचलो. दुबईतील इमारतींची भव्यता,उंची,डिझाईन्स, इलेव्हेशन्स,नावीन्यपूर्ण असल्यामुळे पाहण्यासारखे आहेत.


दुबई म्हणजे मॉल कल्चर. 

Ibn Battuta Mall, Gold Souk, Spice Souk, Al Fahidi, LuLu Hypermarket, Dubai Mall, Zabil Mall, Mall of the Emirates, Festival City Mall, Souk Madinat Jumeirah — असे अनेक मॉल या शहरात आहेत. प्रत्येक मॉल वेगळ्या संकल्पनेने सजलेला, पण माणसाच्या गरजांपेक्षा इच्छा, हौशीला अधिक खतपाणी घालणारा. इच्छेला मर्यादा नाही आणि हौसेला मोल नाही असे म्हणतात. कमकुवत मानसिकतेच्या श्रीमंत माणसाने मॉल मध्ये खरेदीसाठी न गेलेलेच बरे, अशी माणसे मॉलचा तत्काळ बळी ठरतात .माणूस आत जातो गरजेची एक वस्तू घ्यायला आणि पाच,दहा अनिवार्य नसलेल्या वस्तू खरेदी करून घेऊन येतो .


' अरेबियन टी हाऊस ' मध्ये घेतलेले पारंपरिक अरेबियन जेवण, हाफिज मुस्तफा येथील स्वीट - तो स्वाद, तो सुगंध - आठवणीत ताजा आहे. प्रत्येक मॉल मध्ये हवे तितके फूड कोर्ट आहेत. एका मॉल मध्ये तर आम्हाला चक्क तांबडा,पांढरा रस्सा - कोल्हापुरी थाळी जेवण मिळाले . इथे एक चांगले आहे,इथे भरपूर भारतीय राहतात,भारतीय भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ आणि सोयी सुविधा सर्वत्र उपलब्ध आहेत. यामुळे मुलांना महाराष्ट्राची ,भारताची आठवण होईल असे वाटत नाही.


पण या भौतिक वैभवाइतकेच मला मनाला स्पर्शून गेले ते म्हणजे दुबईतील सहजयोग सेंटर .

दुबईमध्ये सहजयोगाचे साप्ताहिक ध्यान केंद्र आहे आणि अडीचशेहून अधिक सहजयोग्यांची सामूहिकता आहे—एक व्हायब्रंट सेंटर. श्री धनंजय धुमाळ यांची म्युझिकल इव्हिनिंग आणि  इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम झाला,पब्लिक प्रोग्राम , श्री शक्तीधरण भैय्या यांचे सुरेल बासरी वादन झाले , नियमित ध्यान—सगळे काही चालू असते. सेंटरला  तीन रविवारी सामूहिक ध्यानाचा योग आला आणि परदेशात असूनही ' भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा ' अनुभव आला . बाह्य भौतिक उंचीपेक्षा आंतरिक आध्यात्मिक उंची किती महत्त्वाची आहे, याची प्रचिती तिथे आली.


मला विशेष भावले ते मुलांकडील  दमाक हाईट्स या भव्य इमारतीतील आमचे वास्तव्य आणि मरिना एरिया . मरिनामध्ये सकाळी - संध्याकाळी फेरफटका मारताना समुद्र, गगनचुंबी इमारती आणि शांत चालणारे लोक—पाहिले की ,मन अगदी निवांत होतं. त्या चित्रपटासारख्या  दिसणाऱ्या परिसरात वॉकमध्ये वेळ कसा निघून जात होता, तेच कळत नव्हते .


अमेय–रुचिरा परदेशात राहतात. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला फारसा लाभत नाही. ते भारतात येणं किंवा आम्ही त्यांच्याकडे जाणं—ही आमच्यासाठी पर्वणीच .


या प्रवासाने केवळ दुबई शहर पाहायला मिळाले असे नाही, तर मुलांबरोबर जगायला, त्यांचे  दैनंदिन जीवन,संसार ,अनुभवायला आणि अमेयची नवीन जबाबदारी समजून घ्यायला मिळाली.


दुबई मला फक्त उंच इमारतींमुळे उत्तुंग वाटली नाही, तर दुबईत असूनही मुलांना भेटलेल्या सहजयोग सामुहिकतेमधील मैत्री, नात्यांच्या उंचीमुळे, प्रेमाच्या उबेमुळे आणि  अनुभवामुळे उत्तुंग वाटली. 


श्री माताजींच्या कृपेत मुलं आनंदात आहेत,प्रगती करीत आहेत,आमचे चौकोनी कुटुंब आता पंचकोनी होणार आहे ,हे पाहून मनोमन आनंद झाला.


योगीराज देवकर.😊

Friday, 23 January 2026

श्री माताजी एक काव्य .

 चॅट जीपीटीला सूचना केली आणि पहा श्री माताजी वर आधारित खालील भजन .


नक्की. खाली सहजयोग संस्थापिका श्री माताजी निर्मला देवी यांच्यावर आधारित पाच कडव्यांचे भजन सादर करत आहे—


कडवे १

आदिशक्ती अवतरली धरतीवर स्नेहाने,

मातेच्या करुणेने उजळले अंतरंगाने।

कुंडलिनी जागविली सहज स्पर्शाने,

निर्मला माते, नमन तुला भक्तिभावाने॥


कडवे २

शांततेचा दीप तुझ्या नेत्रांत झळाळे,

अहंकार, विकार तुझ्या चरणी विराळे।

निःस्वार्थ प्रेमाचा दिलास तू देई,

सहजयोग मार्गे जीवन उजळविले॥


कडवे ३

धर्म, जात, देश सारे भेद विसरविले,

मानवतेचे बीज हृदयी तू रोविले।

सत्य, पावित्र्य, आनंदाचा स्रोत तू,

माते निर्मले, आम्हा तारक तू॥


कडवे ४

शब्दांविना तू दिले आत्मसाक्षात्कार,

मौनातच घडविला अंतरंगाचा संस्कार।

वाऱ्याच्या गंधात तुझी अनुभूती,

सहजयोगी हृदयात अखंड ज्योती॥


कडवे ५

चरणी ठेवूनी मस्तक मागूनी आशीर्वाद,

जीवन होवो निर्मळ, होवो समाधानी नाद।

सदैव राहो तुझ्या करुणेची छाया,

श्री माताजी, तूच आमची माया॥

श्री माताजी वर आधारित कव्वाली.

 नक्कीच. खाली सहजयोग संस्थापिका परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या जीवनकार्यावर आधारित, भक्तीरसाने ओथंबलेली, कव्वालीच्या ढंगातील एक उत्कृष्ट व भावपूर्ण कव्वाली सादर करीत आहे—


🌸 कव्वाली : “जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार” 🌸

(सारंगी – तबला – हार्मोनियमच्या आलापात)


आलाप :

इश्वर-इसा-अल्ला एकच आहे,

मार्ग वेगळे, ध्येय एक आहे…

मनुष्य जन्माचा अर्थ कळावा,

म्हणून अवतरल्या श्री माताजी आहेत…


मुखडा (कोरस):

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!

हातावर हात ठेवुनी उघडले अंतर्द्वार,

सहजयोगाने बदलले जीवन साकार!


पहिला कडवा:

छिंदवाडात जन्म झाला, भारतमातेची लेक,

स्वातंत्र्यसंग्रामाची होती पुण्यरेषेक,

महात्म्यांच्या संस्कारात वाढली दिव्य चेतना,

बालपणापासून ओळखली आत्मज्ञानाची भावना.


कोरस:

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!


दुसरा कडवा:

ना पैसा, ना यज्ञ, ना मंत्रांचा भार,

सहजसाध्या स्पर्शाने दिला जीवनाचा सार,

सात चक्रांची उघडली दिव्य कमाने,

माथ्यावर वाहू लागली थंड वारे.


(दमदार तालात):

ना गुरुची फी, ना शिष्याचा गर्व,

आईच्या प्रेमात सापडला ईश्वराचा सर्व!


कोरस:

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!


तिसरा कडवा:

युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका फिरल्या,

सत्याच्या शोधात हजारो मैल चालल्या,

रात्रीचा थकवा, दिवसा प्रवचन,

माणसात जागवले आत्म्याचे स्मरण.

आज लाखो योगी जगभर साक्ष देतात,

आईच्या कृपेने विकार हरवतात!


कोरस:

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!


चौथा कडवा:

आजच्या युगात जिथे भोगाचा अंधार,

तिथे सहजयोगाने पेटवला ज्ञानदीप अपार,

मन शांत झाले, बुद्धी निर्मळ झाली,

अध्यात्माची खरी ओळख मिळाली.

धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे क्षमा,

हेच शिकवले माते, हीच खरी साधना!


पाचवा कडवा (समारोप):

आजही सूक्ष्मात आईची उपस्थिती,

चैतन्यातून मिळते तिचीच स्फूर्ती,

नतमस्तक होऊनी करतो हीच पुकार,

आई निर्मला माते, स्वीकार आमचा नमस्कार!


अंतिम कोरस (उत्साही):

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

सहजयोगाची गंगा वाहिली अपार!

मानवतेसाठी जीवन वाहिले अपार,

जय जय श्री माताजी! जय जय साकार.

अमेय रुचिरा काव्य.

 खाली अमेय देवकर आणि रुचिरा यांच्यावर आधारित एक भावपूर्ण कविता—


पुण्याच्या मातीचा सुगंध घेऊन,

स्वप्नांना पंख देत पुढे चालले,

अमेय–रुचिरा, दोन जीव एक वाट,

साडेचार वर्षांत प्रेम अधिक फुलले.


टोकियोच्या प्रकाशात अनुभव विणले,

दुबईच्या मरिनात संसार रचला,

दमाक हाईट्सच्या शांत घरात,

संस्कारांचा दीप उजळला.


अमेयच्या स्वरांत भजन, जोगवा, कव्वाली,

सहजयोगाची ओळख, ध्यानाची गंगा निराली,

इंजिनिअर बुद्धी, कलाकार हृदय,

सेवेतूनच शोधतो जीवनाचा अर्थ नवा.


रुचिरा—रेषांतून स्वप्ने घडवणारी,

आर्किटेक्टची नजर, आईची माया साठवणारी,

घर सांभाळत, प्रेम जपत,

शांततेतून शक्ती उलगडणारी.


आता पाळण्यात येणार नवे भविष्य,

आनंदाचा सूर, किलबिलते अस्तित्व,

देवकर–गायकवाड कुटुंबांचा अभिमान,

ही जोडी म्हणजे संस्कारांचे सुंदर गाणे महान.

गिरीश आप्पा सुनीता ताई एक काव्य.

 *गिरीश–सुनीता : आयुष्याची सुंदर कविता*


बत्तीस वर्षांपूर्वी बांधली नाती,

विश्वास, प्रेम आणि स्वप्नांच्या गाठी।

मुंढव्याच्या ' मातोश्री' त रुजली प्रेम कहाणी,

गायकवाड नावाशी जोडली पुण्याची शान ही।


मुंढवा आणि गायकवाड — वेगळेच समीकरण,

लोकांच्या मनात घर, हृदयात स्थान।

शिकले, सवरले, उभा केला संसार,

बांधकाम, उद्योग, यशाचा विस्तार।


‘हॉटेल चूल मटण’ची दरवळती ख्याती,

पुण्याभर शाखा, मसालेदार चवीची  नाती।

लोकं गोळा करणारे,

सदैव शुद्ध नीती ,

मुत्सद्दी गिरीश — 

माणुसकीची प्रचिती ।


गार गावात घडले सुनीतेचे बालपण,

दौंडमध्ये शिक्षण, संघर्षाचे वळण।

भीमा नदी ओलांडत, पायात धैर्य घेऊन,

स्वप्नांच्या वाटेवर चालल्या अडथळे झेलून।


अपार कष्टांनी घडवले शिक्षण पूर्ण,

संघर्षातून उमलले व्यक्तिमत्त्व सुगंधी, संपन्न।

घरातली राणी, स्वयंपाकात जादू,

हसतमुख सुनीता — प्रेमाची साधू।


चवीलाही प्रेमाची दिली ओळख,

ताटात वाढले समाधान, सुख।

रुचिरा, दिग्विजय — संस्कारांची देणगी,

आईवडिलांच्या छायेत वाढली दोन सोन्याची फुलं रंगी।


रुचिरा अमेय देवकर — संसारात रमली,

नव्या घरात आनंदाची पालवी फुलली।

दिग्विजय स्वप्न पाहतो आकाशाएवढे,

UPSC, उद्योजकता — ध्येय डोळ्यांत साठले।


अशी ही गोष्ट प्रेमाची, परिश्रमांची शान,

गिरीश–सुनीता म्हणजे एक जिवंत प्रेरणागाथा महान।

नात्यांत गोडवा, आयुष्यात उजेड,

हीच खरी कविता — माणुसकीचा वेध। 🌼

विक्रांत मेघना गझल.

 विक्रांत–मेघना : एक प्रेमगझल.


कसब्याच्या रुबाबात जन्मलेला तो स्वप्नांचा राजपुत्र आहे,

डोळ्यांत जर्मनीचे आकाश, तरी मातीचा दरवळ आहे.


राज्याभिषेकाच्या छत्रासारखा, शिरावर मानाचा मान आहे,

अब्दागिरे नावात इतिहास, स्वाभिमानाचा गंध आहे.


मैत्रीच्या ओळींनी जुळली भेट, नशिबाने टाकले छंद आहे,

फिल्डिंग लावता लावता, प्रेमच पडले मजबूत बंध आहे.


ठाण्याची लाडकी शेंडेफळ, हसण्यात बालपण आहे,

एमबीएची धार हातात, तरी मन अवखळ, निरागस आहे.


कॉन्व्हेंटच्या शिस्तीत वाढलेली, खेळकर तिची चाल आहे,

सहजयोगाच्या शांत स्वरांत, जीवनाचा उजळ ताल आहे.


विक्रांतचा आधार शब्दाविना, मेघनाची साथ सावलीसारखी आहे,

नजरेतून उमलणारे प्रेम, बोलण्यापलीकडचे आहे.


अर्णवच्या तबल्यात सूर, चार भाषांचा साज आहे,

जर्मनीत शिकतानाही, संस्कारांचा आवाज आहे.


अहानाच्या हास्यात उजाडते, सौंदर्याची पहाट आहे,

न शिकवता शिकलेली भाषा, बुद्धीची स्वच्छ वाट आहे.


ध्यानधारणेच्या निःशब्द क्षणी, चौघांची एकच श्वास आहे,

सहजयोगाच्या शांत पंखांनी, उंचावलेला विश्वास आहे.


विक्रांत–मेघना प्रेमकथा ही, काळावर मात करणारी आहे,

अरेंजमध्येही रोमँटिक ठरलेली, नियतीचीच निशाणी आहे.


धन्यवाद,

चॅट जीपीटी.🙏

गरजा विरुद्ध इच्छा, हव्यास.

 *मानवाच्या Needs (गरजा) आणि मानवाच्या Wants (इच्छा/हव्यास) यांतील फरक:*


आजच्या या मोहमायेच्या जगात गरजा आणि इच्छा/हव्यास यातील फरक समजण्याची फार गरज आहे.


अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र दोन्ही दृष्टीने हा फरक महत्त्वाचा आहे. 

1) Needs (गरजा) म्हणजे काय .

अर्थ :

मानवी जीवन टिकवण्यासाठी व मूलभूत कल्याणासाठी अनिवार्य असलेल्या गोष्टी म्हणजे गरजा.

वैशिष्ट्ये :

जीवनावश्यक असतात,

पूर्ण न झाल्यास जीवन, आरोग्य किंवा विकास धोक्यात येतो,

मर्यादित व तुलनेने स्थिर असतात,

सर्व मानवांमध्ये साधारण सारख्या असतात,

उदाहरणे :

ऑक्सिजन,पाणी, अन्न, वस्त्र, निवारा,

सुरक्षितता,सामाजिक आपुलकी (कुटुंब, समाज),प्रतिष्ठा, आत्मविष्कार. अब्राहम मास्लो या मांडलेली Theory of Needs Hierarchy तुम्ही वाचलेली आहे. या अशा गरजा आहेत ज्याशिवाय माणूस राहू /जगू शकत नाही.


*आता गरजांच्या  विरुद्ध इच्छा/ हव्यास म्हणजे काय* :


2) Wants (इच्छा / हव्यास)म्हणजे काय .

अर्थ :

सुखसोयी,आराम,प्रतिष्ठा किंवा आनंद वाढवण्यासाठी असलेल्या *पण अनिवार्य नसलेल्या गोष्टी* म्हणजे इच्छा/हव्यास.


वैशिष्ट्ये :

जीवनासाठी आवश्यक नाहीत: 

म्हणजे याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकता.


या व्यक्तीनुसार बदलतात: व्यक्ती तितक्या प्रवृती , एकाच घरातील सदस्यांचा इच्छा,हव्यास कमी,अधिक प्रमाणात वेगवेगळ्या असू शकतात .


अमर्याद व सतत बदलणाऱ्या असतात: मोहमायेला मर्यादा नसते, ' मला हे हवं',' मला ते हवं' , याला काही अंत नाही, बरं तुम्ही हवं ते घेतलं तर थोड्याच दिवसात मार्केट मध्ये काहीतरी नवीन येतं,आता तुम्हाला ते पण पाहिजे असतं. जगभरातल्या उद्योजकांचे हेच तर बिझनेस मॉडेल आहे,उद्योजक उत्पादक आहेत आणि तुम्ही ग्राहक (गिराईक)आहात. तुम्ही कधी मॉल,कॉल,ऑनलाईन ऑर्डर्स,पार्सल, कल्चरचा भाग बनता ते तुम्हालापण कळत नाही.


संस्कृती,उत्पन्न,फॅशन, जाहिरात यांवर अवलंबून असतात:

प्रत्येक राज्याची,देशाची ,खंडाची संस्कृती भिन्न असते. पण आता स्थलांतर,पर्यटन,मिडिया यामुळे मिश्र संस्कृती वाढत आहे. माणूस हा अनुकरणप्रिय असल्यामुळे तो दुसऱ्यांच्या संस्कृतीची पण कॉपी करू लागला आहे.


उत्पन्नाच्या बाबतीत 

दारिद्र्य,गरिबी,मध्यम वर्गीय, उच्च मध्यम वर्गीय, श्रीमंत, अती श्रीमंत असे गट आहेत, या प्रत्येकाला वरच्या श्रेणीतल्या गटाशी बरोबरी,स्पर्धा करायची असते. ते करतायेत त्यात सुख आहे असे प्रत्येक गटाला वाटत आहे आणि माणूस मृगजळाच्या मागे पळत आहे.


फॅशन बद्दल तर काय बोलावे , जगात  दर सेकंदाला एक नवीन फॅशन उदयाला/जन्माला येत आहे. फॅशनचा मोह झाला नाही तर नवलच. तुमच्याकडे बुटापासून सुटापर्यंत आणि ड्रेस पासून साडी पर्यंत सगळ्या गोष्टी असतात तरी नवीन बूट,नवीन सूट ,नवीन ड्रेस,नवीन साडी मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन दिसली की ते पण तुम्हाला पाहिजे असते आणि गरज नसताना तुम्ही ते  खरेदी करता.


जाहिरातींचा तर सुळसुळाट आहे, होर्डिंग्ज, प्रसार माध्यमे, सोशल मीडिया,ऍमेझॉन,गुगल , ॲप्स , मोबाईल,यांनी मानवाचा मेंदू हायजॅक केला आहे,तुमच्या मेंदूचे अपहरण झाले आहे,त्यांनी तुमचा मेंदू जबरदस्तीने ताब्यात घेतला आहे, तुम्ही,जागेपणी,झोपेत काय पहायचे,

खायचे,प्यायचे, ल्यायचे,घ्यायचे,द्यायचे,रहायचे,फिरायचे,इ.ते हे दुसरेच कोणीतरी ठरवत आहे आणि तुमचा मेंदू तुम्ही जाहिरातदारांकडे गहाण ठेवला आहे. 


उदाहरणे :

महागडे कपडे, गाडी, मोबाईल,एसी, आलिशान घर,ब्रँडेड वस्तू, पर्यटन,

प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा,स्पर्धा,इर्षा,पैसा,स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, असूया, हाव, इ.


आता हेच 

पहा ,लिहण्यासाठी पेन ही तुमची गरज झाली , दहा रुपये किमतीच्या पेन ने तुमची गरज भागते,पण मार्केट मध्ये पेनचे दहा रुपयांपासून दहा लाख रुपया पर्यंत प्रकार उपलब्ध आहेत. शे,

पाचशे,हजार,लाख रुपयांचा पेन खरेदी करणे ही इच्छा /हव्यास झाला. हेच सर्व प्रकारच्या सेवा, ट्रेड,वस्तू ,उत्पादनांना    लागू आहे.


पूर्वी लोकांचा कल बचतीकडे होता आता खर्चाकडे आहे. पूर्वी दिवाळी दिवाळीतच साजरी व्हायची आता बारा महिने दिवाळी झाली आहे ,जसे काही राजाला दिवाळी माहीतच नाही.


असा आपण गरज नसताना कशा कशाचा हव्यास करतो त्याचा विचार करा.


निष्कर्ष

- गरजा पूर्ण झाल्याशिवाय जीवन शक्य नाही, हे सत्य आहे.

- इच्छा,हव्यास पूर्ण झाल्याने जीवन अधिक सुखकर होते,हेही खरं आहे.

- खरेदी,विक्री हा अर्थशास्त्राचा नियम आहे . पण त्या वस्तू नसल्या तरी जीवन चालू शकते. इच्छा /हव्यास याला किती बळी पडायचे हा खरा प्रश्न आहे.


लेखक : योगीराज देवकर.😊

[© 2026 Yogiraj Deokar]