tag:blogger.com,1999:blog-56652203613614361062024-03-12T10:22:32.126+05:30योगिराज देवकर | Yogiraj Deokarमहाराष्ट्रात घराघरात उद्योजक निर्माण करणे या
विचाराने प्रभावित समविचारी व्यक्तींचे व्यासपीठ.Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.comBlogger82125tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-1102598223170323232024-03-07T22:00:00.001+05:302024-03-07T22:00:37.948+05:30केल्याने होत आहे रे!<p> केल्याने होत आहे रे!</p><p>डेंटिस्ट डॉ चेतन पोपटराव पराडे हे डॉ आकाश कदम या माझ्या मेव्हण्याचा क्लासमेट त्यामुळे माझी त्यांच्याशी ओळख झाली. मागच्या वर्षी मला समजले की त्यांनी पन्नास एकर केळीचे पीक केले आहे तेव्हापासून त्यांचे शेत पहायला जाण्याची इच्छा होती ती 29 जानेवारीला पूर्ण झाली.</p><p>सकाळी पुण्याहून निघून 10.30ला सासरे श्रीबलभीमराव जाधव कु.आकाश जाधव आणि मी महाळुंग, श्रीपूर या गावी पोहोचलो. त्यानंतर पुढील तीन तास ऐकत आणि पहात राहिलो डॉ चेतन पराडे याची रोलर-कोस्टर, चढ-उतारांची सक्सेस स्टोरी...</p><p><br /></p><p>2020 मध्ये शेती महामंडळाची शंभर एकर जमीन ठराविक कालावधीसाठी भाडेकराराने देण्याची एक जाहिरात होती. डॉ चेतन यांनी हा फॉर्म भरला. यांचा दर कंपेटिटिव्ह असल्यामुळे अर्ज मंजूर झाला. सुरुवातीलाच दोन वर्षाचे भाडे डिपॉजिट स्वरूपात भरायचे होते ते यांनी भरले. प्रोजेक्टचे नामकरण निर्मला ऍग्रो अँड फार्म्स (NAAF) असे केले. 2021 ला जमिन ताब्यात मिळाली आणि कामं सुरु झाली तितक्यात कोरोना वाढला ज्याचा चेतनला डॉक्टर फायदाच फायदा झाला.डॉक्टर असल्यामुळे पुणे - श्रीपूर विना अडथळा ये-जा करता येत होते, लॉकडाउन मध्ये शेतीची कामं सुरु होती पण कोरोनाच्या भीतीने स्थानिक लोकांच्या हाताला काम नव्हते त्यामुळे या कामाला माणसं, यंत्रणा उपलब्ध झाली आणि लोकांना रोजगार मिळाला.</p><p><br /></p><p>ती शंभर एकर जमीन गेली 8-10 वर्ष पडीक होती. सगळीकडे वेड्या बाभळींचे जंगल वाढले होते. जेसीबी लावून सर्वप्रथम ते काटेरी जंगल साफ केले, त्याची विल्हेवाट लावली आणि जमीन स्वच्छ केली. आता शंभर एकर जमीनीची कशी डेव्हलोपमेंट करायची याचा एकत्रित प्लॅन करणे गरजेचे होते. यात त्यांना काही जाणकार आणि नेटाफेम एजन्सीचे सहकार्य झाले. शेतात कॅनॉलचे पाणी येत होते. अगोदर एक छोटे शेततळे तयार केले, कॅनॉलचे पाणी या शेततळ्यात घेतले, तिथेच शेत मजु्रांसाठी खोल्या बांधल्या आणि शेतीचा श्रीगणेशा झाला. पण एव्हढ्याने त्या शंभर एकरांचे भागणार नव्हते. मग हाती घेतला सहा एकर आकाराचा भव्य शेततळ्याचा प्रोजेक्ट. सहा एकरावर जमिनीच्या खाली 15 फूट आणि जमिनीच्या वर 20 फूट महाकाय प्रोजेक्ट पोकलेन, हेवी ट्रक्स, ब्लास्टिंगच्या मदतीने अहोरात्र कामं करून केवळ दोन महिन्यात पूर्ण केला. इथं जी कामं करायला माणसं होती त्यांच्यासाठी गावातच एक मेस लावली होती केवळ त्याचं बिल तीन लाख झाले होते. शेततळ्यावर जो प्लास्टिक पेपर अंथरला आहे तो पस्तीस लाखाचा आहे. या शेततळ्यातून जी काळी माती बाहेर काढली ती शेततळ्याचा भराव लेवल करण्यासाठी वापरली, दहा-दहा एकरांचे प्लॉट तयार केले,शेततळ्यातून जो मुरूम, दगड बाहेर आला त्यातून शेतात प्रत्येक प्लॉट पर्यंत जाण्यासाठी पंधरा फुटी रस्ते तयार केले. स्वतंत्र डीपी घेतला, त्या शेततळ्यावर प्रत्येकी दहा HP च्या आठ इलेक्ट्रिक मोटरी बसविता येतील अशी सोय केली, सध्या चार मोटारी आहेत. आठ सॅन्ड फिल्टर्सची सिस्टीम उभारली, इथून प्रत्येकी दहा एकर क्षेत्रात ड्रीप इर्रीगेशन होईल अशा आठ पाईपलाईन सुरु होतात. एक मोटर चालू केली तर दहा एकर भरणे होते. आठ मोटरी चालू केल्या तर एका वेळी 80 एकर भरणे होऊ शकते. पिकांना औषधे, बुरशीनाशके, खते ड्रीप मधून देण्याची सोय आहे. शेतावर वर्षभर बांधील कामं करणारे दहा महिला आणि दहा पुरुष कामगार आहेत. या प्रोजेक्टमुळे डायरेक्ट इनडायरेक्ट 40-50 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुदैवाने इथं कामं करणारे मॅनेजर आणि कामगार श्रमांची, मोबदल्याची जाणीव असलेले आणि प्रामाणिक आहेत. हा कर्मचारी वर्ग खुरपण, शेणखते टाकणे, मल्चिंग करणे, कीटक नाशके फवारणे, पिकांची निगा राखणे, पाणी व्यवस्थापन करणे आदी कामं अगदी आपलेपणाने करताना आढळले. चेतनने सुरुवातच पन्नास एकर केळी पिकापासून केली. पीक चांगलं आलं, एक्स्पोर्ट केलं आणि चांगला आर्थिक फायदा झाला. आता त्यांच्या प्रोजेक्टला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला पपई , कलिंगड ही पिकं केली जी चांगलीच तोट्यात गेली. एकदा वादळ झालं आणि तीन एकर केळी आलेल्या फळासह झोपली, म्हणजे पुन्हा मोठं नुकसान. सध्या शेतावर प्रत्येकी दहा एकरावर आलं, पेरू, शेवगा आहे, पन्नास एकरावर केळी पीक सुरु, खोडवा, निडवा आहे आणि उर्वरित क्षेत्रात ऊस होता. हे मी एका वाक्यात लिहून मोकळा झालो पण त्यामागे आहेत डॉक्टरचे अपरिमित कष्ट.</p><p><br /></p><p>चेतन स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना प्रत्येक पिकाच्या तब्बेतीमधील लहानसहान बदल लगेच लक्षात येतात आणि त्यावर लागलीच उपचार करतात. शेणखत, मळी, राख, औषधे, खते, इ. पुरवठा धारक आणि मालाच्या विक्री, एक्स्पोर्टचे नेटवर्क उभे केले आहे.</p><p><br /></p><p>चेतनचे मुळ गांव बाभुळगाव जे श्रीपूर पासून 15 किमीवर आहे. तिथे त्यांची वडिलोपार्जित 16 एकर जमीन आहे. या 16 एकराच्या अनुभवरून चेतनने ही 100 एकराची उडी घेतली आहे जी फारच कौतुकास्पद आहे. यात आढळतं ते चेतनचे व्हिजन, आर्थिक धोका, भांडवल उभारणी आणि व्यवस्थापन, साहस, हुशारी, कष्ट आणि उपयुक्त लोकांची सांगड घालण्याची कला. चेतन एकदम इनोसंट आहेत त्यांच्याकडे पाहुन या कार्याची कल्पना पण येत नाही.</p><p><br /></p><p>कथा ऐकताना लक्षात आले की, इथं लाखात, कोटीत खर्च झाला आहे, होत आहे, हे मुळीच सोप काम नाही. आता आर्थिक उलाढाल पण त्याच प्रमाणात आहे. या प्रोजेक्टबद्दल बोलताना ते म्हणाले, " हे करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही. ना कधी दडपण आलं, ना कधी झोपमोड झाली. ही सारी श्री माताजी निर्मला देवींची कृपा.सगळं कसं सहज चाललं आहे. घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट आणि दाखविलेला विश्वास तितकाच महत्वाचा आहे."</p><p><br /></p><p>वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमच्या ठिकाणी छान शेड उभारले आहे. छोटेखानी ऑफिस आहे. ऑफिसमध्ये श्री माताजींचा फोटो आहे. चेतन इथली शेती सहजकृषी प्रमाणे करतात. म्हणजे काय तर शेती, पिकं करण्यासाठी वैश्विक चैतन्य आणि पृथ्वी किंवा पंच तत्वाचे सहाय्य घेणे. ही श्री माताजींनी सहजयोगात निर्माण केलेली सहजकृषी पद्धती आहे. यात कामगारांचा पण सहभाग आहे.</p><p><br /></p><p>डॉ चेतनने खरंच इथं नंदनवन उभ केलं आहे. ते म्हणाले, " इथं शेततळ्याजवळ, वॉटरसप्लायजवळ आलं की पूर्ण शंभर एकरातील पिकांचे विहंगम दृष्य दिसते आणि इथलं वातावरण इतकं आल्हाददायक असतं की,अगदी काश्मीर सारखं वाटतं. "</p><p><br /></p><p>डॉ चेतनला भविष्यात अजून यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा.</p><p><br /></p><p>शब्दांकन...</p><p>लेखक योगीराज देवकर.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-66440108799904693702023-10-11T20:06:00.002+05:302023-10-11T20:06:41.890+05:30युरोप ट्रिप 2023<p> विक्रांत, मेघना, अर्णव आणि आहाना अबदागिरे फॅमिलीस नमस्कार!</p><p><br /></p><p>पूर्वी सासरे ठाण्यात रहायचे तेव्हा त्यांच्याकडे जाऊन सासुरवाडीत राहणे होत असे. सध्या सासरे, सगळे साडू, व्याही,असे जवळचे सगळेच नातेवाईक पुण्यातच रहात असल्यामुळे कोणा नातेवाईकांच्या घरी जाऊन मुक्काम करणे ही गोष्ट घडत नाही . तुम्ही म्युनिक, जर्मनीत राहता, इथे येऊन तुमचा पाहुणचार घेणे, तुमच्याकडे येऊन राहणे केवळ तुमचा आम्हाला युरोप फिरायला यायचा केलेला आग्रह आणि अमेय आणि रुचिराचे या सुट्टीत भारतात न येता जर्मनी, युरोपला ट्रिप करूया या कल्पनेमुळे शक्य झाले.एरवी हॉटेल मध्ये जाऊन राहणे वेगळे पण यनिमित्ताने खूप वर्षानंतर नातेवाईकाच्या घरी जाऊन जास्त दिवस राहण्याचा योग आला. तुमच्या स्वागत आणि आदरातिथ्यामुळे हा अनुभव खूप चांगला आणि कायम लक्षात राहील असा ठरला.</p><p><br /></p><p>ऑस्टपार्क मधील बार्रबेक्यू पार्टीच्या वेळीच तुम्ही आमच्यासाठी केलीली तयारी लक्षात आली होती. तेव्हा या मेमोरेबल ट्रिप साठी सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक आभार!</p><p><br /></p><p>पण खरंतर तुमची ही सगळी सुट्टी आमचा पाहुणचार करण्यात खर्च झाली याची खंत वाटली.</p><p><br /></p><p>एकत्र राहताना आपल्यामुळे कोणाला काही त्रास होऊ नये असा माझा प्रयत्न असतो तरी माझे स्पष्ट आणि कडक बोलणे यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर किंवा आम्हा कोणाकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमस्व. (अमेयने तर मला बर्न मध्ये सूचनाच दिली की, त्या अर्णवला मोठ्या आवाजात सांगितलेले ऐकायची सवय नाही. एक बरंच झालं ही सूचना आणि याचा सराव भविष्यात आजोबा झाल्यावर मला फायदाच होईल.😀)</p><p><br /></p><p>या ट्रिपमध्ये लक्षात राहीले ते अर्णव आणि आहानाने आपल्या बरोबरीने तयार होऊन ट्रिपच्या वेळा पाळणे. आहानाच्या निरागस वागण्याने ट्रिपची आणि येथील वास्तव्याची मजा वाढली. हुशार आणि समजूतदार आहेत तुमची दोन्ही मुलं.</p><p><br /></p><p>युरोप मध्ये टुरिझमसाठी सगळं रेडी असलेलं इन्फ्रास्ट्रॅक्चर, तुमच्या स्वतःच्या कारने आणि अमेयने इंटरनॅशनल ड्रायविंग लायसन्स घेऊन युरोप मध्ये रेंटेड कारने पार्किंग टू पार्किंग दिलेली सेवा,आल्प्सपर्वत रांगा, बर्फाछाद्दीत शिखरे,प्रदूषणाचे कमी प्रमाण, वाहतुकीतली शिस्त, स्वच्छ पाण्याच्या वाहणाऱ्या नद्या,प्रत्येक ठिकाणी केलेले ऍडव्हान्स इंट्री बुकिंग, इंटरलाखन आणि झुरीच येथील अनुक्रमे छान कॅम्पिंग साईट आणि युथ हॉस्टेलची निवड, डे टू डे चे प्रॉपर प्लँनिंग, स्विझरलँड आणि एकूणच युरोपमधील महागाईवर मात करण्यासाठी पोर्टेबल गॅस शेगडी पासून केलेली तयारी, कल्याण भेळ,मिसळ, गिट्सची तयार पाव ,पनीर भाजी,ब्रेड-ऑम्लेट,मॅगी, चितळे, जोशी फूडस् चे प्रॉडक्ट्स, ( ब्रेकफास्ट, लंच असो की डिनर या सेवेसाठी सदैव तत्पर रुचिरा, मेघना आणि अनिताचे विशेष कौतुक आणि आभार. एकवेळ Lazy Rancho इथे फूड तयार करणे ठीक होते पण त्यांनी विशेषतः Brienzsee आणि Bern इथे ऑड कंडिशन्स असताना कूकिंग केले ते कायम लक्षात राहील. ) LIDL, ADLI, KAUFLAND अशा सुपर स्टोअर्स, Ali super food मध्ये तसेच Macdonald मध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थामुळे युरोपात महागाई असली तरी त्यातल्यात्यात इकॉनॉमिकल करता आली आणि कारच्या प्रवासामुळे मुळे पण हे शक्य झाले.</p><p><br /></p><p>नाहीतर काय इथली महागाई आणि काय या युरोपीयन लोकांचे टुरिस्टच्या प्रति भेदभाव केल्यासारखे वागणे . पॅरिस आणि मिलान शहरे तर भुरट्या, पाकीटमार चोरांची शहरे आहेत .काय या देशांची ख्याती,इथे गेल्यापासून परत येईपर्यंत पिकपॉकेटर्स पासून सावध रहा हेच ऐकायला मिळते आणि मला तर अनुभवायलाच मिळाले . शहाण्या माणसाने फ्रान्स आणि इटली ट्रीपला अजिबात जाऊ नये या मतावर मी आलो आहे.</p><p><br /></p><p>प्रत्येक्ष ट्रिपच्यावेळी वातावरण उष्ण होते तरी सगळा निसर्ग पाहता आल्यामुळे ट्रिप चांगली झाली आणि आपल्याला एन्जॉय करता आले याचा आनंद आहे. ट्रिप नंतर सुरु झालेला गारवा निर्माण करणारा पाऊस जर ट्रिपच्या वेळी आला असता तर आपले हाल झाले असते. </p><p><br /></p><p>तुम्हा चौघान्ना जर्मन भाषा येते याचा या प्रवासात आम्हाला लाभ झाला.( अर्णवचा जरा जास्तच.)तुम्ही आणि अमेय अभ्यासू ट्रिप ऑर्गनायझर असल्यामुळे ही ट्रिप छान झाली. मी यापूर्वीही पण म्हटलंय की, पूर्वी आम्ही आम्ही अमेयला भारतातील राज्यात फिरायला घेऊन जायचो आता त्याने आम्हाला सिंगापूर, जपान नंतर युरोपची ट्रिप घडविली आहे. फीलिंग प्राऊड.</p><p><br /></p><p>देवकर आणि अबदागिरे फॅमिलीची ही पहिलीच एकत्र आणि मोठी ट्रिप होती. आता लवकरच आपण आपल्या भारतात भेटूया आणि महाराष्ट्र किंवा भारत ट्रिप करूया. अर्णवला किल्ले पहायचे आहेत ते पाहूया.</p><p><br /></p><p>अमेय,रुचिरा आणि आहानाचा कमी वेळात चांगलाच लळा निर्माण झाला होता त्यामुळे आहाना सारखी "अमेय दादाsss, रुची वहिनीsss!" असा दोसरा काढत होती. आम्ही निघत असताना अर्णव भारी बोलला. मेघनाला म्हणे, तु म्हणत बस आता, "योगीराज भाऊजी sss, अनिता मावशी ( माई )sss!"</p><p><br /></p><p>आता पुढचे काही दिवस तुम्हाला घर मोठे झाल्यासारखे वाटेल आणि आम्हाला सुनेसूने.</p><p><br /></p><p>अर्णव, छान अभ्यास कर आणि मोठ्ठा Scientist हो. आता तुला तुझे 16 एरिया ऑफ इंटरेस्ट पण समजले आहेत. पण त्यासाठी अभ्यास करावा लागेल,मेहनत घ्यावी लागेल, आणि हो मम्मी, डॅडी चे ऐकावे लागेल. आरे बाबा कोणत्याही मुलाला भविष्य चांगले व्हावे म्हाणून त्याचे आई, वडीलच रागवतात रे. तुला Scientist होण्यासाठी शुभेच्छा.💐</p><p><br /></p><p>चिमणी आहाना तर काय उद्या उड्या मारतच स्कूल मध्ये जाईल.</p><p><br /></p><p>तिकडे उजव्या बाजूने चालायची सवय झाली होती आता मुंबईत उतरलो की डाव्या बाजूने चालणे अवघड जाईल असे वाटते.🤣🤣</p><p><br /></p><p>असो पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार!</p><p>😅😂🤣🙏🏻💐👍🏻</p><p><br /></p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-16969627727784805012023-07-15T23:37:00.004+05:302023-07-15T23:37:41.750+05:30लोणी देवकर प्राथमिक शाळा माजी विद्यार्थी मेळावा <p> लोणी देवकर : 2 एप्रिल 2023</p><p><br /></p><p>लोणी देवकर प्राथमिक शाळेतील माजी विध्यार्थ्यांचा मेळावा.</p><p><br /></p><p>जीवन शिक्षण विद्या मंदिर लोणी देवकर मधील शाळेत </p><p>सन 1968 -1975 बॅचला शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 2 एप्रिल 2023 रोजी उत्साहात पार पडला. लोणी देवकर मधील शाळेत पहिल्यांदाच आयोजित झालेल्या या कार्यक्रमास तब्बल 48 वर्षानंतर बालपणीचे पंचवीस मित्र-मैत्रिणी एकत्र जमले होते. मुलांना पत्नीसह आणि मुलींना पतीसह निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे 48 वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांना ज्यांनी शिक्षणाचे धडे दिले असे माजी शिक्षक </p><p>भीमराव डोंगरे गुरुजी,संपत तोंडे गुरुजी आणि वामन दीक्षित गुरुजी यांची सपत्नीक या मेळाव्यास उपस्थिती लाभली. या मेळाव्यात अशोक तोंडे, उत्तम गाढवे, संजय घाडगे,हौसराव कारंडे,सौ. रतन आसबे, सौ. रतन जगताप, सौ. बंडूताई साळुंखे, अभिमन्यू डोंगरे, दादासाहेब डोंगरे, बबन सूर्यवंशी, भाऊसाहेब सरडे,मनोहर चव्हाण,मोहन भोरे, बलभीम घाडगे,</p><p>भालचंद्र जगताप,तानाजी जाधव, भारत सोनवणे, राजेंद्र गायकवाड, शिवाजी कानगुडे आणि योगीराज देवकर यांनी मनोगते</p><p>व्यक्त केली आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. माजी शिक्षक उभयतांचा पूर्ण पोशाख आणि लेखक योगीराज देवकर यांची प्रकाशित पुस्तके भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.सर्व मित्रांना 'सहजयोग' नावाचे आध्यात्मिक पुस्तक भेट देण्यात आले. आपण सर्व माजी विद्यार्थी मिळून या शाळेसाठी काय करू शकतो याचाही उहापोह झाला.मूळ लोणीकर पण सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या शिवाजी कानगुडे, योगीराज देवकर, नाथा घाडगे यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी माजी शिक्षकांना भेटून, शाळेतून नावांची यादी आणि नंतर सर्वांचे संपर्क क्रमांक मिळवून सर्वांच्या सहभागातून प्रत्येक्षात आणली.</p><p>शिवाजी कानगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले आणि योगीराज देवकर यांनी सूत्रसंचालन केले आणि शेवटी सर्वांचे आभार मानले.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-39719387168336963562023-07-15T23:28:00.004+05:302023-07-15T23:28:35.667+05:30न्यारी दुनियादारी <p> न्यारी दुनियादारी</p><p>श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर मधील 1978 दहावीच्या माजी विद्यार्थी बॅचला आता गेटटुगेदर करण्याची चांगली सवय जडली आहे. इंदापूर,भिगवण,थेऊर, औरंगाबाद नंतर आता दरेकर वाडा येथे आमचे गेट टुगेदर नुकतेच पार पडले. यावेळी निमित्त होते मुख्य वन संरक्षक अधिकारी, सत्यजित गुजर, औरंगाबाद विभाग यांच्या सेवा निवृत्ती नंतरच्या ऋणनिर्देश सोहळ्याचे. याची महिनाभरापासूनच पूर्वतयारी सुरु होती. सदर गेटटुगेदरला माझ्यासह घनश्याम शहा, गणेश देशपांडे,पांडुरंग राऊत, प्रशांत कुलकर्णी,</p><p>रमेश देवकर,उज्वला अर्णीकर, प्रवीण शिंपी,</p><p>श्रीकांत जोशी,अर्जुन ठोंबरे, विजय तांबिले,डॉ सविता पटवर्धन, प्रमिलाताई जाधव,गौतम गुणाजी, राजेंद्र चव्हाण,</p><p>राजेंद्र देवकर,गिरीश शहा,</p><p>सुरेश मेहेर,प्रदीपदादा गारटकर,संजय सावंत, यांची उपस्थिती लाभली.याशिवाय </p><p>अविनाश जोशी,संजीवनी, प्रदीप शहा, दयानंद कद्रे यांचा गेटटुगेदरला बाहेरून पाठिंबा राहिला.</p><p><br /></p><p>ठरल्याप्रमाणे सकाळी सर्वजण दरेकर वाडा येथे एकत्र जमले आणि ब्रेकफास्ट नंतर हॉल मध्ये फॉर्मल ऋणनिर्देश सोहळा सुरु झाला. हायस्कूल मधील वर्गमित्रांनी एखाद्या मित्राचा सेवा निवृत्तीनिमित्त केलेला बहुदा हा पहिलाच सोहळा असावा. सुरुवातीलाच उज्वला अर्णीकरने सत्यजित विषयी तयार केलेल्या समर्पक कवितेचे वाचन केले. त्यानंतर श्रीमती प्रतिभा गारटकर मॅडम ज्या आमच्या माजी शिक्षिका आहेत त्यांनी सत्यजित विषयी खास कविता तयार करून पाठविली होती तिचे गणेशने वाचन केले. शिक्षिकेने विध्यार्थ्यांसाठी कविता लिहणे हा प्रसंगही विरळच असावा. प्रमिला ताईने भाषणात या ग्रुपमधील सगळेजण चांगले आहेत. साठी नंतरही आपण भेटतो, गेटटुगेदर करतो यांचे सगळ्यांना आश्चर्य वाटते. ग्रुप मधील कोणीही वाया गेलेला नाही असे म्हटल्यावर उपस्थित वहिनीं मंडळीतून आवाज आला आम्ही तुमच्या मित्रांना वाया जाऊ दिलेले नाही आणि एकच हशा पिकला. सुनीता कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांचे प्रतिनिधीत्व करून फार छान विचार मांडले. सत्यजित बद्दल बोलताना बहुतेकांनी दोन प्रकारचा ऋणनिर्देश व्यक्त केला. एक त्याने मित्र म्हणून या ग्रुपच्या एकत्रीकरणासाठी दिलेले योगदान आणि दोन आय एफ एस अधिकारी म्हणून धरणीमातेच्या सेवेत वृक्ष,वेली,प्राणी आणि पक्षांसाठी दिलेले योगदान याबद्दल सगळे भरभरून बोलले. नंतर सत्यजितचा प्रदीप गारटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच सत्यजितच्या अर्धांगिनी स्वाती वहिनी यांचा डॉ सविता पटवर्धन, उज्वला अर्णीकर आणि प्रमिला जाधव यांच्या हस्ते भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.</p><p>सर्वांच्या मनोगतानंतर स्वाती वहिनी आणि सत्यजितने सत्कारास उत्तर दिले. सत्यजितने 38 वर्षांच्या सेवेत 19 ठिकाणी झालेले पोस्टिंगचा थोडक्यात आढावा घेतला. भंडारा, अल्लापल्ली, रेहकुरी, भीमाशंकर, पुणे, अहमदनगर, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, कुंडल, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी तो छोटा साहेबापासून ( ACF) मोठा साहेब(CCF) कसा घडत गेला या प्रवासाचे वर्णन केले .वन क्षेत्रातील अतिक्रमणे कशी काढली, वनातून होणाऱ्या गैर गोष्टींना कसा आळा घातला, प्राणघातक गोष्टींना साहसाने कसा सामोरा गेला, असे अनेक किस्से सांगून त्याचा कारकिर्दीचा पट सर्वांसमोर उलगडला. सव्वादोन तास चाललेल्या कार्यक्रमाचा सर्वांचे आभार मानून समारोप झाला.</p><p><br /></p><p>आता आम्हाला एन्जॉय करायचा होता दरेकर वाडा. मग काय ग्रुप फोटोज्, स्विमिंग टॅंकमध्ये पोहणे, रेन डान्स,दुपारचे जेवण,बोटिंग, ऍडव्हेंचर झुला, लॉन क्रिकेट, गप्पा आणि गाणी. यावेळच्या गेटटुगेदरला प्रवीण शिंपी, सुरेश मेहेर, राजेंद्र चव्हाण,पहिल्यांदाच उपस्थित होते . त्या उभायतांची ओळख परेड झाली. राजेंद्र चव्हाणने स्कूल मधील आठवणी सांगताना अशी काही धमाल उडवून दिली की, सर्वांची हसता हसता पुरी वाट लागली. आम्ही एकत्र असलो की,श्रीकांतची गाणी आणि राऊत वहिनींचे विनोद याची मेजवानी असतेच.</p><p><br /></p><p>अशा कार्यक्रमात असे आढळते की, जे जास्त बोलणारे असतात ते भाव खाऊन जातात आणि जे कमी बोलतात ते आनंद घेऊन जातात.अशा या न्यारी दुनियादारीत मित्रांच्या संगतीत दिवस कसा गेला ते कळले देखील नाही.शेवटी हाय टी आणि खूप सारी ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा कधी भेटायचे ते ठरवून गेटटुगेदरचा समारोप गेला आणि सगळे परतीच्या प्रवासाला लागले.</p><p><br /></p><p>योगीराज देवकर.</p><p>9307133134</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-56618965306040443902023-06-09T12:24:00.003+05:302023-06-09T12:24:52.654+05:30श्री नितीन साने फॅक्टरी व्हिजिट <p> *Omega Sinto Sane Foundry Machinery Pvt Ltd. Pirangut, Pune.*</p><p><br /></p><p>उद्योजक श्री नितीन साने यांचे वडील नगरला फिरोदिया फौंडरीत नोकरीत होते. तिथे त्यांनी सॅन्ड आणि तिचा पुनःवापरचा अभ्यास केला आणि त्यांनी असा विचार केला की, आपणच हा व्यवसाय का सुरु करू नये आणि पिरंगुट मध्ये साने फौंडरी मशीनरीची सुरुवात झाली. पुढे नितीन साने मेकॅनिकल इंजिनीअर झाले आणि त्यांनी या व्यवसायाची भरभराट केली आणि आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ तिसरी पिढी रोबोट्रिक्स मध्ये एमएस करून त्यांना जॉईन झाला आहे. अशा एका जगभर नावारूपाला आलेल्या उद्योगाला Entrepreneurs' International Club मुळे भेट देण्याचा योग आला. श्री साने त्यांच्या उद्योगाच्या प्रगतीचा रोमांचक प्रवास समजून घेताना सर्वांनाच खूप आनंद झाला.</p><p><br /></p><p>1991-92 ला देशात जागतिकरणाचे वारे वाहू लागले. अनेक परदेशी कंपन्या भारतात आल्या त्यामुळे डिझाईन, क्वालिटी, मार्केट शेअर, प्राईस अशा सगळ्याच फ्रंटवर स्पर्धा सुरु झाली. अशावेळी त्यांना ओमेगा कंपनी सोबत 50:50 भागीदारी करण्याचा योग आला याचीही मोठी सुरस कथा त्यांनी आम्हाला सांगितली.</p><p><br /></p><p>Chemically bounded sand चा वापर सुरु झाला होता अशावेळी ओमेगाचे foundry equipments आणि machinery निर्माण करण्यात technical know-how, designs, product quality सर्वच पातळ्यावर फार सहाय्य झाले. सध्या Sinto या जापनीज् कंपनीने ओमेगाचे नव्वद टक्के शेअर्स घेतले आहेत त्यामुळे साने ओघानेच सिंटो कंपनीशी जोडले गेले आहेत. याशिवाय गार्गी ही फौंडरी केमिकल उत्पादक कंपनी साने ग्रुपच्या मार्केटिंगचे काम करते त्यामुळे ओमेगा सिंटो साने कंपनीला मुबलक ऑर्डर्स मिळत आहेत.</p><p><br /></p><p>Chemically bounded sand equipments & foundry machinery निर्माण करणाऱ्या या कंपनीचे Sand mixer, Mould handling equipment, Core making machinery, Shakeouts, Sand reclamation plant, Coating plants असे बरेच प्रॉडक्ट्स आहेत. ते नवीन फौंडरी लेआऊट डिझाईन आणि एक्सपान्शन अशा टर्न की प्रकल्प उभारणीचे कामही करतात. त्यांना लेझर कटिंगचे आऊटसोर्स करावे लागते.</p><p><br /></p><p>56 म्हटले की, आपल्याला आठवेल अबतक छप्पन सिनेमा किंवा 56 इंच छाती पण इथे ओमेगा सिंटो साने कंपनीने 56 देशात त्यांचा ग्राहकवर्ग तयार केला आहे. भारतात त्यांच्या 3500 समाधानी ग्राहक कंपन्या आहेत.</p><p><br /></p><p>पिरंगुट येथे 40000 आणि 10000 चौ.फु. च्या दोन कंपन्या. कोथरूड मध्ये उपर मकान नीचे दुकान असे 2000 चौ.फु.ऑफिस. अशा विस्तारलेल्या कंपनीला भेट देवून समाधान वाटले.</p><p>योगीराज देवकर.</p><p>9403733901</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-57877040915050963332023-06-09T12:18:00.000+05:302023-06-09T12:18:59.084+05:30श्री एस पी रानडे उर्फ तात्या <p> आदरणीय श्री सुरेश परशुराम रानडे सर.</p><p><br /></p><p>मिटकॉन चे पहिले व्यवस्थापकीय संचालक. बहुतेकांना मिस्टर एस पी रानडे म्हणून परिचित तर जवळच्या लोकांचे तात्या. आदरणीय श्री सुरेश परशुराम रानडे सरांनी 31 मार्च 2023 रोजी वयाची नव्वद वर्षें पूर्ण केली आहेत.आ.तात्यांना वाढदिवसा निमित्त आणि पुढील दशाकाच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.</p><p><br /></p><p>नोव्हेबर 1985 मध्ये मिटकॉन ली.मध्ये ट्रेनर मोटिव्हेटर पदी सिलेक्शन्स झालेली माझी तिसरी बॅच. माझ्या बॅच मध्ये सुनील चांडक, राजकुमार फटाटे, अरुण गाट आणि सुभाष कारले हे ट्रेनर्स होते. तेव्हाच रानडे सरांचा पहिल्यांदा परिचय झाला. पुढे तीन वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ट्रेनर म्हणून जडणघडण झाली. ऑक्टोबर 1988 नंतर आम्हा सर्व ट्रेनर्सची रवानगी MCED मध्ये झाली होती.आम्हाला Entrepreneurship Trainers Training Program करिता EDII अहमदाबादला पाठविले होते.तिथेही ते ट्रेनर्सना भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करायला आले होते.</p><p><br /></p><p>मला आणि सुनील चांडकला पहिला डेमो 'उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम' ठाणे शहरात करायचा होता. इथं आमचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरु झाले. मी एक साधे फोल्डर घेऊन फिरायचो. सर कुठूनतरी एका सेमिनारहुन आले होते.तिथे त्यांना एक छान ऑफिस बॅग मिळाली होती त्यांनी ती मला भेट दिली आणि इथून पुढे ऑफिस बॅग वापरत जा असा सल्ला दिला . आम्ही ऑफिस फाइल्स तयार केलेल्या नव्हत्या हे लक्षात आल्यावर त्यांनी एकजणाला ऑफिस फाइल्स विकत आणायला लावल्या. कोणकोणत्या विषयासाठी फाईल लागतील त्यानुसार त्यावर नावे लिहायला लावली.अगदी कागदांना स्टेपलर पिन कशी मारावी, कागदाला पेपर पर्पोरेटरने होल कसे करावेत, इतक्या बारीकसारीक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकविल्या.ते म्हणायचे प्रत्येक काम चांगलं करायचं एक शास्त्र असते.तसा मला नीटनीटकेपणा आवडायचाच पण सरांमुळे त्यात भर पडली.</p><p><br /></p><p>मी आणि सुनील चांडक ठाण्यात गोखले रोडवरील एका सोसायटीत रहात होतो . मिटकॉनचा एम डी असलेला हा माणूस एकदा चक्क आमच्या खोलीवर आला होता,याचे आम्हाला फार आश्चर्य वाटले होते. तसे ते पुण्यात आपटे रोडवर बंगल्यात रहायचे पण त्यांचा भांडुपला राम रतन त्रिवेदी रोडवर एक फ्लॅट होता. तिथे असल्यावर ते आम्हाला संध्याकाळी तिकडे बोलवायचे, सोसायटीत कट्ट्यावर बसून आमच्याशी गप्पा मारायचे, फारच उशीर झाला तर बाहेर डिनरला घेऊन जायचे. हेतू एकच असायचा आमच्यातला ट्रेनर घडविणे. महाराष्ट्रात गुजरात प्रमाणे उद्योजकता विकास करायचा हे त्यांचे स्वप्न होते आणि आम्ही ट्रेनर्स त्या स्वप्नाचे माध्यम होतो. </p><p><br /></p><p>एकदा इंडस्ट्रिज असोसिएशन, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये त्यांचे एक व्याख्यान होते. तिथे ते आम्हाला घेऊन गेले होते. उद्योजकता विकासाचा प्रचार प्रसार कसा करायचा याचा तो धडा होता. दुसऱ्या दिवशी एका रोटेरिअन उद्योजकाने त्यांना भेटायला बोलावले होते. तो माणूस पूर्णवेळ इंग्लिश मध्ये बोलला पण रानडे सर मात्र त्यांच्याशी मराठीत बोलले. याबद्दल त्यांना विचारले तर ते म्हणाले, "त्यांना मराठी समजते तर मग इंग्रजीत का बोलायचे आणि ठाण्या मुंबईत असला तरी आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांसाठी काम करायचे आहे.मातृभाषेत लोकांना जास्त चांगले समजते."</p><p><br /></p><p>त्या काळात Entrepreneurship Development विषयावरील साहित्य इंग्लिश मध्ये उपलब्ध होते. सरांचे म्हणणे होते की, महाराष्ट्रातील लोकांमध्ये जर उद्योजकता रुजवायची असेल तर हे साहित्य मराठीत भाषांतरित करणे आवश्यक आहे. पुढे मी अनेक पेपर्स, नोट्स मराठीत करण्याचे काम केले.</p><p><br /></p><p>तात्या बऱ्याचदा डेक्कन क्विनने प्रवास करायचे एकदा चर्चा करण्यासाठी त्यांनी आम्हाला कल्याणला येऊन व्हीटीचे फर्स्ट क्लासचे तिकीट काढून ते बसलेल्या बोगीत भेटायला बोलावले होते. ठरल्यानुसार डेक्कन क्विन मधून आमचा कल्याण - व्हीटी (आत्ताचे सि एस टी ) प्रवास सुरु झाला. सर म्हणाले, "या भेटीसाठी आपला बराच खर्च होत आहे. आपल्या हातात आता मिटिंग साठी सव्वा तास वेळ आहे. आता आपण इतकी उपयुक्त चर्चा करू की मीटिंगच्या खर्चापेक्षा पाच पट अधिक फायदा व्हायला पाहिजे." Effectiveness, efficiency, input v/s output चे हे उत्तम उदाहरण होते. व्हीटी ला उतरून ते त्यांच्या कामाला मुंबईत गेले आणि आम्ही आमच्या कामासाठी ठाण्याला परतलो.</p><p><br /></p><p>सर आम्हाला नेहमी सांगायचे की," Trainer must be X plus something. तुमचा ट्रेनी जर X असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तच असले पाहिजे. कायम अभ्यास करत रहा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहितच हवी असे नाही तर ती कोणाला माहित आहे हे तरी तुम्हाला माहित हवे."</p><p><br /></p><p>एकदा एका ट्रेनर ने त्यांच्याकडे दुसऱ्या एका ट्रेनरची चुगली केली होती. तेव्हा सर म्हणाले होते की," एकतर तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो इथे हजर नाही.जे काही बोलायचे ते समोरासमोर बोला.दुसरे असे की, ज्या अर्थी त्याच्या गैरहजेरीत तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय तसेच तुम्ही माझ्या गैरहजेरीत माझ्याबद्दलही बोलाल. हा तुमचा स्वभाव दिसतोय.याला बॅक बायटिंग म्हणतात. हे पहिले आणि शेवटचे, यापुढे असे बॅक बायटिंग करायचे नाही."</p><p><br /></p><p>मी बोलताना, लिहताना माझी ओळख वाय एच देवकर अशी करायचो. सर म्हणाले, "माझं ठीक आहे रे सुरेश परशुराम ऐवजी मी एस पी रानडे लिहतो. तुझे नाव किती छान आहे योगीराज. नेहमी योगीराज हरिश्चंद्र देवकर पूर्ण नावाचा वापर कर."</p><p><br /></p><p>सर मराठी, इंग्लिश मध्ये उत्तम भाषणे करायचे. एकदा मी म्हणालो, सर, तुम्ही फार छान भाषण करता. मी बऱ्याचदा भाषण करताना तुमची कॉपी करतो. तर सर म्हणाले,"मी छान बोलतो ते मला माहित आहे रे. आता तुम्ही छान भाषण करायला शिका. कोणाची कॉपी करू नका. प्रत्येकाची स्वतःची अशी एक खास शैली असते. आता तुझी स्वतःची भाषणाची शैली तयार कर."</p><p><br /></p><p>काही ट्रेनर्स सरांच्या खूप पुढं पुढं करायचे. सरांना खूष करायचा प्रयत्न करायचे. तेव्हा सर म्हणायचे मला माहित आहे तुम्ही चांगले आहात. पण मी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून काम करू नका. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करत आहात ना त्या प्रशिक्षणार्थिंनी तुम्हाला चांगलं म्हणावं असे काम करा. थोडक्यात बॉस ने नव्हे तर ग्राहकाने चांगलं म्हणावं असे काम करा.</p><p><br /></p><p>एक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे पाच-सहा महिन्यांचा कार्यकाळ असायचा. तेव्हा एखाद्या जिल्ह्यात हा कार्यक्रम होणे म्हणजे काहीतरी नावीन्यपूर्ण, वैशिष्ठपूर्ण घडत आहे असे वातावरण होते. आता माझे ठाणे, पुणे,नांदेड चे कार्यक्रम पूर्ण होऊन माझा रत्नागिरी येथे चौथा कार्यक्रम सुरु होता. त्या कार्यक्रमाचा Achievement Motivation Training (AMT) गणपतीपुळे येथे झाला होता. त्या काळी महाराष्ट्रात मनोहर नाडकर्णी सोडले तर AMT घेणारे कोणी नव्हते. हा AMT घ्यायला EDII अहमदाबाद वरून रमेश दवे सर आले होते. त्यांचा AMT चालू असताना मी 20-25 पानांच्या नोट्स काढल्या. त्यांनी पाहिल्यावर मी त्यांना सांगितले की, मला AMT ट्रेनर व्हायचे आहे. ते म्हणाले या 20-25 पानांनी काय होणार. आता लगेच माझा सिंधुदुर्गच्या कार्यक्रमासाठी पुढचा AMT इथेच होणार आहे त्यात तु तीन दिवस शब्द न शब्द लिहून काढ. मी त्यांचे ऐकले आणि खरंच शंभर पेक्षा जास्त पानांच्या नोट्स काढल्या. नंतर त्यावर आधारित AMT Trainers Manual तयार केले. ते जेव्हा मी रानडे सरांना दाखविले तेव्हा ते प्रचंड खूष झाले आणि म्हणाले, "तु फार मोठं काम केलेलं आहे. आता सांग मी तुझ्यासाठी काय करू." मी म्हणालो मला प्रत्येक्ष AMT घ्यायला परवानगी द्या. त्यांनी मला गावात मित्रांना एकत्र करून AMT घ्यायला सुचविले. थोडक्यात उंदरांवर प्रयोग करतात तसे हे होते. मग मी लोणी देवकर या गावात माझ्या मित्रांना एकत्र करून माझा पहिला वहिला AMT यशस्वी केला आणि मी AMT ट्रेनर बनलो. पुढे मी महाराष्ट्रात शेकडो AMT घेऊन इतिहास घडविला ते अनेकांना माहित आहे. पण माझ्या या कार्याचा पाया रानडे सरांमुळे तयार झाला होता.</p><p><br /></p><p>पुढे माझ्या पहिल्या 'उद्योजकता ' पुस्तकाची संहिता तयार झाली . रानडे सरांनीच कॉन्टीनेंटल प्रकाशन कडे माझ्या पुस्तकाची शिफारस केली होती . माझी कॉन्टी्नेंटल प्रकाशनचे श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली आणि पुढे आमचे खूप छान सूर जुळले.माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आणि मी खऱ्या अर्थाने लेखक झालो . माझे पहिले पुस्तक रानडे सर आणि बारामतीचे बहुप्रेरित आप्पासाहेब पवार यांना अर्पण केलेले आहे.रानडे सर "उद्योग संधी, शोधा म्हणजे सापडेल", असं ते नेहमी म्हणत असत . तेच माझ्या दुसऱ्या पुस्तकाचे टायटल आहे.</p><p><br /></p><p>कुठंलाही नवीन पुस्तक वाचलं, नवीन माहिती समजली की, सर आम्हाला बोलवून सांगत असत. ते म्हणायचे," आरे तुम्ही फार नशीबवान आहात रे. जी माहिती समजायला मला 52 वर्षें लागली ती तुम्हाला ती तुम्हाला वयाच्या 24व्या वर्षी समजत आहे रे. याचा सगळ्यांना फायदा होऊद्या."</p><p><br /></p><p>नोकरीत चांगला बॉस मिळायला नशीब लागते असे म्हणतात. माझं नशीब चांगलं होतं की, मला रानडे सर बॉस म्हणून लाभले. या माणसाला माणूस कसा घडवायचा हे शास्त्र समजलेलं आहे. उद्योजकता विकास हे त्याचं पहिलं प्रेम होतं आणि कन्सल्टन्सी दुसरं. त्यामुळे तुलनेनं ते ट्रेनिंग ला जास्त वेळ द्यायचे.</p><p><br /></p><p>आपल्याकडे काही लोकं नोकरी झोकून देऊन करतात अगदी स्वतःचं, घरचं कार्य असल्यासारखं. वेळ, काळ, भुक, तब्बेतीचं भानही ठेवत नाहीत. त्यांना कुणी टार्गेट द्यायची गरजच नसते, तेच स्वतःचे टार्गेट ठरवितात. अशी लोकं नोकरी वेतनासाठी नाही तर आनंद आणि समाधानासाठी करतात.माझ्या आई वडिलांचे संस्कार आणि रानडे सरांची शिकवण यामुळे मीही अशीच नोकरी केली.रानडे सरांनी स्वतःच्या कार्याने मिटकॉनला सामाजिक चेहरा मिळवून दिला. माझ्या बॅचच्या ट्रेनर्सने देखील त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपापल्यापरीने महाराष्ट्राच्या उद्योजकता विकासात खारीचा वाटा उचलला आणि त्यांनी जसं आम्हाला घडवलं तसं आम्ही जुनिअर्सना घडविण्याचा प्रयत्न केला.</p><p><br /></p><p>श्री सुरेश परशुराम रानडे सर उर्फ तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने शतक पूर्ण करण्यासाठी आभाळभर शुभेच्छा.</p><p><br /></p><p>योगीराज हरिश्चंद्र देवकर.</p><p><br /></p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-34057085602016468322023-02-19T23:22:00.003+05:302023-02-19T23:22:58.348+05:30दिवाळी पहाट <p> BLOG</p><p><br /></p><p>*दैवी ऊर्जेशी एकरूप झालेली एक दिवाळी पहाट.*</p><p><br /></p><p>दि ३ नोव्हेंबर २०२१ रोजी</p><p>दिवाळीच्या निमित्ताने Saturday Club Global Trust-SCGT वाकड चॅप्टर तर्फे आयोजित पिंपरी चिंचवड रिजन मधील पिंपरी-चिंचवड , औंध-बाणेर चॅप्टर करिता दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.</p><p><br /></p><p>कार्यक्रमाचे प्रायोजक होते</p><p>पैस रंगमंचचे श्री प्रभाकर पवार(चिंचवड) आणि रेझोनन्स स्टुडिओचे श्री तेजस चव्हाण. ज्यांनी स्वखुषीने रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम केला.</p><p><br /></p><p>सांगितिक दिवाळी पहाटची सुरूवात SCGTचे संस्थापक स्व. माधवराव भिडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने लनाने झाली . सूत्रसंचालक प्राजक्ता गव्हाणे यांच्या अलंकारिक शब्दांनी सुरुवातीपासूनच जादू सुरू केली. या आगळ्या वेगळ्या रंगमंचचा उल्लेख त्यांनी निकट रंगमंच असा केला. पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडची पहाट कशी वेगळी हे सांगताना," इथे दिवसाची सुरुवात भोंग्याने होते, सतत जागं आणि वेगानं धावणारं शहर, आवडीच्या शिव्या खात भंडारा डोंगरावर विठोबाच्या भेटीला जाणारे तुकाराम महाराज." अशी शब्द नव्हे तर प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत त्यांनी बहारदार सूत्रसंचालन केले आणि सादरकर्ते व रसिक यांच्यातील दुवा साधला.</p><p><br /></p><p>अक्षय घाणेकर तरुण गायकांमधले एक नवीन नाव. नाव कमवायला खूप कष्ट घ्यावे लागतात पण भरपूर मेहनत करून ज्यांनी सा रे ग म पा ,व्हाईस ऑफ इंडिया, पुणे आयडॉल अशा कार्यक्रमांना आणि पुरस्कारांना सन्मान मिळवून दिला आहे त्यांच्या निरागस स्वरांनी म्हणजेच, "सूर निरागस हो..." या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. </p><p><br /></p><p>मनीषा देशपांडे यांनी," माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा..." अशा सदाबहार गाण्यांनी मैफलीत रंगत भरली.</p><p><br /></p><p>लिटिल मास्टर आदिती धर्माधिकारी,सातवीत शिकणारी मुलगी हिच्या गायनाने तर रसिकांच्या हृदयात शिरकाव केला . रसिकांच्या भावना आणि अश्रू दाटून आले. हिच्या गायनाची सगळ्यांनी प्रशंसा केली.</p><p><br /></p><p>संगीतकार तेजस चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेली आणि प्रीती तेजस यांनी गायलेली काही गाणी सादर करण्यात आली . तेजसने संगीत संयोजन केलेल्या आणि बेला शेंडे यांनी गायिलेल्या ज्या मराठी ब्रेथलेस गाण्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे ते गीत त्यांनी सादर केले ज्याची शब्दरचना प्राजक्ता गव्हाणेची आहे हे ऐकून फार विशेष वाटले . तेजसने कैलास खेर यांनी गायलेले एक सुफी, "हिरे मोती मै ना चाहू....सैया..." हे गीत सादर केले. तेजसने संगीतबद्ध केलेले ," कर कटेवरी उभा विटेवरी वास पंढरपूरी, माझे विठ्ठल रखुमाई..."हे भक्तीगीत अक्षयने सादर केले. या गायकांनी स्वरांची जी काही उधळण केली त्यामुळे रसिकांना निर्विचारतेचा अनुभव मिळाला. दैवी ऊर्जेशी एकरूप होणं यापेक्षा काय वेगळं असतं.</p><p><br /></p><p>महेश गाढवे यांनी तबल्यावर साथ संगत केली. गायनाइतकेच तालवाद्य पण महत्वाचे असते हे त्यांच्या ठेक्याने रसिकांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.</p><p><br /></p><p>महामारीमुळे गेले दीड-पाऊने दोन वर्षें कलाकार आणि रसिक यांची ताटातूट झाली होती. आजचा प्रसंग असा होता की, कलाकाराला रसिक हवा होता आणि रसिकाला कलाकार. ऑन लाईनला कंटाळलेले दोघेही आज तृप्त झाले.</p><p><br /></p><p>आजचा कार्यक्रम हा SCGT मेंबर्ससाठीचा एकदम खाजगी कार्यक्रम जाणवला . जसं की 'कट्यार काळजात घुसली',चित्रपटात राज्याच्या राजवाड्यात फक्त राजासाठी मैफिल होत आहे किंवा पु. ल. चित्रपटात दाखवलंय तसं कोणाच्यातरी घरात फक्त कलेचा आस्वाद घ्यायला गर्दी नव्हे तर दर्दी जमले आहेत. पहाटे सुरू झालेल्या संगीत कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना अल्फा, थिटा हर्ट्स अनुभवत अडीच-तीन तास कधी संपले ते समजलेसुद्धा नाही.कधी कधी टाळ्या नाही तर ही परा वाणीची शांतता पण अनुभवावी असे वाटते. </p><p><br /></p><p>दिवाळी पहाट २०२१ संस्मरणीय करण्याकामी निलेश कुलकर्णी,योगीराज देवकर, गौरव गायकवाड, अनुक्रमे चेअरमन,सेक्रेटरी, ट्रेझरर, वाकड चॅप्टर , कोअर टीम,इतर दोन चॅप्टरचे CST आणि स्वप्नील कुलकर्णी,PCMC रिजन हेड यांनी भरपूर मेहनत घेतली.</p><p><br /></p><p>शेवटी भेटवस्तू देवून,आभार मानून ,अल्पोपहार घेऊन कार्यक्रम संपला पण तो पुढील बराच काळ स्मरणात राहील तो श्री तेजस चव्हाण यांनी आजचा दिवस समृद्ध केला त्यामुळे. कोणालाही हा अभरूचीसंपन्न कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर श्री तेजस चव्हाण यांच्याशी जरूर संपर्क साधण्यात यावा . मो.95611 50916.</p><p><br /></p><p>योगीराज देवकर.</p><p>लेखक,प्रेरक,प्रशिक्षक.</p><p>PCMC Region Blog Writer.</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-68197669905885716242023-02-19T23:14:00.001+05:302023-02-19T23:14:19.044+05:30केरळ सहल <p> *केरळ पर्यटन-एक सुखद अनुभव.*</p><p><br /></p><p>मी,सौ अनिता देवकर,श्री गिरीश(आप्पा)गायकवाड,</p><p>सौ सुनीताताई गायकवाड,श्री अमोल शेटे आणि फॅमिली असे आम्ही सर्वांनी २२ ते २९ मार्च २०२२ दरम्यान केरळचे पर्यटन केले.</p><p><br /></p><p>श्री निलेश कुलकर्णी यांच्या आकांक्षा हॉलिडेज प्रा ली तर्फे ही टूर आयोजित केली होती. कुलकर्णी यांना कार्पोरेट लॉजिस्टिकसचा अनुभव आहे. त्यांनी नव्याने ट्रॅव्हल एजन्सीचा श्री गणेशा केलेला आहे. त्यांच्याकडे बुकिंग करणारा मी पहिलाच पर्यटक.</p><p><br /></p><p>कोची एअरपोर्ट ते त्रिवेंद्रम एअरपोर्ट इनोव्हा कार सेवा आणि कोची(फोर्ट कोची,वास्को द गामा चर्च, राजा वर्मा पॅलेस, कलाडी ),मुन्नार( फ्लॉवर गार्डन,रस्तो-रस्ती फोटो पॉईंट्स,टी फॅक्टरी,मत्त्युपट्टी डँम,एको पॉईंट),</p><p>थेक्कडी( स्पाइस प्लँटेशन व्हिजिट,कलरीपटू मार्शल आर्ट, कथकली डान्स, एलिफंट राईड,पेरियार वाइल्ड लाईफ सँच्युअरी बोट राईड),आलेप्पी (व्हेंबनाड लेक हाउस बोट राईड),कोलम जवळ( पूवार आयलंड रिसॉर्ट)कन्याकुमारी,त्रिवेंद्रम( पद्मनाभम टेम्पल) असा खास आमच्यासाठी टूर डिझाईन केला होता. </p><p><br /></p><p>कुलकर्णीने आमच्यासाठी काय वेगळे केले तर,एअर टिकेट्स बुकिंग, चांगली गाडी,चांगला ड्रायव्हर ,निवासासाठी उत्कृष्ट हॉटेल्स,भेटीची आवश्यक आणि निवडक ठिकाणे,खरेदीसाठी सल्ला आणि आमची कोठे फसवणूक होणार नाही याची दक्षता.</p><p><br /></p><p>अनिता नेहमी म्हणते वाजवी किंमतीत दर्जेदार कपडे खरेदी करायला पारख लागते . अगदी तसच टूरच्या वाजवी किंमतीत उत्कृष्ट हॉटेल्स,कॉंटिनेंटल ब्रेकफास्ट, व्हेज,नॉनव्हेज,लोकल फूड द्यायला आकांक्षा सारखी पारखी एजन्सीअसली पाहिजे. </p><p><br /></p><p>खरंतर आम्हाला पुरविलेली हॉटेल्स,रिसॉर्ट्स इतके सोईसुविधा असलेले होते की त्यांचा लाभ घ्यायला वेळ पुरत नव्हता.</p><p>मुन्नार,थेक्कडीची ब्युटी इतकी सिनिक आहे की २२८ sq.kms विस्तीर्ण डोंगरांच्या रांगात हिरवागार गालिचा अंथरल्या सारखे चहाचे मळे बघून मन हरखून जाते. पेरियार आणि व्हेंबनाड राईड्स अनेक दिवस लक्षात राहतील.</p><p><br /></p><p>कोची ते पूवार आयलंड रिसॉर्ट पर्यंतची हॉटेल्स चढत्या क्रमाने एकापेक्षा एक सरस होती. शेवटच्या दोन दिवसात भारत बंद आंदोलनामुळे आम्हाला कन्याकुमारी रद्द करावे लागले पण आम्ही पूवार रिसॉर्ट एन्जॉय केले.</p><p><br /></p><p>निलेश मला म्हणाले होते की,"सर,तुम्ही माझे पहिले कस्टमर आहात, मला तुम्हाला एकदम चांगली सेवा द्यायची आहे.इतके सगळे नियोजन केले तरी प्रत्येक्षात काही ऊंनीस-बीस होऊ शकते. पण मी प्रामाणिकपणे चांगली सेवा देणार आहे."</p><p><br /></p><p>केवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून सर्वश्री गायकवाड आणि शेटे यांनी निलेशवर जो विश्वास ठेवला तो त्यांनी सार्थ ठरविला.</p><p><br /></p><p>निलेश यापुढेही आलेल्या प्रत्येक ग्राहकास पहिला ग्राहक असे समजूनच सेवा दिली तर तुम्ही जिंकलात म्हणून समजा.</p><p><br /></p><p>आमची केरळ टूर अविस्मरणीय केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार!</p><p><br /></p><p>योगीराज देवकर.</p><p>9403733901/9307133134</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-27165416581515170512023-02-19T23:10:00.006+05:302023-02-19T23:10:58.420+05:30चितळे फॅक्टरी <p> मध्यंतरी श्री इंद्रनील चितळे यांनी क्लब सदस्यांना दिलेल्या निमंत्रणावरून चितळे फॅक्टरीला भेट देण्याचा योग आला. इथे प्रसिद्ध बाकरवडी आणि स्वीट्सचे आद्ययावत मशीनरी द्वारा उत्पादन केले जाते. चितळे घराण्यातील या युवा पिढीने हा उद्योग एका वेगळ्याच उंचीवर पोहचवीला आहे.महाराष्ट्रीयन उद्योजकाचा अभिमान वाटावा असे हे उदाहरण आहे.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-75882493475580606982023-02-19T23:08:00.002+05:302023-02-19T23:08:17.587+05:30प्रथम टेकनॉलॉजिज् <p> World Class From India ही टॅग लाईन देशप्रेमासह मिरविणाऱ्या Pratham Technologies Pvt Ltd च्या श्री दत्ता देशपांडे आणि श्री संजय दांडेकर यांनी Entrepreneurs' International च्या सदस्यांना निमंत्रित केल्यामुळे या फॅक्टरी व्हिजिटचा योग आला. पेपर फोल्डिंग मशीनरी उत्पादन करणाऱ्या या कंपनीने जर्मनीच्या उत्पादकांवर मात करून जगभर स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. अनेक प्रगत,अप्रगत देशात मशीनरी निर्यात करून आणि USA मध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून एक मेंचमार्क निर्माण केला आहे. दोन्ही उद्योजक मित्रांचे अभिनंदन आणि प्रगतीसाठी शुभेच्छा.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-63731590585030974322023-02-19T23:05:00.002+05:302023-02-19T23:05:35.265+05:30मालक नको पालक बना <p> शनिवार 20 ऑगस्ट 22 रोजी म.टा.पुणे मध्ये रेणू गावस्कर मॅडमचा 'मालक नको, पालक व्हा', हा लेख पाहिला-वाचला आणि वंदन नगरकर आठवले.गावस्कर मॅडम नेहमीच फार साध्या, सोप्या,सरळ, समजावण्याच्या भाषेत लेख लिहतात त्यासाठी प्रथम त्यांचे अभिनंदन.</p><p>प्रसाद मिरासदार मुळे माझी वंदनशी ओळख झाली. पुढे ते वक्ता म्हणून आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात येऊ लागले .उत्सुकता म्हणून त्यांनी माझा सूर्य शिबीर येथे 'उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमही',अटेंड केला.पुढे त्यांचे पुस्तक प्रकाशन असो, व्याख्यान असो त्यांची निमंत्रणे येऊ लागली .त्यांनी जेव्हा 'चला बोलूया जग जिंकूया', चा बालगंधर्वला पहिला प्रयोग केला तेव्हा मला परीक्षणासाठी बोलावले होते. वंदन म्हणजे सृजनशील,प्रयोगशील, स्पष्टवक्ता,विनोदी आणि खादाड माणूस.कुठं,काय चांगलं खायला-प्यायला मिळतं ते वंदनला विचारायचं.आज लेखात त्यांचा उल्लेख वाचून आनंद वाटला. प्रयोगशीलतेसाठी वंदनचेही अभिनंदन.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-54072219581743720952023-02-19T21:50:00.003+05:302023-02-19T21:50:39.131+05:30बैलगाडी आणि माझे बालपण <p> बैलगाडी आणि बालपण.</p><p><br /></p><p>5 मे 2021 रोजी अमेय आणि रुचिराचे लग्न झाले. त्यालग्नात श्री.गिरीषराव रमेशराव गायकवाड आणि कुटुंबियांनी पदार्थांचा रुखवत केला होता त्यासोबत एक शोभेची बैलजोडी आणि बैलगाडी पुण्यातल्या घरात आली. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी असल्यामुळे ही बैलगाडी दिसली कि,मला माझा गांव, शेती आणि बालपण आठवणे आगदी साहजिकच आहे.</p><p><br /></p><p>लोणी देवकर या गावात माझा जन्म झाला आणि त्याच गावात बालपण पण गेले.चौथी पर्यंतची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर, लोणी देवकर, पाचवी श्री नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर. सहावी पासून पुण्याला असा शिक्षणाचा प्रवास झाला. माझे वडील स्व.हरिश्चंद्र ज्ञानदेव देवकर मोठे शेतकरी होते. आमची वस्ती शेतातच होती .शेतावर सालाने काम करणारे दहा -बारा शेतमजूर होते आणि त्यांचे कुटुंबीयपण आमच्या वस्तीवरच रहात असत.शेतावर गाय, बैल आणि म्हैस अशा पाळीव प्राण्यांचे मोठमोठे गोठे होते.उन्हाळ्यात सहा-सहा बैलांचे दोन नांगर शेतीची नांगरट करीत असत. म्हैसिंचे दूध भिगवणच्या हॉटेलला पाठविले जायचे.मेंढारांचा मोठा कळप होता आणि मेंढ्यासाठी वाडगे पण होते. मेंढ्याच्या लोकरीची विक्री व्हायची. त्याकाळात वडिलांनी किमान चाळीस, पन्नास लहान मोठी जनावरे पाळलेली होती. त्यामुळे शेतीसाठी मुबलक शेणखत मिळायचे. वस्तीवर कोंबड्या, कुत्री,असल्यामुळे शेतीला स्वयंपूर्ण करणाऱ्या साऱ्या गोष्टी तिथेच होत्या. एका विहिरीवर दहा</p><p>अश्वशक्तीचे रस्टन इंजिन होते. इंजिन चालू केले कि त्याच्या सायलन्सरचा आवाज परिसरात सगळीकडे ऐकू यायचा. इंजिनाने विहिरीतून बाहेर काढलेले पाणी शेतात पिकांपर्यंत वाहून नेहण्यासाठी मोठ्या तालीवरुन पाट बनविलेले होते.एका विहिरीवर मोट असायची. त्याविहिरीवर मोटीसाठीचे वडवान, दगडी हौद, पाण्याचा पाट,धाव, आजही अस्तित्वात आहे.</p><p>त्याकाळात गावात बारा बलुतेदारी अस्तित्वात होती. सुतार शेतीला मशागतीसाठी लागणारी औत,कुळव,तीफण ,अशी अवजारे आणि बैलगाड्या बनवत असत.लोहार लोखंडी खुरपं,विळा,कुदळ,कुऱ्हाड, बनवायचे.आमच्या शेताच्या तालींवर भरपूर केकताडाची झाडे होती. मातंग समाजाचे लोक त्या केकताडापासून वाक बनवायचे आणि मग त्या वाकापासून काणी, कासरा, सोल, नाडा, दोरखंड बनवायचे. त्याकाळात गावात घिसाडी समाजाचे लोक यायचे, तेही शेतीसाठी लागणारी कुदळ, टिकाव,खोरं अशी लोखंडी हत्यारे बनवायचे तसेच बैलगाडीच्या चाकांना लोखंडी रिम बसवून द्यायचे.गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता त्यामुळे आजूबाजूला सगळी असली शेतीचीच कामे होताना दिसत असत.</p><p><br /></p><p>बालपणी माझे मित्र कोण तर वस्तीवरील शेतमजूरांची मुले आणि गावातली शाळेतली मुलं. आजूबाजूच्या या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर प्रभाव होता.त्यातच मी बागायतदारचं पोर,मोठे भाऊ श्री.कालिदास देवकर सरपंच असायचे त्यामुळे मित्रांत आणि शाळेत माझा रुबाब असायचा.</p><p>बालपणी आमचे खेळ काय असायचे तर शेतात आम्ही जे बघायचो त्याची प्रतिकृती आम्ही अंगणात तयार करायचो. विहीर खोदायचो , त्यात पाणी भरायचो ,मोट किंवा कधी चिखलाचे इंजिन तयार करायचो, त्याला कांद्याच्या रोपाला जे बियाण्यांचे शुटआउट येतात त्याचे पाईप वापरून आमच्या छोटेखानी शेताला पाणी द्यायचो.</p><p>ज्वारीचा कडबा असतो त्याच्या चिपाडापासून मी अगदी हुबेहून खेळण्यातली बैलगाडी आणि शेतीची अवजारे बनवायचो.</p><p>चिखलापासून बैलजोडी बनवायचो आणि मग आमचा बैलगाडीचा खेळ चालायचा.</p><p>माझ्यापेक्षा मोठा भाऊ श्री.रत्नकवी देवकर यांनी मला पोहायला शिकवायचा प्रयत्न केला. एक बारव होती तिथे पाठीला पोहरा बांधून मला पोहायला शिकवायचे प्रयोग झाले. तेव्हा मला ते काही जमले नाही. पुढे काही कालावधीनंतर माझ्या वडिलांनी एक नवी विहीर खोदली.आमचा एक शेतमजूर त्याविहिरीत रोज पोहायला जायचा. मी ते रोज पहायला जायचो. मला शिकायचे होते म्हणून त्याचे निरीक्षण करायचो. एक दिवस धाडस करून मीच त्या मजुराला म्हणालो, मला पण पोहायचे आहे. त्याने विचारले पोहायला येते का? मी हो म्हटलं पण त्याला लक्ष द्यायला सांगितले आणि मग काय उतरलो विहिरीत आणि आश्चर्य म्हणजे मला पोहायला जमले. यात मला जे थोडेफार शिकवले होते, माझे निरीक्षण आणि माझा विश्वास याचा वाटा असावा असे वाटले. मग काय पुढचे अनेक दिवस मी त्या मजूरासोबत पोहायला जात होतो .</p><p>त्याकाळात शेतावर कडुनिंब, रामकट, बाभूळ अशी खुप झाडे होती. गावातल्या एका मित्रामुळे मला या झाडांवरचे सरडे विनाकारण दगडांनी मारायची खोडकर सवय लागली होती. सरड्याने जर आम्हाला पाहिले तर तो पळ न काढता उलट तसाच झाडाच्या बुंद्यावर थांबत असे. माझा दगड मारण्याचा नेम फार चांगला होता. त्यामुळे स्थिर उभा राहिलेला सरडा मी एकाच दगडात मारत असे.पुढे समज आल्यावर समजले कि,केवळ स्वतःची नेमबाजी दाखविण्यासाठी मी करत ती एक चूक होती याची नंतर खंत मात्र वाटत राहिली. पण या दगडाच्या नेमबाजीचा मला एकदा चांगलाच फायदा झाला. मी तिसरी किंवा चौथीत असेल, काहीतरी कामासाठी विहिरीकडे गेलो होतो. जवळच्या गवतातून चालताना अचानक एक नाग फना काढून माझ्या समोर उभा राहिला. एक इंच जाडीचा तर नक्की होता तो . मी घाबरून पळालो. 10-15 फुटावर जाऊन उभे राहून पाहिले तर तो नाग तसाच फना काढून उभा होता.मी एक दगड घेतला आणि जोरात त्या नागाच्या दिशेने मारला. तो नेम इतका बरोबर होता तो फटफा नेमका त्याच्या उघडलेल्या फन्यावरच बसला आणि एकाच फटक्याक त्या नागाचा मृत्यू झाला. तेव्हा मला मी शूर आहे असे वाटले होते.झाडांवरचा डिंक गोळा करायची एक चांगली सवय मला लागली होती.स्व.हिराबाई माझ्या आईचे नाव पण तिला सगळे भाभी म्हणत असत.मिळालेला डिंक मी आई कडे देत असे.</p><p>आमच्या गावातल्या शाळेच्या मैदानात ओळीने वडाची झाडे होती, त्यावर आम्ही सुरपारुंब्या हा खेळ खेळायचो.झाडाच्या फांद्या पारुंब्या वरून आम्ही वानरासारखे खेळत असू.</p><p>चीर चीर घोडी हा आमचा अजून एक खेळ, तो तर आम्ही पाचवीत इंदापूर हायस्कूल मध्ये पण खेळत असू .</p><p>विटी-दांडू,गोट्या,लगोरी हे खेळ तर होतेच पण </p><p>घरातले लोक आंबे खावून कोया शेणाच्या उकिरड्यावर टाकायचे, पाऊस पडला कि त्यापासून आंब्याची रोपे उगवायची.ही रोपे ज्या तालीवरून पाण्याचा पाट वाहत असे त्या तालीवर नेहून लावणे हा अजून एक खेळ. तालीच्या उतारावर व्यवस्थित खड्डा करून त्यात रोप लावायचे, आळे तयार करायचे, त्याची पाण्याची सोय करायची. हे सगळे करण्यात आम्ही शेतीचे काहीतरी काम करतोय ही भावना पण असायची.</p><p>त्याकाळात आमच्याकडे एक बुलेट मोटारसायकल होती आणि शेतात बैलगाडी हेच वाहतुकीचे एक साधन होते.महिलांना गावात जायचे यायचे असो ,शेतमाल,शेणखत वाहतूक असो ती बैलगाडीनेच होत असे.त्यामुळे कोणत्याही कारणासाठी बैल गाडीला झुंपले कि आम्ही त्यागाडीत बसायला पळायचो. फार मजा होती बालपणी.</p><p>सध्या हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातल्या घरात दररोज दिसणारी रुचिरा सोबत आलेली बैलजोडी आणि बैलगाडी.</p><p>धन्यवाद.</p><p>योगीराज देवकर.</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-72723227933130478132023-02-19T21:40:00.002+05:302023-02-19T21:40:16.281+05:30चला उद्योजक घडवूया <p> चला उद्योगी,मेहनती माणसं घडवूया!</p><p><br /></p><p>वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कोऑप्रेटीव्ह मॅनेजमेंट मध्ये MCED च्या कार्यक्रमात तीन दिवस वक्ता म्हणून गेली होतो.रोज सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत चहा आणि जेवणाचा वेळ वगळता कार्यक्रम सुरु राहिला. आजकालच्या कार्यक्रमात Science & Technology चे भरपूर प्रशिक्षणार्थी असतात. हुशार ट्रेनि सोबत कार्यक्रम करायला फार मजा येते. समारोपाच्या वेळी माझे मित्र श्री एस एस सुरवसे साहेब,उद्योग सह संचालक, पुणे विभाग आणि MCED चे श्री सुदाम थोटे, RO आणि अधिकारी उपस्थित होते. एखाद्या विषयाचे Wisdom आले कि कार्यक्रम प्रभावी होतोच हे ट्रेनिंच्या फीडबॅक वरून जाणवले.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-36339600862498734792023-02-19T21:36:00.004+05:302023-02-19T21:36:34.439+05:30ग्रेट भेट - आण्णा हजारे <p> 23 जून 2022 रोजी आदरणीय श्री आण्णा हजारे यांची राळेगण मध्ये भेट झाली. हॉल मध्ये येताच मी त्यांच्या पाया पडलो.आरे नको नको, राहूद्या , म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. काय देवकर साहेब खूप दिवसांनी येणं केलंत. मी जेव्हा जेव्हा सोलापूरला गेलो तेव्हा तेव्हा लोणी देवकर गाव दिसले कि मी सोबतच्या कार्यकर्त्यांना सांगायचो,आपले देवकर साहेब या गावचे आहेत. या गावात माझा कार्यक्रम झाला आहे. मी एकदम आश्चर्यचकित झालो,मी म्हटले आण्णा, साध्या माणसाला पण तुम्ही किती लक्षात ठेवले आहे .</p><p><br /></p><p>मी आण्णांच्या प्रकृतिची चौकशी केली, तर ते म्हणाले, पाठीचे दुखणे त्रास देत आहे. पायाच्या शिरा दुखतात,डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मी म्हणालो, आण्णा,तुम्हाला लाखो लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठलाचे आशीर्वाद आहेत, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही Self realize व्यक्ती आहात. डॉक्टरांचे उपचार तर घ्याच पण सद्या वेळ आहेच तर लक्ष टाळुवार ठेऊन ध्यान करत जा. तुम्हाला आराम मिळेल. आण्णा सांगत होते कि, सध्या 85 वय चालू आहे. दोन किलोमीटर चालतो, प्राणायाम, योगा करतो, वाचन, पत्र व्यवहार करतो. मी फार आनंदी आणि समाधानी आहे. आयुष्यात मी काही तत्व पाळली आहेत, निष्कलंक जीवन जगायचे,स्वतःला कसला डाग लागू द्यायचा नाही,बँक बॅलन्स करायचा नाही,</p><p>पैशाचा मोह ठेवायचा नाही,सत्ता मिळवायची नाही,समजसेवेसाठी नेहमी त्याग करायचा,मोह ठेवायचा नाही,40 वर्ष झाली, समाजसेवेसाठी जसं घर सोडलंय तसं पुन्हा घरी गेलो नाही, पुतण्यांची नावं सुद्धा लक्षात नाहीत.</p><p>म्हणूनतर लोकांची साथ मिळाली आणि इतके मोठे काम करता आले.</p><p>मी म्हटले,आण्णा तुम्ही फार मोठा आदर्श निर्माण केला आहे. माझ्यासारखे लाखो लोक आहेत जे तुम्हाला फॉलो करतात.</p><p><br /></p><p>आण्णांना बरे नसताना देखील त्यांनी गप्पासाठी बराच वेळ दिला. त्यांच्याशी बोलून नेहमीच छान वाटते.</p><p><br /></p><p>मी म्हटले, आण्णा, माझ्या ट्रेनिंग मध्ये 40 प्रशिक्षनार्थी आहेत, त्यांनाही तुम्हाला भेटून फोटो घ्यायचा आहे.ते यासाठीही तयार झाले. बाहेर येताच त्यांनी सर्वांना विचारले,तुम्ही सगळे उद्याचे उद्योजक आहात,असे मी समजू का? सगळे हो म्हणाले. मग आण्णांनी त्यांना पण उद्योजक झाल्यावर कसे समाजउपयोगी जीवन जगावे असा सल्ला दिला.</p><p><br /></p><p>कृषी महाविद्यालयाच्या आवारात सावंत आयोगाचे कामकाज(सुरेश जैन विरुद्ध आण्णा हजारे खटला )चालू होते तेव्हा माझे भाग्य कि आण्णा आमच्या तत्कालीन कार्यालयात दुपारचे जेवण करायला बसण्यासाठी येत असत.तेव्हा आम्हाला अण्णांची थोडीफार सेवा करायची संधी मिळाली.</p><p><br /></p><p>आपले किती मोठे भाग्य आहे कि, आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक आदर्श व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्यामुळे समाज योग्य प्रकारे वाटचाल करीत आहे.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-80815461936551874152023-02-19T20:38:00.006+05:302023-02-19T20:38:56.617+05:30My Motivation Academy <p> प्रेरणा विकसित करणारी मोटिवेशन अकॅडेमी.</p><p><br /></p><p>माणसांची वर्तणूक,प्रेरणा, प्रवृत्ती या विषयी संशोधन करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाना एक मूलभूत प्रश्न पडला होता, तो म्हणजे,'Why people do what they do?' या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात माणसांच्या प्रेरणा, प्रवृत्ती वरती पुष्कळ प्रमाणात प्रकाश पडलेला आहे. तुम्ही जे काय करत आहात ते का करत आहात ? हाच प्रश्न तुम्ही स्वतःला पण विचारा म्हणजे तुम्हालाही तुमच्या प्रयत्नाचे कारण समजू शकेल.</p><p><br /></p><p>Motivation,प्रेरणा म्हणजे काय तर To move याचा अर्थ हालणे, प्रवृत्त होणे, धडपड करणे, प्रयत्न करणे. मोटिवेशन हे दोन क्षेत्राशी संबंधित आहे. एक- स्वतःला प्रेरित करणे आणि दोन - इतरांना प्रेरित करणे. प्रेरणेची एक पूर्वअट असते ती म्हणजे माणसाचे निश्चित व्हिजन,मिशन,उद्देश,ध्येय, धोरण असे काहीतरी स्पष्ट असायला पाहिजे म्हणजे या हालचालीला एक निश्चित दिशा मिळू शकते. प्रेरणा, ध्येय असले तरी याच्या संदर्भात सर्वच हेतू, उद्देश, गरजा सारख्याच महत्वाच्या, उपयुक्त असतील असे सांगता येत नाही, काही बिगरउपयुक्त पण असू शकतात. त्यामुळे प्रेरणेत ध्येयाबरोबरच अजून एक घटक महत्वाचा ठरतो तो म्हणजे Need,गरज. म्हणजेच गरज असेल तरच माणूस हालचाल करायला प्रवृत्त होतो अन्यथा नाही.</p><p><br /></p><p>माणसाला दोन प्रकारच्या गरजा असतात. एक - जिवशास्त्रीय किंवा भौतिक गरजा आणि दोन - मानसिक गरजा. मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने गरजांची जी थिअरी मांडली त्यात त्याने माणसाच्या मूलभूत गरजा, शारीरिक,आर्थिक सुरक्षितेच्या भौतिक गरजा सोडल्या तर उरलेल्या मानसिक, भावनिक सुरक्षिततेच्या गरजा , सहवास आणि प्रेमाची गरज, आदर आणि प्रतिष्ठा याची गरज,आदराच्या गरजेतही तो दोन भाग करतो. एक- आदराची खालची पातळी आणि दोन -आदराची वरची पातळी.आदराची वरची पातळी म्हणजे स्वतःचा सन्मान वाढेल, आत्मसन्मान वाढेल अशी वर्तणूक. मॅस्लोने वरच्या पातळीवरील जी गरज सांगितली आहे तिला तो बिईंग नीड असे म्हणतो. म्हणजे माणूस म्हणून विकसित व्हायची,समृद्ध व्हायची गरज किंवा </p><p>आत्मविष्काराची गरज.</p><p>तुम्ही जर का भौतिक गरजा पूर्ण करण्याइतपतच हालचाल करणार असाल तर तुमची प्रगती मर्यादित होते पण तुम्ही जर मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असाल तर तुमची प्रगती अमर्याद होणार.</p><p>खरंतर पाच सहा प्रकारच्या महत्वाच्या मानसिक गरजा सांगितल्या जातात परंतु इथे आपण एकच मानसिक गरज पाहूया.</p><p>एक्सेल ची गरज - सेल्फ एक्सेल, सेल्फ एस्टिम, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन ही मानवाची सर्वोत्तम मानसिक गरज समजली जाते.ही गरज आढळणाऱ्या व्यक्तीला सिद्धिप्रेरित समजले जाते.मानवाने आज जी प्रगती केली आहे ती याच गरजेच्यापूर्ततेसाठी केलेली आहे.नीड फॉर सेल्फ एक्सेल म्हणजे काय तर स्वतःमध्ये वाढ करणे, स्वतः श्रेष्ठ असणे आणि तसे काहीतरी करणे , जे कराल त्याकामात भर घालणे, सुधारणा करणे, सतत उत्तम करण्याचा प्रयत्न करणे. कोणतेही काम मग ते तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल ते असो किंवा पहिल्यांदाच करत असाल ते असो ते सरसच व्हायला पाहिजे, उत्तमच व्हायला पाहिजे,ही मानसिक गरज असणे .</p><p>केवळ एक्सेल या गरजेच्या अनुषंगाने जगाच्या पाठीवर औद्योगिक विश्वात किती मोठे काम झाले आहे ते पहा. गुणवत्तापूर्ण वातावरणासाठी फाईव्ह एस, क्वालिटी सर्कल, लीन मॅनेजमेंट, जस्ट-इन -टाइम, टि क्यू एम, कायझेन,आयएसओ,असे किमान वीस पंचवीस तरी टूल्स पहायला मिळतील .</p><p>मला असे काही उद्योग, संस्था माहित आहेत ज्यांच्याकडे ISO प्रमाणपत्र आहे पण त्यांचा कारभार मुळीच क्वालिटी चाललेला नाही.याउलट एखाद्या संस्थेकडे असे मानक प्रमाणपत्र नसते परंतु तिथले लोक इतकी चांगली सेवा देतात कि आपल्यालाही आश्चर्य वाटते. ते कशामुळे तर कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यामधील नीड फॉर एक्सेल या मानसिकतेमुळे.अशी मानसिक गरज जर स्वभावाचा भाग असेल तर अशा व्यक्तीला तू काम नीट कर हे सांगावे पण लागत नाही.</p><p>Fear,भीती आणि hope, आशा हे प्रेरणेचे दोन स्रोत आहेत. स्वभावात एक्सेलचे प्रमाण कमी असेल तर माणूस भीतीच्या छायेत वावरतो आणि स्वभावात एक्सेलचे प्रमाण जास्त असेल तर माणसाला यशाची आशा,आकांक्षा, महत्वाकांक्षा असते. आज आपल्याला अशाच प्रेरित, सकारात्मक, रचनात्मक, उत्पादक माणसांची गरज आहे.</p><p>माझी मोटिवेशन अकॅडेमी अगदी अशाच प्रकारची उद्योगी, मेहनती व्यक्तिमत्व विकासाचे कार्य करते.</p><p>औद्योगिक विश्वात कार्यरत कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि उद्योजकांना Entrepreneurs day आणि भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या वाढदिवस दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.</p><p><br /></p><p>योगीराज देवकर.</p><p>लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-8542701030870288002023-02-19T20:35:00.001+05:302023-02-19T20:35:12.105+05:30महेश अमोणकर गोवा <p> Regent Metal Tech & Rainbow Engineering at Kundaim-Goa.</p><p>माझे मित्र श्री महेश अमोणकर यांच्या दोन्ही फॅक्टरीज् ला भेट देण्याचा योग आला. इथे Powder Coating चे काम केले जाते. प्रामुख्याने Crompton चे पंखे आणि संबंधित उत्पादनांचे पावडर कोटिंग केले जाते. या उद्योगास आता जवळपास पस्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. सदर तंत्रज्ञान तसे परिचित आहे परंतु हे दोन्ही युनिट्स क्वालिटी जॉब वर्कसाठी प्रसिद्ध आहेत. युनिट्स मधील काही कामगार तर अगदी पहिल्या दिवसापासून इथे काम करीत आहेत हे बघून मला थेअरी 'Z ' ची आठवण झाली. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळच '5 S ' चे महत्व विषद केलेले आहे.कुंडईम इंडस्ट्रियल इस्टेट टेकडीवर आहे त्यामुळे निसर्गरम्य वातावरण आणि नजर जाईल तिथपर्यंत मांडवी नदीचे पात्र आणि खाडीचा भाग दिसतो.गोव्यात कोणाला पावडर कोटिंग ची सुविधा हवी असेल तर तुम्ही हे नाव विश्वासाने रेफेर करू शकता.</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-70296308029330462112023-02-19T20:32:00.001+05:302023-02-19T20:32:19.497+05:30गोवा आणि फिश <p> गोवा आणि फिश</p><p><br /></p><p>ओल्ड गोवा मध्ये श्री आनंद नाईक यांचे स्टार रेस्टॉरंट आहे.पणजी-जुना फोंडा रोडवर 8-10 मिनिटांच्या ड्राईव्हवर जवळची मोठी खूण म्हणजे सेंट ऍंथोनी चर्च किंवा रामदास सॉ मिल . माझ्या गोव्यातल्या मित्राचा हा मित्र आहे. हॉटेलच्या नावात स्टार आहे या नावाला साजेशाच इथल्या फिशच्या डिशेस चवदार असतात.मी पणजीला आलो कि इथे जेवायला जाणे होतेच. बिना काट्यांचा चाणक मासा ,छोट्या प्रॉन्स पासून किंग्ज प्रॉन्स पर्यंतचे प्रॉन्स मासे , सुरमई मासा,अशा कितीतरी एकापेक्षा एक चविष्ठ आणि सरस डिशेस तिथे मिळतात.रेस्टॉरंट म्हणाल तर एक छोटसं जुनं कौलारु बांधकाम, आजूबाजूला झाडी आणि बाहेर मोकळ्या जागेत बसायला लावलेल्या खुर्च्या आणि टेबल्स हा अवतार पाहुन एखाद्याला जेवणाच्या दर्जाबद्दल शंका येईल पण वर्षानुवर्षे चांगली क्वालिटी आणि सेवा देऊन त्यांनी मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.एकदा गेलेला ग्राहक ऍम्बीयन्स नाही तर क्वालिटीसाठी तिथे जातो.तुम्ही पण,पण कशाला,पणजीला याल तेव्हा फिश खाण्यासाठी इथे भेट द्यायाचे ठरवू शकता.</p><p><br /></p><p>स्टार रेस्टॉरंट</p><p>9822382944</p><p>7798354856</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-167340257944946062023-02-19T20:27:00.001+05:302023-02-19T20:27:18.082+05:30शरद काळे यांचा लोणी देवकर येथे सत्कार.<p> विक्रमवीर शरद काळे पाटील यांचा लोणी देवकर येथे सत्कार.</p><p>लोणी देवकर-(12 नोव्हेंबर 2022)- आज शरद काळे पाटील पुणे-इंदापूर -पुणे 300 कि.मी.अंतर सायकल वरून 20 तासात पूर्ण करण्यासाठी हायवे वरून जात असताना लोणी देवकरचे सरपंच कालिदास देवकर यांच्या हस्ते त्यांचा पाहुणचार आणि सत्कार करण्यात आला.</p><p>वय हा केवळ एक आकडा आहे हे अहमदनगर मधील सोनाई गावचे सुपुत्र शरद काळे पाटील यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. खरंतर ते एक उद्योजक आहेत.वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पाहिले आणि पोहायला शिकण्यापासून सुरुवात केली. पोहणे, धावणे आणि सायकल चालवीण्याचा सराव सुरु झाला.आज वयाच्या 56 व्या वर्षी त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.तब्बल आठ वेळा एस आर स्पर्धा(200,300,400,600कि.मि.सायकल स्पर्धा.)पूर्ण करणारे महाराष्ट्रातील ते पहिले सायकल वीर आहेत.</p><p>औरंगाबाद येथे 1000 कि. मि.बीआरएम स्पर्धा 68 तास 10 मिनिटात पूर्ण.</p><p>पुणे 1200 कि.मि. स्पर्धा 79 तास 37 मिनिटात पूर्ण.</p><p>इंग्लंड येथे आयोजित लंडन-इडनबर्ग-लंडन 1540 कि.मि. अंतर 128 तासात पूर्ण.</p><p>ते एक नावाजलेले मोटरसायकल वीरही आहेत.त्यांचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये दोनदा नोंदले गेले आहे.</p><p>मोटारसायकल वरून महाराष्ट्रातील अष्ठविनायक 12 तास 12 मिनिटात पूर्ण. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे 25 तासात पूर्ण.</p><p>भारतातील सुवर्ण चातुस्कोन म्हणजे मुंबई-दिल्ली-कोलकता-चेन्नई-मुंबई 5847 कि.मि. अंतर फक्त 88 तासात पूर्ण केले.</p><p>लोणी देवकर मधील योगीराज देवकर यांचे ते मित्र आहेत. सत्कार समारंभास सर्वश्री इंदापूर कारखान्याचे डायरेक्टर रत्नकवी देवकर,सहदेव डोंगरे,दादासाहेब तोरवे, सचिन घाडगे, दिलावर तांबोळी, पप्पू घाडगे, धनंजय चव्हाण, कुंडलिक घाडगे, पांडुरंग राखुन्नडे, नानासाहेब देवकर, अमोल देवकर,तुळशीराम घाडगे, साईराज देवकर, पत्रकार संदीप बल्लाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-69220172346439836992023-02-19T20:21:00.005+05:302023-02-19T20:21:37.836+05:30राळेगण, गावाचा वाढदिवस.<p> महाराष्ट्रातील सर्व खेड्यांनी राबवावी अशी स्तुत्य संकल्पना - गावाचा वाढदिवस.</p><p><br /></p><p>राळेगण सिद्धी-ग्रामपरिवर्तन दिवस.</p><p><br /></p><p>एकदा गावाकऱ्यांनी आण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले होते. तेव्हा आण्णांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी गावाचा वाढदिवस साजरा करूया अशी संकल्पना मांडली. आणि मग 2 ऑक्टोबर हा दिवस ठरविण्यात आला.राळेगण मधील या उपक्रमाला आता वीस वर्ष झाली आहेत. यावर्षी अतीवृष्टी मुळे तो दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा झाला. योगायोगाने त्याच दिवशी आण्णांच्या मातोश्री कै.लक्ष्मीबाई हजारे यांचा स्मृती दिनही होता.</p><p><br /></p><p>दिवसभर रक्तदान शिबीर आणि पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने यांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडले.</p><p><br /></p><p>विशेष म्हणजे यादिवशी गावात संध्याकाळी चूल बंद असते आणि सगळ्या ग्रामस्थ आणि उपस्थितांना भोजन दिले जाते, ज्याचा खर्च आण्णा हजारेंच्या पेंशनच्या पैशातून केला जातो. या अभिनव उपक्रमात खालील कल्पना राबविण्यात येतात.</p><p>1)ग्राममाता आणि ग्रामपिता चरण पूजन आणि सन्मान- गावात ज्या पुरुषाचे आणि ज्या महिलेचे वय जास्त आहे अशा दोन व्यक्तीची दरवर्षी निवड केली जाते आणि त्यांचे ग्रामपिता आणि ग्राममाता म्हणून आण्णांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चरणपूजा करून सन्मान केला जातो.याचा उद्धेश असा आहे कि,गावातील लहान,थोरांना जेष्ठ नागरिकांच्या योगदानाची जाणीव असावी आणि त्यांचा नेहमी आदर केला जावा.</p><p>2) गतवर्षात गावात जन्मलेल्या बालकांचा सन्मान - गतवर्षात गावात जी बालके जन्माला आलेली आहेत त्यांचा गावाच्या वतीने अंगडं, टोपडं देऊन सन्मान केला जातो .एकप्रकारे हा मातांचाही सन्मान केल्यासारखेच आहे.याचा उद्धेश असा आहे कि,मुले ही गावाची, देशाची संम्पत्ती आहेत. सन्मानाने गावात त्यांचे स्वागत केले जाते.</p><p>3) गतवर्षात गावात ज्या सुना आलेल्या त्यांचा गावाच्या वतीने साडी चोळी देऊन ओटीभरण आणि सन्मान करणे - याचा उद्धेश असा आहे कि,सुन घरात आल्यानंतर तिला जसे घराण्यातील चाळीरिती समजाव्यात,परंपरा आणि संस्कृती कळावी असे वाटते तसेच तिला गावाचा इतिहास आणि संस्कृती कळावी.तिच्या सर्वांशी ओळखी व्हाव्यात.ती गावाची सुन आहे.</p><p>4) कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार - गावातील ज्या नागरिकांनी ते जिथे असतील तिथे गतवर्षात जर काही विशेष कामगिरी गेली असेल त्यांचा सत्कार केला जातो. याचा उद्धेश असा आहे कि, हे नागरिक गावाचे भूषण आहेत, ते गावाचे नाव मोठं करीत आहेत त्यांची उचित दखल घेणे.यात उद्योजक, अधिकारी,शहरातील नोकरी सोडून गावात परत येऊन शेती करणारा शेतकरी, आधुनिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, दूध व्यावसायिक, मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळविलेले विद्यार्थी, सैन्यदलात प्रवेश करण्याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, गावाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करणारे नागरिक,इ. असे अनेकजण होते.</p><p><br /></p><p>मी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ट्रेनिंगच्या निमित्ताने राळेगण मधेच होतो त्यामुळे या उपक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. मला मनापासून असे वाटते कि महाराष्ट्रातील इतर गावांनीही या संकल्पनेचे अनुकरण करावे.</p><p><br /></p><p>योगीराज देवकर.</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-64139960090288727792023-02-19T20:14:00.001+05:302023-02-19T20:14:20.649+05:30हॉटेल चुल मटण <p> हॉटेल चुल मटण - नॉस्टॉजिक अनुभव.</p><p><br /></p><p>हॉटेल चुल मटणची तिसरी शाखा बालगंधर्व चौक,</p><p>नॅचरल आईस्क्रीमच्या मागे, जंगली महाराज रोडवर सुरु झालेली आहे. पूर्वीच्या दोन शाखा डी पी रोड म्हात्रे पुल आणि केशवनगर पिंपळे-सौदागर या अगोदरच चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. </p><p><br /></p><p>शहरात राहणाऱ्या बहुतेक लोकांना ग्रामीण पार्श्वभूमी असते. चुलीवरच्या ज्वारी आणि बाजरीच्या फुगलेल्या भाकरी,घरगुती चिकन,</p><p>मटण,लाल,काळ्या मसाल्यातील रस्सा ,अळणी चिकन आणि मटण (सुप ), निखाऱ्यावर भाजलेली कलेजी, घडीच्या चपात्या,बुक्की मारून कांदा फोडणे, इ. गोष्टी अनेकांच्या मनात घर करून असतात.</p><p>यामुळेच लोकांना हॉटेल मध्ये जाऊनही घरच्या स्वादाचा अनुभव देणारे फूड आवडते.</p><p><br /></p><p>हॉटेल चुल मटणने याच नॉस्टॉजिक अनुभवाला अधूनीकतेची जोड दिली आहे.त्यामुळेच हॉटेल चुल मटणचा मेनू शहरी आणि ग्रामीण सगळ्याच लोकांच्या आवडीचा झालेला आहे.</p><p><br /></p><p>एकदा खाल तर पुन्हा पुन्हा जाल!</p><p><br /></p><p>शुभेच्छुक.</p><p>योगीराज देवकर.</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-19240473638452971332023-02-19T20:11:00.003+05:302023-02-19T20:11:43.485+05:30वर्गमित्र मेळावा औरंगाबाद <p> ऊर्जादायी जुनी मैत्री.</p><p>श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर सन 1972 ते 1978 च्या पाचवीच्या पहिल्यावहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर 13 फेब्रुवारी 2013 ला झाले होते. तब्बल 35 वर्षांनी एकावेळी सगळे एकमेकांना भेटत होते.फारच भावुक आणि नॉस्टालजिक दिवस होता तो. गेटटुगेदरची कल्पना सुचल्यानंतर गणेश देशपांडे,सत्यजित गुजर , प्रदीप गारटकर, घनश्याम शहा,पांडुरंग राऊत सगळ्यांनी मनावरच घेतलं होतं की, वर्गातल्या सगळ्यांना जिथं कुठं असतील तिथून शोधून काढायचे. सत्तरच्या दशकात ज्यांचे आई-वडील उजनी धरण प्रकल्पच्या नोकरीत होते ती मुलं,मुली औरंगाबाद,मुंबई,</p><p>हैद्राबाद, बेळगाव अशा ठिकाणी गेली होती,नोकरी निमित्त काहीजण पुण्यामुंबईत होते,तर मुली लग्न होऊन कुठे कुठे सासरी गेल्या होत्या. मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका निवृत्त झाले होते आणि त्यातले काही इंदापूर तर काही इतरत्र स्थायिक झाले होते. पण या मित्रांनी सगळ्यांना शोधून काढलेच आणि आमचे गेटटुगेदर जोशात पार पडले. खरंतर मी फक्त पाचवीला एकच वर्ष इंदापूरला होतो.माझं पुढचं सगळं शिक्षण पुण्यात झाले. इथे नवीन मित्रवर्ग निर्माण झाला. पण जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे बालपणीच्या मित्रांचे खास वेगळेच स्थान असते. गेटटुगेदरचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आमचा 'मधली सुट्टी ' या आगळ्यावेगळ्या नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. पुढे सत्यजित गुजरने थेऊरला आणि प्रमिला जाधवने कुंभरगाव -भिगवणला गेटटुगेदर ऑर्गनाईज केले होते. तेव्हा आयोजकांच्या यथायोग्य आदरातिथ्य आणि पाहुणचारासोबत थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाचा आणि कुंभरगावला उजनी जलाशयात फ्लेमिंगो पक्षी निरीक्षणचा आनंद घेतला होता.</p><p><br /></p><p>मध्यंतरी मित्र -मैत्रिणींच्या मुला -मुलींची लग्न झाली तेव्हा या भेटीगाठी होत राहिल्या.</p><p><br /></p><p>21 आणि 22 जानेवारी 2023 ला म्हणजे नुकतच आमचं पहिलं निवासी गेटटुगेदर औरंगाबादला साजरे झाले. आयोजनाची पूर्ण जबाबदारी सत्यजित व स्वाती गुजर आणि डॉ सविता व डॉ मिलिंद पटवर्धन या उभायतांनी घेतली होती.</p><p><br /></p><p>20 जानेवारीला रात्रीच नियोजनानुसार तिसजण औरंगाबादला पोहोचले. सत्यजित गुजर हा सध्या औरंगाबाद विभागाचा मुख्य वन संरक्षक आहे. त्याने गेस्टहाऊस आणि बंगल्यात सर्वांची निवासाची सोय केली होती. सकाळी नाष्ट्यापासून ते रात्री भोजनापर्यंत खानसामा दिमतीला होता. मग काय ग्रुपच्या गप्पा आणि मज्जा .</p><p><br /></p><p>पहिल्या दिवशी सकाळी आम्ही घृषणेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो . स्वागताला वन विभागाचे अधिकारी हजर होते. सरळ सगळे मंदिराच्या कार्यालयात गेलो. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांची प्राधान्याने दर्शनाची सोय केली. शनिवार,गर्दी असूनही आम्हाला महादेवाचे व्हीआयपी दर्शन घडले. त्यानंतर वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेलो. तिथं गाईड कचरू जाधव आमची वाट पहात उभा होता. त्यांच्या विनोदी, हजरजबाबी आणि तितक्याच अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही कैलास लेणी पाहण्याचा आनंद लुटला. तिथून चालतच आम्ही महादेव वनात गेलो. बारा जोतिर्लिंगापैकी पाच जोतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. युती सरकारने प्रत्येक जोतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेवाला आवडणाऱ्या वृक्षांचे वन निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. घृषणेश्वर मंदिर परीसरात सदर महादेव वन निर्माण करण्यात आरएफओ सत्यजित गुजरचे मोठे योगदान आहे. साडेबारा एकरात फुललेल्या नंदनवनात विविध प्रकारचे बेल,रुद्राक्ष,चाफा,अर्जुन सादळा अशा अनेक प्रकारचे वृक्ष पाहताना </p><p>सगळ्यांनाच सत्यजितचा अभिमान वाटत होता. औरंगाबादला परतलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. जेवणानंतर तासाभराच्या आंतराने हुरडापार्टी सुरु झाली. एरवी कृषी पर्यटनात हुरडा पार्टी करणारी टीमच सत्यजितने कामाला लावली होती. हुरड्याच्या सोबतीला तीन प्रकारच्या चटण्या आणि आकटीत भाजलेली बेबी कॉर्नची चविष्ठ कणसे पण होती. आकटीच्या शेजारीच लॉनवर गोलाकार खुर्च्या मांडून बसलो मग काय योगीराज देवकरने मनोरंजक खेळांनी सुरुवात केली.सत्यजित गुजरच्या ऍक्टिव्हिटीज् नी सर्वांची मने जिंकली.गणेश देशपांडेने तर तो बॅचलर असताना सत्यजित आणि सविताने त्याला लिहलेल्या पत्रांचे वाचन करून मैत्रीच्या खोलीला उजाळा दिला. मग सविताने पण तिच्याकडील पत्रांचा खजिना काढला आणि काही शिक्षकांची पत्रे वाचून दाखविण्याची विनंती सत्यजितला केली कारण तिला स्वतःला फारच गहिवरून आले होते .श्रीकांत जोशीने बहारदार गायन करून अजूनही मी स्कूल मध्ये होतो तसाच छान गाणी गातो याची प्रचिती दिली. खरी मजा आणली ती पांडुरंग आणि पुष्पा राऊत या पती-पत्नीच्या विनोदांच्या जुगल बंदीने. बालपणीच्या कविता गायन, गाण्याच्या भेंड्या, पासिंग दी बॉल आणि शिक्षा सारख्या खेळांनी रात्रीचे नऊ कधी वाजले ते समजले नाही. हुरड्यानंतर मग रात्री नावाला जेवण आणि भरपेट गप्पा झाल्या.</p><p><br /></p><p>दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही दौलताबाद किल्याच्या पार्किंगला होतो. गाईडच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पहायला चार तास लागले.वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना पाहताना सगळे आश्चर्यचकित झाले होते.256 एकरांना सुरक्षा भिंत,नागमोडी वळणावरील सात भव्य प्रवेशद्वारे,</p><p>पाण्याची व्यवस्था,वॉच टॉवर,खंदक, मेंढा तोफ,भुयारी मार्गातील भुलभूलय्या,निवास आणि मंदिराचे बांधकाम, दुर्गा तोफ असा हा अभेद्य किल्ला तोही मित्रांसोबत पाहणं एक अल्हाददायक अनुभव होता. सगळेजण भुलभूलय्या पार करून वरच्या टप्प्यावर आले खरे पण वेडात दौडलेले फक्त सातच वीर सत्यजित, योगीराज, गणेश, गौतम, रमेश, प्रदीप आणि अर्जुन दुर्गा तोफे पर्यंत पोहोचले. त्यानंतर आम्ही पैठण रोडवर सविताच्या घरी गेलो. तिच्या कॉलनीच्या शेजारीच वाल्मि संस्थेचे कॅम्पस आहे. निसर्गरम्य परिसरात तिचे घर पाहताना खूप छान वाटले. त्यानंतर वाटेत MCED संस्थेला भेट देऊन पुन्हा वन विभागाच्या बंगल्यावर पोहोचलो तर खानसामाने पुरणपोळीचा बेत केला होता. खानसामाची पत्नी,आई उत्तम सुगरण आहेत. जेवणानंतर त्यांचे कौतुक केले तर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.जेवणानंतर औरंगाबादच्या तारा पान सेन्टर मधील मगई पानाचा आस्वाद घेतला.</p><p><br /></p><p>जेवणानंतर गेटटुगेदरच्या समारोपासाठी आम्ही एकत्र बसलो. यात गौतम गुणाजी बेळगांवहुन तर दयानंद काद्रे हैद्राबाद हुन आले होते.त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. उद्योग व्यवसायामुळे बिझी असलेले अविनाश जोशी, संजय सावंत थोडा वेळ का होईना पण गेटटुगेदरला हजेरी लावून गेले. प्रदीप गारटकरची मात्र उणीव भासली.एकएक करून सगळे बोलायला लागले तर सत्यजित म्हणे, " मला सेंडऑफचा फील देऊ नका." पण खरंच सत्यजित, स्वाती आणि सविता, मिलिंद या चौघांनी हे गेटटुगेदर यशस्वी करायला फार मेहनत घेतली. त्यांच्या एनर्जीला सगळ्यांनी दाद दिली. त्यांनी प्रत्येकाकडून जोडीचे फोटो मागविले होते आणि स्कूलच्या इमारतीचा फोटो पण मिळविला होता. स्कूलची इमारत आणि जोडीचा फोटो 'मग' वर छापून प्रत्येकाला भेट द्यायची नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी राबविली. समारोपात बोलताना प्रमिला जाधव, प्रशांत कुलकर्णी, संजीवनी यांना अश्रू अनावर झाले होते. तर गौतम गुणाजी, सविता पटवर्धन, गणेश देशपांडे, उज्वला अर्णिकर फारच भावुक झाले होते.घनश्याम शहा,अर्जुन ठोंबरे,राजेंद्र आणि रमेश देवकर, प्रदीप शहा,यांच्या सुंदर सहभागामुळे गेटटुगेदरची रंगत वाढली.</p><p>या गेटटुगेदरचे वेगळेपण म्हणजे सगळे मित्र आणि मैत्रिणी जोडीने आल्यामुळे मित्रांच्या बायका आणि मैत्रिणींचे नवरे सगळ्यांचीच एकमेकांशी मैत्री वाढायला मदत झाली. आयोजकांचे, वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, खानसामाचे आभार मानून पुन्हा लवकरच भेटू असे ठरवून संध्याकाळी सगळे आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.</p><p><br /></p><p>आयुष्यात बालपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय,प्रोफेशन, छंद, प्रवास,अशा विविध टप्प्यावर लोकं भेटतात परंतु केवळ बालपण आणि शिक्षणाच्या वेळी भेटलेले मित्रच निःस्वार्थ, निखळ, स्वच्छ मैत्री करतात आणि जपतात असा बहुतेकांचा अनुभव असावा.</p><p>म्हणूनच जुनी मैत्री खरीखुरी आणि ऊर्जादायी असते.</p><p><br /></p><p>योगीराज देवकर.</p><p>लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.</p><p>www.motivationacademy.in</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-32909426734634346772022-07-05T10:52:00.000+05:302022-07-05T10:52:11.954+05:30Best 30 second business speech.<p> नमस्कार !</p><p>माझे नाव आहे योगीराज देवकर,</p><p>ट्रेनिंग द्यायला असतो नेहमी तत्पर.</p><p>संस्थेचे नाव मोटिव्हेशन अकॅडमी,</p><p>ट्रैनिंग आणि कन्सल्टन्सी</p><p>ही बिझनेस कॅटेगरी.</p><p>मेहनत,धडपडीच्या विचारांचा देतो धडा,</p><p>शिकवितो मोटिव्हेशन,</p><p>Soft स्किल्स आणि OD.</p><p>तीस वर्षांचा अनुभव तरीही विध्यार्थी,</p><p>मराठीतून प्रशिक्षण अनुभव हीच खात्री.</p><p>किर्लोस्कर,राज ग्रुप, क्यूबिक्स, मिटकॉन , MCED, हे ग्राहक,</p><p>भारत सरकारचा पुरस्कार्थी आणि चार पुस्तकांचा लेखक.</p><p>लघु उद्योग,कॉलेजेस, संस्थांची नावे मला सांगा,</p><p>बदलतो मानसिकता, वाढवितो कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता.</p><p>"स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"</p><p>योगीराज देवकर आणि मोटिव्हेशन अकॅडेमी ला प्रसिद्ध करा.</p><p>www.motivationacademy.in ला भेट द्या,</p><p>मला रेफेरन्ससेस द्या आणि माझ्याकडूनही घ्या.</p><p>आभार .🙏🏻</p><p><br /></p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-69449300509102852532022-06-06T14:54:00.002+05:302022-06-06T14:54:30.846+05:30Hon PM से प्रभावित वन मिनिट बिझनेस प्रेझेंटेशन <p> आजका वन मिनिट Hon PM से प्रभावित.</p><p><br /></p><p>मित्रो !</p><p>अच्छे दिन आने वाले हैं l</p><p>लेकिन इसके लिये,</p><p>सबका साथ - सबका विकास,</p><p>सबका विश्वास - सबका प्रयास l</p><p>जरुरी हैं l</p><p><br /></p><p>आपके SCGT वाकड चॅप्टर के मेंबर योगीराज देवकर जी और उनका मोटीव्हेशन अकॅडेमी लोगोमें बदलाव लाने का बहुत बडा काम कर रहा हैं l</p><p><br /></p><p>उनकी ' उद्योगी, मेहनती, व्यक्तिमत्व विकास ' ये किताब आप पढिये l</p><p>आप जान जाओगे कि,</p><p>कडी मेहनत कभी थकान नहीं लाती वह संतोष लाती हैं l</p><p><br /></p><p>आपके यह देवकर जी,</p><p>Industrious Motivation .</p><p>Soft Skills और</p><p>Organization Development, इन टॉपिकपे घमासान ट्रेनिंग देते हैं ।</p><p><br /></p><p>योगीराज देवकर जी को 1994 में भारत सरकारने 'बेस्ट आंत्रप्रेनेर ट्रेनर' पुरस्कारसे नवाजा गया हैं l </p><p><br /></p><p>क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,</p><p>राज ग्रुप, क्यूबिक्स ऑटोमेशन , कूल फौंडेशन, MCED, MITCON यहाँपर उनका बार बार ट्रेनिंग होते रहता हैं ।</p><p><br /></p><p>उनका USP हैं, की,</p><p>" सिर्फ ट्रेनिंग ही नहीं , वो ट्रेनी के लिये आत्मपरीक्षण का समय होता हैं ।"</p><p><br /></p><p>अभि पिछले हप्ते वो ट्रेनिंग के लिये M U कॉलेज ऑफ कॉमर्स गये थे ।</p><p><br /></p><p>" खुद प्रेरित रहो और दुसरोंको प्रेरित करो !" यह उनका स्लोगन हैं l</p><p><br /></p><p>माना कि अंधेरा घना हैं,</p><p>लेकीन दिया जलाना कहा मना हैं l</p><p><br /></p><p>अब आपके पहचान में जितनेभी उद्यमी हैं , कॉलेजेस हैं , ऑर्गनायझेशन्स हैं, उनके रेफेरेन्सस इन्हे देदो ।</p><p><br /></p><p>जरा फुरसत निकालके देवकर जी के साथ 1 to 1 करो और www.motivationacademy.in को व्हिजिट करो l</p><p><br /></p><p>दीपक कि लौ के समान उपर उठना हममे से हर एक कि स्वाभाविक वृत्ती हैं, आइये इस वृती को विकसित करे l</p><p><br /></p><p>बोलो, भारत माता कि !जय!</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-82213864152162557242022-06-06T14:50:00.000+05:302022-06-06T14:50:09.412+05:3031 मे 2019 निवृत्ती निमित्ताने चार शब्द <p> नमस्कार ! </p><p><br /></p><p>निवृत्ती निमित्त दोन-चार शब्द .</p><p><br /></p><p>वक्तृत्वकला,उपक्रमांचे आयोजन करण्याची आणि प्रवासाची आवड या गुणांमुळे नोव्हेंबर १९८५ मधे मिटकॉन मधे भविष्यात येणाऱ्या एम.सी.इ.डी.साठी माझी निवड झाली.</p><p><br /></p><p>व्याख्याने द्यायला विषय हवेत म्हणून मी 'सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण' या विषयाची निवड केली आणि खूप मेहनत घेऊन हा विषय तयार केला .या विषयाचे मराठी लहान पुस्तक तयार केले आणि १९८७ मधे स्वतःच्या लोणी देवकर या गावात हा कार्यक्रम राबवून या विषयाचा श्रीगणेशा केला. पुढे यथावकाश मी 'उद्योजकता', 'उद्योग संधी शोधा म्हणजे सापडेल','व्यवसायिक उद्योजकता', इ. पुस्तकांचा लेखक झालो.श्री.विश्वास देवकर, श्री.शशीकांत कुंभार यांनी पहिल्या पुस्तकाचे तर श्रीमती आनंदी कुलकर्णी यांनी दुसऱ्या पुस्तकाचे शब्दांकन केले आणि श्री. डॉ.श्रीपाद कडवेकर सर,डॉ.रवींद्र कोठावदे,यांनी मला तिसऱ्या पुस्तकासाठी सहलेखक होण्याचा मान दिला. </p><p><br /></p><p>सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण हा एक कार्यक्रम ३ दिवसांचा असतो आणि कार्यक्रमात ३० प्रशिक्षणार्थी असतात.असे मी महाराष्ट्रात ६०० पेक्षा अधिक कार्यक्रम घेतले आहेत .</p><p>याचाच अर्थ मी १८०० दिवस कार्यक्रम घेऊन १८००० प्रशिक्षणार्थींना उद्योजकतेचे धडे दिले आहेत. वर्षाचे २६० कामाचे दिवस गृहीत धरता मी जवळपास ७ वर्षे फक्त या एकाच विषयावर पूर्णवेळ व्याख्याने दिलेली आहेत. या प्रदीर्घ अनुभवामुळे या विषयाची माझी उत्तम तयारी झालेली आहे असे मला नमूद करावेसे वाटते.या योगदानामुळेच मला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे 'उत्कृष्ठ प्रेरक प्रशिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि इतरही अनेक मान सन्मान मिळाले.</p><p><br /></p><p>या शिवाय व्यक्तिमत्व विकास, Business Opportunity Search & Scanning ( BOSS), संस्था विकास (OD), विपणन व्यवस्थापन,</p><p>कश्यासाठी कोणाकडे सम्पर्क , जीवन कौशल्य(Soft Skills ), प्रेरणा,इ. माझे आवडीचे विषय आहेत. या विविध विषयावर मी राज्यभरात हजारो व्याख्याने दिलेली आहेत आणि काही लाख लोकांपर्यंत हे विषय पोहोचवले आहेत.</p><p><br /></p><p>नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आणि बहुतेक तालुक्यात,भारताच्या अनेक राज्यात,परदेशात इंग्लंड,युरोप,इ.ठिकाणी मला प्रवासाची संधी मिळाली .</p><p><br /></p><p>कार्यक्रमांसाठी व्याख्याता म्हणून मला निमंत्रित केलेले प्रकल्प अधिकारी, कार्यक्रम समनव्यक, शिक्षण संस्था,कार्यक्रम पुरस्कर्ते संस्था,उद्योग विभाग-महाराष्ट्र शासन ,माझ्या प्रशिक्षणातून निर्माण झालेले शेकडो नवउद्योजक, औद्योगिक संघटना आणि सहभागी प्रशिक्षणार्थी, इ.यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि विशेषतः परमेश्वराचा मी खास आभारी तसेच ऋणी आहे की त्याने माध्यम म्हणून या कामासाठी माझी निवड केली.</p><p><br /></p><p>एम.सी. इ. डी. तर्फे 'उद्योजकीय मराठी साहित्य संमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते, त्यापैकी पुणे आणि कराड (सातारा) येथे पार पडलेल्या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती .या घटना आठवत असताना डॉ. भा.रा.साबडे,कराडची पतसंस्था यांची देखील आठवण होत आहे.</p><p><br /></p><p>महाराष्ट्र टाइम्स,सकाळ,</p><p>लोकमत,सागर,रत्नागिरी टाइम्स,लोकसत्ता,इ.वर्तमान</p><p>पत्रातून माझे अनेक लेख प्रकाशित झाले, E TV मराठी चॅनलने माझे १०-१२ एपिसोड प्रसारित केले, त्या सर्वांचा मी आभारी आहे.</p><p><br /></p><p>श्री.प्रभाकर देशमुख साहेब, तत्कालीन जिल्हाधिकारी, पुणे यांच्या पुढाकारातून आणि श्री एस.एस.सुरवसे साहेब, तत्कालीन महाव्यवस्थापक, जि.उ.केंद्र, पुणे यांच्या साहाय्याने पुणे जिल्ह्यात राबवलेली 'राजश्री शाहू स्वरोजगार योजना' , महाराष्ट्र शासनातर्फे मराठवाड्यात राबविलेल्या 'रिटेल मॅनेजमेंट योजना ',एम.सी.ए.इ.आर. पुरस्कृत 'कृषी उद्योजकता कार्यक्रम' </p><p>इ. प्रकल्प माझ्या कार्यातील विशेष उल्लेखनीय बाबी आहेत.श्री. जितेंद्र जोशी यांची रिटेल उपक्रम तर श्री. परकाळे साहेब, श्री. व्ही.डी. पाटील यांची कृषी उपक्रम राबविण्यात मोलाची मदत झाली. </p><p><br /></p><p>सुरुवातीस प्रकल्प अधिकारी पदावर असताना ठाणे,</p><p>पुणे,नांदेड,रत्नागिरी,</p><p>बारामती येथे दीर्घकालीन उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केले .त्यानंतर मला पुणे विभागात विभागीय अधिकारी या पदावर खूप वर्षें काम करण्याची संधी लाभली,त्यानंतर दोनदा मराठवाडा विभाग ,आणि शेवटी मुंबई विभागात काम केले. या काळात तेथील प्रकल्प अधिकारी,कार्यक्रम समन्वयक,स्टाफ आणि सहाय्यक संस्था यांचे मौलिक सहकार्य लाभले. त्या सर्वांचा मी आभारी आहे.</p><p><br /></p><p>मा.विभागीय आयुक्त,श्री. प्रभाकर करंदीकर साहेब,अनेक मा.जिल्हाधिकारी विशेषतः सर्वश्री,साहेब आणि मा .अमिताभ राजन, रमेशचंद्र कानडे ,श्रीनिवास पाटील,इ. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.विशेषतः राजेंद्र पवार, रमेश देवकर, इ. विकास आयुक्त उद्योग, विशेषतः यशवंत भावे, जयंत कावळे,इ. यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवण्याची संधी मला लाभली.अनेक मा.ना.मंत्री, खासदार,आमदार,शिक्षण तज्ञ,उद्योग विकास संस्था अधिकारी,समाजसेवक, अनेक साहित्यिक,उद्योजक स्व.बी.जी.शिर्के साहेब, श्री. सुभाषजी दांडेकर, स्व.गजाननजी पेंढारकर,</p><p>श्री.राजकुमारजी चोरडिया,श्री.विशाल चोरडिया आणि चोरडिया कुटुंबीय, राज ग्रुप चे श्री. कदम साहेब आणि श्री.निंबाळकर साहेब,श्री. राम भोगले साहेब,श्री. परशुरामभाऊ चितळे, मानसशास्त्रज्ञ स्व.मनोहर नाडकर्णी,</p><p>स्व.डॉ.राम कुलकर्णी, डॉ.एम.यु.देशपांडे,</p><p>डॉ.सुधीरजी गव्हाणे सर,</p><p>स्व.आप्पासाहेब पवार,श्री. शिवराज गोर्ले, स्व.जयंत रानडे,मा.श्री. आण्णा हजारे,मा.कार्यकारी संचालक,एम.सी.इ.डी. श्री.बी.व्ही.राठोड आणि इतर सर्व माजी व आजी का.सं; संस्थेतले अनेक कार्यक्रम आयोजक,प्रेरक प्रशिक्षक सर्वश्री दत्ता मुळे, शेरखान पठाण,विलास आहेर,दीपक भिंगरदेव,संजय भामरे,सुबोध बायस,सुरेश उमाप, विशेषतः माझे बॅच मेट सर्वश्री राजकुमार फटाटे,</p><p>सुनील चांडक,अरुण गाट ,'उद्योजक' विभाग,आणि एम.सी.इ.डी.मधील स्टाफ,इ.तसेच माझा मित्र श्री.उन्मेष गायधनी ,या सर्वांचा सहवास मला लाभला , यांच्याकडुल मला खूप,खूप शिकायला मिळाले आणि माझे व्यक्तिमत्व घडत गेले .या सर्वांचा मी शतशः आभारी आहे.</p><p><br /></p><p>मला अनेक संस्थांतून प्रशिक्षणाची संधी लाभली,EDI-I, अहमदाबाद, NISBUD आणि ASEED दिल्ली, रांची,कोडाई कॅनॉल,गुवाहाटी, इ.येथील उद्योजक विकास संस्था,FORMAPER - मिलान,इटली, या संस्थांची मला आठवण होत आहे.या संस्थांशी संबंधित डॉ.व्ही.जी.पटेल,डॉ.सी. एच.पाठक,श्री.रमेश दवे,श्री.अजय दीक्षित,</p><p>डॉ.एम.एम.पी.अखोरी,डॉ.</p><p>एन.पी.सिंग,डॉ.उदय पारेख, अश्या अनेकांचा मी खूप खूप आभारी आहे.</p><p><br /></p><p>सुदैवावे श्री. सुरेश रानडे साहेब मला पहिले बॉस म्हणून लाभले. उत्कृष्ठ सल्लागार,प्रशिक्षक,</p><p>उपदेशक,वक्ता,अभ्यासू , उत्साही आणि उद्योजकता विकासाची हृदयापासून तळमळ अश्या अनेक गुणांचे ते रसायन आहेत. त्यानंतर लाभलेल्या प्रत्येक बॉस मधे मी श्री. रानडे शोधत राहिलो.</p><p><br /></p><p>गेल्या ३४ वर्षांच्याकाळात मी खूप चढ-उतार पाहिले.</p><p>संस्थेत मी कायम महत्वाकांक्षी राहिलो आणि ही महत्वाकांक्षा मी कधी लपवून ठेवली नाही. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी करंदीकर कमिटी रिपोर्ट तयार केला होता. त्यात चीफ प्रोजेक्ट ऑफिसर असे एक पद होते.१२ वर्षानंतर यापदावरील अधिकाऱ्यास संस्था प्रमुख होण्याची संधी होती.पुढे दोन कार्यकारी संचालकांनी दोनदा रिपोर्ट मधे बदल मंजुर करून घेतले. यामुळे प्रोमोशन मधे अनेक अडचणी वाढल्या .</p><p><br /></p><p>मध्यंतरी ९ महिने मला के.व्ही.आय.बी. कडे प्रतिनियुक्तीवर काम पाहण्याची संधी लाभली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.रमेश देवकर साहेब आणि त्यांचे अधिकारी वर्ग जे नंतर माझे चांगले मित्र झाले असे सर्वश्री.धर्मेंद्र काळोखे,पी.के.सावंत,आनंद कर्णिक यांच्या सोबत कार्य करण्याचा योग आला. त्या सर्वांचा मी आभारी आहे.</p><p><br /></p><p>या सर्व प्रवाहात मला माझी पत्नी सौ.अनिता आणि मुलगा चि. अमेय यांची उत्तम साथ लाभली. तसेच सर्व देवकर कुटुंबीय आणि विशेषतः थोरले बंधु श्री कालिदास देवकर यांचे सहकार्य लाभले .यासर्वांचा मी आभारी आहे.</p><p><br /></p><p>माझ्या कारकिर्दीच्या यशात अनेकांचा वाटा आहे, सर्वांचाच नामोल्लेख करणे शक्य नाही.नामोल्लेख नाही म्हणून कोणी नाराज होऊ नये अशी विनंती . प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभारी आहे.</p><p><br /></p><p>उद्योजकता विकास चळवळ, संस्थेतील कर्मचारी आणि संस्थेच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो .</p><p><br /></p><p>३१ मे २०१९ रोजी मी निवृत्त होत आहे. शेवटी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो.</p><p><br /></p><p>धन्यवाद !</p><p>योगीराज देवकर .</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5665220361361436106.post-40691094164315436852022-05-29T21:37:00.004+05:302022-05-29T21:37:36.653+05:30नटसम्राट <p> आजचं वन मिनिट नटसम्राट ने प्रभावित.</p><p>कुणी रेफेरेन्स देत का रेफेरेन्स ?</p><p>एका तुफानाला कुणी रेफेरेन्स देता का ?</p><p>एक तुफान वन मिनिट देतंय, टेन मिनिट देतंय,1 टू 1 करतंय, 1 टू मेनि करतंय, क्रॉस चाप्टर मीटिंग करतंय, न परवडणारं महागडं डिझेल गाडीत भरून शहरा शहरातून हिंडतय , उद्योजकांकडे जावून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता येईल असा उद्योग धुंडतय.</p><p><br /></p><p>कुणी रेफेरेन्स देता का रेफेरेन्स ?</p><p>एका तुफानाला कुणी रेफेरेन्स देता का ?</p><p><br /></p><p>नमस्कार ! </p><p>मी एक तुफान योगीराज देवकर Motivational Speaker .</p><p><br /></p><p>माझ्या संस्थेचे नाव , मोटिव्हेशन अकॅडमी. कॅटेगरी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी.</p><p><br /></p><p>माझे व्याख्यानांचे विषय-</p><p>१) Industrious Motivation.</p><p>२)Soft Skills.</p><p>३) Organization Development.</p><p><br /></p><p>Experience- तीन दशके.</p><p><br /></p><p>My Clients - क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,राज ग्रुप, क्यूबिक्स ऑटोमेशन , मिटकॉन, MCED.इ.</p><p><br /></p><p>U.S.P. - केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मपरीक्षण.</p><p><br /></p><p>Recent success story - लेखाचे लिखाण.</p><p><br /></p><p>Specific Ask- चितळे उद्योग समूहाचे HR किंवा तत्सम Small & medium scale Industries HR managers आणि ऑर्गनिझशन्स हेडस्. </p><p><br /></p><p>My Gives- Content writing.</p><p><br /></p><p>Tag line - "स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"</p><p><br /></p><p>पुन्हा एकदा योगीराज देवकर आणि मोटिव्हेशन अकॅडेमी.</p><p>www.motivationacademy.in</p><p><br /></p><p>कुणी रेफेरेन्स देता का रेफेरेन्स ?</p><p>कुणी रेफेरन्स दिला तर हे तुफान त्यांचं आभारी राहील.</p><p>धन्यवाद.🙏🏻</p><div class="blogger-post-footer">http://yogirajdeokar.blogspot.com/</div>Yogiraj Deokarhttp://www.blogger.com/profile/15539846794518772892noreply@blogger.com0