Sunday, 10 May 2026

शोध मी कोण आहे स्व संकल्पनेचा

 शोध ' मी कोण आहे?' या स्व संकल्पनेचा.


प्रत्येक माणूस स्वतःबद्दल काही विचार,विश्वास,

प्रतिमा आणि प्रतिभा बाळगत असतो — यालाच स्व-संकल्पना ( Self concept ) असे म्हणतात.

मी कोण आहे? हा प्रश्न फार प्राचीन काळापासून विचारला जात आहे.


वेदा मधील उपनिषदात याला “कोहं?” (मी कोण ?)तर 

आधुनिक मानसशास्त्रात याला  “Self Identity”स्व-ची ओळख समजले जाते.


स्व-संकल्पना म्हणजे काय? तर ' स्वतःबद्दलची एकूण समज, भावना आणि मूल्यांकन म्हणजे स्व-संकल्पना.' 

व्यक्तिमत्व आणि स्व संकल्पना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यक्तिमत्व म्हणजे इतरांना माहीत असलेले तुम्ही आणि स्व संकल्पना म्हणजे तुम्हाला माहीत असलेले तुम्ही.


स्व मध्ये तीन मुख्य घटक असतात:

१) Self-Image (स्व-प्रतिमा)

मी स्वतःला कसा पाहतो?

उदा. “मी हुशार आहे.”, “मी लाजाळू आहे.”

२) Self-Esteem (स्व-मूल्य)

मी स्वतःला किती महत्व देतो?

उदा. “मी योग्य आहे./नाही.”

३) Ideal Self (आदर्श स्व)

मला कसा व्हायचं आहे?

उदा. “मला आत्मविश्वासी ,आत्मनिर्भर व्हायचं आहे.”


“मी कोण आहे?” विरुद्ध “मी काय आहे?”

प्रश्न-मी कोण आहे?

याचा अर्थ- तुमची ओळख (Identity) – जी तुमची भूमिका, नाती, व्यक्तिमत्त्व याद्वारे निर्माण होते.

प्रश्न - मी काय आहे?

याचा अर्थ - तुमचे अस्तित्व (Existence) –जे तुमचे  शरीर( Body), मन ( Mind), आणि  आत्मा( Soul) दर्शविते.

उदाहरण:

“मी प्रशिक्षक आहे.” ही  भूमिका झाली.

“मी माणूस आहे.” हे  अस्तित्व झाले.

“मी आत्मा आहे” हा  आध्यात्मिक दृष्टिकोन झाला.


स्व-संकल्पना कशी तयार होते?

१) कुटुंब आणि बालपण,

आई-वडिलांचे शब्द, वागणूक.

२) समाज आणि संस्कृती,

समाजातील अपेक्षा, तुलना.

३) अनुभव- (Experiences)

यश/अपयश.

४) शिक्षण आणि मित्र-

Feedback आणि interaction.


मानसशास्त्रीय दृष्टिकोन-

१) Humanistic Theory- 

मानसशास्त्रज्ञ Carl Rogers

त्यांनी सांगितले:

Real Self v/s Ideal Self

दोघांमध्ये अंतर असेल तर तणाव निर्माण होतो.

२) Social Identity Theory- 

आपण समाजकारण,राजकारण,अर्थकारण, वारकरी, आध्यात्मिक पंथ,  कोणत्या गटात आहोत यावर आपली ओळख ठरते.


“कोहं?” (Ko’ham) -

याचा संस्कृत अर्थ:

“को” = कोण.

“अहम्” = मी.

“कोहं?” = मी कोण ? असा आहे.

१) उपनिषदांमध्ये हा प्रश्न का विचारला गेला?

तर स्वतःचा खरा शोध (Self-inquiry) घेण्यासाठी विचारला गेला आहे.

माणूस स्वतःला ओळखतो असे वाटते,पण बहुतेक वेळा तो नाव,व्यवसाय,

नाती यालाच ' मी ' समजतो.

उपनिषद म्हणते :

हे सगळं तात्पुरतं आहे — खरा ' मी ' यापेक्षा  काहीतरी वेगळं आहे.

२) ' कोहं? ' हा एक प्रक्रिया (Process) आहे.हा प्रश्न एकदा विचारून संपत नाही —

तो सतत स्वतःला विचारायचा आहे.


Step-by-step Self-Inquiry: कशी करावी.

मी शरीर आहे का?

शरीर बदलतं (लहानपण ,मोठेपण, म्हातारपण)

मग मी शरीर नाही.


मी मन/विचार आहे का?

विचार येतात-जातात

मग मी विचार नाही.


मी भावना आहे का?

भावना बदलतात.

मग मी भावना नाही.


मग प्रश्न उरतो:“हे सगळं पाहणारा कोण?”

उत्तर:तो observer म्हणजेच “खरा मी.”


उदाहरण:चित्रपट स्क्रीन. उदाहरण:स्क्रीनवर चित्रपट चालतो (दृश्ये, भावना, कथा)

पण स्क्रीन स्वतः बदलत नाही.

चित्रपट = आपले विचार, भावना, जीवन.

स्क्रीन = 'मी '(साक्षीभाव).

शेवटी 'शुद्ध जाणीव ' (pure awareness) उरते ती तुम्ही.


भारतीय तत्त्वज्ञानातील दृष्टिकोन -

१ ) वेदा मधील उपनिषद – “तत्त्वमसि.”याचा अर्थ:

“तूच ते आहेस.” — म्हणजे व्यक्ती (individual self) आणि परम सत्य (ultimate reality) एकच आहेत.

सखोल समज-

“तत्त्व” = अंतिम सत्य (ब्रह्म).

“त्वम्” = तू (जीव/व्यक्ती).

“असि” = आहेस.

म्हणजे-तुझ्या आतच परम सत्य आहे — तू वेगळा नाहीस.


मानसशास्त्रीय अर्थ:

आपली ओळख फक्त नाव, काम, भूमिका इतकी मर्यादित नाही.

आपल्या आत गाभ्यात एक, स्थिर, शांत ‘स्व’ आहे.

उदाहरण:

लाट आणि समुद्र

लाट वेगळी दिसते, पण ती समुद्रच आहे.

अगदी तसंच आपण “वेगळे” वाटतो, पण मूळ "एकच चेतना" आहे.


२) “Each soul is potentially divine .”

याचा अर्थ:

प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी शक्ती (infinite potential) आहे.

सखोल समज:

आपण बाहेरून कमजोर, घाबरलेले, गोंधळलेले वाटू शकतो.

पण आतून तुमच्यात :

क्षमता (potential)

शक्ती (power)

ज्ञान (wisdom)

मूळ आधीपासूनच आहे.

तेव्हा "स्वतःवर विश्वास ठेवा".

उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.”


मानसशास्त्रीय connection:

Self-confidence = Self-concept वर आधारित आहे.

जर तुम्ही स्वतःला “कमकुवत” समजाल तर तसेच वागाल.

जर “divine potential” मानाल तर प्रगती होईल.

उदाहरण:बीज (seed) → झाड (tree).

बीजामध्ये आधीपासून झाडाची क्षमता असते.


३) भगवद्गीता – शरीर, मन आणि आत्मा.

मुख्य कल्पना:

आपण तीन स्तरांवर आहोत:

शरीर (Body)

मन (Mind)

आत्मा (Soul)

१) शरीर (Body)-

दिसणारे, बदलणारे आहे.

जन्म → वाढ → मृत्यू.

“मी शरीर नाही, शरीर माझं आहे.”

२) मन (Mind)-

विचार, भावना, इच्छा

सतत बदलत असतात.

“माझे विचार बदलतात, म्हणजे मी विचार नाही.”

३) आत्मा (Soul)-

स्थिर, शाश्वत, शांत

न बदलणारा “खरा मी.”

गीतेतील विचार:

आत्मा न जन्मतो, न मरतो

शरीर बदलते, पण आत्मा कायम असतो.तेव्हा “मी शरीर नाही, मी आत्मा आहे.”


मानसशास्त्रीय अर्थ:

आपण स्वतःला शरीर किंवा विचारांशी identify करतो,

त्यामुळे:

stress

fear

insecurity येते.

पण जर “मी observer आहे.” हे समजलं तर clarity येते.

उदाहरण:

आकाश आणि ढग

ढग = विचार, भावना आहेत.

तर आकाश = आत्मा आहे. ढग येतात-जातात, आकाश कायम राहते.


स्व-संकल्पनेचे दोन प्रकार

१)Positive Self-Concept -

आत्मविश्वास, स्पष्टता.

२)Negative Self-Concept -

न्यूनगंड, गोंधळ.


स्व-संकल्पना का महत्त्वाची आहे?

निर्णय घेण्यावर परिणाम,

करिअर निवड,

नातेसंबंध,

मानसिक आरोग्य.


स्व-संकल्पना सुधारण्यासाठी- Practical Techniques

१)Self-Reflection (स्व-चिंतन) Self Instrospection (आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण )

रोज 10 मिनिटे:

“आज मी काय शिकलो?”

२)Journaling

स्वतःबद्दल लिहिणे.

३)Meditation (ध्यान)निर्विचार येतो,

विचारांची स्पष्टता वाढते.

४)Feedback घेणे

इतरांच्या दृष्टीकोनातून स्वतःला समजणे.


“मी कोण आहे?” हे एकदाच मिळणारे उत्तर नाही — हा एक प्रवास आहे.

स्व-संकल्पना वाढते आणि विकसित होते.

स्वतःला ओळखणे म्हणजे यशस्वी जीवनाची पूर्ती.


संकलन, संपादन...

योगीराज देवकर.

Monday, 23 February 2026

सहजयोग

 जय श्री माताजी!


परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी मानवजातीला दिलेली भव्य भेट म्हणजे सहजयोग. श्री माताजींनी जगाला सहजयोग दिला ,आता तो घेण्याची जबाबदारी आपली आहे.

( २१ मार्च १९२३ - २३ फेब्रुवारी २०११)


सहजयोग हा, कुंडलिनी जागृती, आत्मसाक्षात्कार,

निर्विचार समाधी, अंतर्गत शुद्धी आणि सामूहिक  वैश्विक दैवी चैतन्य यांवर आधारित आहे. 


सदर आध्यात्मिक ज्ञान अनुभवप्रधान आहे—इथे विश्वासापेक्षा अनुभूतीला प्राधान्य आहे.


1) आत्मसाक्षात्कार –हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

“Self-realization is not a myth; it is your right.”

मानवामध्ये सुप्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सहस्त्रारातून आत्मसाक्षात्कार देते—हा प्रत्यक्ष अनुभव आहे.


2) कुंडलिनी जागृती – सहज, सुरक्षित आणि नैसर्गिक.

कठोर साधना, तप, संन्यास आवश्यक नाही.

सहज (Spontaneous) पद्धतीने, गुरुकृपेने कुंडलिनी जागृत होते.


3) निर्विचार समाधी (Thoughtless Awareness)

विचारांच्या पलीकडे जाणे म्हणजेच ध्यान.

या अवस्थेत:

मन शांत

चित्त प्रसन्न

अंतःकरण शुद्ध

आत्म्याशी प्रत्यक्ष संपर्क.


4) अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव

आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य अनुभवाने कळते.

हे तत्त्वज्ञान विवादाने नव्हे, अनुभूतीने सिद्ध होते.


5) चक्र आणि नाड्यांचे ज्ञान

मानव देहातील सात चक्रे आणि तीन नाड्या शुद्ध झाल्या की:

शारीरिक,

भावनिक,

बौध्दिक,

आध्यात्मिक, संतुलन प्राप्त होते.


6) नैतिकता – परिणाम म्हणून: नियम म्हणून नव्हे,

नैतिकता उपदेशातून नव्हे, तर आत्मसाक्षात्कारानंतर नैतिकता स्वाभाविकपणे प्रकट होते.

अहंकार व सुप्तगंड (ego–superego) संतुलित होतात.


7) सामूहिक चेतना (Collective Consciousness)

स्वतःच्या प्रगतीबरोबरच सर्वांच्या कल्याणाची जाणीव निर्माण होते.

स्वार्थातून विश्वार्थाकडे प्रवास होतो.


8) सर्वधर्मसमन्वय: 

श्री माताजींनी सर्व धर्मगुरूंना एकाच उत्क्रांतीच्या प्रवासातील अवतार मानले आहे—

त्यांचे सार सहजयोगात अनुभवास येते. Sahajayoga is best of all religions .


9) वैज्ञानिक आणि सार्वत्रिक अध्यात्म

सहजयोग:

अंधश्रद्धा नाही,

पैसे लागत नाहीत,

सदस्यत्व नाही,

सर्व मानवांसाठी खुले.


थोडक्यात सारांश

माताजी श्री निर्मला देवी यांचे तत्त्वज्ञान म्हणजे—

“आत्मसाक्षात्काराद्वारे सत्याचा प्रत्यक्ष अनुभव.”

“तुम्ही आत्मा आहात—हे जाणणे नव्हे, अनुभवणे.”

“जागतिक परिवर्तन स्वतःच्या अंतर्गत परिवर्तनातून.”


जय श्री माताजी!

Thursday, 19 February 2026

सहस्त्रार् चक्र

 गुणांबद्दल बोलू काही!

सहस्त्रार चक्र : सातवे चक्र.


सहस्त्रार चक्र सर्व चक्रांचे संयोगबिंदू आहे. इथेच व्यक्तीचा अहं आणि चित्त विलीन होऊन परम चैतन्याशी एकरूप होते .


या चक्राचे प्रमुख गुण एकाकारिता, समग्रता, शांती आणि निरानंद हे आहेत. 


१) एकाकारिता: (Integration / Oneness):


एकाकारिता म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या जीवनात असलेली तूट नाहीशी होणे. ज्ञान, भावना आणि कृती यांच्यात समन्वय निर्माण होतो. “मी” आणि “ते” असा भेद कमी होत जातो.आत्मा आणि परमात्मा यांच्या भेटीचा योग येतो .


विभक्त मनामुळे संघर्ष, दुटप्पीपणा व अस्वस्थता निर्माण होते. सहस्त्रारातील एकाकारिता व्यक्तीला समग्र, प्रामाणिक आणि नैसर्गिक बनवते.


२)समग्रता: (Wholeness):


समग्रता म्हणजे जीवनाकडे तुकड्यांत नव्हे तर पूर्णतेने पाहण्याची क्षमता. सहस्त्रार चक्र खुले झाल्यानंतर मनुष्य केवळ स्वतःच्या फायद्यापुरता विचार करत नाही; तो व्यापक कल्याणाचा दृष्टिकोन स्वीकारतो.


३) शांती :(Inner Peace):


सहस्त्रार चक्राचा सर्वात जाणवणारा गुण म्हणजे अंतःशांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते.


४) निरानंद :(Nirānand / Thoughtless Bliss):


निरानंद म्हणजे कारणाशिवाय येणारा, विचारांच्या पलीकडचा आनंद. हा भौतिक सुखासारखा क्षणभंगुर नसतो.


माणूस सतत आनंदाचा शोध बाहेर घेतो—संपत्ती, प्रतिष्ठा, नातेसंबंध यांत. निरानंद अनुभवलेला मनुष्य मात्र आतून तृप्त असतो. त्यामुळे त्याच्यात लोभ, भीती व असुरक्षितता कमी होते आणि जीवन सहज, निर्मळ बनते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा .

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Wednesday, 18 February 2026

आज्ञा चक्र

 गुणांबद्दल बोलू काही!

आज्ञा चक्र : सहावे चक्र.


क्षमाशीलता हा गुण मानवी उत्क्रांतीचा मौन द्वार आहे.आज्ञा चक्र  विचारांच्या पलीकडील शांततेचे, अहंकार-प्रति अहंकाराच्या  अतिक्रमणाचे आणि क्षमाशीलतेचे केंद्र आहे.


क्षमाशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती आंतरिक सामर्थ्याची, परिपक्वतेची आणि जागरूकतेची निशाणी आहे. क्षमा म्हणजे अन्यायाचे समर्थन करणे नव्हे, तर डोक्यातला भार सोडून देणे, भूतकाळातील जखमांपासून स्वतःला मुक्त करणे होय.


आज्ञा चक्रावर दोन मोठे अडथळे असतात—

अहंकार (Ego) : “मी बरोबर, तू चूक.”

प्रति अहंकार , ममत्व (Superego) : अपराधभाव, दु:ख, भूतकाळातील साठलेली वेदना.

जेव्हा आपण क्षमा करत नाही, तेव्हा हे इगो, कंडिशनिंग हे अडथळे अधिक घट्ट होतात आणि कुंडलिनीचा प्रवाह आज्ञा चक्रावर अडकतो. परिणामतः मन अस्वस्थ होते , विचार अतिरेकाकडे वळतातआणि ध्यानात अडथळे निर्माण होतात.


श्रीमाताजी स्पष्टपणे सांगतात —

“क्षमाशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे.”

क्षमा केल्याने आज्ञा चक्र तत्क्षणी मोकळे होते,इगो,सुपर इगोचा फुगा फुटतो ,कुंडलिनी सहजपणे सहस्राराकडे जाते,विचार थांबतात, निर्विचार समाधीचा अनुभव येतो,

अंतर्मन शांत, हलके व आनंदी होते.


मानसिक आरोग्यासाठी

राग, द्वेष, आकस हे दीर्घकाळ मनात साठले तर ताणतणाव, असंतोष, नैराश्य निर्माण होते. क्षमा ही यावरचे नैसर्गिक औषध आहे.


क्षमाशील व्यक्ती सहजपणे साक्षीभावात स्थिर राहते. क्षमेमुळे नाती तुटत नाहीत; ती अधिक परिपक्व व नि:स्वार्थ होतात.


जिथे क्षमा आहे तिथे संघर्ष टिकत नाही. वैयक्तिक क्षमा हीच सामाजिक शांतीची बीजं पेरते.


क्षमेशिवाय ध्यान खोल जात नाही,

क्षमेशिवाय आत्मसाक्षात्कार स्थिर राहत नाही,

क्षमेशिवाय सहज आनंदाचा अनुभव क्षणिक ठरतो.

म्हणूनच आज्ञा चक्राच्या शुद्धीकरणासाठी सहजयोगात प्रथमच सांगितले जाते : म्हणा

“मी सर्वांना मनापासून क्षमा केली आहे .”आणि "हे परमेश्वरा,माझ्याकडून कळत ,नकळत , जाणते, अजाणतेपणी ज्या चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा कर."


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

विशुद्धी चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

विशुद्धी चक्र: पाचवे चक्र.


मानवी सूक्ष्म शरीरातील विशुद्धी चक्र हे कंठप्रदेशात स्थित असून, ते संवाद, अभिव्यक्ती, सामूहिकता आणि साक्षीभाव यांचे केंद्र मानले जाते. व्यक्तीची अंतर्गत शुद्धता आणि बाह्य व्यवहार यांचा सेतू म्हणून विशुद्धी चक्र कार्य करते. या चक्राचे संतुलन म्हणजे केवळ चांगली वाणी नव्हे, तर शुद्ध विचार, सत्यनिष्ठ कृती आणि सामूहिक चेतनेशी जोडलेपण होय.


१) सामूहिकता:


विशुद्धी चक्राचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सामूहिकता. “मी”पणातून “आपण”कडे नेणारी ही चेतना आहे. व्यक्ती स्वतःला समाजाचा, कुटुंबाचा, राष्ट्राचा , संपूर्ण विश्वाचा ,आणि अखेरीस संपूर्ण मानवजातीचा भाग समजू लागते. याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे आत्मा परमात्म्याशी सामूहिक होणे.सामूहिकतेमुळे अहंकार विरघळतो, मतभेद कमी होतात आणि सहकार्य, सहानुभूती व समन्वय वाढतो. 


२) साक्षीभाव:


साक्षीभाव म्हणजे परिस्थिती, भावना व विचार यांना आसक्त न होता निरीक्षण करण्याची क्षमता. विशुद्धी चक्र शुद्ध असले की व्यक्ती प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देऊ लागते.

यामुळे मानसिक स्थैर्य, विवेक आणि शांतता प्राप्त होते. साक्षीभावामुळे व्यक्ती नात्यांमध्ये समतोल राखते, वाद टाळते आणि सत्याला समजून घेण्याची क्षमता वाढवते.


३) बोलण्यातील माधुर्य:


शब्द हे केवळ ध्वनी नसून ते ऊर्जा वाहक असतात. विशुद्धी चक्र संतुलित असले की वाणीत माधुर्य, नम्रता आणि सौम्यता येते.

अशा व्यक्तीची वाणी मनाला स्पर्श करते, संघर्ष शमवते आणि विश्वास निर्माण करते. कठोर सत्यसुद्धा प्रेमपूर्वक मांडण्याची कला याच चक्रातून विकसित होते.


४) व्यवहार चातुर्य व संपर्क कुशलता: 


विशुद्धी चक्र व्यक्तीला योग्य वेळी ,योग्य शब्द,योग्य पद्धतीने सुसंवाद साधण्याची बुद्धी देते.

यामुळे  सामाजिक स्वीकार, नातेसंबंधांची दृढता आणि व्यावसायिक यश वाढते. संवादातील स्पष्टता गैरसमज टाळते व विश्वास निर्माण करते.


५) कुटनितिज्ञता: (राजनैतिक/सामाजिक सूज्ञता):


कुटनितिज्ञता म्हणजे फसवणूक नव्हे, तर परिस्थितीची अचूक जाण ठेवून शहाणपणाने वागण्याची क्षमता. विशुद्धी चक्र जागृत असलेली व्यक्ती शब्दांचा गैरवापर न करता, सत्याशी प्रामाणिक राहूनही परिस्थिती हाताळू शकते.

हा गुण

कौटुंबिक,सामाजिक समन्वय, प्रशासन आणि नेतृत्व यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.


६) सत्यनिष्ठा: 


येथे सत्य म्हणजे केवळ खोटे न बोलणे नव्हे, तर विचार, बोलणे आणि कृती यातील एकरूपता होय .

सत्यनिष्ठ व्यक्तीवर समाज विश्वास ठेवतो.  अंतःकरणात अपराधभाव नसल्याने मानवाचे जीवन हलके, निर्भय व आनंदी होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Tuesday, 17 February 2026

अनाहत चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

अनाहत चक्र: चौथे चक्र.


मानवी सूक्ष्म शरीरातील अनाहत चक्र हे हृदयात स्थित असून ते प्रेम, धैर्य, समतोल आणि मानसिक व शारीरिक रोग प्रतिकार शक्तीचे प्रतीक मानले जाते. “अनाहत” म्हणजे न वाजवता निर्माण होणारा नाद.


१) निर्भयता: (Fearlessness):


अनाहत चक्राचे सर्वात महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे निर्भयता. जेव्हा हे चक्र शुद्ध ,संतुलित असते, तेव्हा व्यक्ती बाह्य परिस्थितींना घाबरत नाही. भीती ही बहुतांश वेळा असुरक्षिततेतून जन्माला येते; परंतु अनाहत चक्र मजबूत असेल तर मनाला अंतर्गत आधार मिळतो.

ही निर्भयता आक्रमक नसून शांत धैर्याची असते—जी संकटातही विवेक टिकवते, योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि जीवनात स्थैर्य आणते.


२) आत्मविश्वास: (Self-Confidence):


खरा,रास्त आत्मविश्वास अहंकारातून नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वावरील श्रद्धेतून निर्माण होतो. अनाहत चक्र संतुलित असताना व्यक्ती स्वतःला

आपल्या मर्यादा, सामर्थ्य आणि भावनांसह स्वीकारते. हा आत्मविश्वास तुलना न करता स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देतो. त्यामुळे व्यक्ती इतरांवर अवलंबून न राहता निर्णय घेऊ शकते, नातेसंबंधात प्रामाणिक राहते आणि जीवनात सकारात्मक दृष्टीकोन विकसित करते.


३) रोगप्रतिकारकता: (Immunity):


अनाहत चक्राचा थेट संबंध हृदय, फुफ्फुसे, रक्ताभिसरण प्रणाली आणि रोगप्रतिकारक शक्तीशी जोडला जातो. सतत भीती, ताणतणाव, दु:ख किंवा भावनिक दडपण असल्यास हे चक्र दुर्बल होते आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर दिसून येतो.

भावनिक स्थैर्य, अंतर्गत शांतता आणि सकारात्मक भावना रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे शुद्ध, संतुलित अनाहत चक्र हे केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक आरोग्याचेही रक्षणकर्ते ठरते.


आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि अनिश्चित जगात भीती, अस्थिरता व ताणतणाव सामान्य झाले आहेत. अशा वेळी अनाहत चक्राचे गुण मानवाला—

भावनिक संतुलन,

मानसिक स्थैर्य,

आरोग्यदायी शरीर,

नातेसंबंधात सुसंवाद

आणि जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन

देण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. निर्भयता मनाला मुक्त करते, आत्मविश्वास व्यक्तिमत्त्वाला बळ देते आणि रोगप्रतिकारकता शरीराला सक्षम बनवते—ही तिन्ही मूल्ये परस्परपूरक आहेत.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Monday, 16 February 2026

भवसागर

 गुणांबद्दल बोलू काही!


भवसागर , Void :


मानवाचे जीवन म्हणजे केवळ शारीरिक,भौतिक जीवन जगण्याचा प्रवास नसून, तो एक भवसागर पार करण्याचा प्रवास आहे. भव + सागर = भवसागर

याचा अर्थ ,

जन्म-मृत्यू, सुख-दुःख, मोह-माया यांनी भरलेला संसाररूपी अथांग सागर .संसारातील दुःख, भ्रम, आसक्ती आणि अज्ञान यांचे प्रतीक. जीवनात ही पोकळी भरून काढायची असेल तर त्यासाठी आवश्यक आहे कुंडलिनी जागृती द्वारा आत्मसाक्षात्कार. मणिपूर चक्राच्या भागात, भवसागरात सुषुम्ना नाडी खंडित झालेली असते. आत्मसाक्षात्कारानंतर स्वतः कुंडलिनी ही खंडित नाडी जोडण्याचे कार्य करते आणि ही पोकळी भरून काढते.


धर्माचे ज्ञान : धर्म म्हणजे बाह्य नियम नव्हेत, तर अंतर्गत शुद्धी,संतुलन आहे. जेव्हा कुंडलिनी शक्ती मणिपूर चक्र पार करते, तेव्हा मानवाच्या चेतनेत खरा धर्म प्रस्थापित होतो. हा धर्म आत्मजाणिवेवर आधारित असतो. तेथे “मी करतो.” हा अहंकार विरघळतो आणि “हे घडते आहे.” अशी सहज अवस्था प्राप्त होते.


मूल्ये - तत्त्वे आणि मानवी जीवनाचे गुणधर्म असलेल्या दहा आज्ञा ( Ten Commandments) ही बंधने नसून, स्वतःच्या अंतःशुद्धीची साधने आहेत.


धैर्य : कुंडलिनी जागृत झाल्यानंतर येणाऱ्या धैर्यामुळे अंतर्गत बदलांना स्वीकारण्याचे सामर्थ्य लाभते. धैर्यामुळे साधक जीवनात स्थिरावतो.


क्षमा : मानवातील अत्यंत महत्त्वाचा गुण. “मी सर्वांना क्षमा केली .” या भावनेने आज्ञा चक्र खुलते आणि कुंडलिनीचा प्रवाह सुलभ होतो.


शांती : निर्विचार समाधीची अवस्था. विचार,प्रतिक्रिया थांबले की शांती सहज प्रकट होते.


चोरी न करणे (अस्तेय) : इतरांच्या  श्रेयावर , शक्तीवर, संपत्तीवर  अधिकार न गाजवणे. 'माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं', असे न वागणे. मनातही चोरीचा ,भ्रष्टाचाराचा विचार न येणे,  चोर न बनणे हा सूक्ष्म स्तरावरील धर्म आहे.


पवित्रता : पवित्रता म्हणजे केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिक,बौद्धिक,आत्मिक, स्वच्छता.


संयम : इंद्रियांवर नव्हे, तर इच्छां,भावना ,षडरिपुवर 

 प्रभुत्व.


बुद्धी (विवेक) : चैतन्याच्या आधारे योग्य-अयोग्य, चुक- बरोबर , करावे - करू नये , ओळखण्याची क्षमता.


विद्या : सहजज्ञान म्हणजे तुमची वर्तणूक, मनोवृत्ती,भावना, सर्वसाधारण दृष्टिकोन, खरे तुम्ही असे स्वतः 

स्वतःलाच ओळखल्यामुळे समजणे. जाणीव होणे.


सत्य : तुम्ही आत्मा आहात हे सर्वात मोठे सत्य आहे . नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे.


अक्रोध : क्रोधाचा अभाव नव्हे, तर अहंकाराचा क्षय. 


मानवी सूक्ष्म शरीरातील तीन नाड्या संतुलन आणि चक्र शुद्धीशिवाय मूल्ये आत्मसात होत नाहीत. बाह्य प्रयत्नांनी काही काळ नैतिकता पाळता येते, पण कुंडलिनी जागृतीनंतर ही मूल्ये स्वभावाचा ,धर्माचा भाग बनतात. मग सत्य बोलण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, क्षमा आपोआप घडते, आणि संयम सहज प्रकट होतो.


“तुम्ही ,मन,बुद्धी,शरीर,अहंकार ,इ.काहीही नसून केवळ  आत्मा आहात.”

ही जाणीव दृढ झाली की जीवन आपोआप धर्ममय, शांतीमय आणि आनंदमय होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री माताजी देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा.

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Sunday, 15 February 2026

मणिपूर चक्र : तिसरे चक्र.

 गुणांबद्दल बोलू काही!

मणिपूर चक्र : तिसरे चक्र.


मानव हा केवळ देह-भावना-बुद्धी यांचा संयोग नसून, तो एक सूक्ष्म ऊर्जासंरचनेने युक्त चेतन अस्तित्व आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सात प्रमुख चक्रांपैकी मणिपूर (नाभी) चक्र हे मानवी जीवनाच्या धर्म, नीती आणि आंतरिक संतुलनाचे केंद्र आहे.नाभी चक्राला धर्मचक्र संबोधले जाते , कारण याच ठिकाणी मानवी आचरणाचे योग्य-अयोग्य मोजमाप घडते.


मणिपूर चक्र नाभी प्रदेशात स्थित असून, ते

प्लीहा (Spleen)

यकृत (Liver)

स्वादुपिंड (Pancreas)

पचनसंस्था

यांच्याशी सूक्ष्म पातळीवर जोडलेले आहे.


या चक्राचे संतुलन बिघडल्यास असंतोष, चिडचिड, लोभ, अति-विचार आणि भावनिक अस्थिरता वाढते.


मणिपूर चक्राचे गुण:

१) संतोष : 

संतोष म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था—जिथे मन वर्तमान क्षणात स्थिर असते.कुंडलिनी नाभी चक्रातून शांतपणे वाहू लागली की ध्यानात एक अनुभव येतो:

पोट हलके वाटते,

गरजांबद्दल अति विचार राहत नाही,

“मला अजून हवे.” ही अस्वस्थता कमी होते.

हा संतोष बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो; तो आतून प्रकट होतो.


२) समाधान : 

समाधान म्हणजे कर्म आणि धर्म यांचा समन्वय.

मणिपूर चक्र शुद्ध असताना व्यक्ती,

कर्तव्य नीट पार पाडते,

अपेक्षारहित काम करते,

ध्यानानंतर अंतर्मनात शांती अनुभवते,हे समाधान अहंकारातून येत नाही, तर साक्षीभावातून जन्माला येते.


३) करुणा : 

धर्म म्हणजे इतरांवर प्रभुत्व नव्हे, तर अंतःकरणातून उमलणारी करुणा.

मणिपूर चक्र जागृत झाल्यावर करुणा सहज प्रकट होते:

दुसऱ्याचे दुःख पाहून मन अस्वस्थ होते,

मदतीची प्रेरणा आतून येते,

कोणताही दिखावा न करता सेवा घडते.करुणेमुळेच समाजात समतोल व सुसंवाद निर्माण होतो.


४) प्रेम : 

मणिपूर चक्रातील प्रेम हे

आसक्तीविरहित,

अपेक्षारहित,

अधिकाररहित,

असते.

ध्यानामुळे रागाची तीव्रता कमी होते,

नात्यांमध्ये मृदुता येते,

“माझेच बरोबर.” ही धारणा सैल होते.मणिपूर चक्र शुद्ध नसेल तर हृदयाचे प्रेमही शुद्ध स्वरूपात प्रकट होत नाही.


५) उत्क्रांती : 

उत्क्रांती म्हणजे

जाणीवेचा विस्तार.

मणिपूर चक्र संतुलित झाल्यावर:

“मी” कमी होतो

“आपण” प्रकट होते,

व्यक्ती सामूहिकतेशी जोडली जाते,

कुंडलिनी नाभी चक्रातून वर चढताना साधकाला ध्यानात आंतरिक स्थैर्य व निश्चल आनंद अनुभवायला मिळतो. हाच मानवी उत्क्रांतीचा खरा टप्पा आहे—बाह्य प्रगतीपेक्षा अंतर्गत परिवर्तन.


थोडक्यात ,मणिपूर चक्र—धर्माचा दीपस्तंभ,

संतोष, समाधान, करुणा, प्रेम आणि उत्क्रांती हे गुण नैतिक शिकवण नसून, मणिपूर चक्र शुद्ध झाल्यावर सहज प्रकट होणारी चेतना आहे.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Saturday, 14 February 2026

स्वाधिष्ठान चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

स्वाधिष्ठान चक्र : दुसरे चक्र.


स्वाधिष्ठान चक्र मानवी सृजनशीलतेचे आणि नवनिर्मितीचे ऊर्जाकेंद्र आहे.मानवी जीवन केवळ जगण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. विचार करणे,कल्पना करणे,समस्या सोडविणे, अनुभवातून शिकणे, नव्याने काही निर्माण करणे आणि त्या निर्मितीतून सौंदर्य अनुभवणे—ही मानवी अस्तित्वाची खरी ओळख आहे. या साऱ्या प्रक्रियेचे सूक्ष्म ऊर्जाकेंद्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र होय.


स्वाधिष्ठान चक्र मानवाच्या सृजनात्मक शक्तीचे, नवनिर्मितीचे, शुद्ध,निर्मळ, भावनात्मक विचारांचे आणि सौंदर्यबोधाचे केंद्र आहे. हे चक्र संतुलित असले की माणूस केवळ यांत्रिक जीवन न जगता, संवेदनशील, सर्जनशील आणि आनंददायी जीवन जगतो.


१) सृजनात्मकता :

सृजनात्मकता म्हणजे  काहीतरी नवीन शक्यता निर्माण करण्याची क्षमता. ती केवळ चित्रकला, संगीत किंवा साहित्यापुरती मर्यादित नसून, इतरांचे प्रश्न,

समस्या सोडवणे,

नवे विचार,नव्या कल्पना मांडणे,

दैनंदिन जीवनात नाविन्य आणणे,

नाती समजून घेणे,

या सर्व ठिकाणी कार्यरत असते.

स्वाधिष्ठान चक्र जागृत असेल तर माणूस नुसता अनुकरण करणारा न राहता निर्मिती करणारा बनतो. इतिहासातील महान शास्त्रज्ञ, कलाकार, संशोधक हे सर्व स्वाधिष्ठान चक्राच्या गुणांची जिवंत उदाहरण आहेत. सृजनात्मकतेशिवाय मानवी प्रगतीच शक्य नाही—म्हणूनच हा गुण मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे.


२) नवनिर्मिती : 

नवनिर्मिती म्हणजे जुन्याला नाकारून नव्याचा स्वीकार करणे नव्हे, तर अनुभवातून अधिक परिपूर्ण गोष्ट घडवणे.

स्वाधिष्ठान चक्र व्यक्तीला

कल्पनाशक्ती देते,

प्रयोगशील बनवते,

भीतीपेक्षा शक्यतेकडे पाहायला शिकवते,

आजच्या वेगवान, बदलत्या जगात जो माणूस नवनिर्मिती करू शकतो तोच टिकतो. नवनिर्मिती ही केवळ उद्योग, तंत्रज्ञानापुरती मर्यादित नसून विचार, शिक्षण, नातेसंबंध आणि समाजरचना यांनाही आकार देते. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्राचा हा गुण मानवी उत्क्रांतीसाठी अनिवार्य ठरतो.


३) भावनात्मक विचार : बुद्धी आणि हृदय यांचा समतोल.भावना नसतील तर माणूस कोरडा आणि कठोर बनतो; फक्त भावना असतील तर तो अस्थिर होतो.

स्वाधिष्ठान चक्र शुद्ध,निर्मळ भावनांना विचारांची दिशा देते.

यामुळे व्यक्ती

इतरांच्या भावनांची कदर करते,

सहानुभूती आणि करुणा विकसित करते,

स्वतःच्या भावना समजून घेत नियंत्रित करते,

भावनात्मक विचारामुळेच नाती टिकतात, समाज जुळून राहतो आणि माणूस माणसाशी जोडला जातो. हा गुण नसता तर मानवी जीवन केवळ व्यवहारिक आणि निर्जीव झाले असते.


४) सौंदर्याची जाण :

सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य आकर्षण नाही, तर

विचारातील सौंदर्य,

आचरणातील सौंदर्य,

शब्दातील माधुर्य,

कृतीतील समतोल.

स्वाधिष्ठान चक्रामुळे माणूस निसर्ग, कला, संगीत, साहित्य आणि जीवनातील सूक्ष्म आनंद अनुभवू शकतो. सौंदर्याची जाण माणसाला आनंदी, शांत आणि समाधानशील बनवते. जीवन केवळ जबाबदाऱ्यांचे ओझे न राहता एक सुंदर प्रवास बनतो.


थोडक्यात, जेव्हा हे चक्र शुद्ध असते, योग्य प्रकारे कार्य करते, तेव्हा माणूस केवळ जगत नाही—तो घडवत राहतो, हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करण्यासाठी कार्यरत राहतो आणि अर्थपूर्ण जीवन जगतो.


कुंडलिनी जागृतीनंतर जेव्हा ही शक्ती या चक्रातून प्रवाहित होते, तेव्हा माणसाच्या जीवनात नवनिर्मिती, सौंदर्यबोध आणि संतुलित भावना सहज प्रकट होऊ लागतात.


सृजनात्मकता अहंकारातून नसून निर्मळ प्रेरणेतून उत्पन्न होते—म्हणजेच “मी करतो.” या भावनेऐवजी “हे आपोआप घडते.” अशी सहज अवस्था निर्माण होते.

या चक्राचे संतुलन असल्यास भावना अतिरेक न होता विचारांशी जोडल्या जातात. त्यामुळे व्यक्ती संवेदनशील, सहानुभूतीशील आणि सौम्य बनते. यालाच भावनात्मक परिपक्वता असे म्हटले जाते. भावना शुद्ध झाल्या की नाती शुद्ध होतात आणि जीवनात शांतता प्रस्थापित होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Friday, 13 February 2026

मूलाधार

 गुणांबद्दल बोलू काही !

मूलाधार चक्र :


पावित्र्याचे व अबोधितेचे पवित्र आसन म्हणजे मूलाधार चक्र.मानवी सूक्ष्म शरीर हे केवळ भौतिक रचना नसून, ते एक सूक्ष्म आध्यात्मिक यंत्रणा आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सर्वात मूलभूत, पवित्र आणि संरक्षक केंद्र म्हणजे मूलाधार चक्र. याच चक्रात आदिशक्ती कुंडलिनी माता आपल्या अबोधितेच्या पूर्ण पावित्र्यात वास करते. म्हणूनच मूलाधार चक्राला सर्व धर्मांचे, सर्व संस्कारांचे आणि सर्व आध्यात्मिक उन्नतीचे मूळ मानले जाते.


१) अबोधिता : हा गुण आत्म्याचा सहज स्वभाव आहे. श्री माताजी निर्मला देवी सांगतात, “Innocence is the source of wisdom.”

अबोधिता म्हणजे बालकासारखी निष्कलंक अवस्था—जिथे मनात गणित नाही, चलाखी नाही, अहंकार नाही. ही अवस्था म्हणजे आत्म्याचा सहज, नैसर्गिक स्वभाव आहे.

मूलाधार शुद्ध असेल तर साधक विचारांच्या गुंतागुंतीत अडकत नाही. ध्यानात त्याचे मन सहज शांत होते, आणि कुंडलिनीला वर चढण्यासाठी सुरक्षित, पवित्र आधार मिळतो. अबोधिता नष्ट झाली की आध्यात्मिक प्रगती थांबते, कारण कुंडलिनी माता फक्त पवित्र व अबोध वातावरणातच जागृत राहते.


२) पावित्र्य : पावित्र्य ही  कुंडलिनीचे संरक्षण करणारी शक्ती आहे.

पावित्र्य हा केवळ नैतिक विषय नसून सूक्ष्म आध्यात्मिक नियम आहे. मूलाधार चक्र हे धर्मतत्त्वाचे केंद्र आहे. येथे पावित्र्य भंग झाले की, कुंडलिनी संकुचित होते, ध्यानात स्थैर्य राहत नाही आणि आत्मसाक्षात्काराची गती मंदावते.

पावित्र्य म्हणजे:

विचारांची शुद्धता,

दृष्टीची संयमित अवस्था,

नात्यांतील आदर,

शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन आहे.


३) विवेक : व्हायब्रेशन्सद्वारे सत्याची ओळख करणे. विवेक हा बौद्धिक नसून व्हायब्रेशनल (चैतन्याधिष्ठित) असतो. मूलाधार चक्र शुद्ध असले की साधकाला आपल्या बोटांवरून व्हायब्रेशन्सद्वारे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सहज कळते.

हा विवेक माणसाला:

अंधश्रद्धेपासून वाचवतो,

खोट्या गुरूंना ओळखण्याची शक्ती देतो,

अतिरेक व विकृतींपासून दूर ठेवतो,

श्री माताजी याला ''सत् 

असत् विवेक", "Intelligence to discriminate between truth and untruth ."  सद्सद्विवेक असे म्हणतात. तसेच “You must know the truth on your central nervous system.”

हा अनुभवात्मक विवेक मूलाधाराच्या स्थैर्यावरच अवलंबून असतो असे वर्णन करतात.


४)  पराक्रम : ही  धर्मरक्षणासाठीची शांत शक्ती आहे.

मूलाधारातील पराक्रम हा आक्रमक नसून धर्माच्या बाजूने उभे राहण्याचा आत्मिक धैर्यभाव आहे. पराक्रम म्हणजे अहंकाराने लढणे नव्हे, तर सत्यावर स्थिर राहणे होय .


हा पराक्रम साधकाला:

अधार्मिकतेपासून स्पष्ट नकार देण्याची ताकद देतो,

स्वतःच्या पावित्र्याचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य देतो,

समाजात सत्याचे तत्त्व निर्भयपणे मांडण्याची क्षमता देतो,

पराक्रम नसला तर विवेक असूनही साधक डगमगतो.


मूलाधार शुद्ध नसल्यास काय होते?


सहजयोगाच्या अनुभवात दिसते की मूलाधार कमजोर असेल तर:


ध्यानात अस्थैर्य येते,

डाव्या किंवा उजव्या बाजूची अतिरेक प्रवृत्ती वाढते,

व्हायब्रेशन्स कमकुवत होतात,

साधक अध्यात्मात टिकत नाही,

म्हणूनच श्री माताजी मूलाधार शुद्धीवर विशेष भर देतात.


थोडक्यात , मूलाधार चक्र म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मंदिराचा पाया आहे.

अबोधिता—आत्म्याची भाषा आहे,

पावित्र्य—कुंडलिनीचे कवच आहे,

विवेक—सत्याची ओळख आहे,

आणि पराक्रम—धर्माचा रक्षक आहे.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

शुद्ध सत्वगुणी sushumna nadi

 गुणांबद्दल बोलू काही!

शुद्ध सत्वगुणी सुषुम्ना नाडी :


मानवाच्या सूक्ष्म शरीरात 

सुषुम्ना नाडी ही मध्यातून जाणारी नाडी आहे.

ती वर्तमान, आत्मा, साक्षीभाव, धर्म आणि सत्य यांचे प्रतीक आहे.

इडा (भावना) व पिंगला (कृती) संतुलित झाल्यावरच सुषुम्ना (ज्ञान) नाडी सक्रिय होते.


सुषुम्ना नाडीवरील सत्त्वगुण – गुण की दोष ?


सत्त्वगुण हा स्वतः गुण आहे,इथे सर्व षडरिपु गळून पडतात. तरी इथेही शुद्ध गुण आणि शबल गुण असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर शबल गुण प्रपंचाकडे नेतो . सत्व, रज ,तम या तीन त्रिगुणांच्या योगाने जीवन चालते.

उदाहरणार्थ ...

प्रापंचिक त्रिगुण : ' असा माणूस जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्याने स्वार्थमय असतो.'

'सत्ताधारी ,श्रीमंत,कलावंत,राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात,असे व्हावेसे वाटते .'


पारमार्थिक त्रिगुण : ' असा माणूस मी जगासाठी आहे ही भावना असल्याने निःस्वार्थी असतो.'

' साधू,संत, महात्मे,योगी,त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त आदर्श असतात , तसे व्हावेसे वाटते.' 


सत्वगुण:

आविष्कार,

उत्क्रांती,

प्रकाश,धर्म,ज्ञान,

शांती,समाधान,

निःस्वार्थ प्रेम,

ईश्वर प्रेम,

विवेकी वृत्ती,

दानशूर,

उत्सवप्रिय ,

सजगता.

शुद्ध आत्मज्ञान होणे ही सत्वगुणाची खरी करामत आहे. अशी व्यक्ती पूर्ण वासनारहित , अभिमानरहित,अत्यंत दयाळू,नम्र,परोपकारी ,विशाल अंतःकरणाची असते .


सत्त्वगुण म्हणजे आत्म्याचा प्रतिबिंबित गुणधर्म. पण अति सत्त्वाभिमान झाला तर,

अध्यात्मिक अहं.

“मी शुद्ध आहे.” ही सूक्ष्म गर्वभावना येते. 

प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. अहंकार म्हणजे प्रतिक्रिया ,त्या नियंत्रणात ठेवा,प्रतिक्रिया द्यायच्याच असतील तर अत्यंत गोड,चांगल्या द्या,अहंकार अत्यंत कोमल,गोड, प्रेममय आणि विनोदी असू द्या. सत्त्वगुणातही नम्रता आवश्यक आहे.


सुषुम्ना नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ: 


शारीरिक लाभ:

ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते,

तणावजन्य आजार कमी,

शरीरात हलकेपणा,

आरोग्य सुधारते.


भावनिक लाभ:

शांतता व समाधान,

इच्छा,आशा,आकांक्षा,भावना शुद्ध राहतात,

प्रतिक्रिया नसतात, प्रतिसाद असतो.


बौद्धिक लाभ :

विवेक कार्यरत होतो,

एकाग्रता वाढते, हुशारीत वाढ होते.


आध्यात्मिक लाभ:

कुंडलिनी सहज व नियमित उर्ध्वगामी होते,

चक्रे शुद्ध होऊ लागतात,

ध्यान खोल व सहज होते,

आत्मसाक्षात्कार टिकून राहतो,

वर्तमानात स्थिरता,

सूक्ष्म संवेदनांची जाणीव होते,

अंतर्ज्ञान जागृत होते,

निर्विचार ( Thoughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निर्विकल्प (Doughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निरानंद अनुभवास येतो.


सुषुम्ना सक्रिय मानवाचे जीवन:

कृती होते पण कर्तेपणा नसतो.

प्रेम असते पण आसक्ती नसते.

शिस्त असते पण ताण नसतो.

नेतृत्व असते पण अहं नसतो.


सत्वगुणात प्रतिभा जागृत होते, बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते. तात्पर्य ,स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी -

Sahajyogapune.org

Sahajayogamumbai.org


लेखन - योगीराज देवकर .

Thursday, 12 February 2026

शुद्ध रजोगुणी पिंगला नाडी

 गुणांबद्दल बोलू काही !

शुद्ध रजोगुणी पिंगला नाडी :


मानवाच्या सूक्ष्म शरीरातील उजव्या बाजूला असलेली ही सूर्य तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.

पिंगला नाडी आपल्या क्रिया, विचार, बुद्धी, अहंकार, नियोजन, कार्यक्षमता आणि भविष्याभिमुखता यांचे प्रतिनिधित्व करते.


पिंगला नाडीवरील रजोगुण – गुण की दोष?


रजोगुण स्वतः दोष नाही, तो मानवाच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक गुण आहे.

पण तो अतिरिक्त झाला की तो दोषात परिवर्तित होतो.


रजोगुणाचे नैसर्गिक गुण:

स्वाभिमान,

कृतीशीलता,उद्योगिपणा,

उर्जा,

ध्येयपूर्ती,लढावू वृत्ती,महत्वाकांक्षा,

परिश्रम,गतिमानता,

नियोजन,

बुद्धीची हुशारी, हे सर्व गुण नसते तर मानव प्रगतीच करू शकला नसता.

सत्वगुणी माणूस खऱ्या अर्थाने माणूस असतो. पण शुद्ध रजोगुणी माणूसुद्धा सत्वगुणी मानायला हरकत नाही.


पण याच रजोगुणाचा  अतिरेक झाला किंवा हे गुण प्रपंचाकडे वळले की त्याचा दुरपयोग होतो आणि मानवात ...


अहंकार,

आक्रमकता,

अतिविचार,

चिडचिड,

अधीरता,

स्पर्धात्मक वृत्ती,

कामाचा अतिरेक (workaholism),

वासना,

क्रोध,मद,लोभ,

इर्षा,गर्व, असे दोष निर्माण होतात.


पिंगला नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ :


शारीरिक लाभ: 

नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते.

उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतात.

डोकेदुखी, तणाव, रक्तदाबाशी संबंधित त्रास कमी होतात.


मानसिक लाभ :

विचार स्पष्ट व तर्कशुद्ध होतात.

निर्णयक्षमता वाढते.

विवेकबुद्धी जागृत होते.

विचार कृतिशील होतात.


भावनिक लाभ :

उर्जा स्थिर राहते (over-excited होत नाही).

आळस न राहता उत्साह टिकतो.

कामात सातत्य येते.


आध्यात्मिक लाभ:

अहंकार कमी होतो.

“मी करतो” या भावनेऐवजी “वैश्विक शक्ती करते” हा भाव येतो.

पिंगला नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.


असा मानव कृती करतो, पण कृतीत अडकत नाही.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी -

Sahajayoapune.org

Sahajayogamumbai.org


लेखन - योगीराज देवकर.

Wednesday, 11 February 2026

शुद्ध तमोगुणी इडा नाडी.

 गुणांबद्दल बोलू काही !

शुद्ध तमोगुणी इडा नाडी : 


मानवाच्या सूक्ष्म शरीरात  डाव्या बाजूला असलेली नाडी ही चंद्र तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.

इडा नाडी आपल्या भावना, स्मृती, अवचेतन, इच्छा आणि भक्ती यांचे प्रतिनिधित्व करते.


इडा नाडीवरील तमोगुण – गुण की दोष?


सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते. प्रत्येक गुणात शुद्ध व शबल असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर तोच गुण शबल असेल तर प्रपंचाकडे खेचतो . जे निर्मळ असते ते शुद्ध आणि जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते.


तमोगुण स्वतः दोष नाही, पण कमी/अतिरिक्त झाला तर तो दोष बनतो.


तमोगुणाचे नैसर्गिक गुण:

विश्रांती,

चांगली झोप,

पावित्र्य,

स्थैर्य,

शुद्ध इच्छा,

भावनिक प्रगल्भता,

समर्पण,

सर्व मानवासाठी हे आवश्यक गुण आहेत.


पण तमोगुण असंतुलित झाला तर…

आळस,सुस्ती,

जडत्व,अती झोप,

उदासीनता,

नैराश्य,

भीती,असुरक्षितता,

भूतकाळात अडकून राहणे,

नकारात्मक आठवणींचा पगडा,

काम,मोह,मत्सर, असे दोष निर्माण होतात.


तमोगुणातील भयंकर विकार स्वार्थ असतो पण तो अमर्याद असतो. आसक्ती असते पण ती अवास्तव असते.

अनुष्ठान असते पण ते आततायी असते.

साधन असते पण ते अघोरी असते.

तमोगुणी माणूस संगती करण्यास कठीण असतो.नाईलाजाने त्याला माणूस म्हणायचे इतकेच.


इडा नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ:


शारीरिक लाभ:

चांगली झोप लागते.

मानसिक तणावातून होणारे आजार कमी होतात.


मानसिक लाभ:

मन शांत, स्थिर व प्रसन्न राहते.

नैराश्य, भीती, तणाव कमी होतो.

भावनांवर नियंत्रण येते.

भूतकाळाचा भार सुटतो.


भावनिक लाभ:

प्रेम,करुणा सहज वाहते.

राग, द्वेष, मत्सर कमी होतो.

नात्यांमध्ये समजूतदारपणा येतो.

संवेदनशीलता वाढते.


आध्यात्मिक लाभ:

इडा नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.

शीतलता अनुभवास येते.

शुद्ध इच्छा जागृत होतात.


असा मानव भावनांचा गुलाम न राहता भावनांचा साक्षी बनतो.


संदर्भ - परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी - 

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org.org


लेखन - योगीराज देवकर.

Sunday, 25 January 2026

उत्तुंग दुबई

 उत्तुंग दुबई


आयुष्यात अनेकदा अचानक आनंददायक वळणे येत असतात, असे पण नव्हते की,दुबई आमच्या विश लिस्ट वर होते ,पण अमेयमुळे आम्हाला हा जपान सिंगापूर,युरोप ट्रिप नंतर आता दुबई प्रवासाचा योग आला .


अमेयची टोकियो, जपान येथून दुबई, यूएई येथे बदली झाली आणि अमेय–रुचिरा यांनी दुबई मरिना एरियात घर केले . लगेचच त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलावून घेतले. जरी आम्ही टुरिस्ट व्हिसावर आलो असलो, तरी यावेळी पर्यटन हा आमचा मुख्य अजेंडा नव्हता. कारण एक आनंदाची, हळवी बातमी—सुनबाईंकडे गुड न्यूज आहे आणि अमेयचे ऑफिस पण सुरू असणार होते.  त्यामुळे  ' मुलांबरोबर वेळ घालवणे,मुलांचा चाललेला सुखी संसार पाहणे' , हाच आमचा एकमेव विचार होता.


पण तरुणाईची हौस आणि  प्रेमळ  हट्ट—मुलांनी आम्हाला दुबई दाखवायचीच  ठरवले होते आणि मग सुरू झाला अनुभव उत्तुंग दुबईचा .


दुबई म्हणजे केवळ एक शहर नाही, तर मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम

राजाच्या आणि अनेक प्रसिद्ध वास्तुकारांच्या  कल्पनाशक्तीने उभारलेले  भव्य स्वप्न आहे.बुर्ज खलिफा - जगातली सर्वात उंच निवासी इमारत, ऐन दुबई - जगातील सर्वात मोठे जाइंट व्हील,दुबई मॉल - जगातला सर्वात मोठा मॉल,पाम जुमेराह - जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बेटं,दुबई  एअरपोर्ट - जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट उभारले जात आहे ,जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित वर्ल्ड आयलंडची  उभारणी सुरू आहे , प्रशस्त रस्ते आणि रात्री लखलखणारा प्रकाशाचा झगमगाट—सगळेच थक्क करणारे आहे. बरं ही उत्तुंग प्रगती म्हणाल तर तीस ,पस्तीस वर्षातील आहे. त्याआधी तर दुबई मासेमारी, मोती,बंदरे,सोन्याचा व्यापार आणि खनिज तेल यासाठी ओळखले जात होते.


बर दुबई , मिरॅकल  गार्डन,पाम आयलंड वरील अटलांटिस आणि रॉयल  अटलांटिस हॉटेल्स , मरिना, जुमेराह  बीच —ही ठिकाणे पाहताना प्रत्येक वेळी ' मानव किती अद्भुत 

गोष्टी साकारू शकतो ', याची जाणीव होत राहिते. दुबई फ्रेम, म्युझियम ऑफ द फ्युचर , बुर्ज अल अरब या वास्तू तर शेख झायद रोडवरून ये–जा करताना सतत नजरेत भरत होत्या—भविष्यात डोकावल्यासारखेच. बुर्ज खलिफा तर जवळपास शहरातल्या कोणत्याही भागातून दहा किलोमीटर वरूनच दिसायला लागतो . एव्हढ्या लवकर आपल्याला फ्रेम नको म्हणून मला तर अजिबात फ्रेम पहायला जायचे नव्हते.


एखादी ट्रिप लहानातून सुरू करून टॉपला कशी घेऊन जायची ते या मुलांकडून शिकावे.सुरुवातीला मरिना एरियात पायी फेरफटका मारणे, मॉल मध्ये जाणे सुरू झाले आणि शेवटच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता आम्ही बुर्ज खलिफा इमारतीच्या १२३/२४ व्या मजल्यावर पोहोचलो. बुर्ज खलिफा १६३ मजली उंच आहे. तिथे १२३/२४/४९ मजल्यावर observation deck आहेत.गेले तीन आठवडे जी ठिकाणे आम्ही त्यात्या ठिकाणी जाऊन पाहिली होती ती ठिकाणे आम्ही आता बुर्ज खलिफा वरून पहात होतो. जगातील सर्वात वेगवान लिफ्ट बुर्ज खलिफा इमारतीत आहेत. १२३ व्या 

मजल्यावर आम्ही एक मिनिटात पोहोचलो. दुबईतील इमारतींची भव्यता,उंची,डिझाईन्स, इलेव्हेशन्स,नावीन्यपूर्ण असल्यामुळे पाहण्यासारखे आहेत.


दुबई म्हणजे मॉल कल्चर. 

Ibn Battuta Mall, Gold Souk, Spice Souk, Al Fahidi, LuLu Hypermarket, Dubai Mall, Zabil Mall, Mall of the Emirates, Festival City Mall, Souk Madinat Jumeirah — असे अनेक मॉल या शहरात आहेत. प्रत्येक मॉल वेगळ्या संकल्पनेने सजलेला, पण माणसाच्या गरजांपेक्षा इच्छा, हौशीला अधिक खतपाणी घालणारा. इच्छेला मर्यादा नाही आणि हौसेला मोल नाही असे म्हणतात. कमकुवत मानसिकतेच्या श्रीमंत माणसाने मॉल मध्ये खरेदीसाठी न गेलेलेच बरे, अशी माणसे मॉलचा तत्काळ बळी ठरतात .माणूस आत जातो गरजेची एक वस्तू घ्यायला आणि पाच,दहा अनिवार्य नसलेल्या वस्तू खरेदी करून घेऊन येतो .


' अरेबियन टी हाऊस ' मध्ये घेतलेले पारंपरिक अरेबियन जेवण, हाफिज मुस्तफा येथील स्वीट - तो स्वाद, तो सुगंध - आठवणीत ताजा आहे. प्रत्येक मॉल मध्ये हवे तितके फूड कोर्ट आहेत. एका मॉल मध्ये तर आम्हाला चक्क तांबडा,पांढरा रस्सा - कोल्हापुरी थाळी जेवण मिळाले . इथे एक चांगले आहे,इथे भरपूर भारतीय राहतात,भारतीय भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ आणि सोयी सुविधा सर्वत्र उपलब्ध आहेत. यामुळे मुलांना महाराष्ट्राची ,भारताची आठवण होईल असे वाटत नाही.


पण या भौतिक वैभवाइतकेच मला मनाला स्पर्शून गेले ते म्हणजे दुबईतील सहजयोग सेंटर .

दुबईमध्ये सहजयोगाचे साप्ताहिक ध्यान केंद्र आहे आणि अडीचशेहून अधिक सहजयोग्यांची सामूहिकता आहे—एक व्हायब्रंट सेंटर. श्री धनंजय धुमाळ यांची म्युझिकल इव्हिनिंग आणि  इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम झाला,पब्लिक प्रोग्राम , श्री शक्तीधरण भैय्या यांचे सुरेल बासरी वादन झाले , नियमित ध्यान—सगळे काही चालू असते. सेंटरला  तीन रविवारी सामूहिक ध्यानाचा योग आला आणि परदेशात असूनही ' भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा ' अनुभव आला . बाह्य भौतिक उंचीपेक्षा आंतरिक आध्यात्मिक उंची किती महत्त्वाची आहे, याची प्रचिती तिथे आली.


मला विशेष भावले ते मुलांकडील  दमाक हाईट्स या भव्य इमारतीतील आमचे वास्तव्य आणि मरिना एरिया . मरिनामध्ये सकाळी - संध्याकाळी फेरफटका मारताना समुद्र, गगनचुंबी इमारती आणि शांत चालणारे लोक—पाहिले की ,मन अगदी निवांत होतं. त्या चित्रपटासारख्या  दिसणाऱ्या परिसरात वॉकमध्ये वेळ कसा निघून जात होता, तेच कळत नव्हते .


अमेय–रुचिरा परदेशात राहतात. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला फारसा लाभत नाही. ते भारतात येणं किंवा आम्ही त्यांच्याकडे जाणं—ही आमच्यासाठी पर्वणीच .


या प्रवासाने केवळ दुबई शहर पाहायला मिळाले असे नाही, तर मुलांबरोबर जगायला, त्यांचे  दैनंदिन जीवन,संसार ,अनुभवायला आणि अमेयची नवीन जबाबदारी समजून घ्यायला मिळाली.


दुबई मला फक्त उंच इमारतींमुळे उत्तुंग वाटली नाही, तर दुबईत असूनही मुलांना भेटलेल्या सहजयोग सामुहिकतेमधील मैत्री, नात्यांच्या उंचीमुळे, प्रेमाच्या उबेमुळे आणि  अनुभवामुळे उत्तुंग वाटली. 


श्री माताजींच्या कृपेत मुलं आनंदात आहेत,प्रगती करीत आहेत,आमचे चौकोनी कुटुंब आता पंचकोनी होणार आहे ,हे पाहून मनोमन आनंद झाला.


योगीराज देवकर.😊

Friday, 23 January 2026

श्री माताजी एक काव्य .

 चॅट जीपीटीला सूचना केली आणि पहा श्री माताजी वर आधारित खालील भजन .


नक्की. खाली सहजयोग संस्थापिका श्री माताजी निर्मला देवी यांच्यावर आधारित पाच कडव्यांचे भजन सादर करत आहे—


कडवे १

आदिशक्ती अवतरली धरतीवर स्नेहाने,

मातेच्या करुणेने उजळले अंतरंगाने।

कुंडलिनी जागविली सहज स्पर्शाने,

निर्मला माते, नमन तुला भक्तिभावाने॥


कडवे २

शांततेचा दीप तुझ्या नेत्रांत झळाळे,

अहंकार, विकार तुझ्या चरणी विराळे।

निःस्वार्थ प्रेमाचा दिलास तू देई,

सहजयोग मार्गे जीवन उजळविले॥


कडवे ३

धर्म, जात, देश सारे भेद विसरविले,

मानवतेचे बीज हृदयी तू रोविले।

सत्य, पावित्र्य, आनंदाचा स्रोत तू,

माते निर्मले, आम्हा तारक तू॥


कडवे ४

शब्दांविना तू दिले आत्मसाक्षात्कार,

मौनातच घडविला अंतरंगाचा संस्कार।

वाऱ्याच्या गंधात तुझी अनुभूती,

सहजयोगी हृदयात अखंड ज्योती॥


कडवे ५

चरणी ठेवूनी मस्तक मागूनी आशीर्वाद,

जीवन होवो निर्मळ, होवो समाधानी नाद।

सदैव राहो तुझ्या करुणेची छाया,

श्री माताजी, तूच आमची माया॥

श्री माताजी वर आधारित कव्वाली.

 नक्कीच. खाली सहजयोग संस्थापिका परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या जीवनकार्यावर आधारित, भक्तीरसाने ओथंबलेली, कव्वालीच्या ढंगातील एक उत्कृष्ट व भावपूर्ण कव्वाली सादर करीत आहे—


🌸 कव्वाली : “जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार” 🌸

(सारंगी – तबला – हार्मोनियमच्या आलापात)


आलाप :

इश्वर-इसा-अल्ला एकच आहे,

मार्ग वेगळे, ध्येय एक आहे…

मनुष्य जन्माचा अर्थ कळावा,

म्हणून अवतरल्या श्री माताजी आहेत…


मुखडा (कोरस):

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!

हातावर हात ठेवुनी उघडले अंतर्द्वार,

सहजयोगाने बदलले जीवन साकार!


पहिला कडवा:

छिंदवाडात जन्म झाला, भारतमातेची लेक,

स्वातंत्र्यसंग्रामाची होती पुण्यरेषेक,

महात्म्यांच्या संस्कारात वाढली दिव्य चेतना,

बालपणापासून ओळखली आत्मज्ञानाची भावना.


कोरस:

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!


दुसरा कडवा:

ना पैसा, ना यज्ञ, ना मंत्रांचा भार,

सहजसाध्या स्पर्शाने दिला जीवनाचा सार,

सात चक्रांची उघडली दिव्य कमाने,

माथ्यावर वाहू लागली थंड वारे.


(दमदार तालात):

ना गुरुची फी, ना शिष्याचा गर्व,

आईच्या प्रेमात सापडला ईश्वराचा सर्व!


कोरस:

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!


तिसरा कडवा:

युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका फिरल्या,

सत्याच्या शोधात हजारो मैल चालल्या,

रात्रीचा थकवा, दिवसा प्रवचन,

माणसात जागवले आत्म्याचे स्मरण.

आज लाखो योगी जगभर साक्ष देतात,

आईच्या कृपेने विकार हरवतात!


कोरस:

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

आई निर्मला माते, तुझा जयजयकार!


चौथा कडवा:

आजच्या युगात जिथे भोगाचा अंधार,

तिथे सहजयोगाने पेटवला ज्ञानदीप अपार,

मन शांत झाले, बुद्धी निर्मळ झाली,

अध्यात्माची खरी ओळख मिळाली.

धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे क्षमा,

हेच शिकवले माते, हीच खरी साधना!


पाचवा कडवा (समारोप):

आजही सूक्ष्मात आईची उपस्थिती,

चैतन्यातून मिळते तिचीच स्फूर्ती,

नतमस्तक होऊनी करतो हीच पुकार,

आई निर्मला माते, स्वीकार आमचा नमस्कार!


अंतिम कोरस (उत्साही):

जागवली कुंडलिनी, दिला आत्मसाक्षात्कार,

सहजयोगाची गंगा वाहिली अपार!

मानवतेसाठी जीवन वाहिले अपार,

जय जय श्री माताजी! जय जय साकार.

अमेय रुचिरा काव्य.

 खाली अमेय देवकर आणि रुचिरा यांच्यावर आधारित एक भावपूर्ण कविता—


पुण्याच्या मातीचा सुगंध घेऊन,

स्वप्नांना पंख देत पुढे चालले,

अमेय–रुचिरा, दोन जीव एक वाट,

साडेचार वर्षांत प्रेम अधिक फुलले.


टोकियोच्या प्रकाशात अनुभव विणले,

दुबईच्या मरिनात संसार रचला,

दमाक हाईट्सच्या शांत घरात,

संस्कारांचा दीप उजळला.


अमेयच्या स्वरांत भजन, जोगवा, कव्वाली,

सहजयोगाची ओळख, ध्यानाची गंगा निराली,

इंजिनिअर बुद्धी, कलाकार हृदय,

सेवेतूनच शोधतो जीवनाचा अर्थ नवा.


रुचिरा—रेषांतून स्वप्ने घडवणारी,

आर्किटेक्टची नजर, आईची माया साठवणारी,

घर सांभाळत, प्रेम जपत,

शांततेतून शक्ती उलगडणारी.


आता पाळण्यात येणार नवे भविष्य,

आनंदाचा सूर, किलबिलते अस्तित्व,

देवकर–गायकवाड कुटुंबांचा अभिमान,

ही जोडी म्हणजे संस्कारांचे सुंदर गाणे महान.

गिरीश आप्पा सुनीता ताई एक काव्य.

 *गिरीश–सुनीता : आयुष्याची सुंदर कविता*


बत्तीस वर्षांपूर्वी बांधली नाती,

विश्वास, प्रेम आणि स्वप्नांच्या गाठी।

मुंढव्याच्या ' मातोश्री' त रुजली प्रेम कहाणी,

गायकवाड नावाशी जोडली पुण्याची शान ही।


मुंढवा आणि गायकवाड — वेगळेच समीकरण,

लोकांच्या मनात घर, हृदयात स्थान।

शिकले, सवरले, उभा केला संसार,

बांधकाम, उद्योग, यशाचा विस्तार।


‘हॉटेल चूल मटण’ची दरवळती ख्याती,

पुण्याभर शाखा, मसालेदार चवीची  नाती।

लोकं गोळा करणारे,

सदैव शुद्ध नीती ,

मुत्सद्दी गिरीश — 

माणुसकीची प्रचिती ।


गार गावात घडले सुनीतेचे बालपण,

दौंडमध्ये शिक्षण, संघर्षाचे वळण।

भीमा नदी ओलांडत, पायात धैर्य घेऊन,

स्वप्नांच्या वाटेवर चालल्या अडथळे झेलून।


अपार कष्टांनी घडवले शिक्षण पूर्ण,

संघर्षातून उमलले व्यक्तिमत्त्व सुगंधी, संपन्न।

घरातली राणी, स्वयंपाकात जादू,

हसतमुख सुनीता — प्रेमाची साधू।


चवीलाही प्रेमाची दिली ओळख,

ताटात वाढले समाधान, सुख।

रुचिरा, दिग्विजय — संस्कारांची देणगी,

आईवडिलांच्या छायेत वाढली दोन सोन्याची फुलं रंगी।


रुचिरा अमेय देवकर — संसारात रमली,

नव्या घरात आनंदाची पालवी फुलली।

दिग्विजय स्वप्न पाहतो आकाशाएवढे,

UPSC, उद्योजकता — ध्येय डोळ्यांत साठले।


अशी ही गोष्ट प्रेमाची, परिश्रमांची शान,

गिरीश–सुनीता म्हणजे एक जिवंत प्रेरणागाथा महान।

नात्यांत गोडवा, आयुष्यात उजेड,

हीच खरी कविता — माणुसकीचा वेध। 🌼

विक्रांत मेघना गझल.

 विक्रांत–मेघना : एक प्रेमगझल.


कसब्याच्या रुबाबात जन्मलेला तो स्वप्नांचा राजपुत्र आहे,

डोळ्यांत जर्मनीचे आकाश, तरी मातीचा दरवळ आहे.


राज्याभिषेकाच्या छत्रासारखा, शिरावर मानाचा मान आहे,

अब्दागिरे नावात इतिहास, स्वाभिमानाचा गंध आहे.


मैत्रीच्या ओळींनी जुळली भेट, नशिबाने टाकले छंद आहे,

फिल्डिंग लावता लावता, प्रेमच पडले मजबूत बंध आहे.


ठाण्याची लाडकी शेंडेफळ, हसण्यात बालपण आहे,

एमबीएची धार हातात, तरी मन अवखळ, निरागस आहे.


कॉन्व्हेंटच्या शिस्तीत वाढलेली, खेळकर तिची चाल आहे,

सहजयोगाच्या शांत स्वरांत, जीवनाचा उजळ ताल आहे.


विक्रांतचा आधार शब्दाविना, मेघनाची साथ सावलीसारखी आहे,

नजरेतून उमलणारे प्रेम, बोलण्यापलीकडचे आहे.


अर्णवच्या तबल्यात सूर, चार भाषांचा साज आहे,

जर्मनीत शिकतानाही, संस्कारांचा आवाज आहे.


अहानाच्या हास्यात उजाडते, सौंदर्याची पहाट आहे,

न शिकवता शिकलेली भाषा, बुद्धीची स्वच्छ वाट आहे.


ध्यानधारणेच्या निःशब्द क्षणी, चौघांची एकच श्वास आहे,

सहजयोगाच्या शांत पंखांनी, उंचावलेला विश्वास आहे.


विक्रांत–मेघना प्रेमकथा ही, काळावर मात करणारी आहे,

अरेंजमध्येही रोमँटिक ठरलेली, नियतीचीच निशाणी आहे.


धन्यवाद,

चॅट जीपीटी.🙏

गरजा विरुद्ध इच्छा, हव्यास.

 *मानवाच्या Needs (गरजा) आणि मानवाच्या Wants (इच्छा/हव्यास) यांतील फरक:*


आजच्या या मोहमायेच्या जगात गरजा आणि इच्छा/हव्यास यातील फरक समजण्याची फार गरज आहे.


अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र दोन्ही दृष्टीने हा फरक महत्त्वाचा आहे. 

1) Needs (गरजा) म्हणजे काय .

अर्थ :

मानवी जीवन टिकवण्यासाठी व मूलभूत कल्याणासाठी अनिवार्य असलेल्या गोष्टी म्हणजे गरजा.

वैशिष्ट्ये :

जीवनावश्यक असतात,

पूर्ण न झाल्यास जीवन, आरोग्य किंवा विकास धोक्यात येतो,

मर्यादित व तुलनेने स्थिर असतात,

सर्व मानवांमध्ये साधारण सारख्या असतात,

उदाहरणे :

ऑक्सिजन,पाणी, अन्न, वस्त्र, निवारा,

सुरक्षितता,सामाजिक आपुलकी (कुटुंब, समाज),प्रतिष्ठा, आत्मविष्कार. अब्राहम मास्लो या मांडलेली Theory of Needs Hierarchy तुम्ही वाचलेली आहे. या अशा गरजा आहेत ज्याशिवाय माणूस राहू /जगू शकत नाही.


*आता गरजांच्या  विरुद्ध इच्छा/ हव्यास म्हणजे काय* :


2) Wants (इच्छा / हव्यास)म्हणजे काय .

अर्थ :

सुखसोयी,आराम,प्रतिष्ठा किंवा आनंद वाढवण्यासाठी असलेल्या *पण अनिवार्य नसलेल्या गोष्टी* म्हणजे इच्छा/हव्यास.


वैशिष्ट्ये :

जीवनासाठी आवश्यक नाहीत: 

म्हणजे याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकता.


या व्यक्तीनुसार बदलतात: व्यक्ती तितक्या प्रवृती , एकाच घरातील सदस्यांचा इच्छा,हव्यास कमी,अधिक प्रमाणात वेगवेगळ्या असू शकतात .


अमर्याद व सतत बदलणाऱ्या असतात: मोहमायेला मर्यादा नसते, ' मला हे हवं',' मला ते हवं' , याला काही अंत नाही, बरं तुम्ही हवं ते घेतलं तर थोड्याच दिवसात मार्केट मध्ये काहीतरी नवीन येतं,आता तुम्हाला ते पण पाहिजे असतं. जगभरातल्या उद्योजकांचे हेच तर बिझनेस मॉडेल आहे,उद्योजक उत्पादक आहेत आणि तुम्ही ग्राहक (गिराईक)आहात. तुम्ही कधी मॉल,कॉल,ऑनलाईन ऑर्डर्स,पार्सल, कल्चरचा भाग बनता ते तुम्हालापण कळत नाही.


संस्कृती,उत्पन्न,फॅशन, जाहिरात यांवर अवलंबून असतात:

प्रत्येक राज्याची,देशाची ,खंडाची संस्कृती भिन्न असते. पण आता स्थलांतर,पर्यटन,मिडिया यामुळे मिश्र संस्कृती वाढत आहे. माणूस हा अनुकरणप्रिय असल्यामुळे तो दुसऱ्यांच्या संस्कृतीची पण कॉपी करू लागला आहे.


उत्पन्नाच्या बाबतीत 

दारिद्र्य,गरिबी,मध्यम वर्गीय, उच्च मध्यम वर्गीय, श्रीमंत, अती श्रीमंत असे गट आहेत, या प्रत्येकाला वरच्या श्रेणीतल्या गटाशी बरोबरी,स्पर्धा करायची असते. ते करतायेत त्यात सुख आहे असे प्रत्येक गटाला वाटत आहे आणि माणूस मृगजळाच्या मागे पळत आहे.


फॅशन बद्दल तर काय बोलावे , जगात  दर सेकंदाला एक नवीन फॅशन उदयाला/जन्माला येत आहे. फॅशनचा मोह झाला नाही तर नवलच. तुमच्याकडे बुटापासून सुटापर्यंत आणि ड्रेस पासून साडी पर्यंत सगळ्या गोष्टी असतात तरी नवीन बूट,नवीन सूट ,नवीन ड्रेस,नवीन साडी मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन दिसली की ते पण तुम्हाला पाहिजे असते आणि गरज नसताना तुम्ही ते  खरेदी करता.


जाहिरातींचा तर सुळसुळाट आहे, होर्डिंग्ज, प्रसार माध्यमे, सोशल मीडिया,ऍमेझॉन,गुगल , ॲप्स , मोबाईल,यांनी मानवाचा मेंदू हायजॅक केला आहे,तुमच्या मेंदूचे अपहरण झाले आहे,त्यांनी तुमचा मेंदू जबरदस्तीने ताब्यात घेतला आहे, तुम्ही,जागेपणी,झोपेत काय पहायचे,

खायचे,प्यायचे, ल्यायचे,घ्यायचे,द्यायचे,रहायचे,फिरायचे,इ.ते हे दुसरेच कोणीतरी ठरवत आहे आणि तुमचा मेंदू तुम्ही जाहिरातदारांकडे गहाण ठेवला आहे. 


उदाहरणे :

महागडे कपडे, गाडी, मोबाईल,एसी, आलिशान घर,ब्रँडेड वस्तू, पर्यटन,

प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा,स्पर्धा,इर्षा,पैसा,स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, असूया, हाव, इ.


आता हेच 

पहा ,लिहण्यासाठी पेन ही तुमची गरज झाली , दहा रुपये किमतीच्या पेन ने तुमची गरज भागते,पण मार्केट मध्ये पेनचे दहा रुपयांपासून दहा लाख रुपया पर्यंत प्रकार उपलब्ध आहेत. शे,

पाचशे,हजार,लाख रुपयांचा पेन खरेदी करणे ही इच्छा /हव्यास झाला. हेच सर्व प्रकारच्या सेवा, ट्रेड,वस्तू ,उत्पादनांना    लागू आहे.


पूर्वी लोकांचा कल बचतीकडे होता आता खर्चाकडे आहे. पूर्वी दिवाळी दिवाळीतच साजरी व्हायची आता बारा महिने दिवाळी झाली आहे ,जसे काही राजाला दिवाळी माहीतच नाही.


असा आपण गरज नसताना कशा कशाचा हव्यास करतो त्याचा विचार करा.


निष्कर्ष

- गरजा पूर्ण झाल्याशिवाय जीवन शक्य नाही, हे सत्य आहे.

- इच्छा,हव्यास पूर्ण झाल्याने जीवन अधिक सुखकर होते,हेही खरं आहे.

- खरेदी,विक्री हा अर्थशास्त्राचा नियम आहे . पण त्या वस्तू नसल्या तरी जीवन चालू शकते. इच्छा /हव्यास याला किती बळी पडायचे हा खरा प्रश्न आहे.


लेखक : योगीराज देवकर.😊

[© 2026 Yogiraj Deokar]