गुणांबद्दल बोलू काही!
सहस्त्रार चक्र : सातवे चक्र.
सहस्त्रार चक्र सर्व चक्रांचे संयोगबिंदू आहे. इथेच व्यक्तीचा अहं आणि चित्त विलीन होऊन परम चैतन्याशी एकरूप होते .
या चक्राचे प्रमुख गुण एकाकारिता, समग्रता, शांती आणि निरानंद हे आहेत.
१) एकाकारिता: (Integration / Oneness):
एकाकारिता म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या जीवनात असलेली तूट नाहीशी होणे. ज्ञान, भावना आणि कृती यांच्यात समन्वय निर्माण होतो. “मी” आणि “ते” असा भेद कमी होत जातो.आत्मा आणि परमात्मा यांच्या भेटीचा योग येतो .
विभक्त मनामुळे संघर्ष, दुटप्पीपणा व अस्वस्थता निर्माण होते. सहस्त्रारातील एकाकारिता व्यक्तीला समग्र, प्रामाणिक आणि नैसर्गिक बनवते.
२)समग्रता: (Wholeness):
समग्रता म्हणजे जीवनाकडे तुकड्यांत नव्हे तर पूर्णतेने पाहण्याची क्षमता. सहस्त्रार चक्र खुले झाल्यानंतर मनुष्य केवळ स्वतःच्या फायद्यापुरता विचार करत नाही; तो व्यापक कल्याणाचा दृष्टिकोन स्वीकारतो.
३) शांती :(Inner Peace):
सहस्त्रार चक्राचा सर्वात जाणवणारा गुण म्हणजे अंतःशांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते.
४) निरानंद :(Nirānand / Thoughtless Bliss):
निरानंद म्हणजे कारणाशिवाय येणारा, विचारांच्या पलीकडचा आनंद. हा भौतिक सुखासारखा क्षणभंगुर नसतो.
माणूस सतत आनंदाचा शोध बाहेर घेतो—संपत्ती, प्रतिष्ठा, नातेसंबंध यांत. निरानंद अनुभवलेला मनुष्य मात्र आतून तृप्त असतो. त्यामुळे त्याच्यात लोभ, भीती व असुरक्षितता कमी होते आणि जीवन सहज, निर्मळ बनते.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा .
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment