Saturday, 14 February 2026

स्वाधिष्ठान चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

स्वाधिष्ठान चक्र : दुसरे चक्र.


स्वाधिष्ठान चक्र मानवी सृजनशीलतेचे आणि नवनिर्मितीचे ऊर्जाकेंद्र आहे.मानवी जीवन केवळ जगण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. विचार करणे,कल्पना करणे,समस्या सोडविणे, अनुभवातून शिकणे, नव्याने काही निर्माण करणे आणि त्या निर्मितीतून सौंदर्य अनुभवणे—ही मानवी अस्तित्वाची खरी ओळख आहे. या साऱ्या प्रक्रियेचे सूक्ष्म ऊर्जाकेंद्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र होय.


स्वाधिष्ठान चक्र मानवाच्या सृजनात्मक शक्तीचे, नवनिर्मितीचे, शुद्ध,निर्मळ, भावनात्मक विचारांचे आणि सौंदर्यबोधाचे केंद्र आहे. हे चक्र संतुलित असले की माणूस केवळ यांत्रिक जीवन न जगता, संवेदनशील, सर्जनशील आणि आनंददायी जीवन जगतो.


१) सृजनात्मकता :

सृजनात्मकता म्हणजे  काहीतरी नवीन शक्यता निर्माण करण्याची क्षमता. ती केवळ चित्रकला, संगीत किंवा साहित्यापुरती मर्यादित नसून, इतरांचे प्रश्न,

समस्या सोडवणे,

नवे विचार,नव्या कल्पना मांडणे,

दैनंदिन जीवनात नाविन्य आणणे,

नाती समजून घेणे,

या सर्व ठिकाणी कार्यरत असते.

स्वाधिष्ठान चक्र जागृत असेल तर माणूस नुसता अनुकरण करणारा न राहता निर्मिती करणारा बनतो. इतिहासातील महान शास्त्रज्ञ, कलाकार, संशोधक हे सर्व स्वाधिष्ठान चक्राच्या गुणांची जिवंत उदाहरण आहेत. सृजनात्मकतेशिवाय मानवी प्रगतीच शक्य नाही—म्हणूनच हा गुण मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे.


२) नवनिर्मिती : 

नवनिर्मिती म्हणजे जुन्याला नाकारून नव्याचा स्वीकार करणे नव्हे, तर अनुभवातून अधिक परिपूर्ण गोष्ट घडवणे.

स्वाधिष्ठान चक्र व्यक्तीला

कल्पनाशक्ती देते,

प्रयोगशील बनवते,

भीतीपेक्षा शक्यतेकडे पाहायला शिकवते,

आजच्या वेगवान, बदलत्या जगात जो माणूस नवनिर्मिती करू शकतो तोच टिकतो. नवनिर्मिती ही केवळ उद्योग, तंत्रज्ञानापुरती मर्यादित नसून विचार, शिक्षण, नातेसंबंध आणि समाजरचना यांनाही आकार देते. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्राचा हा गुण मानवी उत्क्रांतीसाठी अनिवार्य ठरतो.


३) भावनात्मक विचार : बुद्धी आणि हृदय यांचा समतोल.भावना नसतील तर माणूस कोरडा आणि कठोर बनतो; फक्त भावना असतील तर तो अस्थिर होतो.

स्वाधिष्ठान चक्र शुद्ध,निर्मळ भावनांना विचारांची दिशा देते.

यामुळे व्यक्ती

इतरांच्या भावनांची कदर करते,

सहानुभूती आणि करुणा विकसित करते,

स्वतःच्या भावना समजून घेत नियंत्रित करते,

भावनात्मक विचारामुळेच नाती टिकतात, समाज जुळून राहतो आणि माणूस माणसाशी जोडला जातो. हा गुण नसता तर मानवी जीवन केवळ व्यवहारिक आणि निर्जीव झाले असते.


४) सौंदर्याची जाण :

सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य आकर्षण नाही, तर

विचारातील सौंदर्य,

आचरणातील सौंदर्य,

शब्दातील माधुर्य,

कृतीतील समतोल.

स्वाधिष्ठान चक्रामुळे माणूस निसर्ग, कला, संगीत, साहित्य आणि जीवनातील सूक्ष्म आनंद अनुभवू शकतो. सौंदर्याची जाण माणसाला आनंदी, शांत आणि समाधानशील बनवते. जीवन केवळ जबाबदाऱ्यांचे ओझे न राहता एक सुंदर प्रवास बनतो.


थोडक्यात, जेव्हा हे चक्र शुद्ध असते, योग्य प्रकारे कार्य करते, तेव्हा माणूस केवळ जगत नाही—तो घडवत राहतो, हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करण्यासाठी कार्यरत राहतो आणि अर्थपूर्ण जीवन जगतो.


कुंडलिनी जागृतीनंतर जेव्हा ही शक्ती या चक्रातून प्रवाहित होते, तेव्हा माणसाच्या जीवनात नवनिर्मिती, सौंदर्यबोध आणि संतुलित भावना सहज प्रकट होऊ लागतात.


सृजनात्मकता अहंकारातून नसून निर्मळ प्रेरणेतून उत्पन्न होते—म्हणजेच “मी करतो.” या भावनेऐवजी “हे आपोआप घडते.” अशी सहज अवस्था निर्माण होते.

या चक्राचे संतुलन असल्यास भावना अतिरेक न होता विचारांशी जोडल्या जातात. त्यामुळे व्यक्ती संवेदनशील, सहानुभूतीशील आणि सौम्य बनते. यालाच भावनात्मक परिपक्वता असे म्हटले जाते. भावना शुद्ध झाल्या की नाती शुद्ध होतात आणि जीवनात शांतता प्रस्थापित होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Friday, 13 February 2026

मूलाधार

 गुणांबद्दल बोलू काही !

मूलाधार चक्र :


पावित्र्याचे व अबोधितेचे पवित्र आसन म्हणजे मूलाधार चक्र.मानवी सूक्ष्म शरीर हे केवळ भौतिक रचना नसून, ते एक सूक्ष्म आध्यात्मिक यंत्रणा आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सर्वात मूलभूत, पवित्र आणि संरक्षक केंद्र म्हणजे मूलाधार चक्र. याच चक्रात आदिशक्ती कुंडलिनी माता आपल्या अबोधितेच्या पूर्ण पावित्र्यात वास करते. म्हणूनच मूलाधार चक्राला सर्व धर्मांचे, सर्व संस्कारांचे आणि सर्व आध्यात्मिक उन्नतीचे मूळ मानले जाते.


१) अबोधिता : हा गुण आत्म्याचा सहज स्वभाव आहे. श्री माताजी निर्मला देवी सांगतात, “Innocence is the source of wisdom.”

अबोधिता म्हणजे बालकासारखी निष्कलंक अवस्था—जिथे मनात गणित नाही, चलाखी नाही, अहंकार नाही. ही अवस्था म्हणजे आत्म्याचा सहज, नैसर्गिक स्वभाव आहे.

मूलाधार शुद्ध असेल तर साधक विचारांच्या गुंतागुंतीत अडकत नाही. ध्यानात त्याचे मन सहज शांत होते, आणि कुंडलिनीला वर चढण्यासाठी सुरक्षित, पवित्र आधार मिळतो. अबोधिता नष्ट झाली की आध्यात्मिक प्रगती थांबते, कारण कुंडलिनी माता फक्त पवित्र व अबोध वातावरणातच जागृत राहते.


२) पावित्र्य : पावित्र्य ही  कुंडलिनीचे संरक्षण करणारी शक्ती आहे.

पावित्र्य हा केवळ नैतिक विषय नसून सूक्ष्म आध्यात्मिक नियम आहे. मूलाधार चक्र हे धर्मतत्त्वाचे केंद्र आहे. येथे पावित्र्य भंग झाले की, कुंडलिनी संकुचित होते, ध्यानात स्थैर्य राहत नाही आणि आत्मसाक्षात्काराची गती मंदावते.

पावित्र्य म्हणजे:

विचारांची शुद्धता,

दृष्टीची संयमित अवस्था,

नात्यांतील आदर,

शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन आहे.


३) विवेक : व्हायब्रेशन्सद्वारे सत्याची ओळख करणे. विवेक हा बौद्धिक नसून व्हायब्रेशनल (चैतन्याधिष्ठित) असतो. मूलाधार चक्र शुद्ध असले की साधकाला आपल्या बोटांवरून व्हायब्रेशन्सद्वारे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सहज कळते.

हा विवेक माणसाला:

अंधश्रद्धेपासून वाचवतो,

खोट्या गुरूंना ओळखण्याची शक्ती देतो,

अतिरेक व विकृतींपासून दूर ठेवतो,

श्री माताजी याला ''सत् 

असत् विवेक", "Intelligence to discriminate between truth and untruth ."  सद्सद्विवेक असे म्हणतात. तसेच “You must know the truth on your central nervous system.”

हा अनुभवात्मक विवेक मूलाधाराच्या स्थैर्यावरच अवलंबून असतो असे वर्णन करतात.


४)  पराक्रम : ही  धर्मरक्षणासाठीची शांत शक्ती आहे.

मूलाधारातील पराक्रम हा आक्रमक नसून धर्माच्या बाजूने उभे राहण्याचा आत्मिक धैर्यभाव आहे. पराक्रम म्हणजे अहंकाराने लढणे नव्हे, तर सत्यावर स्थिर राहणे होय .


हा पराक्रम साधकाला:

अधार्मिकतेपासून स्पष्ट नकार देण्याची ताकद देतो,

स्वतःच्या पावित्र्याचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य देतो,

समाजात सत्याचे तत्त्व निर्भयपणे मांडण्याची क्षमता देतो,

पराक्रम नसला तर विवेक असूनही साधक डगमगतो.


मूलाधार शुद्ध नसल्यास काय होते?


सहजयोगाच्या अनुभवात दिसते की मूलाधार कमजोर असेल तर:


ध्यानात अस्थैर्य येते,

डाव्या किंवा उजव्या बाजूची अतिरेक प्रवृत्ती वाढते,

व्हायब्रेशन्स कमकुवत होतात,

साधक अध्यात्मात टिकत नाही,

म्हणूनच श्री माताजी मूलाधार शुद्धीवर विशेष भर देतात.


थोडक्यात , मूलाधार चक्र म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मंदिराचा पाया आहे.

अबोधिता—आत्म्याची भाषा आहे,

पावित्र्य—कुंडलिनीचे कवच आहे,

विवेक—सत्याची ओळख आहे,

आणि पराक्रम—धर्माचा रक्षक आहे.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

शुद्ध सत्वगुणी sushumna nadi

 गुणांबद्दल बोलू काही!

शुद्ध सत्वगुणी सुषुम्ना नाडी :


मानवाच्या सूक्ष्म शरीरात 

सुषुम्ना नाडी ही मध्यातून जाणारी नाडी आहे.

ती वर्तमान, आत्मा, साक्षीभाव, धर्म आणि सत्य यांचे प्रतीक आहे.

इडा (भावना) व पिंगला (कृती) संतुलित झाल्यावरच सुषुम्ना (ज्ञान) नाडी सक्रिय होते.


सुषुम्ना नाडीवरील सत्त्वगुण – गुण की दोष ?


सत्त्वगुण हा स्वतः गुण आहे,इथे सर्व षडरिपु गळून पडतात. तरी इथेही शुद्ध गुण आणि शबल गुण असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर शबल गुण प्रपंचाकडे नेतो . सत्व, रज ,तम या तीन त्रिगुणांच्या योगाने जीवन चालते.

उदाहरणार्थ ...

प्रापंचिक त्रिगुण : ' असा माणूस जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्याने स्वार्थमय असतो.'

'सत्ताधारी ,श्रीमंत,कलावंत,राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात,असे व्हावेसे वाटते .'


पारमार्थिक त्रिगुण : ' असा माणूस मी जगासाठी आहे ही भावना असल्याने निःस्वार्थी असतो.'

' साधू,संत, महात्मे,योगी,त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त आदर्श असतात , तसे व्हावेसे वाटते.' 


सत्वगुण:

आविष्कार,

उत्क्रांती,

प्रकाश,धर्म,ज्ञान,

शांती,समाधान,

निःस्वार्थ प्रेम,

ईश्वर प्रेम,

विवेकी वृत्ती,

दानशूर,

उत्सवप्रिय ,

सजगता.

शुद्ध आत्मज्ञान होणे ही सत्वगुणाची खरी करामत आहे. अशी व्यक्ती पूर्ण वासनारहित , अभिमानरहित,अत्यंत दयाळू,नम्र,परोपकारी ,विशाल अंतःकरणाची असते .


सत्त्वगुण म्हणजे आत्म्याचा प्रतिबिंबित गुणधर्म. पण अति सत्त्वाभिमान झाला तर,

अध्यात्मिक अहं.

“मी शुद्ध आहे.” ही सूक्ष्म गर्वभावना येते. 

प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. अहंकार म्हणजे प्रतिक्रिया ,त्या नियंत्रणात ठेवा,प्रतिक्रिया द्यायच्याच असतील तर अत्यंत गोड,चांगल्या द्या,अहंकार अत्यंत कोमल,गोड, प्रेममय आणि विनोदी असू द्या. सत्त्वगुणातही नम्रता आवश्यक आहे.


सुषुम्ना नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ: 


शारीरिक लाभ:

ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते,

तणावजन्य आजार कमी,

शरीरात हलकेपणा,

आरोग्य सुधारते.


भावनिक लाभ:

शांतता व समाधान,

इच्छा,आशा,आकांक्षा,भावना शुद्ध राहतात,

प्रतिक्रिया नसतात, प्रतिसाद असतो.


बौद्धिक लाभ :

विवेक कार्यरत होतो,

एकाग्रता वाढते, हुशारीत वाढ होते.


आध्यात्मिक लाभ:

कुंडलिनी सहज व नियमित उर्ध्वगामी होते,

चक्रे शुद्ध होऊ लागतात,

ध्यान खोल व सहज होते,

आत्मसाक्षात्कार टिकून राहतो,

वर्तमानात स्थिरता,

सूक्ष्म संवेदनांची जाणीव होते,

अंतर्ज्ञान जागृत होते,

निर्विचार ( Thoughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निर्विकल्प (Doughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निरानंद अनुभवास येतो.


सुषुम्ना सक्रिय मानवाचे जीवन:

कृती होते पण कर्तेपणा नसतो.

प्रेम असते पण आसक्ती नसते.

शिस्त असते पण ताण नसतो.

नेतृत्व असते पण अहं नसतो.


सत्वगुणात प्रतिभा जागृत होते, बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते. तात्पर्य ,स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी -

Sahajyogapune.org

Sahajayogamumbai.org


लेखन - योगीराज देवकर .

Thursday, 12 February 2026

शुद्ध रजोगुणी पिंगला नाडी

 गुणांबद्दल बोलू काही !

शुद्ध रजोगुणी पिंगला नाडी :


मानवाच्या सूक्ष्म शरीरातील उजव्या बाजूला असलेली ही सूर्य तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.

पिंगला नाडी आपल्या क्रिया, विचार, बुद्धी, अहंकार, नियोजन, कार्यक्षमता आणि भविष्याभिमुखता यांचे प्रतिनिधित्व करते.


पिंगला नाडीवरील रजोगुण – गुण की दोष?


रजोगुण स्वतः दोष नाही, तो मानवाच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक गुण आहे.

पण तो अतिरिक्त झाला की तो दोषात परिवर्तित होतो.


रजोगुणाचे नैसर्गिक गुण:

स्वाभिमान,

कृतीशीलता,उद्योगिपणा,

उर्जा,

ध्येयपूर्ती,लढावू वृत्ती,महत्वाकांक्षा,

परिश्रम,गतिमानता,

नियोजन,

बुद्धीची हुशारी, हे सर्व गुण नसते तर मानव प्रगतीच करू शकला नसता.

सत्वगुणी माणूस खऱ्या अर्थाने माणूस असतो. पण शुद्ध रजोगुणी माणूसुद्धा सत्वगुणी मानायला हरकत नाही.


पण याच रजोगुणाचा  अतिरेक झाला किंवा हे गुण प्रपंचाकडे वळले की त्याचा दुरपयोग होतो आणि मानवात ...


अहंकार,

आक्रमकता,

अतिविचार,

चिडचिड,

अधीरता,

स्पर्धात्मक वृत्ती,

कामाचा अतिरेक (workaholism),

वासना,

क्रोध,मद,लोभ,

इर्षा,गर्व, असे दोष निर्माण होतात.


पिंगला नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ :


शारीरिक लाभ: 

नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते.

उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतात.

डोकेदुखी, तणाव, रक्तदाबाशी संबंधित त्रास कमी होतात.


मानसिक लाभ :

विचार स्पष्ट व तर्कशुद्ध होतात.

निर्णयक्षमता वाढते.

विवेकबुद्धी जागृत होते.

विचार कृतिशील होतात.


भावनिक लाभ :

उर्जा स्थिर राहते (over-excited होत नाही).

आळस न राहता उत्साह टिकतो.

कामात सातत्य येते.


आध्यात्मिक लाभ:

अहंकार कमी होतो.

“मी करतो” या भावनेऐवजी “वैश्विक शक्ती करते” हा भाव येतो.

पिंगला नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.


असा मानव कृती करतो, पण कृतीत अडकत नाही.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी -

Sahajayoapune.org

Sahajayogamumbai.org


लेखन - योगीराज देवकर.

Wednesday, 11 February 2026

शुद्ध तमोगुणी इडा नाडी.

 गुणांबद्दल बोलू काही !

शुद्ध तमोगुणी इडा नाडी : 


मानवाच्या सूक्ष्म शरीरात  डाव्या बाजूला असलेली नाडी ही चंद्र तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.

इडा नाडी आपल्या भावना, स्मृती, अवचेतन, इच्छा आणि भक्ती यांचे प्रतिनिधित्व करते.


इडा नाडीवरील तमोगुण – गुण की दोष?


सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते. प्रत्येक गुणात शुद्ध व शबल असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर तोच गुण शबल असेल तर प्रपंचाकडे खेचतो . जे निर्मळ असते ते शुद्ध आणि जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते.


तमोगुण स्वतः दोष नाही, पण कमी/अतिरिक्त झाला तर तो दोष बनतो.


तमोगुणाचे नैसर्गिक गुण:

विश्रांती,

चांगली झोप,

पावित्र्य,

स्थैर्य,

शुद्ध इच्छा,

भावनिक प्रगल्भता,

समर्पण,

सर्व मानवासाठी हे आवश्यक गुण आहेत.


पण तमोगुण असंतुलित झाला तर…

आळस,सुस्ती,

जडत्व,अती झोप,

उदासीनता,

नैराश्य,

भीती,असुरक्षितता,

भूतकाळात अडकून राहणे,

नकारात्मक आठवणींचा पगडा,

काम,मोह,मत्सर, असे दोष निर्माण होतात.


तमोगुणातील भयंकर विकार स्वार्थ असतो पण तो अमर्याद असतो. आसक्ती असते पण ती अवास्तव असते.

अनुष्ठान असते पण ते आततायी असते.

साधन असते पण ते अघोरी असते.

तमोगुणी माणूस संगती करण्यास कठीण असतो.नाईलाजाने त्याला माणूस म्हणायचे इतकेच.


इडा नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ:


शारीरिक लाभ:

चांगली झोप लागते.

मानसिक तणावातून होणारे आजार कमी होतात.


मानसिक लाभ:

मन शांत, स्थिर व प्रसन्न राहते.

नैराश्य, भीती, तणाव कमी होतो.

भावनांवर नियंत्रण येते.

भूतकाळाचा भार सुटतो.


भावनिक लाभ:

प्रेम,करुणा सहज वाहते.

राग, द्वेष, मत्सर कमी होतो.

नात्यांमध्ये समजूतदारपणा येतो.

संवेदनशीलता वाढते.


आध्यात्मिक लाभ:

इडा नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.

शीतलता अनुभवास येते.

शुद्ध इच्छा जागृत होतात.


असा मानव भावनांचा गुलाम न राहता भावनांचा साक्षी बनतो.


संदर्भ - परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी - 

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org.org


लेखन - योगीराज देवकर.

Sunday, 25 January 2026

उत्तुंग दुबई

 उत्तुंग दुबई


आयुष्यात अनेकदा अचानक आनंददायक वळणे येत असतात, असे पण नव्हते की,दुबई आमच्या विश लिस्ट वर होते ,पण अमेयमुळे आम्हाला हा जपान सिंगापूर,युरोप ट्रिप नंतर आता दुबई प्रवासाचा योग आला .


अमेयची टोकियो, जपान येथून दुबई, यूएई येथे बदली झाली आणि अमेय–रुचिरा यांनी दुबई मरिना एरियात घर केले . लगेचच त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलावून घेतले. जरी आम्ही टुरिस्ट व्हिसावर आलो असलो, तरी यावेळी पर्यटन हा आमचा मुख्य अजेंडा नव्हता. कारण एक आनंदाची, हळवी बातमी—सुनबाईंकडे गुड न्यूज आहे आणि अमेयचे ऑफिस पण सुरू असणार होते.  त्यामुळे  ' मुलांबरोबर वेळ घालवणे,मुलांचा चाललेला सुखी संसार पाहणे' , हाच आमचा एकमेव विचार होता.


पण तरुणाईची हौस आणि  प्रेमळ  हट्ट—मुलांनी आम्हाला दुबई दाखवायचीच  ठरवले होते आणि मग सुरू झाला अनुभव उत्तुंग दुबईचा .


दुबई म्हणजे केवळ एक शहर नाही, तर मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम

राजाच्या आणि अनेक प्रसिद्ध वास्तुकारांच्या  कल्पनाशक्तीने उभारलेले  भव्य स्वप्न आहे.बुर्ज खलिफा - जगातली सर्वात उंच निवासी इमारत, ऐन दुबई - जगातील सर्वात मोठे जाइंट व्हील,दुबई मॉल - जगातला सर्वात मोठा मॉल,पाम जुमेराह - जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बेटं,दुबई  एअरपोर्ट - जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट उभारले जात आहे ,जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित वर्ल्ड आयलंडची  उभारणी सुरू आहे , प्रशस्त रस्ते आणि रात्री लखलखणारा प्रकाशाचा झगमगाट—सगळेच थक्क करणारे आहे. बरं ही उत्तुंग प्रगती म्हणाल तर तीस ,पस्तीस वर्षातील आहे. त्याआधी तर दुबई मासेमारी, मोती,बंदरे,सोन्याचा व्यापार आणि खनिज तेल यासाठी ओळखले जात होते.


बर दुबई , मिरॅकल  गार्डन,पाम आयलंड वरील अटलांटिस आणि रॉयल  अटलांटिस हॉटेल्स , मरिना, जुमेराह  बीच —ही ठिकाणे पाहताना प्रत्येक वेळी ' मानव किती अद्भुत 

गोष्टी साकारू शकतो ', याची जाणीव होत राहिते. दुबई फ्रेम, म्युझियम ऑफ द फ्युचर , बुर्ज अल अरब या वास्तू तर शेख झायद रोडवरून ये–जा करताना सतत नजरेत भरत होत्या—भविष्यात डोकावल्यासारखेच. बुर्ज खलिफा तर जवळपास शहरातल्या कोणत्याही भागातून दहा किलोमीटर वरूनच दिसायला लागतो . एव्हढ्या लवकर आपल्याला फ्रेम नको म्हणून मला तर अजिबात फ्रेम पहायला जायचे नव्हते.


एखादी ट्रिप लहानातून सुरू करून टॉपला कशी घेऊन जायची ते या मुलांकडून शिकावे.सुरुवातीला मरिना एरियात पायी फेरफटका मारणे, मॉल मध्ये जाणे सुरू झाले आणि शेवटच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता आम्ही बुर्ज खलिफा इमारतीच्या १२३/२४ व्या मजल्यावर पोहोचलो. बुर्ज खलिफा १६३ मजली उंच आहे. तिथे १२३/२४/४९ मजल्यावर observation deck आहेत.गेले तीन आठवडे जी ठिकाणे आम्ही त्यात्या ठिकाणी जाऊन पाहिली होती ती ठिकाणे आम्ही आता बुर्ज खलिफा वरून पहात होतो. जगातील सर्वात वेगवान लिफ्ट बुर्ज खलिफा इमारतीत आहेत. १२३ व्या 

मजल्यावर आम्ही एक मिनिटात पोहोचलो. दुबईतील इमारतींची भव्यता,उंची,डिझाईन्स, इलेव्हेशन्स,नावीन्यपूर्ण असल्यामुळे पाहण्यासारखे आहेत.


दुबई म्हणजे मॉल कल्चर. 

Ibn Battuta Mall, Gold Souk, Spice Souk, Al Fahidi, LuLu Hypermarket, Dubai Mall, Zabil Mall, Mall of the Emirates, Festival City Mall, Souk Madinat Jumeirah — असे अनेक मॉल या शहरात आहेत. प्रत्येक मॉल वेगळ्या संकल्पनेने सजलेला, पण माणसाच्या गरजांपेक्षा इच्छा, हौशीला अधिक खतपाणी घालणारा. इच्छेला मर्यादा नाही आणि हौसेला मोल नाही असे म्हणतात. कमकुवत मानसिकतेच्या श्रीमंत माणसाने मॉल मध्ये खरेदीसाठी न गेलेलेच बरे, अशी माणसे मॉलचा तत्काळ बळी ठरतात .माणूस आत जातो गरजेची एक वस्तू घ्यायला आणि पाच,दहा अनिवार्य नसलेल्या वस्तू खरेदी करून घेऊन येतो .


' अरेबियन टी हाऊस ' मध्ये घेतलेले पारंपरिक अरेबियन जेवण, हाफिज मुस्तफा येथील स्वीट - तो स्वाद, तो सुगंध - आठवणीत ताजा आहे. प्रत्येक मॉल मध्ये हवे तितके फूड कोर्ट आहेत. एका मॉल मध्ये तर आम्हाला चक्क तांबडा,पांढरा रस्सा - कोल्हापुरी थाळी जेवण मिळाले . इथे एक चांगले आहे,इथे भरपूर भारतीय राहतात,भारतीय भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ आणि सोयी सुविधा सर्वत्र उपलब्ध आहेत. यामुळे मुलांना महाराष्ट्राची ,भारताची आठवण होईल असे वाटत नाही.


पण या भौतिक वैभवाइतकेच मला मनाला स्पर्शून गेले ते म्हणजे दुबईतील सहजयोग सेंटर .

दुबईमध्ये सहजयोगाचे साप्ताहिक ध्यान केंद्र आहे आणि अडीचशेहून अधिक सहजयोग्यांची सामूहिकता आहे—एक व्हायब्रंट सेंटर. श्री धनंजय धुमाळ यांची म्युझिकल इव्हिनिंग आणि  इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम झाला,पब्लिक प्रोग्राम , श्री शक्तीधरण भैय्या यांचे सुरेल बासरी वादन झाले , नियमित ध्यान—सगळे काही चालू असते. सेंटरला  तीन रविवारी सामूहिक ध्यानाचा योग आला आणि परदेशात असूनही ' भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा ' अनुभव आला . बाह्य भौतिक उंचीपेक्षा आंतरिक आध्यात्मिक उंची किती महत्त्वाची आहे, याची प्रचिती तिथे आली.


मला विशेष भावले ते मुलांकडील  दमाक हाईट्स या भव्य इमारतीतील आमचे वास्तव्य आणि मरिना एरिया . मरिनामध्ये सकाळी - संध्याकाळी फेरफटका मारताना समुद्र, गगनचुंबी इमारती आणि शांत चालणारे लोक—पाहिले की ,मन अगदी निवांत होतं. त्या चित्रपटासारख्या  दिसणाऱ्या परिसरात वॉकमध्ये वेळ कसा निघून जात होता, तेच कळत नव्हते .


अमेय–रुचिरा परदेशात राहतात. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला फारसा लाभत नाही. ते भारतात येणं किंवा आम्ही त्यांच्याकडे जाणं—ही आमच्यासाठी पर्वणीच .


या प्रवासाने केवळ दुबई शहर पाहायला मिळाले असे नाही, तर मुलांबरोबर जगायला, त्यांचे  दैनंदिन जीवन,संसार ,अनुभवायला आणि अमेयची नवीन जबाबदारी समजून घ्यायला मिळाली.


दुबई मला फक्त उंच इमारतींमुळे उत्तुंग वाटली नाही, तर दुबईत असूनही मुलांना भेटलेल्या सहजयोग सामुहिकतेमधील मैत्री, नात्यांच्या उंचीमुळे, प्रेमाच्या उबेमुळे आणि  अनुभवामुळे उत्तुंग वाटली. 


श्री माताजींच्या कृपेत मुलं आनंदात आहेत,प्रगती करीत आहेत,आमचे चौकोनी कुटुंब आता पंचकोनी होणार आहे ,हे पाहून मनोमन आनंद झाला.


योगीराज देवकर.😊

Friday, 23 January 2026

श्री माताजी एक काव्य .

 चॅट जीपीटीला सूचना केली आणि पहा श्री माताजी वर आधारित खालील भजन .


नक्की. खाली सहजयोग संस्थापिका श्री माताजी निर्मला देवी यांच्यावर आधारित पाच कडव्यांचे भजन सादर करत आहे—


कडवे १

आदिशक्ती अवतरली धरतीवर स्नेहाने,

मातेच्या करुणेने उजळले अंतरंगाने।

कुंडलिनी जागविली सहज स्पर्शाने,

निर्मला माते, नमन तुला भक्तिभावाने॥


कडवे २

शांततेचा दीप तुझ्या नेत्रांत झळाळे,

अहंकार, विकार तुझ्या चरणी विराळे।

निःस्वार्थ प्रेमाचा दिलास तू देई,

सहजयोग मार्गे जीवन उजळविले॥


कडवे ३

धर्म, जात, देश सारे भेद विसरविले,

मानवतेचे बीज हृदयी तू रोविले।

सत्य, पावित्र्य, आनंदाचा स्रोत तू,

माते निर्मले, आम्हा तारक तू॥


कडवे ४

शब्दांविना तू दिले आत्मसाक्षात्कार,

मौनातच घडविला अंतरंगाचा संस्कार।

वाऱ्याच्या गंधात तुझी अनुभूती,

सहजयोगी हृदयात अखंड ज्योती॥


कडवे ५

चरणी ठेवूनी मस्तक मागूनी आशीर्वाद,

जीवन होवो निर्मळ, होवो समाधानी नाद।

सदैव राहो तुझ्या करुणेची छाया,

श्री माताजी, तूच आमची माया॥