गुणांबद्दल बोलू काही!
आज्ञा चक्र : सहावे चक्र.
क्षमाशीलता हा गुण मानवी उत्क्रांतीचा मौन द्वार आहे.आज्ञा चक्र विचारांच्या पलीकडील शांततेचे, अहंकार-प्रति अहंकाराच्या अतिक्रमणाचे आणि क्षमाशीलतेचे केंद्र आहे.
क्षमाशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती आंतरिक सामर्थ्याची, परिपक्वतेची आणि जागरूकतेची निशाणी आहे. क्षमा म्हणजे अन्यायाचे समर्थन करणे नव्हे, तर डोक्यातला भार सोडून देणे, भूतकाळातील जखमांपासून स्वतःला मुक्त करणे होय.
आज्ञा चक्रावर दोन मोठे अडथळे असतात—
अहंकार (Ego) : “मी बरोबर, तू चूक.”
प्रति अहंकार , ममत्व (Superego) : अपराधभाव, दु:ख, भूतकाळातील साठलेली वेदना.
जेव्हा आपण क्षमा करत नाही, तेव्हा हे इगो, कंडिशनिंग हे अडथळे अधिक घट्ट होतात आणि कुंडलिनीचा प्रवाह आज्ञा चक्रावर अडकतो. परिणामतः मन अस्वस्थ होते , विचार अतिरेकाकडे वळतातआणि ध्यानात अडथळे निर्माण होतात.
श्रीमाताजी स्पष्टपणे सांगतात —
“क्षमाशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे.”
क्षमा केल्याने आज्ञा चक्र तत्क्षणी मोकळे होते,इगो,सुपर इगोचा फुगा फुटतो ,कुंडलिनी सहजपणे सहस्राराकडे जाते,विचार थांबतात, निर्विचार समाधीचा अनुभव येतो,
अंतर्मन शांत, हलके व आनंदी होते.
मानसिक आरोग्यासाठी
राग, द्वेष, आकस हे दीर्घकाळ मनात साठले तर ताणतणाव, असंतोष, नैराश्य निर्माण होते. क्षमा ही यावरचे नैसर्गिक औषध आहे.
क्षमाशील व्यक्ती सहजपणे साक्षीभावात स्थिर राहते. क्षमेमुळे नाती तुटत नाहीत; ती अधिक परिपक्व व नि:स्वार्थ होतात.
जिथे क्षमा आहे तिथे संघर्ष टिकत नाही. वैयक्तिक क्षमा हीच सामाजिक शांतीची बीजं पेरते.
क्षमेशिवाय ध्यान खोल जात नाही,
क्षमेशिवाय आत्मसाक्षात्कार स्थिर राहत नाही,
क्षमेशिवाय सहज आनंदाचा अनुभव क्षणिक ठरतो.
म्हणूनच आज्ञा चक्राच्या शुद्धीकरणासाठी सहजयोगात प्रथमच सांगितले जाते : म्हणा
“मी सर्वांना मनापासून क्षमा केली आहे .”आणि "हे परमेश्वरा,माझ्याकडून कळत ,नकळत , जाणते, अजाणतेपणी ज्या चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा कर."
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.