चार वेद- थोडक्यात सोपी ओळख आणि वेद व सहजयोग संबंध.
वेद म्हणजे “ज्ञान” (संस्कृत: विद् = जाणणे).
वेद हे मानवजातीचे सर्वात प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ मानले जातात.
चार वेद आहेत:
१)ऋग्वेद
२)यजुर्वेद
३)सामवेद
४)अथर्ववेद
१) ऋग्वेद (Rigveda)
हा सर्वात प्राचीन वेद आहे.
याचा मुख्य विषय आहे :
-देवतांची स्तुती (इंद्र, -अग्नी, वरुण,इ.).
-सृष्टीचे रहस्य.
-जीवन आणि निसर्ग.
स्वरूप:
१० मंडल (chapters),
सुमारे १०,५८० मंत्र.
वैशिष्ट्य:
“ज्ञान आणि काव्य” यांचा संगम,
आध्यात्मिक विचारांची सुरुवात इथून होते.
उदाहरण:
“एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति”
(सत्य एक आहे, पण ज्ञानी त्याला अनेक नावांनी ओळखतात.)
२) यजुर्वेद (Yajurveda)
हा कर्मकांड आणि यज्ञांचा वेद आहे.
याचा मुख्य विषय आहे:
-यज्ञ कसे करावे?
-विधी, नियम, मंत्र.
याचे दोन प्रकार आहेत :
१)शुक्ल यजुर्वेद (स्पष्ट, व्यवस्थित).
२)कृष्ण यजुर्वेद (मिश्र स्वरूप).
वैशिष्ट्य:
“कर्मयोग” ची पायाभरणी
कृतीतून शुद्धी.
साधा अर्थ: “योग्य कृती म्हणजेच पूजा.”
३) सामवेद (Samaveda)
हा संगीताचा वेद आहे.
याचा मुख्य विषय आहे :
-मंत्रांचे “गायन”
-संगीताच्या स्वरात उपासना.
वैशिष्ट्य:
भारतीय संगीताची मुळे इथे या वेदात आहेत.
बहुतेक मंत्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत.
साधा अर्थ: “भक्ती + संगीत = आत्मानुभव.”
४) अथर्ववेद (Atharvaveda)
हा जीवनोपयोगी वेद आहे.
मुख्य विषय:
-आरोग्य, औषध.
-गृहजीवन, समाज.
-मन, ऊर्जा, संरक्षण.
वैशिष्ट्य:
सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित
आध्यात्मिक + व्यावहारिक ज्ञान.
साधा अर्थ: “दैनंदिन जीवनात आध्यात्म महत्वाचे आहे .”
प्रत्येक वेदात वेदाचे चार भाग आहेत.
प्रत्येक वेद चार स्तरांमध्ये समजला जातो:
१) संहिता-
मंत्र आणि स्तोत्रे.
२) ब्राह्मण-
विधी आणि यज्ञांचे स्पष्टीकरण.
३) आरण्यक-
ध्यान आणि अंतर्मुखता.
४) उपनिषद-
“मी कोण आहे?” याचे उत्तर
आत्मा आणि ब्रह्म यांचे ज्ञान.
वेदांचा मुख्य संदेश (सार)-
१. सत्य एक आहे.
२. आत्मा अमर आहे.
३. कर्म महत्वाचे आहे.
४. ज्ञान आणि ध्यान आवश्यक आहे.
५. “तत्त्वमसि” – तूच परमसत्य आहेस.
शेवटचा सार
ऋग्वेद = ज्ञान
यजुर्वेद = कर्म
सामवेद = भक्ति
अथर्ववेद = जीवन
आणि हे चार मिळून: “पूर्ण जीवनाचा आध्यात्मिक अर्थ ” तयार करतात.
सहजयोग्यांसाठी महत्वाचे -
*वेद आणि सहजयोग – यामधील मूलभूत संबंध काय आहे.*
वेद हे “सिद्धांत” (Theory) आहेत.
तर सहजयोग हा “अनुभव” (Experience) आहे.
म्हणजेच: वेद सांगतात काय आहे.
आणि सहजयोग दाखवतो ते कसे अनुभवायचे.
१) वेदांतील “आत्मज्ञान” आणि सहजयोगातील " आत्मसाक्षात्कार "
वेदांचा मुख्य प्रश्न आहे: “मी कोण आहे?” (कोहं?)
याचे उत्तर उपनिषदांत दिले आहे ते खालीलप्रमाणे : “तत्त्वमसि” – तूच ते परमसत्य आहेस.
सहजयोगात: आपण “Self Realization” (आत्मसाक्षात्कार) अनुभवतो.
कुंडलिनी जागृतीमुळे “मी आत्मा आहे.” याची जाणीव होते.
म्हणजेच : वेदांचे ज्ञानाचा सहजयोगात प्रत्यक्ष अनुभव येतो .
२) वेद आणि कुंडलिनी शक्ती.
वेदांमध्ये “आदिशक्ति” किंवा “दिव्य ऊर्जा” याचा उल्लेख आहे.
उदाहरण:
ऋग्वेदात “शक्ति” आणि “अग्नि” यांचा उल्लेख आहे.
सहजयोगात: हीच शक्ति = कुंडलिनी जी मणक्याच्या तळाशी सुप्त अस्वस्थेत असते.
कुंडलिनी जागृती झाल्यावर:
चैतन्य लहरींचा (vibrations) अनुभव येतो.
चक्र शुद्ध होतात.
आत्मसाक्षात्कार होतो.
३) सामवेद आणि ध्यान-
सामवेद म्हणतो: संगीत आणि स्वरातून ईश्वराशी एकरूप व्हा.
सहजयोगात: भारतीय शास्त्रीय संगीत, भजन, नाद, संतुलन,चैतन्य आहे.
ध्यानात “अनाहत नादचा” अनुभव येतो.
म्हणजे: सामवेद = भारतीय शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून ध्यानाचा अनुभव घेणे.
४) यज्ञ आणि सहजयोग-
यजुर्वेदात: यज्ञ म्हणजे शुद्धीकरण प्रक्रिया
सहजयोगात:
हवन विधी केला जातो .
“अंतर्गत यज्ञ” (Inner purification)
उदा: चक्र शुद्धीसाठी संतुलन,ध्यान,
पूजा, केली जाते.
तमो,रजो गुणातील
दोषांचा त्याग केला जातो.
अहंकार व कंडिशनिंग कमी होते .
म्हणजे: यज्ञ = अंतर्मन शुद्धी.
५) अथर्ववेद आणि जीवन.
अथर्ववेद: आरोग्य, मन, ऊर्जा, संरक्षण.
सहजयोगात: ध्यान द्वारा :
आरोग्य सुधारणा
मानसिक शांतता
बौद्धिक सुधारणा
आध्यात्मिक उन्नती होते.
म्हणजे: आध्यात्म + दैनंदिन जीवन = एकत्र जोडले जाते.
६) वेदातील “चैतन्य” आणि सहजयोग.
वेद: सर्वत्र “चैतन्य” (Divine consciousness)
सहजयोग:हातावर, टाळूवर थंड चैतन्य लहरीं जाणवतात.
म्हणजे: “चैतन्य” आता अनुभवण्याजोगे होते.
अंतिम सार-
वेद म्हणतात:
“तू परमात्म्याचा अंश आहेस.”
सहजयोग आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे हा अनुभव देतो:
“होय, मी तेच आहे.”
परम पूज्य श्री माताजी म्हणतात ब्राम्हण म्हणजे ज्याने ब्रह्म जाणले आहे तो. सहजयोगामुळे सहजयोग्यांना हे ब्रह्म ज्ञान अगदी सहज मिळालेले आहे.
जय श्री माताजी!
संकलन,संपादन ...
योगीराज देवकर.