Sunday, 16 August 2026

चार वेद आणि सहजयोग

चार वेद- थोडक्यात सोपी ओळख आणि वेद व सहजयोग संबंध.

वेद म्हणजे “ज्ञान” (संस्कृत: विद् = जाणणे).

वेद हे मानवजातीचे सर्वात प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ मानले जातात.

चार वेद आहेत:

१)ऋग्वेद

२)यजुर्वेद

३)सामवेद

४)अथर्ववेद


१) ऋग्वेद (Rigveda)

हा सर्वात प्राचीन वेद आहे.

याचा मुख्य विषय आहे :

-देवतांची स्तुती (इंद्र, -अग्नी, वरुण,इ.).

-सृष्टीचे रहस्य.

-जीवन आणि निसर्ग.

स्वरूप:

१० मंडल (chapters),

सुमारे १०,५८० मंत्र.

वैशिष्ट्य:

“ज्ञान आणि काव्य” यांचा संगम,

आध्यात्मिक विचारांची सुरुवात इथून होते.

उदाहरण:

“एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति”

(सत्य एक आहे, पण ज्ञानी त्याला अनेक नावांनी ओळखतात.)


२) यजुर्वेद (Yajurveda)

हा कर्मकांड आणि यज्ञांचा वेद आहे.

याचा मुख्य विषय आहे:

-यज्ञ कसे करावे?

-विधी, नियम, मंत्र.

याचे दोन प्रकार आहेत :

१)शुक्ल यजुर्वेद (स्पष्ट, व्यवस्थित).

२)कृष्ण यजुर्वेद (मिश्र स्वरूप).

वैशिष्ट्य:

“कर्मयोग” ची पायाभरणी

कृतीतून शुद्धी.

साधा अर्थ: “योग्य कृती म्हणजेच पूजा.”


३) सामवेद (Samaveda)

हा  संगीताचा वेद आहे.

याचा मुख्य विषय आहे :

-मंत्रांचे “गायन”

-संगीताच्या स्वरात उपासना.

वैशिष्ट्य:

भारतीय संगीताची मुळे इथे या वेदात आहेत.

बहुतेक मंत्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत.

साधा अर्थ: “भक्ती + संगीत = आत्मानुभव.”


४) अथर्ववेद (Atharvaveda)

हा जीवनोपयोगी वेद आहे.

मुख्य विषय:

-आरोग्य, औषध.

-गृहजीवन, समाज.

-मन, ऊर्जा, संरक्षण.

वैशिष्ट्य:

सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित

आध्यात्मिक + व्यावहारिक ज्ञान.

साधा अर्थ: “दैनंदिन जीवनात आध्यात्म महत्वाचे आहे .”


प्रत्येक वेदात वेदाचे चार भाग आहेत.

प्रत्येक वेद चार स्तरांमध्ये समजला जातो:

१) संहिता-

मंत्र आणि स्तोत्रे.

२) ब्राह्मण-

विधी आणि यज्ञांचे स्पष्टीकरण.

३) आरण्यक-

ध्यान आणि अंतर्मुखता.

४) उपनिषद-

“मी कोण आहे?” याचे उत्तर

आत्मा आणि ब्रह्म यांचे ज्ञान.


वेदांचा मुख्य संदेश (सार)-

१. सत्य एक आहे.

२. आत्मा अमर आहे.

३. कर्म महत्वाचे आहे.

४. ज्ञान आणि ध्यान आवश्यक आहे.

५. “तत्त्वमसि” – तूच परमसत्य आहेस.


शेवटचा सार

ऋग्वेद = ज्ञान

यजुर्वेद = कर्म

सामवेद = भक्ति

अथर्ववेद = जीवन

आणि हे चार मिळून:  “पूर्ण जीवनाचा आध्यात्मिक अर्थ ” तयार करतात.


सहजयोग्यांसाठी महत्वाचे -

*वेद आणि सहजयोग – यामधील मूलभूत संबंध काय आहे.*


वेद हे “सिद्धांत” (Theory) आहेत.

तर सहजयोग हा “अनुभव” (Experience) आहे.


म्हणजेच: वेद सांगतात काय आहे.

आणि सहजयोग दाखवतो ते कसे अनुभवायचे.

१) वेदांतील “आत्मज्ञान” आणि सहजयोगातील " आत्मसाक्षात्कार "

वेदांचा मुख्य प्रश्न आहे: “मी कोण आहे?” (कोहं?)

याचे उत्तर उपनिषदांत दिले आहे ते खालीलप्रमाणे :  “तत्त्वमसि” – तूच ते परमसत्य आहेस.


सहजयोगात: आपण “Self Realization” (आत्मसाक्षात्कार) अनुभवतो.

कुंडलिनी जागृतीमुळे “मी आत्मा आहे.” याची जाणीव होते.


म्हणजेच : वेदांचे ज्ञानाचा सहजयोगात प्रत्यक्ष अनुभव येतो .


२) वेद आणि कुंडलिनी शक्ती.

वेदांमध्ये “आदिशक्ति” किंवा “दिव्य ऊर्जा” याचा उल्लेख आहे.

उदाहरण:

ऋग्वेदात “शक्ति” आणि “अग्नि” यांचा उल्लेख आहे.


सहजयोगात: हीच शक्ति = कुंडलिनी जी मणक्याच्या तळाशी सुप्त अस्वस्थेत असते.

कुंडलिनी जागृती झाल्यावर:

चैतन्य लहरींचा (vibrations) अनुभव येतो.

चक्र शुद्ध होतात.

आत्मसाक्षात्कार होतो.


३) सामवेद आणि ध्यान-

सामवेद म्हणतो:  संगीत आणि स्वरातून ईश्वराशी एकरूप व्हा.

सहजयोगात: भारतीय शास्त्रीय संगीत, भजन, नाद, संतुलन,चैतन्य आहे.

ध्यानात “अनाहत नादचा” अनुभव येतो.

म्हणजे: सामवेद = भारतीय शास्त्रीय संगीताच्या  माध्यमातून ध्यानाचा अनुभव घेणे.


४) यज्ञ आणि सहजयोग-

यजुर्वेदात: यज्ञ म्हणजे शुद्धीकरण प्रक्रिया

सहजयोगात:

हवन विधी केला जातो .

“अंतर्गत यज्ञ” (Inner purification)

उदा: चक्र शुद्धीसाठी संतुलन,ध्यान,

पूजा, केली जाते.

तमो,रजो गुणातील 

दोषांचा त्याग केला जातो.

अहंकार व कंडिशनिंग कमी होते .

म्हणजे: यज्ञ = अंतर्मन शुद्धी.


५) अथर्ववेद आणि जीवन.

अथर्ववेद: आरोग्य, मन, ऊर्जा, संरक्षण.

सहजयोगात: ध्यान द्वारा :

आरोग्य सुधारणा

मानसिक शांतता

बौद्धिक सुधारणा

आध्यात्मिक उन्नती होते.

म्हणजे: आध्यात्म + दैनंदिन जीवन = एकत्र जोडले जाते.


६) वेदातील “चैतन्य” आणि सहजयोग.

वेद: सर्वत्र “चैतन्य” (Divine consciousness)

सहजयोग:हातावर, टाळूवर थंड चैतन्य लहरीं जाणवतात.


म्हणजे: “चैतन्य” आता अनुभवण्याजोगे होते.


अंतिम सार-

वेद म्हणतात:

“तू परमात्म्याचा अंश आहेस.”

सहजयोग आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे हा अनुभव देतो:

“होय, मी तेच आहे.”


परम पूज्य श्री माताजी म्हणतात ब्राम्हण म्हणजे ज्याने ब्रह्म जाणले आहे तो. सहजयोगामुळे सहजयोग्यांना हे ब्रह्म ज्ञान अगदी सहज मिळालेले आहे.


जय श्री माताजी!

संकलन,संपादन ...

योगीराज देवकर.

सुशिक्षित ते निवृत्त - एक अनुभव

 सुशिक्षित ते निवृत्त - एक अनुभव .


व्यक्ती पदवीधारक ,उच्च पदवीधारक अगदी डॉक्टरेट होऊन एकतर रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची पात्रता निर्माण करतो. पात्रतेच्या निकषांच्या आधारावर त्याला नोकरी मिळते. नोकरीला फक्त इतकेच पुरेसे नसते. मग तो एम्प्लॉयर प्रोबेशन पिरियड मध्ये या व्यक्तीला जॉब संबंधित प्रशिक्षण देतो,ठराविक कालावधीसाठी वरिष्ठांच्या हाताखाली काम करायला लावतो. हा त्याचा उमेदवारीचा काळ असतो. व्यक्ती इंडिपेंडंटली काम करू शकेल अशी खात्री पटली की, ज्युनियर लेवलवर इंडिपेंडंट जबाबदारी देऊन काम सुरू होते. 


काहीच बदलांना सामोरे जाणाऱ्या किंवा सतत सुधारणा होत असलेल्या ऑर्गनायझेशन्सचा अपवाद वगळला तर बहुतेक व्यक्ती प्रोबेशन आणि सुरुवातीच्या पहिल्या वर्षात जे शिकलेले असतात तेच निवृत होईपर्यंत करत असतात. थोडक्यात त्यांचा अनुभव असतो पहिल्याच वर्षाचा निवृत होईपर्यंत तो चौतीस, पस्तीस वेळा रिपीट झालेला असतो ,पण ते मात्र फुशारकी मारत असतात,मला इतक्या,इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव आहे. 


केवळ म्हणायला आणि दाखवायला एम्प्लॉयरला सगळे अधिकारी,

कर्मचारी सारखेच असतात.पण त्यातले साधारणपणे वीस टक्के जास्त सारखे असतात.जास्त पात्र किंवा योग्य असतात. हेच ते वीस टक्के कर्मचारी असतात जे ऑर्गनायझेशनचे ८०  टक्के काम करत असतात, उरलेले ८० टक्के कर्मचारी २० टक्के काम करतात. बहुतेक संस्थेत असे अगदी Pareto Principle ला साजेसे घडत असते.


संस्थेच्या धोरणानुसार एम्प्लॉयर जॉबमधे अधिक सक्षम व्हायची संधी सर्वांनाच देतो पण जेव्हा त्याच्या लक्षात येते की,काही व्यक्ती प्रशिक्षणासाठी पाठविल्यावर फक्त वजन वाढवून परत येत आहेत तेव्हा तो विशेषतः ज्ञान वाढवून येणाऱ्या या वीस टक्के एम्प्लॉयीजची पात्रता वाढविण्याचा प्रयत्न करतो.  ऑर्गनायझेशन मध्ये नवीन शिकण्याची, प्रश्न सोडवायची , प्रयोग करायची, आहे त्यापेक्षा अधिक चांगले काम करायची , रिझल्ट प्रोड्युस करायची आणि विशेषतः संस्थेच्या बाहेरील आणि आतील ग्राहकास खूष करायची  आवड असणारे काही कर्मचारी असतात.अशा कर्मचाऱ्यांना संस्था 

स्थानिक, राज्य,देश विदेशात प्रशिक्षणाची संधी देते. यातले दोन,चार टक्के लोकं ऑर्गनायझेशन मध्ये त्यांच्या विषयातील तज्ञ बनतात,त्यातील काहींना 

तर त्या विषयाचे विस्डम प्राप्त होते.


एखाद्या कर्मचाऱ्याला असे हे विस्डम सहजासहजी  प्राप्त होत नसते . 


या विस्डोमिस्ट लोकांना आयुष्यात बराच त्याग करावा लागतो.कुटुंब,घर, 

नातेवाईक,सण समारंभ,मौजमजा, इत्यादीकडे दुर्लक्ष होणे, मुलांना वेळ देता न येणे, खूप प्रवास करावा लागणे,१० ते ६ नव्हे तर तहान - भूक विसरून दिवसाचे कितीही तास झोकून दिल्यासारखे काम करणे, नवीन शिक्षण,प्रशिक्षण, वाचन,मनन,चिंतन, अभ्यास, लिखाण, जे शिकलोय त्याचा प्रभावी वापर , सतत नंबर गेम मध्ये टिकून राहण्यासाठी वेळ,पैसे,श्रम खर्च करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष होणे, स्वतःची मते बाजूला ठेवून संस्थेच्या ध्येय धोरणांना पाठिंबा देणे,  हे आणि असे कितीतरी त्याग कळत ,न कळत झालेले असतात.


आता तुम्ही संस्थेत वरिष्ठ असता. हा तुमचा भरभराटीचा काळ असतो. तुम्हाला संस्थेत आणि संस्थे बाहेरही मान,सन्मान असतो. तुमचं आयुष्य म्हणजे संस्थेने नेमून दिलेले आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त काम करणे, निमंत्रणे, मार्गदर्शन,हार,तुरे,शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, पुरस्कार,ऑटोग्राफ,फोटो, बातम्या, आज या पंचतारांकित हॉटेलमध्ये तर उद्या त्या मध्ये सेमिनार अटेंड करायचे योग येत  असतात. संस्था तुमच्यावर खर्च करते कारण त्याच पटीत तुम्ही त्यांचा लाभ करून देत असता.


जसेकाही तुम्हीच या संस्थेचे प्रमुख आहात आणि राज्याच्या,देशाच्या विकासाची जबाबदारी तुमच्याच खांद्यावर आहे अशा थाटात तुम्ही वागत असता. चौतीस, पस्तीस वर्षापूर्वी पेटविलेल्या या खोंडाला वयाची अठ्ठावणं वर्षे कधी पूर्ण होतात ते समजत पण नाही. संस्थेत तुमचा औपचारिक निरोप समारंभ होतो. तुम्ही कसे श्रेष्ठ आहात,मार्गदर्शक,

गुरु आहात असे भाग्याचे बोल ऐकायला मिळतात आणि तुम्ही घरी जाता,ते उद्यापासून पुन्हा या संस्थेत परत यायचे नाही त्यासाठी. 


पुढचे काही महिने तरी तुम्हाला तुम्ही संस्थेचे काम करत असल्याची स्वप्न पडतात. स्वप्नातच तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो त्यामुळे खुष होत असता. थोड्याच दिवसात तुमच्या हे लक्षात येते की,विषयातला तज्ञ, विस्डोमिस्ट हे सगळं त्या संस्थेपुरते मर्यादित होते. बाहेरच्या जगात याला फारसी किंमत नाही. 


आता तुम्हाला पटते की, एकाच विषयाचा तज्ञ असून काही उपयोग नाही. तुम्ही चार,पाच विषयातले तज्ञ असायला पाहिजे होते. एकापेक्षा जास्त कामांसाठी पात्र असायला पाहिजे होते म्हणजे तुम्हाला अजूनही बिझी राहायला वाव मिळाला असता. काहीतरी इन्कम सोर्स सुरू राहिला असता.  मग काय शोधून काढायचे अर्थवट राहिलेले छंद आणि गुंतवून ठेवायचे स्वतःला त्यात. 


आता तुमच्या घरात नव्या पिढीचा उदय झालेला असतो. एका बाजूला त्यांना त्यांची स्पेस निर्माण करायची असते. त्यांना स्वतःला स्पेस हवी असते आणि तुमची स्पेस कमी ,कमी होत जाते. इतकी की,तुमची लायब्ररी,तुमचे  मोमेंटोज,पुरस्कार घरात एक समृद्ध अडगळ होते.  तुम्ही कितीही अजून जेष्ठ नागरिक झालो नाही, फिट अँड फाइन आहात असा प्रयत्न केला तरी लोकं तुम्हाला पदोपदी हे जाणून देतात की,तुम्ही आता इतिहास झाले . 


भारतात राहून आपण नुसत्याच जपानच्या ' इकीगाई ' च्या गप्पा मारायच्या आणि ज्येष्ठांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि मनुष्य संसाधनांचा उपयोग नाही करायचा जे विसंगत वाटते.


योगीराज देवकर.