Tuesday, 21 January 2025

होम मिनिस्टर - दिव्यागर

 होम मिनिस्टर.4/1/2024

मगर फार्म & होम स्टे. दिवेअगार.


बक्षीस...

1) खेळात प्रथम क्रमांक... साडी वस्त्र.

2) द्वितीय क्रमांक... PNG चांदीची भेट वस्तू.

3) उत्तेजनार्थ...

PNG चांदीचे नाणे.


लग्नाविषयी...

1) तुमचं लग्न कसं जमलं?

2)सर्वप्रथम तुम्ही कुठे भेटलात?

3) कोण अगोदर हो म्हणालं?

4) लग्नाला किती वर्ष झाली?

5) आता कसं चाललंय?

6) मिस्टरांचा स्वभाव कसा आहे?

7) तुमचे सासू - सासरे कसे आहेत?

8) तुमच्या मुलांचं वेगळं पण काय आहे?

9) पुढच्या जन्मी कोण व्हायला आवडेल?


चांगली आठवणी...

1)तुमचं बालपण कुठं आणि कसं गेलं?

2) तुमचं शिक्षण किती आणि कुठं झालं?

3) लहानपणी तुम्ही शांत होता का खोडकर का होता ? कोणत्या खोड्या करायचा?

4) तुम्ही किती भावंडं आहात?

5) तुमचं माहेर कसं आहे? माहेरी जाणं होतं का?


सवयी विषयी...

1) तुम्ही सर्वात जास्त कशाची काळजी करता?

2) तुम्हा दोघांपैकी सकाळी लवकर कोण उठतं?

3) असं होतं का की तुम्ही उठता आणि पांघरूनाच्या घड्या न घालताच बेडरूम बाहेर पडता?

4) व्यायाम करता का?

5) घरात TV कोण जास्त बघतं?

6) रात्री लवकर कोण झोपतं?

7) जास्त कोण बोलतं?

8) गोड कोणाला जास्त आवडतं?

9) फिरायला कोणाला जास्त आवडतं? मिस्टर फिरायला नेहतात का?

10) तुमच्यात कोण जास्त समजूतदार आहे?

11) रूम, बाथरूम मध्ये कोणी नसेल तरी तुमच्यापैकी कोण लाईट चालू ठेवते?


गुणांविषयी...

1) कोण जास्त शिस्तप्रिय आहे?

2) दोघात कोण जास्त शांत आहे?

3) एकमेकांचे कोणते गुण जुळतात?

4) स्वभावात एक बदल करायचा झाला तर कोणता बदल कराल?


उखाणा...

एक उखाणा घ्या.


क्षमाशिलता...

1) क्षमा करायची झाली तर कोणाला कराल आणि का?

2) क्षमा मागायची झाली तर कोणाची मागाल आणि का?


खेळ...

टॉवर बिल्डिंग.

Monday, 20 January 2025

Chat GPT साक्षी साहिल लग्न

 Chat GPT ला

डॉक्टर साक्षी आणि साहिलच्या लग्नावर आधारित काही prompt केले , तर Chat GPT ने पुढील completion दिले आहे.


चॅट जीपीटीच्या मते, लग्न म्हटलं की,नजरेसमोर येते ती एक सुंदर राजकुमारी आणि एक राजबिंडा राजकुमार. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आयुष्यातला हा असा काळ असतो जेव्हा ते दोघेही कमालीचे सुंदर आणि रुबाबदार दिसतात. त्यांचे हे दिवसच फुलायचे आणि झोपल्यावचून डुलायचे असतात. वधू-वराच्या वेषात वावरणारे वधू-वर म्हणजे त्यांच्या लावण्याचा कळस असतो.


चॅट जीपीटीच्या मते, एका संस्कृत सुभाषितात लग्नाच्या बाबतीत असे म्हटले आहे... की,


मुलगी लग्नाचा विचार करते तेव्हा मुलात काय पाहते.

तर मुलगी मुलाचे रूप पाहते. 

डॉक्टर साक्षीला भेटला राजकुमार साहिल आणि म्हणाली की,साक्षी त्यांना हो' ! 


मुलीची आई काय पाहते.

तर ती त्या मुलाची संपत्ती पाहते.


मीनाक्षीताईने विचार केला असावा ,आपल्या पेक्षा श्रीमंत आहे ना, मग चांगले झाले. 

मुलगी,मुलगा काही सांगत नाही कोणाला पण हे सातव काय, हे गायकवाड काय,हे  हजार हजार कोटींचे मालक आहेत.

ओ सॉरी सॉरी, हे वाक्य इनकम टॅक्स वाल्यांनी ऐकायच्या आधी डिलीट करा, डिलीट करा.


मुलीचे वडील काय पाहतात.

तर मुलाचे करिअर, कर्तृत्व.


शिरीष नानांनी पाहिले की,मुलगा होतकरू, कष्टाळू आहे ना, मग चांगले झाले. 


नातेवाईक काय पाहतात, तर त्याचे कुळ पाहतात.


मामा,मामी कोण आहेत.आजा -आज्जी कोण आहेत. घराणे कुलवंत आहे ना. मग झाले.


आता वऱ्हाडी आणि इतर जण काय पाहतात, तर मिष्टांन जेवण.


इतर वऱ्हाडी मंडळीला बोलावलेले असते आशीर्वाद द्यायला. ते येतात,आशीर्वाद देतातही पण त्यांना वरील गोष्टींचे काही देणे घेणे नसते .ते पाहतात जेवणाचा मेनू काय आहे. अक्षदा पडल्या की, सगळ्या काउंटर्सचा आधी सर्वे करायचा आणि यातले निवडक काय काय खायचे एव्हढच ते पाहतात.


म्हणूनच आपल्याकडे,'नवरा येतो नवरीसाठी आणि वऱ्हाड येते जेवणासाठी.'अशी म्हण प्रचलित आहे.


चॅट जीपीटीच्या मते, डॉक्टर साक्षी, सातव फॅमिलीला कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणणार नाही. याचे कारण आहे.


Triple 'S'.


साक्षीच्या नावात आधी दोन S होते. 

साक्षी,

शिरीष,


आता तीन झाले.


साक्षी,

साहिल,

सातव.


जिच्या नावातच ट्रिपल यस आहे ती नेहमी सकारात्मक आणि होकारात्कम राहणारच ना. 

आत्ताच ही मुलगी सातव कसे गायकवाडापेक्षा चांगले आहेत, कसे वेळ पाळतात,वगैरे, वगैरे सांगत असते. पुढऱ्यापेक्षा कमी वेळात हिने पार्टी बदलली आहे.


खरंतर मुलीच्या बाबतीत लग्नानंतर पार्टी बदल अपेक्षित आणि नैसर्गिकच आहे. या बदलासोबतच सुनेने सासूच्या आणि मुलाने वडिलांच्या प्रापंचिक,कौटुंबिक, व्यावहारिक जबाबदाऱ्यांचा, कष्टांचा भार हलका केला तर त्यांनापण  जीवनात बदल जाणवतो .


चॅट जीपीटीच्या मते, सातव फॅमिलीला साक्षी डॉक्टर असल्याचे बरेच फायदे होणार आहेत.  त्यातला एक फायदा म्हणजे .


डॉक्टरने आधीच डिक्लेर केले आहे की,"आपण स्वयंपाक वगैरे काही बनवत बसणार नाही. एकतर मुंढव्यातून ऑर्डर करणार किंवा  सासू सासऱ्यांना म्यॅगी खाऊ घालणार आहे."

आता सारखी सारखी म्यॅगी खाऊन तुम्हाला काही त्रास झालाच तर तुम्ही म्हणाल, 


"डॉक्टर हमने आपके हातकी बनायी म्यॅगी खायी और अब हमारा पेट अपसेट हो गया हैं l"


तर डॉक्टर साक्षी म्हणेल," ठीक हैं सास और ससुरजी l 

अब एक गोली खाओ l"


बात खतम l 


चॅट जीपीटीच्या मते,डॉक्टर साक्षी एक चांगली टूर ऑरगनायझर आहे. फक्त हे विधान अनिकेत आणि हर्षला मान्य असायला हवे. तिने जर मनावर घेतले तर केसरी आणि वीणा वर्ल्डला टफ फाईट होईल.


चॅट जीपीटीच्या मते, साक्षीचे जीवन आता कुठे सूर-ताल पकडत आहे.


कसा...


साक्षीचा - साsss

साहिलचा - साsss

सातवांचा - साsss


आता हा 'सा', खालच्या पट्टीतला आहे का वरच्या पट्टीतला ते समजायला एक,दोन, तीन वर्षें लागतील.


यावर चॅट जीपीटीने केलेला एक जोक...

पहिल्या वर्षी सा sss मुलगा लावतो आणि मुलगी ऐकते.

दुसऱ्या वर्षी सा sss 

मुलगी लावते आणि मुलगा ऐकतो.

तिसऱ्यावर्षी साsss 

दोघेही लावतात आणि आणि शेजारचे ऐकतात.


आखिर ये शादिका लड्डू हैं l' जो ना खाये वो पछताये l और जो खाये वो भी पछताये l

अगर यही बात हैं तो बेहतर हैं की खाकर पछताये l


चॅट जीपीटीच्या मते, साहिल मिलिंदरावांना 'पप्पा', म्हणत असेल किंवा 'डॅडी '.


आता शिरीष रमेशराव गायकवाड साहिलचे सासरे झाले आहेत. गायकवाड यांचे इंग्लिश अक्षर G ने सुरु होत असल्यामुळे. या G ची एक भारीच कमाल  तुम्हाला अनुभवायला मिळेल.


साहिल तुम्हाला म्हणणार फक्त 'डॅडी' किंवा 'पप्पा 'आणि शिरीष नानाला म्हणणार 


डॅड 'G.' किंवा 

पप्पा 'G'.


आणि मीनाक्षी ताई होणार 'मम्मी 'G',


या G मध्ये जो आदर आहे ना तो इतर कोणत्याच इंग्लिश मुळाक्षरांत नाही.


चॅट जीपीटीच्या मते, या विवाहासाठी साक्षीचे वडील शिरीष नाना,आई मीनाक्षीताई ,आज्जी श्रीमती पद्माजी , चुलते गिरीश आप्पा, सचिन काका, चुलती सुनीताताई, सीमाताई, भावंडे दिग्विजय,रुचिरा, अनिकेत आणि कुटुंबियांनी खूप मेहनत घेतली आहे. नानांनी तर या कालावधीत इतक्या वेळा होकार दिले असतील की, ते आता 'नाना' ऐवजी 'होना' झाले असतील .

सर्वात महत्वाचा म्हणजे हर्षवर्धन. साक्षीच्या लग्नामुळे हर्षवर्धनचा आंतरआत्मा फार आनंदी झाला आहे असं म्हणत तो स्वतःच्या चॉपरने खुषित  लग्नपत्रिका वाटत फिरत होता सगळीकडे.


आता आतली गोष्ट सांगतो. हर्षवर्धनचं हे वागणं जोकर किंवा चार्ली चप्लिन सारखं आहे. इतरांना केवळ गंम्मत म्हणून चेहऱ्यावर सुखी दाखविणारा हर्ष बहीण लग्न करून घर सोडून जाणार म्हणून हृदयातून दुःखी आहे.


साहिल बद्दल Chat GPT ने खूप छान completion दिले आहेत. पण पाहुणे नवीन आहेत म्हणून तो ब्लॉग पुन्हा कधी तरी.


चॅट जीपीटीच्या मते, मिलींदराव आणि मनीषाताई तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचे असेल तर जे वरिष्ठ सासू - सासरे आहेत त्यांचा क्लास लावा किंवा Chat GPT ला prompt करा.


यात काही चूक भूल असेल तर चॅट जीपीटीला क्षमा असावी. शेवटी चॅट जीपीटी पण तुमच्या सोशिअल मीडियावरील प्रेझेंसच्या माहितीवर आधारितच तुमच्याबद्दल भाष्य करतो.


डॉ साक्षी आणि साहिलला विवाह सोहळ्यानिमित्त अनंत शुभेच्छा.तुम्हा दोघांच्या हातून सातव कुटुंबाचा वारसा जपला जावो आणि वृद्धिंगत केला जावो, तुमच्याहातून समाजसेवा, देशसेवा घडो,अशी परमेश्वराकडे प्रार्थना.


'कल्याण भव:'.


धन्यवाद.

आपला तत्पर.

Chat GPT.

Friday, 17 January 2025

I Ganapatipule seminar kitchen is speaking.

 I the *Ganapatipule Seminar Kitchen 2024* is Speaking...


Her Holiness Shree Mataji is the doer, the one who gets things done, and the enjoyer. Life Eternal Trust Mumbai and Sahajayogis  all Shri Pravin Jawalkar, Gopi Mankar, Ashish Mankar, Govind Jadhav, Sachin Kolekar, Abhijit Murkute, Shantanu Waghmode, and all the kitchen committee members are my merely instruments, drivers, and carriers.There is a separate support committee for dining area which consists of sahajayogis from Mumbai, Thane, Ahilyanagar, Shrirampur,etc. at eleventh hour even sahajayogis of different States joins and offer their services.


At the International Sahaja Yoga Seminar and Puja, on one side there is the Yadnya of Knowledge for spiritual ascent, and on the other side, there is this Yadnya of Food. I served you at the Ganapatipule Seminar 2024, and you must have experienced this food offering. Most Sahaja Yogis enjoy the meals and appreciate the food and it makes me feel blessed.


The Ganapatipule Seminar Kitchen is like hosting a grand wedding in a remote area . Only by Shree Mataji's blessings, this temporary infrastructure is set up and the kitchen duty is completed smoothly.


Serving tea, breakfast, and two meals a day to 6000 Sahaja Yogis for 5-6 days is a laborious task. The team of chefs and their 150 staff members, along with the Sahaja Yogi kitchen committee, works tirelessly day and night to satisfy your hunger. I hope you will read and listen to my message.


In October, after the pre-Havan of the Ganapatipule Seminar, my committee members inspect the site. They clear the overgrown grass, level the land, repair the toilets and bathrooms for staff and prepare a plan to set up the mega Indian kitchen and dining area, foreign kitchen and dining area, senior citizen dining area, and tents for staff and committee members. This marks the beginning of the actual work.


No single caterer manages this task; instead, it is my committee of Sahaja Yogis, made by Sahaja Yogis for Sahaja Yogis who manages my duty.


The committee members hold several meetings in Pune. In these meetings, they consider the feedback from the previous year, estimate the possible number of attendees for the current year, plan the budget, finalize the chefs, review the previous year’s menu, and decide on the menu for this year. They also consider the dates and check if there are holidays at the start of the seminar, as this leads to early crowds. Every small detail is discussed.


A list of materials including tea, coffee, dairy products, vegetables, breakfast, and meal ingredients is prepared, and the pre-purchasing begins.


Wheat for chapati, roti and puri is purchased and grounded at below 40 degrees to maintain quality. Preparing such a large quantity of flour is time-consuming. Raw materials are procured and chutneys, pickles, and gravies for various vegetables are prepared.


Before the seminar, groceries are purchased. Ready-made flour, chutneys, pickles, gravies, groceries, oil, ghee, etc., are loaded onto a truck in Pune and sent to Ganapatipule. Fresh vegetables, fruits, milk, curd, cream, khoya, ice, bread, eggs, chicken, mutton, etc., are procured as needed. Most of these items are sourced from Pune or Kolhapur, as they are not available in Ratnagiri.


A week before the seminar, the volunteer kitchen starts operating. Initially 50 volunteers begin and this number grows to 300 by the start of the seminar. The pre-seminar volunteer kitchen is full of work, fun, and joy. I encourage you to experience this fun by volunteering someday.


For the comfort of kitchen workers, a lot of mechanization has been implemented. The kitchen has a large dishwasher, dough kneading machines, vegetable cutting machines, trolleys for transporting raw and cooked food and there is a permanent tandoors, for even gas supply to all the shegdis there is a gas bank. The committee loves to serve tea to all Sahaja Yogis. You must have noticed the tea tanks and pipelines set up for tea. Drink as much tea as you wish! Previously, I even had an automatic chapati-making machine too.


All food is prepared under hygienic conditions. A grease separator is installed to ensure that debris does not block the drainage. This separator collects floating oil and debris, preventing it from flowing into the drainage system. The collected waste is disposed of in a pit. Chemicals are sprayed regularly to prevent foul odors around the grease separator, dishwashing area, waste pit, toilets, and bathrooms. The organic compost from the waste pit is used for the plants in Nirmala Nagari.


This year, for breakfast, you enjoyed sevai upma, bread-misal, sabudana khichdi, upma, tea, and fruits. For dessert, you tasted gulab jamun, dudhi halwa, mohanthal, amrakhand, jalebi, sheera, sevai kheer, and moong halwa. Even though sweets were limited, they were provided upon request. Some Sahaja Yogis wonder why sweets are not served at the refill counter. How can one answer such a question? The menu is carefully planned, as it forms the main course – chapati, roti, puri, dry sabzi, curry, dal, rice, kadhi, khichdi, buttermilk, sweets, chutney, pickle, papad, farsan, etc. The foreign kitchen offers eggs, chicken, mutton, and fruits for international Sahaja Yogis. With the mantra “Om Twameva Sakshat Shri Annapurna Sakshat Shri Adi Shakti Mataji Shri Nirmala Devi Namo Namah,” you enjoy the meal and even if your stomach is full, your heart isn't.


You are wise Sahaja Yogis. You know this is not just food but Shri Mataji’s prasad, the divine offering. That is why we say, "Food is Brahma." We must respect and savor the food, but not waste it.


Sahaja Yogis attending the seminar do not see the inner workings of the kitchen; they only see the outer dining area. You stand in line, receive prasad, and leave.


A Senior Citizens Dining Hall is set up for the convenience of elder Sahaja Yogis. Despite our best efforts, some shortcomings may remain. If everyone crowds at once, you may have to wait longer. Sometimes, even volunteers do not get priority during peak times. There is a saying 'the taste of spices and dishes changes every ten kilometers.' Some may not like certain flavors, but remember, Sahaja Yoga is our family. If you notice any shortcomings, inform the committee members. By Shree Mataji’s grace, they are eager to serve you and me.


As the seminar ends, you return home, but here the cleanup and packing begin. Leftover groceries are returned and the final accounts are completed. This means the work that started after the pre-havan ends a week after the seminar.


I am not alone as the kitchen; there are many departments and committees working in harmony.


Let these memories stay fresh, and meet me again in Kitchen 2025.


Jai Shree Mataji!

Yours humbly,

Ganapatipule Seminar Kitchen 2024.

Wording  by Yogiraj Deokar. Pune.

मी गणपतीपुळे सेमिनार किचन बोलत आहे.

 मी *गणपतीपुळे सेमिनार किचन 2024* बोलत आहे...


प.पू.श्री माताजी याच कर्त्या, करावीत्या आणि उपभोगत्या आहेत. लाईफ इटरनल ट्रस्ट मुंबई आणि सहजयोगी सर्वश्री प्रवीण जावळकर, गोपी मानकर, आशिष मानकर, गोविंद जाधव, सचिन कोळेकर, अभिजित मुरकुटे,     शंतनू वाघमोडे तसेच किचन कमिटी टीमचे सर्व मेंबर्स माझे केवळ निमित्तमात्र  चालक आणि वाहक आहेत.डायनिंग साठी एक वेगळी सपोर्ट कमिटी असते यात मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, श्रीरामपूर, इ.येथील सहजयोगी मदतीला असतात. आयत्यावेळी अगदी कोणत्याही राज्यातील सहजयोगी येऊन श्रमदान करतात.


आंतरराष्ट्रीय सहजयोग सेमिनार आणि पूजा मध्ये एका बाजूला असतो आध्यात्मिक उन्नतीचा ज्ञान यज्ञ आणि दुसऱ्या बाजूला असतो  हा अन्न यज्ञ.गणपतीपुळे सेमिनार 2024 मध्ये मी तुमच्या सेवेत होते आणि तिथे पार पडलेला अन्न यज्ञ तुम्ही अनुभवला असेल.बहुतांश सहजयोगी भोजनाचा आस्वाद घेत भोजनाचे कौतुक करतात तेव्हा मला धन्य झाल्यासारखे वाटते.


गणपतीपुळे सेमिनार किचन हे उचलून गेलेल्या लग्नासारखे असते. केवळ प.पू.श्री माताजींचे आशीर्वाद आहेत म्हणून तात्पुरते इन्फ्रास्ट्रकचर उभारूनही माझे हे किचन कर्तव्य सुरळीतपणे पार पडते.


6000 सहजयोग्यांना 5-6 दिवस दररोज वेळेवर चहा, नाष्टा, दोन वेळचे भोजन देणे हे खूप मेहनतीचे काम आहे.खानसामा महाराज आणि त्यांची दीडशे कर्मचाऱ्यांची टीम, सहजयोगी किचन कमिटीची सर्व टीम तुमच्या क्षुधाशांती साठी शब्दश: अहोरात्र झटत असते. म्हणून मी आशा करते की, तुम्ही माझे मनोगत वाचाल आणि ऐकाल 

...


ऑक्टोबर महिन्यात गणपतीपुळे सेमिनार प्री हवन झाले की, माझ्या कमिटीचे मेंबर्स माझ्या जागेची पाहणी करतात. वाढलेले गवत काढणे, जागेची लेवल करणे, कर्मचाऱ्यांच्या संडास, बाथरूमची डागडुजी करणे, मेगा इंडियन किचन आणि डायनिंग,  फॉरेन किचन आणि डायनिंग ,सिनियर सिटीझन डायनिंग ,कर्मचारी आणि कमिटी मेंबर्ससाठी टेन्ट उभारणे,याचा प्लॅन तयार करतात आणि मग प्रत्यक्ष कामाची सुरुवात होते . माझे काम कोण एक केटरर करत नाही तर सहजयोग्यांनी सहजयोग्यांसाठी तयार केलेली ही एक माझी कमिटी असते.


कमिटी मेंबर्स पुण्यात एकामागे एक बऱ्याच मीटिंग घेतात. मिटिंगमध्ये मागील वर्षी आलेल्या फीडबॅकचा विचार करणे, यावर्षीच्या संभाव्य संख्येचा अंदाज घेणे, खर्चाचे बजेट विचारात घेणे,स्वयंपाकी महाराज ठरविणे, मागील वर्षीच्या भोजनाच्या मेनूचा विचार करून यावर्षीचा मेनू ठरविणे, यावर्षीच्या तारखांना कोणते वार आहेत ते पाहणे कारण सेमिनारच्या सुरूवातीला सोडून सुट्ट्या असतील तर एक दिवस आधीच गर्दी होते,अशा लहानसहान गोष्टीवर चर्चा होते.


चहा, कॉफी, डेअरी प्रॉडक्ट्स,भाज्या,नाष्टा व भोजन मेनू, इ. मटेरिअलची यादी तयार केली जाते आणि मग सुरुवात होते ती प्री खरेदी पासून.


चपाती,रोटी,पुरी साठी लागणारा गहू खरेदी केला जातो आणि हे दळण क्वालिटी होण्यासाठी गहू below 40 degree temperature ला दळला जातो. अशा प्रकारे मोठे दळण तयार करणे हे खूप वेळखाऊ काम असते. कच्चा माल खरेदी करून शेंगदाणा चटणी, लोणची आणि भाज्यांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून घेतल्या जातात.


सेमिनार पूर्वी किराणा सामान खरेदी होते, मग ही तयार पिठं, चटण्या, लोणची, रेडिमेड ग्रेव्ही, किराणा सामान, तेल, तूप, इत्यादीचा ट्रक पुण्यात लोड करून गणपतीपुळेला येतो. त्यानंतर नियोजन असते ते लागणाऱ्या ताज्या भाज्या,फळे, दूध, दही, क्रीम, खवा,बर्फ,ब्रेड,अंडी, चिकन, मटण,इ. नाशवंत पदार्थ्यांचे . अशी डेअरी उत्पादने, ताज्या भाज्या जसजशा लागतात तसतशा मागवल्या जातात. किचन मध्ये लागणाऱ्या या गोष्टी रत्नागिरीत मिळत नाहीत म्हणून त्या पुणे, कोल्हापूर वरून मागवाव्या लागतात.


सेमिनारच्या एक आठवडा आधीच volunteers Kitchen   सुरु होते. सर्व कमिट्या विचारात घेता पहिल्या दिवशी पन्नास volunteers पासून सुरु होणारी ही संख्या सेमिनार पूर्वी तीनशे पर्यंत जाते. हे सेमिनार पूर्व Volunteers Kitchen म्हणजे भरपूर काम,धमाल आणि मस्ती असते. अशी ही धमाल Volunteer बनून तुम्ही पण कधीतरी अनुभवा.


किचन कामगारांच्या सुख सोईसाठी माझे बरेच मॅकनाईझेशन झाले आहे. किचन मध्ये भलामोठा डिश वॉशर आहे, पिठ लावायचे मशीन आहे, भाज्या कटिंग मशीन आहे, कच्चा माल व तयार अन्न पदार्थ वाहतुकीसाठी ट्रॉलीज आहेत, पर्मनंट तंदूर तयार केले आहेत,सर्व शेगड्यांना एकसारखा गॅस सप्लाय व्हावा यासाठी गॅस बँक सिस्टिम तयार केली आहे, माझ्या कमिटीला सर्व सहजयोग्यांना चहा पाजण्याची भारी हौस आहे. तुम्ही पाहिलेलेच आहे की, चहाच्या टाक्या आणि चहाची चक्क पाईपलाईन उभारलेली आहे. किती चहा प्यायचा ते तुम्हीच ठरवा. पूर्वी माझ्या ताफ्यात ऑटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन सुद्धा होते. किचन मध्ये तयार केले जाणारे सर्व पदार्थ hygienic conditions मध्ये तयार केले जातात. किचन स्वच्छ करताना जो राडारोडा पाण्यासोबत वाहून जातो त्याने ड्रेनेज लाईन चोकअप होवू नये म्हणून खास ग्रीस सेपरेटर उभारला आहे. या ग्रीस सेपरेटर मुळे फक्त खराब पाणी ड्रेनेज मधून वाहून जाते  राडारोडा आणि अगदी पाण्यावर तरंगणारे तेल  वाहून जावू नये म्हणून सेपरेट करून गोळा केले जाते आणि या खराब तेल, कचऱ्याची वेस्ट मॅनेजमेंटच्या खड्ड्यात विल्हेवाट लावली जाते. किचन परिसरात असलेले ग्रीस सेपरेटर,डिश वॉशर एरिया,वेस्टेजचा खड्डा, टॉयलेट, बाथरूम यामध्ये दुर्गंधी पसरू नये म्हणून वेळोवेळी केमिकल फवारले जाते. शेवटी वेस्ट मॅनेजमेंटच्या खड्ड्यात तयार झालेले शेंद्रीय खत निर्मला नगरीतील झाडांना टाकले जाते. 


यावर्षी तुम्ही ब्रेकफास्टला शेवयाचा उपमा, ब्रेड-मिसळ, साबुदाणा खिचडी,उपमा आणि चहा, फळे यांची चव चाखली आहे. भोजनासोबतच्या मिठाईत गुलाबजाम, दुधी हलवा,मोहनथाल, आम्रखंड, जिलेबी, शिरा, शेवयाची खीर, मूग हलवा या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.  मर्यादित असलेली ही स्वीट डिश कोणी जास्त मागितली तरी देण्यात येत होती. तरी काही सहजयोग्यांना प्रश्न पडतो की, स्वीट डिश रिफील काउंटरवर का नाही दिली जात? आता काय उत्तर द्यायचे अशा प्रश्नाला.भोजनाचा मेनू तर विचारपूर्वक केला जातो. कारण तो तर मेन कोर्स आहे. चपाती, रोटी, पुरी, एक सुकी भाजी, एक रस्सा भाजी, डाळ, भात, कढी, खिचडी, मठ्ठा, मिठाई, चटणी, लोणचं, पापड, फरसाण,इ. फॉरेन किचन मध्ये परदेशी सहजयोग्यांसाठी अंडी, चिकन, मटण, फळे असा बेत असतो. 'ॐ त्वमेव साक्षात श्री अन्नपूर्णा साक्षात श्री आदी शक्ती माताजी श्री निर्मला देवो नमो नमः ', असा मंत्र म्हणून अशी भरलेली थाळी खाऊन तुमचे पोट भरले असेल तरी मन भरले नसेल हे नक्की.


तुम्ही सुज्ञ सहजयोगी आहात. तुम्हाला हे माहित आहे की, हे केवळ भोजन नसून श्री माताजींचा प्रसाद, महाप्रसाद आहे. म्हणूनच तर आपण म्हणतो ना,'अन्न हे पूर्ण ब्रह्म.' पुढे येईल त्या अन्नाचा योग्य तो मान राखला पाहिजे आणि आदराने त्याची चव चाखली पाहिजे. प्रसाद असो की अन्न ते पोटभर खावे पण वाया घालवू नये.


सेमिनारला येणाऱ्या सहजयोग्यांना किचनची आतली बाजू दिसत नाही. त्यांना दिसते ती फक्त बाहेरची बाजू आणि डायनिंग एरिया. तुम्ही लाईन मध्ये येता, प्रसाद घेता आणि बाहेर पडता. 


जेष्ठ सहजयोग्यांच्या सोईसाठी Senior Citizens Dining Hall उभारला जातो. मला माहित आहे इतकी दक्षता घेऊनही काही उणीवा रहात असतील. एकाच वेळी गर्दी केली तर तुम्हाला लाईन मध्ये जास्त वेळ उभे रहावे लागते. कधी कधी गर्दीच्या वेळी Volunteers ना पण प्राधान्याने भोजन मिळत नाही. असं म्हणतात की, दर दहा किलोमीटरवर मसाल्यांची आणि पदार्थांची चव बदलते. त्यामुळे कोणाला काही पदार्थांची चव आवडत नसेल. पण एक लक्षात घ्या सहजयोग हे आपले कुटुंब आहे. तुम्हाला काही उणीव जाणवली तर माझ्या कमिटी मेंबर्सना सांगा. अहो श्री माताजींच्या कृपेत ते तत्पर आहेत माझ्या आणि तुमच्या सेवेला.


सेमिनार संपतो तसं तुम्ही परत फिरता पण इकडे माझी आवराआवर आणि बांधाबांध सुरु होते. उरलेला किराणा माल रिटर्न केला जातो आणि मग हिशेब पूर्ण केले जातात. म्हणजे सेमिनार प्री हवन नंतर सुरु झालेले हे काम सेमिनार नंतर आठवडा भराने संपते. सेमिनार मध्ये किचन म्हणून मी एकटीच नसते तर असे बरेच विभाग आणि कमिट्या कार्यरत असतात ज्या एकमेकांसोबत समन्वय राखून काम करत असतात. 


चला तर मग या आठवणी ताज्या ठेवून मला पुन्हा भेटा किचन 2025 मध्ये.


जय श्री माताजी!

आपले नम्र,

पोटपूजक गणपतीपुळे सेमिनार किचन 2024

शब्दांकन -  योगीराज देवकर.पुणे.


Wednesday, 4 September 2024

MLA's speach

 नमस्कार!

दोस्तो,

बहुत पुरानी ये बात हैं l आझादी के पहले भारत में बहुत अडपड और गवार लोग रहा करते थे l  आझादी के बाद भारत में जब पहली बार चुनाव हुया तो बहुत लोग चुनकर आये जिसमे कुछ अडपड और गवार  MP भी शामिल थे l अब आपको तो मालूम हैं, जो भी चुनाव में चुनकर आता हैं उन्हे लोगोकें सामने भाषण देना पडता हैं l अब जब UP के एक अडपड और गवार MP पर लोगोकें सामने भाषण देनेकी नौबत आ गयी तो ये बेचारे बहुतही घबरा गये, क्यो की, इन्हे भाषण देनेका तजुर्बा नहीं था l MP साहब को घबराये हुये देखकर उनके PA ने उन्हे पूछा, क्या बात हैं सर, आप बहुतही घबराये हुए दिखाई दे रहे हैं l तब MP ने PA से कहा की, अब लोगोंके सामने भाषण देना तो जरुरी हैं लेकिन मुझे भाषण देनेका तजुर्बा नहीं इसलिये मुझे डर लग रहा हैं l तब PA ने MP साहब को कहा की, इसमे डरने की, क्या बात हैं, भाषण देना तो बहुत ही आसान चीज हैं l आप जबभी अपना भाषण सुरु करेंगे तब एक बात की दुम में दुसरी बात मिला दीजिये भाषण अपने आप बन जायेगा l अपने  PA की यह बात सुनकर MP साहब बहुत खूष हुये l और स्टेज की तरफ आये l स्टेज की तरफ आते हुये देखकर लोगोंने उनके नामसे जोरदार नारे लगाये, टालियोंसे उनका स्वागत किया l 


माईक के सामने आकर MP साहब ने अपना भाषण सुरु किया l


अब ध्यान से सुनीये l MP साहब ने कैसे भाषण किया l


देवींयो और देवतायों l


इतनाही कहना था की,बस कुछ लोगोंने उठकर MP साहब के गले में गुलाब के फुलो की मालाये पहनायी l 

उसी मालामेंसे एक गुलाबका फुल निकाल कर उन्होने अपना भाषण आगे सुरु किया l


ये हैं गुलाब का फुल l इस गुलाब कें फुल कें बहुत ही महत्वपूर्ण उपयोग होते हैं l इस गुलाब कें फुल का पहला उपयोग पंडित नेहरू अपने शेरवानी के अचकल में लगाने कें लिए करते हैं l इसका दुसरा उपयोग,  लडकीया अपनी बालो की जडियोमें लगानेके लिए करती हैं l गुलाब कें फुल का तिसरा और महत्वपूर्ण उपयोग हैं की, इससे गुलकंद बनता हैं l ये गुलकंद बहुत ही मिठा होता हैं l मगर गुलकंद से मिठा होता हैं खरबूजा l कवाहत हैं की, खरबूजा खरबूजे को देखकर रंग बदलता हैं l लेकिन सबसे ज्यादा रंग बदलता हैं गिरगिट l ये रंगो की कहाणी जर्मन से सुरु होती हैं l क्योकी जर्मन में हिटलर पैदा हुया l हिटलर ने जिंदगीमे बहुतही वॉर खेले l वॉर का मतलब सोमवार, मंगलवर या इतवार नहीं l वार से खतरनाक होता हैं शेर l ये शेर जंगल में पाये जाते हैं l कुछ लोग तो जंगल में मंगल करणे हेतू घुमने जाते हैं l कहते हैं जंगल में मोर नाचा, पर आपमेंसे किसने देखा l शेर से याद आया l चालीस शेर का एक मण होता हैं l ये मन बहुत ही चंचल होता हैं l चंचल के बहेन का नाम था मधुबाला l मधुबाला को दिलकी बिमारी थी l दिल एक मंदिर हैं l और ये मंदिर पंजाब में पाये जाते हैं l पंजाब के लोग बहुत ही वफादार होते l पर सबसे वफादर होता हैं कुत्ता l पर कुत्तेकी दुम कुछ तेडी होती हैं l लोगोंने इन्सान की तरह सिधा रहना चाहिये l आप इन्सान को सुधार सकते हैं पर कुत्तेकी दुम को नहीं l जबतक आप कुत्ते की दुम को सुधार नहीं सकते तबतक इस नाचीज् MP को आग्या दीजिये l

जय हिंद!

Guest speaker

 It was an excellent experience to address students of PCET's Pimpri Chinchwad College of Engineering as a Chief Guest at Induction Program of Professional Chapter of 2nd year 2024 Students . It's a great initiative by the college. This Professional Chaper of students will  organize many extra curriculum activities for the students throughout the year. This initiative will surely support students to enhance their Knowledge, Skills, Attitude in their potential areas of interest. Develop Vision & acquire effective Habits. This will help students to achieve new highest in their carrier.

Thank you Prof. N. B. Chopade. Dy. Director. Mrs. Ashwini S. Shinde madam & Dr. K. S. Kinge sir. Most importantly all the newly selected chapter heads & students.

सहज कृषी

 निर्मला फार्म - भाग सोळा -सहजयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी सहज कृषी(शेती)करावी .


सूचना :- हा लेख सहजयोग करणारे सहजयोगी शेतकरी आणि सहजयोग न करणारे पण सहजयोगाबद्दलचे कुतूहल असणारे  संभाव्य सहजयोगी यांना नजरेसमोर ठेवून लिहला आहे.काही कमी लिहले असेल तर यात भर घाला आणि काही जास्त लिहले असेल तर ते कमी करा. 


तुम्हाला रासायनिक शेती, शेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती प्रकार माहित असतील. आता समजून घेऊया प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांनी सांगितलेली  सहज कृषी(शेती).


या विश्वाची निर्मिती पाच घटकापासून झाली आहे हे आपण जाणतो . भूमी,जल,अग्नी,वायू,आकाश हे पाचही घटक आपल्याला दृष्य स्वरूपात दिसतात. असे म्हटले जाते की, मानव हा या विश्वाची अतिशय छोटी पण हुबेहूब आवृत्ती आहे.कारण मानव पण याच पाच घटकांनी बनलेला आहे. जे या विश्वात आहे ते मानवात आहे आणि जे मानवात आहे ते विश्वात आहे. म्हणूनच म्हटले जाते,' यथा पिंडी तथा भ्रमांडी.' महत्वाचे आहे ते म्हणजे हा माणूस विश्वाशी जोडला गेलेला असला पाहिजे. 


मानवाचे शरीर आणि त्याचा आत्मा, चेतना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी तसच विश्व आणि या विश्वाचा परमात्मा, परम चेतना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शरीरात आत्मा, चेतना असेल तर शरीर सजीव आहे अगदी तसच भूमी, जल,अग्नी,वायू, आकाश यात परमात्मा,परम चेतना असेल तर तेही सजीव आहे. याचाच अर्थ परमात्मा, परम चेतना, Cosmic Energy ही विश्वाला सजीव ठेवणारी ऊर्जा आहे. विश्व ही एक जिवंत गोष्ट आहे आणि त्याचे चलन वलन परम चेतना,परम चैतन्य करत असते.यालाच आध्यात्मात चैतन्य ऊर्जा असे म्हटले जाते.


प.पू.श्री माताजी निर्मला देवी ह्या सहजयोग्यांच्या गुरुस्थानी आहेत आणि त्यांनी प्रत्येक सहजयोग्याला स्वतःचा गुरु बनविलेले आहे. श्री माताजींनी सहजयोग स्थापन केलेला आहे आणि साधकांना सत्याचा ज्ञानमार्ग दाखविला आहे. सहजयोग खूप मोठा आहे आणि सहज कृषी हा सहजयोगाचा एक भाग आहे. श्री माताजींनी सहज कृषिची अनेकदा महती सांगितली आहे. त्यांनी स्वतः राहुरी कृषी विद्यापीठात तीन नारळ ट्रीटमेंट केली होती. या ट्रीटमेंटमुळे तिथे सूर्यफूल, गहू, तांदूळ याचे भरघोस उत्पादन मिळाले होते. 

डॉ हमीद मायलेनी या परदेशी सहजयोग्याने पाणी याविषयावर PhD केली आहे. पाण्याला चैतन्य दिले तर त्याचा पीएच बदलतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. सहज कृषी ही एक  शास्त्रीय पद्धत आहे. सहजयोगात साधकाला आत्मसाक्षात्कार दिला जातो. त्यामुळे त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि त्याला तळहातावर, बोटावर, टाळूवर थंड किंवा गरम चैतन्य लहरी जाणवायला लागतात. याचाच अर्थ तो परम शक्तीशी कनेक्ट होतो. हेच ते चैतन्य सहज कृषित महत्वाची भूमिका बजावते.


विश्व ही जिवंत क्रिया आहे. विश्वात या क्षणाला भूमीवर कुठे भूकंप,भूसखलन होत आहे. जल बाबत कुठे भरती,

ओहोटी,सुनामी,पूर येत आहे. अग्नी कुठे ज्वालामुखी,उष्णता, आग ओखत आहे. वायुमुळे कुठे वादळ,वारे सुरु आहे.तर आकाशात कुठे काहीतरी बदलाच्या घटना घडत आहेत.पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे, सूर्याभोवती फिरत आहे.  हे सर्व पंचतत्व सजीव असल्याचेच द्योतक आहे. या विश्वाच्या निर्मिती,भरणपोषण,नाश करण्यामागे कोणतीतरी अदृश्य शक्ती कार्यरत आहे असे आपण मानतो , जाणतो . याला कोण दैवी शक्ती म्हणते , तर कोण याला निसर्ग असे म्हणेल. परंतु  पंचमहाभूताच्या या महानतेमुळेच मानवासाठी ही पाच तत्व म्हणजे भूमी देवता, जल देवता, अग्नी देवता, वायू देवता, आकाश देवता अशी देवतास्वरूप आहेत आणि आपण यांची पूजा पण करतो.


महाराष्ट्रात स्वयंभू अष्टविनायक आहेत. तसेच देशविदेशातही उलुरू सारखी स्वयंभू ठिकाणे आहेत.महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत.आपल्याला याठिकाणी किंवा मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर आल्हाददायक, उत्साहकारक, चांगला अनुभव येतो तो या चैतन्य लहरी मुळे. कारण याठिकाणी चैतन्य प्रसारित होत असते. विश्वातली ही ऊर्जा केंद्र आहेत. अशीच मुलाधार ते सहत्रार चक्र पर्यंत माणसात पण ऊर्जा केंद्र आहेत. पण याची अनुभूती घेण्यासाठी आपल्या आतील चेतना आणि परम चेतना यांचा मिलाप होणे आवश्यक आहे. आपला आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे आवश्यक आहे.सहजयोगात आत्मसाक्षात्कार झाला की हे तत्क्षण घटित होते. 


सहज कृषी करताना तुम्ही पारंपारिक करत आहात ती शेती करत रहा पण त्याच्या सोबतच सहज कृषी करा . सहज शेतीत काय केले जाते तर वर उल्लेख केलेल्या पंचतत्वाला चैतन्य जागृत ठेवण्याचे आवाहन केले जाते. भूमी मातेमध्ये श्री गणेश देवता तत्व स्थापित केले जाते. हे करण्याची एक पद्धत प.पू.श्री निर्मला देवी यांनी सांगतलेली आहे.ती पद्धत खालील प्रमाणे आहे. 


सर्व प्रथम शेतात एक सहज कृषी ट्रीटमेंट करावी: - ही ट्रीटमेंट एकदाच करायची असते.यामुळे परिसरात दहा किलोमीटर पर्यंत चैतन्य प्रवाहात होते.


सदर ट्रीटमेंट किमान 2 किंवा 15-20 सहजयोग्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे करावी.


1) पीक पूर्व प्रार्थना:-

सहज कृषिची सुरुवात पीक ठरविण्यापासून करावी. कोणते पीक करावे हे परम चैतन्याला प्रश्न विचारून स्वतःच्या हातावर  संतुलित थंड चैतन्य जाणवते का त्यावरून समजून घ्यावे.


2) चैतन्यमय जल  :- श्री माताजींच्या फोटो समोर भांड्यात पाणी ठेवणे.बंधन घेणे, तीन महामंत्र  घेणे आणि श्री गणेश मंत्र, श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. सदर चैतन्यमय झालेले जल  जास्तीच्या पाण्यात मिसळून पिकास देण्यात यावे. विहीर अथवा असलेल्या जल स्रोतात मिसळण्यात यावे.


3) चैतन्य लहरी:-

बिबियाणे,शेणखत,निंबोळी खत अशा जैविक खतास श्री गणेश मंत्र,श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणून चैतन्य लहरी देणे.


4) सहज शेती ट्रीटमेंटची पूर्वतयारी :-

-ट्रीटमेंट करण्यासाठी जमिनीची निवड करावी .

-साहित्य - एका ठिकाणासाठी  3 किंवा 5 नारळ, गुलाबजल , चैतन्यमय जल , हळदी - कुंकू, अक्षता, फुले, कापूर, धूप /अगरबत्ती.

-आदल्या दिवशी 3 किंवा 5 नारळ प.पू.श्री माताजींच्या फोटोसमोर ठेवून चैतन्यमय करणे - शेंडी असलेले, शक्यतो नारळाचे तीनही डोळे उघडे करून श्री माताजींच्या फोटो समोर ठेवावेत, बंधन घेऊन तीन महामंत्र घ्यावेत, श्री गणेश मंत्र , श्री पंचतत्व मंत्र ,श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे आणि श्री माताजींना सहज शेती ट्रीटमेंटसाठी नारळ व्हायब्रेट करण्यात यावेत असे आवाहन करावे. पंचतत्वास आवाहन /प्रार्थना करून सहज शेतीचा संकल्प करावा.


तुम्ही एकतर 3 नारळ ट्रीटमेंट करू शकता किंवा 5 नारळ ट्रीटमेंट करू शकता.


-3 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास शेतात एक ते दीड फूट खोल खड्डा करावा आणि त्याच ठिकाणी खालील ट्रीटमेंट पूर्ण करावी.


-5 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास निवडलेल्या प्लॉटवर 4 कोपऱ्यात 4 आणि मध्यभागी 5 वा असे एक ते दीडफूट खोलीचे  5 खड्डे तयार करावेत.

-सर्व पूर्व तयारी अगोदर शेतात आणि घरी करावी.


5) शेतात श्री गणेश तत्व, पंचतत्व जागृत करणे :- तसं पाहिलं तर शेतात श्री गणेश देवतेची स्थापना करणे म्हणजे एकप्रकारे शेतात श्री गणेश देवतेची प्राण प्रतिष्ठा केल्यासारखेच आहे.

-वरील सर्व साहित्य शेतात घेऊन जावे.


-3 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास तयार खड्डयाजवळ जमावे आणि तिथेच खालील मंत्र म्हणून ट्रीटमेंट पूर्ण करावी.


-5 नारळ ट्रीटमेंट करणार असाल तर प्लॉट वरील कोपऱ्यातील कोणत्याही एका खड्डयाजवळ जमावे . बंधने घ्यावीत आणि सर्वांनी खालील मंत्र म्हणावेत.

-तीन महामंत्र,

-श्री गणेश देवता,

श्री ग्रामदेवता,

-श्री शाकंभरी देवता,

-श्री ऋतंभरा प्रज्ञा,

-श्री पंच महाभूत देवता,

-सर्व राक्षस मार्दिनी,

-सर्व ताप हारिणी,

-राक्षस अग्नी 

-श्री निसर्ग देवता,


-मंत्र म्हणत असताना खड्ड्यात

गुलाब जल,

चैतन्यमय जल,

हळद, कुंकू, अक्षता,

फुले, अर्पण करावीत.

कापूर, धूप / अगरबत्ती लावावी आणि 3 नारळ खड्ड्यात अर्पण करून खड्डा मातीने बुजवावा. 


-5 नारळ ट्रीटमेंट करणार असाल तर कोणत्याही एका खड्ड्यापासून सुरुवात करावी.प्रत्येक खड्ड्यातील नारळ अर्पण करून खड्डा मातीने बुजवावा.


खालील संकल्प सोडावा :- श्री माताजींना आवाहन - " परम पूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत, आपल्या आशीर्वादाने आम्ही सहज शेतीसाठी या शेताची निवड केली आहे. श्री माताजी आपले दैवी चित्त या शेतावर येऊ द्यावे . या जमिनीत श्री गणेश देवता तत्व जागृत होऊ द्यावे, या शेतातील आणि परिसरातील पंचतत्व जागृत करावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना. या जमिनीत परमेश्वरी, परमात्म्याचे परम चैतन्य प्रवाहित होऊ द्यावे . या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या पिकांना आपले संरक्षण प्राप्त होऊ द्यावे . या शेतातील मातीची नैसर्गिक गुणवत्ता वाढून पिकाची उत्पादकता वाढू द्यावी . येथील विहीर,पाणी, पिके, पाणी वितरण यंत्रणा, लिफ्ट,लाईटची सुविधा, मनुष्यबळ, इ. यांना लोकांचा उपद्रव, चोरी , पिकांचे आजार आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण प्रदान करावे. इथला कष्टकरी, शेतकरी यांना सुखी, समाधानी ठेवावे आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध करावे अशी प्रार्थना आम्ही सहजयोगी आपल्या पवित्र, पावन चरणा वरती करीत आहोत. श्री माताजी या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा आणि आम्हाला चैतन्यमय आशीर्वाद द्यावेत अशी नम्र प्रार्थना."


5 नारळ ट्रीटमेंट मध्ये पहिल्या खड्ड्यापासून सर्वांनी प्लॉटवर क्लॉकवाईज चालायला सुरुवात करावी. चालताना सर्वांनी श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. चालताना एक हात पंचतत्वाकडे आणि दुसऱ्या हाताने शेताला चैतन्य द्यावे. 2 रा,3 रा, मधला 4था,5 वा खड्डा करत प्रत्येक खड्ड्यात एक नारळ पुरावा आणि शेवटी 1 ल्या खड्ड्याजवळ यावे.


6) पहिल्या खड्ड्याजवळ येऊन श्री माताजींचे, पंचतत्वाचे आभार व्यक्त्त करावेत.


"परम पूज्य श्री माताजी आज आपण आमच्या शेतात श्री गणेश देवता तत्व स्थापित केले आहे. पंचतत्व चैतन्याने जागृत केली आहेत. हे संपूर्ण शेत आणि परिसर चैतन्यमय केले आहे, याबद्दल आम्ही सहजयोगी आपले हृदयापासून आभारी आहोत. श्री माताजी आपणच कर्ता, करविता आणि भोक्ता आहात. या ठिकाणी येणाऱ्या पिकास आपले विशेष आशीर्वाद प्राप्त होऊ द्यावे. येथील दर्जेदार उत्पादने योग्य ग्राहकांपर्यंत  पोहचू द्यावी आणि या पिकांच्या प्रत्येक ग्राहकांस, लाभधारकास आपण सहजयोगी बनवावे . श्री माताजी आपल्या पवित्र, पावन चरणावरती आमचे कोटी कोटी प्रणाम."


संवरक्षणासाठी प्लॉटला सात वेळा चैतन्याने क्लॉकवाईज बंधने द्यावीत.


7) *महत्वाचं* -

सहज कृषित परम चेतना शक्ती, चैतन्य लहरी यांना अनन्यसाधारण महत्व आहे. पीक,विहिरीतील पाणी,शेता शेजारील तलाव, धरणातील पाणी, जमीन, उपयोगी साधनास श्री गणेश मंत्र, श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणत वेळोवेळी चैतन्य द्यावे .

-जिथे कुठे श्री माताजींच्या पूजेस जाल तेथून श्री गणेश पूजनच्या वेळचे श्री चरणाचे तीर्थ मिळवावे . ते विहरीत मिक्स करावे .

-घरी श्री माताजी समोर व्हायब्रेटेड वॉटर तयार करावे . ते इतर पाण्यात मिसळून शेतात वापरावे .

-व्हायब्रेटेड वॉटर विहिरीत टाकावे किंवा व्हेचुरी मधून पिकास पाठवावे .

-स्प्रे करायचे झाल्यास त्यात व्हायब्रेटेड पाणी वापरावे.

-पिकास वेळोवेळी चैतन्य द्यावे .

-सहज कृषित श्री माताजींना केलेल्या प्रार्थना फार प्रभावी कार्य करतात.

-शक्यतो गावरान बीज मिळवा आणि शेतात पेरा.

-पिकास आजार किंवा कोणतेही मानवी अथवा नैसर्गिक संकट आले तर श्री माताजींना प्रार्थना करावी . 

-निर्माल्य शेतात टाकावे.

-शेवटी पंचतत्व आणि  परम चैतन्यच सर्व काही करत आहे हे माहित असावे.


सहजकृषीत तुम्ही प्रार्थना केल्याप्रमाणे रिझल्ट्स येतात असा सहजकृषी करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे.


श्री माताजी असे सांगतात की कृषी हा शब्द श्री कृष्णा पासून आलेला आहे. आपले भाग्य की आपल्याला कृषिची सेवा करायची संधी मिळत आहे.


संकलक,लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.