Sunday, 19 February 2023

शरद काळे यांचा लोणी देवकर येथे सत्कार.

 विक्रमवीर शरद काळे पाटील यांचा लोणी देवकर येथे सत्कार.

लोणी देवकर-(12 नोव्हेंबर 2022)- आज शरद काळे पाटील पुणे-इंदापूर -पुणे 300 कि.मी.अंतर सायकल वरून 20 तासात पूर्ण करण्यासाठी हायवे वरून जात असताना लोणी देवकरचे सरपंच कालिदास देवकर यांच्या हस्ते त्यांचा पाहुणचार आणि सत्कार करण्यात आला.

वय हा केवळ एक आकडा आहे हे अहमदनगर मधील सोनाई गावचे सुपुत्र शरद काळे पाटील यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. खरंतर ते एक उद्योजक आहेत.वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पाहिले आणि पोहायला शिकण्यापासून सुरुवात केली. पोहणे, धावणे आणि सायकल चालवीण्याचा सराव सुरु झाला.आज वयाच्या 56 व्या वर्षी त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.तब्बल आठ वेळा एस आर स्पर्धा(200,300,400,600कि.मि.सायकल स्पर्धा.)पूर्ण करणारे महाराष्ट्रातील ते पहिले सायकल वीर आहेत.

औरंगाबाद येथे 1000 कि. मि.बीआरएम स्पर्धा 68 तास 10 मिनिटात पूर्ण.

पुणे 1200 कि.मि. स्पर्धा 79 तास 37 मिनिटात पूर्ण.

इंग्लंड येथे आयोजित लंडन-इडनबर्ग-लंडन 1540 कि.मि. अंतर 128 तासात पूर्ण.

ते एक नावाजलेले मोटरसायकल वीरही आहेत.त्यांचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये दोनदा नोंदले गेले आहे.

मोटारसायकल वरून महाराष्ट्रातील अष्ठविनायक 12 तास 12 मिनिटात पूर्ण. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे 25 तासात पूर्ण.

भारतातील सुवर्ण चातुस्कोन म्हणजे मुंबई-दिल्ली-कोलकता-चेन्नई-मुंबई 5847 कि.मि. अंतर फक्त 88 तासात पूर्ण केले.

लोणी देवकर मधील योगीराज देवकर यांचे ते मित्र आहेत. सत्कार समारंभास सर्वश्री इंदापूर कारखान्याचे डायरेक्टर रत्नकवी देवकर,सहदेव डोंगरे,दादासाहेब तोरवे, सचिन घाडगे, दिलावर तांबोळी, पप्पू घाडगे, धनंजय चव्हाण, कुंडलिक घाडगे, पांडुरंग राखुन्नडे, नानासाहेब देवकर, अमोल देवकर,तुळशीराम घाडगे, साईराज देवकर, पत्रकार संदीप बल्लाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

राळेगण, गावाचा वाढदिवस.

 महाराष्ट्रातील सर्व खेड्यांनी राबवावी अशी स्तुत्य संकल्पना - गावाचा वाढदिवस.


राळेगण सिद्धी-ग्रामपरिवर्तन दिवस.


एकदा गावाकऱ्यांनी आण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले होते. तेव्हा आण्णांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी गावाचा वाढदिवस साजरा करूया अशी संकल्पना मांडली. आणि मग 2 ऑक्टोबर हा दिवस ठरविण्यात आला.राळेगण मधील या उपक्रमाला आता वीस वर्ष झाली आहेत. यावर्षी अतीवृष्टी मुळे तो दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा झाला. योगायोगाने त्याच दिवशी आण्णांच्या मातोश्री कै.लक्ष्मीबाई हजारे यांचा स्मृती दिनही होता.


दिवसभर रक्तदान शिबीर आणि पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने यांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडले.


विशेष म्हणजे यादिवशी गावात संध्याकाळी चूल बंद असते आणि सगळ्या ग्रामस्थ आणि उपस्थितांना भोजन दिले जाते, ज्याचा खर्च आण्णा हजारेंच्या पेंशनच्या पैशातून केला जातो. या अभिनव उपक्रमात खालील कल्पना राबविण्यात येतात.

1)ग्राममाता आणि ग्रामपिता चरण पूजन आणि सन्मान- गावात ज्या पुरुषाचे आणि ज्या महिलेचे वय जास्त आहे अशा दोन व्यक्तीची दरवर्षी निवड  केली जाते आणि त्यांचे ग्रामपिता आणि ग्राममाता म्हणून आण्णांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चरणपूजा करून सन्मान केला जातो.याचा उद्धेश असा आहे कि,गावातील लहान,थोरांना जेष्ठ नागरिकांच्या योगदानाची जाणीव असावी आणि त्यांचा नेहमी आदर केला जावा.

2) गतवर्षात गावात जन्मलेल्या बालकांचा सन्मान - गतवर्षात गावात जी बालके जन्माला आलेली आहेत त्यांचा गावाच्या वतीने अंगडं, टोपडं देऊन सन्मान केला जातो .एकप्रकारे हा मातांचाही सन्मान केल्यासारखेच आहे.याचा उद्धेश असा आहे कि,मुले ही गावाची, देशाची संम्पत्ती आहेत. सन्मानाने गावात त्यांचे स्वागत केले जाते.

3) गतवर्षात गावात ज्या सुना आलेल्या त्यांचा गावाच्या वतीने साडी चोळी देऊन ओटीभरण आणि सन्मान करणे - याचा उद्धेश असा आहे कि,सुन घरात आल्यानंतर तिला जसे घराण्यातील चाळीरिती समजाव्यात,परंपरा आणि संस्कृती कळावी असे वाटते तसेच तिला गावाचा इतिहास आणि संस्कृती कळावी.तिच्या सर्वांशी ओळखी व्हाव्यात.ती गावाची सुन आहे.

4) कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार - गावातील ज्या नागरिकांनी ते जिथे असतील तिथे गतवर्षात जर काही विशेष कामगिरी गेली असेल त्यांचा सत्कार केला जातो. याचा उद्धेश असा आहे कि, हे नागरिक गावाचे भूषण आहेत, ते गावाचे नाव मोठं करीत आहेत त्यांची उचित दखल घेणे.यात उद्योजक, अधिकारी,शहरातील नोकरी सोडून गावात परत येऊन शेती करणारा शेतकरी, आधुनिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, दूध व्यावसायिक, मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळविलेले विद्यार्थी, सैन्यदलात प्रवेश करण्याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, गावाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करणारे नागरिक,इ. असे अनेकजण होते.


मी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ट्रेनिंगच्या निमित्ताने राळेगण मधेच होतो त्यामुळे या उपक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. मला मनापासून असे वाटते कि महाराष्ट्रातील इतर गावांनीही या संकल्पनेचे अनुकरण करावे.


योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

हॉटेल चुल मटण

 हॉटेल चुल मटण - नॉस्टॉजिक अनुभव.


हॉटेल चुल मटणची तिसरी शाखा बालगंधर्व चौक,

नॅचरल आईस्क्रीमच्या मागे, जंगली महाराज रोडवर सुरु झालेली आहे. पूर्वीच्या दोन शाखा डी पी रोड म्हात्रे पुल आणि केशवनगर पिंपळे-सौदागर या अगोदरच चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. 


शहरात राहणाऱ्या बहुतेक लोकांना ग्रामीण पार्श्वभूमी  असते. चुलीवरच्या ज्वारी आणि बाजरीच्या फुगलेल्या भाकरी,घरगुती चिकन,

मटण,लाल,काळ्या मसाल्यातील रस्सा ,अळणी चिकन आणि मटण (सुप ), निखाऱ्यावर भाजलेली कलेजी, घडीच्या चपात्या,बुक्की मारून कांदा फोडणे, इ. गोष्टी अनेकांच्या मनात घर करून असतात.

यामुळेच लोकांना हॉटेल मध्ये जाऊनही घरच्या स्वादाचा अनुभव देणारे फूड आवडते.


हॉटेल चुल मटणने याच नॉस्टॉजिक अनुभवाला अधूनीकतेची जोड दिली आहे.त्यामुळेच हॉटेल चुल मटणचा मेनू  शहरी आणि ग्रामीण सगळ्याच लोकांच्या आवडीचा झालेला आहे.


एकदा खाल तर पुन्हा पुन्हा जाल!


शुभेच्छुक.

योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

वर्गमित्र मेळावा औरंगाबाद

 ऊर्जादायी जुनी मैत्री.

श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर सन 1972 ते 1978 च्या पाचवीच्या पहिल्यावहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर 13 फेब्रुवारी 2013 ला झाले होते. तब्बल 35 वर्षांनी एकावेळी सगळे एकमेकांना भेटत होते.फारच भावुक आणि नॉस्टालजिक दिवस होता तो. गेटटुगेदरची कल्पना सुचल्यानंतर गणेश देशपांडे,सत्यजित गुजर , प्रदीप गारटकर, घनश्याम शहा,पांडुरंग राऊत सगळ्यांनी मनावरच घेतलं होतं की, वर्गातल्या सगळ्यांना जिथं कुठं असतील तिथून शोधून काढायचे. सत्तरच्या दशकात ज्यांचे आई-वडील उजनी धरण प्रकल्पच्या नोकरीत होते ती मुलं,मुली औरंगाबाद,मुंबई,

हैद्राबाद, बेळगाव अशा ठिकाणी गेली होती,नोकरी निमित्त काहीजण पुण्यामुंबईत होते,तर मुली लग्न होऊन कुठे कुठे सासरी गेल्या होत्या. मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका निवृत्त झाले होते आणि त्यातले काही इंदापूर तर काही इतरत्र स्थायिक झाले होते. पण या मित्रांनी सगळ्यांना शोधून काढलेच आणि आमचे गेटटुगेदर जोशात पार पडले. खरंतर मी फक्त पाचवीला एकच वर्ष इंदापूरला होतो.माझं पुढचं सगळं शिक्षण पुण्यात झाले. इथे नवीन मित्रवर्ग निर्माण झाला. पण जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे बालपणीच्या मित्रांचे खास वेगळेच स्थान असते. गेटटुगेदरचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आमचा 'मधली सुट्टी ' या आगळ्यावेगळ्या नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. पुढे सत्यजित गुजरने थेऊरला आणि प्रमिला जाधवने कुंभरगाव -भिगवणला गेटटुगेदर ऑर्गनाईज केले होते. तेव्हा आयोजकांच्या यथायोग्य आदरातिथ्य आणि पाहुणचारासोबत थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाचा आणि कुंभरगावला उजनी जलाशयात फ्लेमिंगो पक्षी निरीक्षणचा आनंद घेतला होता.


मध्यंतरी मित्र -मैत्रिणींच्या मुला -मुलींची लग्न झाली तेव्हा या भेटीगाठी होत राहिल्या.


21 आणि 22 जानेवारी 2023 ला म्हणजे नुकतच आमचं पहिलं निवासी गेटटुगेदर औरंगाबादला साजरे झाले. आयोजनाची पूर्ण जबाबदारी सत्यजित व स्वाती गुजर आणि डॉ सविता व डॉ मिलिंद पटवर्धन या उभायतांनी घेतली होती.


20 जानेवारीला रात्रीच नियोजनानुसार तिसजण औरंगाबादला पोहोचले. सत्यजित गुजर हा सध्या औरंगाबाद विभागाचा मुख्य वन संरक्षक आहे. त्याने गेस्टहाऊस आणि बंगल्यात सर्वांची निवासाची सोय केली होती. सकाळी नाष्ट्यापासून ते रात्री भोजनापर्यंत खानसामा दिमतीला होता. मग काय ग्रुपच्या गप्पा आणि मज्जा .


पहिल्या दिवशी सकाळी आम्ही घृषणेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो . स्वागताला वन विभागाचे अधिकारी हजर होते. सरळ सगळे मंदिराच्या कार्यालयात गेलो.  मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांची प्राधान्याने दर्शनाची सोय केली. शनिवार,गर्दी असूनही आम्हाला महादेवाचे व्हीआयपी दर्शन घडले. त्यानंतर वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेलो. तिथं गाईड कचरू जाधव आमची वाट पहात उभा होता. त्यांच्या विनोदी, हजरजबाबी आणि तितक्याच अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही कैलास लेणी पाहण्याचा आनंद लुटला. तिथून चालतच आम्ही महादेव वनात गेलो. बारा जोतिर्लिंगापैकी पाच जोतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. युती सरकारने प्रत्येक जोतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेवाला आवडणाऱ्या वृक्षांचे वन निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. घृषणेश्वर मंदिर परीसरात सदर महादेव वन निर्माण करण्यात आरएफओ सत्यजित गुजरचे मोठे योगदान आहे. साडेबारा एकरात फुललेल्या नंदनवनात विविध प्रकारचे बेल,रुद्राक्ष,चाफा,अर्जुन सादळा अशा अनेक प्रकारचे वृक्ष पाहताना 

सगळ्यांनाच सत्यजितचा अभिमान वाटत होता. औरंगाबादला परतलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. जेवणानंतर तासाभराच्या आंतराने हुरडापार्टी सुरु झाली. एरवी कृषी पर्यटनात हुरडा पार्टी करणारी टीमच सत्यजितने कामाला लावली होती. हुरड्याच्या सोबतीला तीन प्रकारच्या चटण्या आणि आकटीत भाजलेली बेबी कॉर्नची चविष्ठ कणसे पण होती. आकटीच्या शेजारीच लॉनवर गोलाकार खुर्च्या मांडून बसलो मग काय योगीराज देवकरने मनोरंजक खेळांनी सुरुवात केली.सत्यजित गुजरच्या ऍक्टिव्हिटीज् नी सर्वांची मने जिंकली.गणेश देशपांडेने तर तो बॅचलर असताना सत्यजित आणि सविताने त्याला लिहलेल्या पत्रांचे वाचन करून मैत्रीच्या खोलीला उजाळा दिला. मग सविताने पण तिच्याकडील पत्रांचा खजिना काढला आणि काही शिक्षकांची पत्रे वाचून दाखविण्याची विनंती सत्यजितला केली कारण तिला स्वतःला फारच गहिवरून आले होते .श्रीकांत जोशीने बहारदार गायन करून अजूनही मी स्कूल मध्ये होतो तसाच छान गाणी गातो याची प्रचिती दिली. खरी मजा आणली ती पांडुरंग आणि पुष्पा राऊत या पती-पत्नीच्या विनोदांच्या जुगल बंदीने. बालपणीच्या कविता गायन, गाण्याच्या भेंड्या, पासिंग दी बॉल आणि शिक्षा सारख्या खेळांनी रात्रीचे नऊ कधी वाजले ते समजले नाही. हुरड्यानंतर मग रात्री नावाला जेवण आणि भरपेट गप्पा झाल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही दौलताबाद किल्याच्या पार्किंगला होतो. गाईडच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पहायला चार तास लागले.वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना पाहताना सगळे आश्चर्यचकित झाले होते.256 एकरांना सुरक्षा भिंत,नागमोडी वळणावरील सात भव्य प्रवेशद्वारे,

पाण्याची व्यवस्था,वॉच टॉवर,खंदक, मेंढा तोफ,भुयारी मार्गातील भुलभूलय्या,निवास आणि मंदिराचे बांधकाम, दुर्गा तोफ असा हा अभेद्य किल्ला तोही मित्रांसोबत पाहणं एक अल्हाददायक अनुभव होता. सगळेजण भुलभूलय्या पार करून वरच्या टप्प्यावर आले खरे पण वेडात दौडलेले फक्त सातच वीर सत्यजित, योगीराज, गणेश, गौतम, रमेश, प्रदीप आणि अर्जुन दुर्गा तोफे पर्यंत पोहोचले. त्यानंतर आम्ही पैठण रोडवर सविताच्या घरी गेलो. तिच्या कॉलनीच्या शेजारीच वाल्मि संस्थेचे कॅम्पस आहे. निसर्गरम्य परिसरात तिचे घर पाहताना खूप छान वाटले. त्यानंतर वाटेत MCED  संस्थेला भेट देऊन  पुन्हा वन विभागाच्या बंगल्यावर पोहोचलो तर खानसामाने पुरणपोळीचा बेत केला होता. खानसामाची पत्नी,आई उत्तम सुगरण आहेत. जेवणानंतर त्यांचे कौतुक केले तर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.जेवणानंतर औरंगाबादच्या तारा पान सेन्टर मधील मगई पानाचा आस्वाद घेतला.


जेवणानंतर गेटटुगेदरच्या समारोपासाठी आम्ही एकत्र बसलो. यात गौतम गुणाजी बेळगांवहुन तर दयानंद काद्रे हैद्राबाद हुन आले होते.त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. उद्योग व्यवसायामुळे बिझी असलेले अविनाश जोशी, संजय सावंत थोडा वेळ का होईना पण गेटटुगेदरला हजेरी लावून गेले. प्रदीप गारटकरची मात्र उणीव भासली.एकएक करून सगळे बोलायला लागले तर सत्यजित म्हणे, " मला सेंडऑफचा फील देऊ नका." पण खरंच सत्यजित, स्वाती आणि सविता, मिलिंद या चौघांनी हे गेटटुगेदर यशस्वी करायला फार मेहनत घेतली. त्यांच्या एनर्जीला सगळ्यांनी दाद दिली. त्यांनी प्रत्येकाकडून जोडीचे फोटो मागविले होते आणि स्कूलच्या इमारतीचा फोटो पण मिळविला होता. स्कूलची इमारत आणि जोडीचा फोटो 'मग' वर छापून प्रत्येकाला भेट द्यायची नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी राबविली. समारोपात बोलताना प्रमिला जाधव, प्रशांत कुलकर्णी, संजीवनी यांना अश्रू अनावर झाले होते. तर गौतम गुणाजी, सविता पटवर्धन, गणेश देशपांडे, उज्वला अर्णिकर फारच भावुक झाले होते.घनश्याम शहा,अर्जुन ठोंबरे,राजेंद्र आणि रमेश देवकर, प्रदीप शहा,यांच्या सुंदर सहभागामुळे गेटटुगेदरची रंगत वाढली.

या गेटटुगेदरचे वेगळेपण म्हणजे सगळे मित्र आणि मैत्रिणी जोडीने आल्यामुळे मित्रांच्या बायका आणि मैत्रिणींचे नवरे सगळ्यांचीच एकमेकांशी मैत्री वाढायला मदत झाली. आयोजकांचे, वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, खानसामाचे आभार मानून पुन्हा लवकरच भेटू असे ठरवून संध्याकाळी सगळे आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.


आयुष्यात बालपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय,प्रोफेशन, छंद, प्रवास,अशा विविध टप्प्यावर लोकं भेटतात परंतु केवळ बालपण आणि शिक्षणाच्या वेळी भेटलेले मित्रच निःस्वार्थ, निखळ, स्वच्छ मैत्री करतात आणि जपतात असा बहुतेकांचा अनुभव असावा.

म्हणूनच जुनी मैत्री खरीखुरी आणि ऊर्जादायी असते.


योगीराज देवकर.

लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.

www.motivationacademy.in

Tuesday, 5 July 2022

Best 30 second business speech.

 नमस्कार !

माझे नाव आहे योगीराज देवकर,

ट्रेनिंग द्यायला असतो नेहमी तत्पर.

संस्थेचे नाव मोटिव्हेशन अकॅडमी,

ट्रैनिंग आणि कन्सल्टन्सी

ही बिझनेस कॅटेगरी.

मेहनत,धडपडीच्या विचारांचा देतो धडा,

शिकवितो मोटिव्हेशन,

Soft स्किल्स आणि OD.

तीस वर्षांचा अनुभव तरीही विध्यार्थी,

मराठीतून प्रशिक्षण अनुभव हीच खात्री.

किर्लोस्कर,राज ग्रुप, क्यूबिक्स, मिटकॉन , MCED, हे ग्राहक,

भारत सरकारचा पुरस्कार्थी आणि चार पुस्तकांचा लेखक.

लघु उद्योग,कॉलेजेस, संस्थांची नावे मला सांगा,

बदलतो मानसिकता, वाढवितो कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता.

"स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"

योगीराज देवकर आणि मोटिव्हेशन अकॅडेमी ला प्रसिद्ध करा.

www.motivationacademy.in ला भेट द्या,

मला रेफेरन्ससेस द्या आणि माझ्याकडूनही घ्या.

आभार .🙏🏻


Monday, 6 June 2022

Hon PM से प्रभावित वन मिनिट बिझनेस प्रेझेंटेशन

 आजका वन मिनिट Hon PM से प्रभावित.


मित्रो !

अच्छे दिन आने वाले हैं l

लेकिन इसके लिये,

सबका साथ - सबका विकास,

सबका विश्वास - सबका प्रयास l

जरुरी हैं l


आपके SCGT वाकड चॅप्टर के मेंबर  योगीराज देवकर जी और उनका मोटीव्हेशन अकॅडेमी लोगोमें बदलाव लाने का बहुत बडा काम कर रहा हैं l


उनकी ' उद्योगी, मेहनती, व्यक्तिमत्व विकास ' ये किताब आप पढिये l

आप जान जाओगे कि,

कडी मेहनत कभी थकान नहीं लाती वह संतोष लाती हैं l


आपके यह देवकर जी,

Industrious Motivation .

Soft Skills और

Organization Development,   इन  टॉपिकपे घमासान ट्रेनिंग देते हैं ।


योगीराज देवकर जी को 1994 में भारत सरकारने 'बेस्ट आंत्रप्रेनेर ट्रेनर' पुरस्कारसे नवाजा गया हैं l 


क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,

राज ग्रुप, क्यूबिक्स ऑटोमेशन , कूल फौंडेशन, MCED, MITCON यहाँपर उनका बार बार ट्रेनिंग होते रहता हैं ।


उनका USP हैं, की,

" सिर्फ ट्रेनिंग ही नहीं , वो ट्रेनी के लिये आत्मपरीक्षण का समय होता हैं ।"


अभि पिछले हप्ते वो ट्रेनिंग के लिये M U कॉलेज ऑफ कॉमर्स गये थे ।


" खुद प्रेरित रहो और दुसरोंको प्रेरित करो !" यह उनका स्लोगन हैं l


माना कि अंधेरा घना हैं,

लेकीन दिया जलाना कहा मना हैं l


अब आपके पहचान में  जितनेभी उद्यमी हैं , कॉलेजेस हैं , ऑर्गनायझेशन्स हैं, उनके रेफेरेन्सस इन्हे देदो ।


जरा फुरसत निकालके देवकर जी के साथ 1 to 1 करो और www.motivationacademy.in को व्हिजिट करो l


दीपक कि लौ के समान उपर उठना हममे से हर एक कि स्वाभाविक वृत्ती हैं, आइये इस वृती को विकसित करे l


बोलो, भारत माता कि !जय!

31 मे 2019 निवृत्ती निमित्ताने चार शब्द

 नमस्कार !        


निवृत्ती निमित्त दोन-चार शब्द .


वक्तृत्वकला,उपक्रमांचे आयोजन करण्याची आणि प्रवासाची आवड या गुणांमुळे नोव्हेंबर १९८५ मधे मिटकॉन मधे भविष्यात येणाऱ्या एम.सी.इ.डी.साठी माझी निवड झाली.


व्याख्याने द्यायला विषय हवेत म्हणून मी 'सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण' या विषयाची निवड केली आणि खूप मेहनत घेऊन हा विषय तयार केला .या विषयाचे मराठी लहान पुस्तक तयार केले आणि १९८७ मधे स्वतःच्या लोणी देवकर या गावात हा कार्यक्रम राबवून या विषयाचा श्रीगणेशा केला. पुढे यथावकाश मी 'उद्योजकता', 'उद्योग संधी शोधा म्हणजे सापडेल','व्यवसायिक उद्योजकता', इ. पुस्तकांचा लेखक झालो.श्री.विश्वास देवकर, श्री.शशीकांत कुंभार यांनी पहिल्या पुस्तकाचे तर श्रीमती आनंदी कुलकर्णी यांनी दुसऱ्या पुस्तकाचे शब्दांकन केले आणि श्री. डॉ.श्रीपाद कडवेकर सर,डॉ.रवींद्र कोठावदे,यांनी मला तिसऱ्या पुस्तकासाठी  सहलेखक होण्याचा मान दिला. 


सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण हा एक कार्यक्रम ३ दिवसांचा असतो आणि कार्यक्रमात ३० प्रशिक्षणार्थी असतात.असे मी महाराष्ट्रात ६०० पेक्षा अधिक कार्यक्रम घेतले आहेत .

याचाच अर्थ मी १८०० दिवस कार्यक्रम घेऊन १८००० प्रशिक्षणार्थींना उद्योजकतेचे धडे दिले आहेत. वर्षाचे २६० कामाचे दिवस गृहीत धरता मी जवळपास ७ वर्षे फक्त या एकाच विषयावर पूर्णवेळ व्याख्याने दिलेली आहेत. या प्रदीर्घ अनुभवामुळे या विषयाची माझी उत्तम तयारी झालेली आहे असे मला नमूद करावेसे वाटते.या योगदानामुळेच मला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे 'उत्कृष्ठ प्रेरक प्रशिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि इतरही अनेक मान सन्मान मिळाले.


या शिवाय व्यक्तिमत्व विकास, Business Opportunity Search & Scanning ( BOSS), संस्था विकास (OD), विपणन व्यवस्थापन,

कश्यासाठी कोणाकडे सम्पर्क , जीवन कौशल्य(Soft Skills ), प्रेरणा,इ. माझे आवडीचे विषय आहेत. या विविध विषयावर मी राज्यभरात हजारो व्याख्याने दिलेली आहेत आणि काही लाख लोकांपर्यंत हे विषय पोहोचवले  आहेत.


नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आणि बहुतेक तालुक्यात,भारताच्या अनेक राज्यात,परदेशात इंग्लंड,युरोप,इ.ठिकाणी मला प्रवासाची संधी मिळाली .


कार्यक्रमांसाठी व्याख्याता म्हणून मला निमंत्रित केलेले प्रकल्प अधिकारी, कार्यक्रम समनव्यक, शिक्षण संस्था,कार्यक्रम पुरस्कर्ते संस्था,उद्योग विभाग-महाराष्ट्र शासन ,माझ्या प्रशिक्षणातून निर्माण झालेले शेकडो नवउद्योजक, औद्योगिक संघटना आणि सहभागी प्रशिक्षणार्थी, इ.यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि विशेषतः परमेश्वराचा मी खास आभारी तसेच ऋणी आहे की त्याने माध्यम म्हणून या कामासाठी माझी निवड केली.


एम.सी. इ. डी. तर्फे 'उद्योजकीय मराठी साहित्य संमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते, त्यापैकी पुणे आणि कराड (सातारा) येथे पार पडलेल्या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती .या घटना आठवत असताना डॉ. भा.रा.साबडे,कराडची पतसंस्था यांची देखील आठवण होत आहे.


महाराष्ट्र टाइम्स,सकाळ,

लोकमत,सागर,रत्नागिरी टाइम्स,लोकसत्ता,इ.वर्तमान

पत्रातून माझे अनेक लेख प्रकाशित झाले, E TV मराठी चॅनलने माझे १०-१२ एपिसोड प्रसारित केले, त्या सर्वांचा मी आभारी आहे.


श्री.प्रभाकर देशमुख साहेब, तत्कालीन जिल्हाधिकारी, पुणे यांच्या पुढाकारातून आणि श्री एस.एस.सुरवसे साहेब, तत्कालीन महाव्यवस्थापक, जि.उ.केंद्र, पुणे यांच्या साहाय्याने पुणे जिल्ह्यात राबवलेली 'राजश्री शाहू स्वरोजगार योजना' , महाराष्ट्र शासनातर्फे मराठवाड्यात राबविलेल्या 'रिटेल मॅनेजमेंट योजना ',एम.सी.ए.इ.आर. पुरस्कृत 'कृषी उद्योजकता कार्यक्रम'  

इ. प्रकल्प माझ्या कार्यातील विशेष उल्लेखनीय बाबी आहेत.श्री. जितेंद्र जोशी यांची रिटेल उपक्रम तर श्री. परकाळे साहेब, श्री. व्ही.डी. पाटील यांची कृषी उपक्रम  राबविण्यात मोलाची मदत झाली. 


सुरुवातीस प्रकल्प अधिकारी पदावर असताना ठाणे,

पुणे,नांदेड,रत्नागिरी,

बारामती येथे दीर्घकालीन उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केले .त्यानंतर मला पुणे विभागात विभागीय अधिकारी या पदावर खूप वर्षें काम करण्याची संधी लाभली,त्यानंतर दोनदा मराठवाडा विभाग ,आणि शेवटी मुंबई विभागात काम केले. या काळात तेथील प्रकल्प अधिकारी,कार्यक्रम समन्वयक,स्टाफ आणि सहाय्यक संस्था यांचे मौलिक सहकार्य लाभले. त्या सर्वांचा मी आभारी आहे.


मा.विभागीय आयुक्त,श्री. प्रभाकर करंदीकर साहेब,अनेक मा.जिल्हाधिकारी विशेषतः सर्वश्री,साहेब आणि मा .अमिताभ राजन, रमेशचंद्र कानडे ,श्रीनिवास पाटील,इ. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.विशेषतः राजेंद्र पवार, रमेश देवकर, इ. विकास आयुक्त उद्योग, विशेषतः यशवंत भावे, जयंत कावळे,इ. यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवण्याची संधी मला लाभली.अनेक मा.ना.मंत्री, खासदार,आमदार,शिक्षण तज्ञ,उद्योग विकास संस्था अधिकारी,समाजसेवक, अनेक साहित्यिक,उद्योजक स्व.बी.जी.शिर्के साहेब, श्री. सुभाषजी दांडेकर, स्व.गजाननजी पेंढारकर,

श्री.राजकुमारजी चोरडिया,श्री.विशाल चोरडिया आणि चोरडिया कुटुंबीय, राज ग्रुप चे श्री. कदम साहेब आणि श्री.निंबाळकर साहेब,श्री. राम भोगले साहेब,श्री. परशुरामभाऊ चितळे, मानसशास्त्रज्ञ स्व.मनोहर नाडकर्णी,

स्व.डॉ.राम कुलकर्णी, डॉ.एम.यु.देशपांडे,

डॉ.सुधीरजी गव्हाणे सर,

स्व.आप्पासाहेब पवार,श्री. शिवराज गोर्ले, स्व.जयंत रानडे,मा.श्री. आण्णा हजारे,मा.कार्यकारी   संचालक,एम.सी.इ.डी. श्री.बी.व्ही.राठोड आणि इतर सर्व माजी व आजी का.सं; संस्थेतले अनेक कार्यक्रम आयोजक,प्रेरक प्रशिक्षक सर्वश्री दत्ता मुळे, शेरखान पठाण,विलास आहेर,दीपक भिंगरदेव,संजय भामरे,सुबोध बायस,सुरेश उमाप, विशेषतः माझे बॅच मेट सर्वश्री राजकुमार फटाटे,

सुनील चांडक,अरुण गाट ,'उद्योजक' विभाग,आणि एम.सी.इ.डी.मधील स्टाफ,इ.तसेच माझा मित्र श्री.उन्मेष गायधनी ,या सर्वांचा सहवास मला लाभला , यांच्याकडुल मला खूप,खूप शिकायला मिळाले आणि माझे व्यक्तिमत्व घडत गेले .या सर्वांचा मी शतशः आभारी आहे.


मला अनेक संस्थांतून प्रशिक्षणाची संधी लाभली,EDI-I, अहमदाबाद, NISBUD आणि ASEED दिल्ली, रांची,कोडाई कॅनॉल,गुवाहाटी, इ.येथील उद्योजक विकास संस्था,FORMAPER - मिलान,इटली, या संस्थांची मला आठवण होत आहे.या संस्थांशी संबंधित  डॉ.व्ही.जी.पटेल,डॉ.सी. एच.पाठक,श्री.रमेश दवे,श्री.अजय दीक्षित,

डॉ.एम.एम.पी.अखोरी,डॉ.

एन.पी.सिंग,डॉ.उदय पारेख, अश्या अनेकांचा मी खूप खूप आभारी आहे.


सुदैवावे श्री. सुरेश रानडे साहेब मला पहिले बॉस म्हणून लाभले. उत्कृष्ठ सल्लागार,प्रशिक्षक,

उपदेशक,वक्ता,अभ्यासू , उत्साही आणि उद्योजकता विकासाची हृदयापासून  तळमळ अश्या अनेक गुणांचे ते रसायन आहेत. त्यानंतर लाभलेल्या प्रत्येक बॉस मधे मी श्री. रानडे शोधत राहिलो.


गेल्या ३४ वर्षांच्याकाळात मी खूप चढ-उतार पाहिले.

संस्थेत मी कायम महत्वाकांक्षी राहिलो आणि ही महत्वाकांक्षा मी कधी लपवून ठेवली नाही. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी करंदीकर कमिटी रिपोर्ट तयार केला होता. त्यात चीफ प्रोजेक्ट ऑफिसर असे एक पद होते.१२ वर्षानंतर यापदावरील अधिकाऱ्यास संस्था प्रमुख होण्याची संधी होती.पुढे दोन  कार्यकारी संचालकांनी दोनदा रिपोर्ट मधे बदल मंजुर करून घेतले. यामुळे प्रोमोशन मधे अनेक अडचणी वाढल्या .


मध्यंतरी ९ महिने मला के.व्ही.आय.बी. कडे प्रतिनियुक्तीवर काम पाहण्याची संधी लाभली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.रमेश देवकर साहेब आणि त्यांचे अधिकारी वर्ग जे नंतर माझे चांगले मित्र झाले असे सर्वश्री.धर्मेंद्र काळोखे,पी.के.सावंत,आनंद कर्णिक यांच्या सोबत कार्य करण्याचा योग आला. त्या सर्वांचा मी आभारी आहे.


या सर्व प्रवाहात मला माझी पत्नी सौ.अनिता आणि मुलगा चि. अमेय यांची उत्तम साथ लाभली. तसेच सर्व देवकर कुटुंबीय आणि विशेषतः थोरले बंधु श्री कालिदास देवकर यांचे सहकार्य लाभले .यासर्वांचा मी आभारी आहे.


माझ्या कारकिर्दीच्या यशात अनेकांचा वाटा आहे, सर्वांचाच नामोल्लेख करणे शक्य नाही.नामोल्लेख नाही म्हणून कोणी नाराज होऊ नये अशी विनंती . प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभारी आहे.


उद्योजकता विकास चळवळ, संस्थेतील कर्मचारी आणि संस्थेच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो .


३१ मे २०१९ रोजी मी निवृत्त होत आहे. शेवटी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो.


धन्यवाद !

योगीराज देवकर .