Thursday, 1 July 2021

कोरोना काळातील लग्नाचे आमंत्रण. एक काव्य.

 कोरोना काळातील लग्नाचे आमंत्रण


या काव्यात संत आणि सामान्य माणूस तसेच लग्नघरातील श्रीमान,श्रीमती अशी चार काल्पनिक पात्र आहेत. कोणाच्या प्रसंग अथवा घटनेशी हे जुळत असेल तर हा निव्वळ योगायोग समजावा. संत म्हणजे आध्यात्मिक मार्गाने जाणारा आणि पारमार्थिक सुख पाहणारा व्यक्ती,तर सामान्य माणूस म्हणजे चारचौघा सारखे जीवन जगणारा आणि भौतिक सुख पाहणारा व्यक्ती. श्रीमान मायक्रोअँग्रेशनची(अहंकार) शिकार,तर श्रीमती हतबलता दर्शविणारी व्यक्तीमत्व होत. समाजात आपल्या आजूबाजूला अशी नाट्ये  घडत असतात . आपण आपले डोळे,कान उघडे ठेवले की ती अनुभवास येतात. 

*काव्य*

संत असो वा सामान्य माणूस एकसारखाच स्वार्थी असतो हेच खरे.

दोघांनाही वाटते पन्नास आमंत्रितांच्या यादीत आपले नाव असेल तर बरे ।

संत सुध्दा तुला आलंय का आमंत्रण असे याला त्याला विचारात असतो.

लगीन घरातल्यांना अजून माझे नाव कसे नाही सुचले विचार करत बसतो ।।१।।

श्रीमान,श्रीमती यापैकी कोणाला बरे पुश करावे याचे चिंतन करत असतो.

श्रीमान काय, अन श्रीमती काय शेवटी रक्ताची असतात तीच आपली हे उमजतो ।

दोघांनीही जर काही इलाज नाही म्हटले तर अवघड होऊन बसेल..मग तत्पूर्वीच,

भात्यातील कोणती बरे शस्त्रे वापरावीत हे साक्षात देवालाच विचारतो ।।२।।

मी मुलीचा किंवा मुलाचा मामा असतो तर किती बरे झाले असते.

लगीन घरच्यांना ब्राह्मणानेच सांगितले असते की मामाला बोलवायचे असते ।

मुलांचा मामा नसलो म्हणून काय झाले,आण्णा,दादा सारखाच एखादा मामाही असतो.

मामा या लाभलेल्या उपाधीचा लाभ अश्यावेळी नाही तर मग कधी होणार असतो ।।३।।

फोनचा मेसेज वाजला,दुसऱ्याला फोन आला तरी पहात अथवा विचारत असतो .

अरे देवा ! मी तर अजून इथेच आहे, माझी दखल का घेत नाही म्हणून खट्टू होऊन बसतो ।

त्यापेक्षा श्रीमतीला फोनच केलेला बरा, हवा-पाण्याच्या गप्पा माराव्यात म्हणतो .

फोनवर बोलताना आमंत्रणाचे आठवणारच नाही असे कसे होईल हे तो हेरतो ।।४।।

देवाकडे नमस्कार, विनवण्या,प्रार्थना सारे काही अगदी मनोभावे करतो.

हे सगळे जगासाठी करायचे असते असे म्हणणारा यावेळी मात्र स्वतःसाठी करतो ।

संत असूनही ध्यान,झोप लागत नाही आणि सारे संतुलन गमावून बसतो .

अजून कसे फळ मिळाले नाही म्हणून चेहरा चिंताग्रस्त करून असतो ।।५।।

शेवटी एकदाची प्रार्थना लागू होते, कुटुंबप्रमुखाचा फोन येतो,मग चेहऱ्यावर लाली झळाळते .

डोळ्यात बालिश ,निरागस तेज वाढते आणि गालावर हास्याची लकेर उमटते ।

सर्वांच्या आधी मी कसे माझे तिकीट निश्चित केले याचा वेगळाच आनंद दाटतो.

कोरोनाच्या काळात हवाई प्रवासाच्या तिकिटापेक्षा याच तिकिटाची किंमत जास्त वाटते ।।६।।

जनसंपर्क मोठा असेल तर ? तर हा , पन्नास लोकांची यादी बनविणे अवघडही असेल.

पण नावांची पसंती ठरविताना लग्नघरात नक्की कोणाचे बरे चालत असेल ?

हा माहेरचा,तो सासरचा,हा असा,अन तो तसा,अशी चर्चा तिथेही झडत असेल .

पण राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्या इतके का ते अवघड असेल ?।।७।।

या पन्नास नावांच्या भानगडीत ज्यांनी आपला पाहुणचार घेतलेला आहे ते सुद्धा बदलतात.

आपल्या टॉप मोस्ट फायद्याचे कोण आहेत, त्यांचीच नावे फक्त ते नक्की करतात ।

उशिरा का होईना ज्याला तोंडी आमंत्रण येते तो आनंदतो अन सुखावतो .

प्रथा,परंपरे प्रमाणे ज्याला आमंत्रण दिले गेले नाही तो मात्र दुखावतो अन दुरावतो।।८।।

आयोजकांचा होमवर्क कच्चा असेल तर आमंत्रितांपैकी ऐनवेळी नकार देणारी संख्या वाढते .

आता मात्र जे वेटिंग लिस्टवर होते वा ग्रहित नव्हते त्यांना कॉल करायची धांदल उडते ।

अशा वेळी घाई करायची नसते, तुम्ही वॉन्टेड होता का अनवॉन्टेड हेही पहायचे असते.

कोणामुळे तरी रिकामी झालेली जागा भरायला न मिळाल्यासारखे जायचे नसते ।।९।।

लग्नाच्या ठिकाणी तुम्ही वॉन्टेड होता का अनवॉन्टेड हे समजणे फारच सोपे असते.

वॉन्टेड ला नमस्कार, चमत्कार आणि अनवॉन्टेडला साधी नजरेला नजर सुद्धा नसते ।

वॉन्टेडच्या डोक्यावर फेटा बांधला जातो आणि खायचं-प्यायचं असतं म्हणून तोंडावर मास्क नसतो .

अनवॉन्टेडला खायचं-प्यायचं नसतं म्हणून तोंडावरचा मास्क तसाच असतो अन डोक्यावर फेटा नसतो ।।१०।।

तसंही कोरोनामुळे सोशिअल डिस्टनसिंग, सँनीटायझेशन आणि मास्क वापरायचा आहे.

लग्नाच्या भाऊगर्दीत तुम्ही होता काय आणि नव्हता काय कोणाला समजणार आहे ।

सरकार सावध करतंय, दिवाळीनंतर कोरोना वाढतोय,उगाच कशाला गर्दीचा भाग व्हायचे आहे.

सध्या सगळं कसं ऑनलाईन आहे, वधु-वराला घरात बसूनच आशीर्वाद व शुभेच्छा द्यायची ही वेळ आहे ।।११।। 


योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

प्रेरक,प्रशिक्षक,लेखक.

२२/११/२०२०


मयूर इंगळे, एनविरो स्मार्ट

 Saturday Club Global Trust -Wakad Chapter. Success Story-Two.

श्री मयूर इंगळे- एनविरो स्मार्ट.

At present Mr Ingale is not active in this business since March 2021 end. The care of the business is being taken by his partner.

एनविरो स्मार्ट ही फर्म इंडस्ट्रियल ऑइल,लुब्रिकेन्ट्स, लाईट डिझेल ऑइल (LDO), बायो-डिझेल किंवा फ्युएल, या उत्पादनांची सप्लायर आणि ट्रेडर्स आहे. या उत्पादनांचा उपयोग प्रामुख्याने इंडस्ट्री आणि ट्रान्सपोर्ट या विभागात केला जातो. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव, चाकण,मरकळ आणि कुरकुंभ एम.आय.डी. सी. मधील काही उद्योगांना त्यांच्यामार्फत इंडस्ट्रियल ऑइल आणि LDO चा पुरवठा होत आहे.


एनविरो स्मार्ट कडे तीन आणि सहा हजार लिटर क्षमतेचे डिस्पेन्स मशीनसह बायो-डिझेलची वाहतूक करणारे दोन टँकर्स आहेत. याद्वारे ते किमान १०० लिटर्स पासून ते कमाल ६००० लिटर्स पर्यंतच्या ऑर्डर्स स्वीकारतात आणि ग्राहकाला जागेवर जावून मालाचा पुरवठा करतात.


एनविरो स्मार्ट द्वारा पुरवठा केले जात असलेले बायो-डिझेल हे एक विशेष उत्पादन आहे. इको फ्रेंडली, पारंपरिक डिझेलच्या तुलनेत ५ ते ६ रुपयांनी स्वस्त , इंजिनचा चांगला पिकअप आणि कार्यक्षमतेत वाढ ही बायो-डिझेलची खास वैशिष्ठे आहेत. त्यामुळेच वाहने आणि जनरेटर्स साठी बायो-डिझेलचा वापर वाढताना आढळत आहे.


अगदी १५मार्च २०२० पर्यंत त्यांची दरमहा साधारणपणे २५ ते ३० हजार लिटर्स बायो-डिझेलची विक्री होत होती. कोव्हीड-19 मुळे लॉक डाउन झाला आणि अन लॉक होईपर्यंत त्याची विक्री मोठा शून्य झाली . दरमहा लाखभर रुपयांचा स्थिर खर्च सुरू होता आणि दोन्ही कामगारांना काही काम उरले नव्हते. अन लॉक सुरू झाला तशा काही इंडस्ट्रीज सुरू झाल्या आणि LDO आणि इंडस्ट्रियल ऑइल या उत्पादनांना मागणी सुरू झाली परंतु अजून ट्रान्सपोर्ट सुरू झाला नव्हता.


श्री इंगळे हे SCGT-Wakad Chapter चे मेंबर आहेत. तिथेच त्यांची श्री निलेश कुलकर्णी यांच्याबरोबर ओळख झाली. प्रथम श्री कुलकर्णी यांनी त्यांच्या बसेससाठी या बायो-डिझेलचा वापर केला. त्यामुळेच श्री कुलकर्णी यांना या उत्पादनाबद्दल खात्री पटली . पुढे हाच मुद्दा श्री इंगळे यांना व्यवसाय मिळवून देण्यास गेम चेंजर ठरला.


श्री निलेश कुलकर्णी यांनी श्री इंगळे यांना गिरीकंद ट्रॅव्हल्सचा रेफेरन्स दिला. गिरीकंद ट्रॅव्हल्सने यापूर्वी दुसऱ्या उत्पादकांचे उत्पादन वापरले होते परंतु त्यांचा अनुभव चांगला नव्हता. श्री कुलकर्णी यांनी अगदी आग्रहाने श्री इंगळे यांच्याकडून बायो-डिझेल विकत घेण्याची शिफारस केली आणि दर्जाबद्दल खात्री दिली . गिरीकंद ट्रॅव्हल्सने सुरुवातीस ट्रायल साठी थोडे बायो-डिझेल घेतले आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनुभव आल्यानंतर त्यांनी एनविरो स्मार्टला  आतापर्यंत अनेकवेळा रिपीट ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि जानेवारी 21 पर्यंतच 25,00,000 ₹ किंमतीचे बत्तीसहजार लिटर पेक्षा जास्त बायो-डिझेल खरेदी केलेले आहे आणि ही खरेदी भविष्यात अशीच  सुरूच राहणार आहे. हा व्यवहार असाच सुरू राहील तर  2021 मध्येच त्यांचा हा बिझनेस एक कोटीपेक्षा जास्त होईल असा एक अंदाज आहे.


वाकड चापटरचे आणखी एक सदस्य श्री विजय नवले देखील श्री इंगळे यांच्याकडून बायो-डिझेलची खरेदी करीत आहेत.


क्लब जॉईन करण्यापूर्वी अपेक्षा केल्याप्रमाणे घटना घडत आहेत त्यामुळे श्री इंगळे यांनी Saturday Club Global Trust-SCGT बद्दल समाधान व्यक्त केले. "SCGT हा एक चांगला ट्रस्ट आहे. खरंतर लॉक डाउनच्या काळात मी काहीसा निराश झालो होतो पण क्लब मुळे भावनिक सपोर्ट मिळाला आणि आपल्यामागे कोणीतरी भक्कमपणे उभे आहे असे जाणवले ! ",अशा शब्दात श्री इंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सध्या श्री इंगळे या व्यवसायात नाहीत. परंतु SCGT Wakad चे सदस्य असताना त्यांना चाप्टर चा भरपूर फायदा झाला.


सदर क्लब हा महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी GET & GIVE या तत्वावर आधारित काम करतो. एकमेकांना सहाय्य केल्याने प्रत्येकाचाच व्यवसाय वाढणार आहे हे निश्चित.


कथा लेखक- योगीराज हरिश्चंद्र देवकर. SCGT-Wakad Chapter, Secretary.

Mob: 9307133134.

www.motivationacademy.in

निलेश कुलकर्णी, आकांक्षा हॉलिडेज

 सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट-वाकड . सदस्यांची सक्सेस स्टोरी.

श्री निलेश कुलकर्णी - आकांक्षा हॉलिडेज प्रा.


श्री निलेश कुलकर्णी परीक्षा आकांक्षा हॉलिडेज प्रा. ही कंपनी पिंपरी-चिंचवड मध्ये सूचीबद्ध आहे. कंपनीच्या दहा विभागातील बारा कर्मचार्‍यांचे संक्षिप्त वर्णन.टिओटॉ सॉफ्टवेयर आणि ऑल स्क्रिप्ट, खराडी सिटी आयटी कंपनी या कार्यालयांचे कर्मचा वाहतूक्यांचा अनुभव. आपण शोधू शकता मार्केटमध्ये व्यवसाय करू शकता. सर्व चालू आनंद आणि सुरळीत चालू.


श्री कुलकर्णी हे Saturday Club Global Trust- Wakad Chapter चे  सदस्य आहेत.( Mob- 8087830007)  जवळपास सगळेच सदस्य क्लबच्या मीटिंग अटेंड करीत असत . क्लबने १८ मार्च २०२० रोजी क्लस्टर मीट आयोजित केली होती. परंतु कोव्हीड-19 मुळे  महाराष्ट्र शासनाने १५ मार्च पासूनच राज्यातील मोठ्या शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ लागू केला त्यामुळे सदर मीट रद्द झाली. २२ मार्च ला देशात जनता करफ्यु झाला , त्यापाठोपाठ लॉक डाउन सुरू झाला. लॉक डाउनचा परिणामस्वरूप आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली. ला काम पुरविणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे कामकाज बंद झाले आणि सर्व बसेस घरासमोर उभ्या राहिल्या, बारा कर्मचाऱ्यांच्या सेवेतही खंड पडला.


१५ मार्च ते १० ऑगस्ट पर्यंत दरमहा साडेपाच लाख ₹ बसेस चे EMI आणि कर्मचाऱ्यांचा पगार असा फिक्स्ड खर्च चालू होता आणि उत्पन्न मात्र शून्यावर आले होते. दोन महिन्यांतरच भांडवल संपले आणि बसेसचे EMI भरण्यासाठी स्वतःच्या बचतीमधील पैसे वापरण्याची वेळ आली. श्री कुलकर्णी यांच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. जसजसा लॉक डाउन वन,टू,थ्री,फोर वाढत होता तसतसे घरासमोर उभ्या असलेल्या बसेसवर धूळ वाढत चालली होती आणि आपल्यासमोर नक्की काय भविष्य वाढून ठेवलंय हा विचार मनात येऊन भीती वाढत चालली होती. कधीनव्हे ते व्यवसायिक पातळीवर निरव शांतता झाली होती. 


एका बाजूला हे अघटित घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र Saturday Club Global Trust-SCGT आणि बाहेरील काही समव्यावसायिक मित्र मानसिक आधार आणि सहाय्य देण्यासाठी उपलब्ध होते. लॉक डाउनच्या काळात क्लबने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. SCGT Wakad हा व्हाट्सअप्प ग्रुप होताच त्यावर प्रत्येकाचे बिझनेस प्रोफाइल शेअरिंग सुरू झाले.२५ मार्च पासूनच SCGT च्या ऑन लाईन मीटिंग  सुरू झाल्या. १ एप्रिल पासून वाकड चापटर चे 'सहाय्य करू मिशन' सुरू झाले.क्लब मधील सदस्यांचे तीन गट केले गेले आणि प्रत्येकाला प्रेझेंटेशन ची संधी मिळू लागली. डिजिटल मीटिंग मुळे क्रॉस चापटर मीटिंग अटेंड करायची संधी उपलब्ध झाली. SCGT चे विविध विषयांवर वेबिनर सुरू झाले. यासर्व गोष्टींचा मानसिक संतुलन राखण्यास आणि आत्मविश्वास टिकून राहण्यास फार फायदा झाला. ऑन लाईन वन-टू-वन होत होते, मैत्री निर्माण होत होतो आणि परस्परामधील विश्वास वाढीला लागला होता.


आणि.....Saturday Club- Wakad Chapter मुळे श्री कुलकर्णी यांना पहिला break through मिळाला. श्री कौस्तुभ बाबर Saturday Club- Wakad चे ट्रेझरर आहेत. त्यांची फोर डायमेंशन बिल्डकॉन प्रा.ली. ही कंपनी आहे. श्री बाबर यांचे शापुरजी पालोनजी ग्रुप मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्यामुळे श्री कुलकर्णी यांना शापुरजी पालोनजी ग्रुपचा रेफेरन्स मिळाला आणि आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.चे चित्रच पालटले. लॉक डाउन लागल्यामुळे शापुरजी पालोनजी ग्रुपचे हजारो कामगार भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात स्वतःच्या गावी गेले होते. महाराष्ट्रात अन लॉक सुरू झाला तसे त्या कामगारांना परत आणण्याचे काम सुरू झाले होते. तीन बस सप्लायर तिथे काम करीत होते , चौथा बस सप्लायर म्हणून आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली. ला काम देण्यात आले.


कामगारांना प्रवासासाठी आवश्यक मेडिकल पास ची व्यवस्था शापुरजी पालोनजी ग्रुपने केली. लागलीच आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.ने बसेस परराज्यात नेहण्यासाठी E-passes काढले. वाहनांची सर्व कागदपत्र अद्ययावत केली. बसेस सँनेटाईज केल्या. ड्रायव्हर्सना कोरोना प्रबंधक सर्वनियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक केले. स्टेट बॉर्डर टॅक्स भरण्याची सोय केली आणि बसेस परराज्यात जाण्यासाठी सज्ज झाल्या.


ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० या दोन महिन्यात आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.ने शापुरजी पालोनजी  ग्रुपच्या २००० कामगारांना बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड,कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूर याठिकाणी आणले. त्यावेळी भारतात होत असलेली अतिवृष्टी,नदी-नाल्यांना आलेले पूर आणि त्यामुळे निर्माण झालेले अडथळे, बदलणारे वेळापत्रक,इ. यासर्व गोष्टीवर मात करून श्री बाबर आणि शापुरजी पालोनजी ग्रुपने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविला. या कार्यात शापुरजी पालोनजी ग्रुपच्या टीमने फार मोठा सपोर्ट केला असे श्री कुलकर्णी आवर्जून सांगतात.


पैसा हे यशाचे मोजमाप करण्याचे एक साधन आहे. आकड्यातच बोलायचे झाले तर श्री कुलकर्णी यांनी केवळ दीड महिन्यात शापुरजी पालोनजी ग्रुपचा ९२ लाख रुपयांचा व्यवसाय केला. याशिवाय श्री बाबर यांनी त्यांच्या कंपनीचे कामही श्री कुलकर्णी यांना दिले त्याद्वारा १२ लाखाचा व्यवसाय केला. क्लब च्या इतर सदस्या मार्फतही त्यांनी ५-६ लाखाचा व्यवसाय केला. या अडचणीच्या काळात श्री कुलकर्णी यांना फक्त Saturday Club Wakad Chapter च्या माध्यमातून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.


श्री निलेश कुलकर्णी काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात, " श्री स्वप्नील कुलकर्णी सर मला Saturday Club चा मेंबर हो म्हणून तीन वर्षापासून मागे लागले होते. मला वाटायचं माझा व्यवसाय हा कार्पोरेट क्षेत्राशी निगडित आहे. क्लब मध्ये वैयक्तिक व्यवसाय करणारे उद्योजक जास्त असतात त्यामुळे क्लबचा मला विशेष फायदा होणार नाही. पण चला नवीन मित्र तर मिळतील म्हणून मागीलवर्षी मी मेंबर झालो. परस्परात विश्वास निर्माण झाला त्यातूनच मैत्री वाढली. एक सदस्य सौ भारती मुरकुटे मॅडम मुळे मला ऑफिसला जागा मिळाली. आता आम्ही पाच सदस्य एकत्र येऊन सर्वांना लवकरच एक मोठी बातमी देणार आहोत. सर्व सुरळीत चालू असताना हा व्यवसाय मिळाला असता तर त्याचे विशेष वाटले नसते पण अडचणीच्या काळात हा व्यवसाय मिळाला म्हणून त्याचे मोल फार मोठे आहे. मला व्यवसाय मिळाला त्यामुळे जसा माझा आत्मविश्वास वाढला तसेच मी इतर सदस्यांना व्यवसाय मिळवून दिला पाहिजे ही भावनापण वाढली. त्यातूनच मी श्री मयूर इंगळे यांना गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये रेफरन्स दिला आणि आग्रहाने व्यवसाय पण मिळवून दिला आहे. धन्य आहेत ते कै. माधावरावजी भिडे सर ज्यांनी Saturday Club Global Trust ही संकल्पना प्रत्येक्षात आणली. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात माझ्यासारख्या हजारो उद्योजकांना व्यवसाय मिळत आहे. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत ही क्लबच्या प्रार्थनेतली ओळ इथे खरी ठरत आहे ! "


मराठी माणूस मराठी माणसाला सहाय्य करीत आहे ही कौतुकास्पद गोष्ट या क्लब मध्ये घडत आहे.


कथा लेखक- योगीराज हरिश्चंद्र देवकर. Saturday Club-Wakad Chapter , Secretary.

Mob 9307133134.

www.motivationacademy.in

Thursday, 16 July 2020

अहंकार सोडा, माणसं जोडा.

नमस्कार !
*अहंकार सोडा , माणसं जोडा.*
Anthropology म्हणजे मानवशास्त्र. मानवाचा वर्तणूक,सामाजिक,सांस्कृतिक,नॉर्मस (चांगले वागण्याचे अलिखित प्रमाण.)मूल्ये यांचा भूतकाळ आणि वर्तमान काळातील अभ्यास. यात अनेक विशेष गुण (Distictions) सांगितले जातात. यावर आधारित जे प्रशिक्षण कार्यक्रम होतात त्यात यापैकीच एका distiction बद्दल बोलले जाते ते म्हणजे रॅकेट्स. म्हणजे खरे लपवायचे आणि  खोटे दाखवायचे.यालाच माणूस ढोंग करतो असे म्हणतात. आपले ढोंग आपणच ओळखून ते दूर करण्यासाठी याचा गुणाचा उपयोग केला जातो.
*ढोंग.*
आपल्यापैकी प्रत्येकात  एक ढोंग लपलेले असते. ढोंग म्हणजे काय तर आपली अनुत्पादक( unproductive behavior or actions.) वागण्याची पद्धत किंवा आपण करत असलेली कृती असते. यात आपण दुसऱ्यांविषयी  *जी खरी नाही* अशी तक्रार सतत करत असतो. आपण मात्र त्या तक्रारीला खरे मानत असतो आणि आपणच सतत बरोबर असे वागत असतो. अशा या वागण्यामुळे आपल्याला एका बाजूला काही फायदा किंवा लाभ होत असतो त्यामुळे वर्तणुकीचे हे चक्र अधिकच बळकट होते. आपल्या हे लक्षातच येत नाही की पुष्कळदा आपली तक्रार खोटी किंवा बोगस असते. कदाचित कधीतरी ती बरोबर,योग्य किंवा अगदी कायदेशीर सुद्धा असू शकेल.

पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला आपल्याला या वर्तणुकीची किंवा कृतीची भरमसाठ किंमत मोजावी लागत असते.

*तुम्ही ढोंगी आहात*, असे जर कोणी म्हटले तर ते तुम्हाला आवडणार पण नाही आणि मान्यही नसेल. तर मग हे ढोंग शोधायचे कसे.

तर ढोंग म्हणजे काय तर , *तुमचा वागण्याचा ठरलेला मार्ग + तुम्ही सतत नेटाने करत असलेली तक्रार*. अशी माणसं जबाबदार असणे टाळतात.

आपण ढोंगामुळे होणारे फायदे किंवा लाभ बघूया.
१)तुम्ही बरोबर,योग्य,खरे आणि इतर लोक चूक हे ठरविणे तुमच्याच हातात असते. तक्रारदार,वकील आणि न्यायाधीश सगळे तुम्हीच असता.
२) स्वतःच्या मताचे किंवा विचारांचे समर्थन केले जाते आणि दुसऱ्याला कमकुवत किंवा कमजोर केले जाते.
३)स्वतःची सत्ता गाजविता येते आणि दुसऱ्याची सत्ता नाकारली किंवा टाळली जाते.
४)स्वतःला जिंकता येते आणि इतरांना हरविता येते.

आता ढोंगाची मोजावी लागणारी किंमत पहा.खरं तर ही तुमच्या आनंदीपणाची किंमत असते.
१) एकमेकांमधील संबंध ( Interpersonal relations) खराब होतात. नातेसंबंध खराब होतात. प्रेम, करुणा, जिव्हाळा रहात नाही.
२) स्वतःला खरं व्यक्त करता येत नाही .
३) सहनशीलता , मानसिक सामर्थ्य कमी होते आणि स्वतःचे कल्याण आणि सुस्थिती अडचणीत येते.
४)तुम्ही स्वयंपूर्ण होऊ शकत नाही.
५) आपणच आपले समाधान हरवुन बसतो.

ढोंगाच्या मिळणाऱ्या लाभातच आपण अडकून पडायचे आहे का मोजावी लागणारी किंमत बघून जागे व्हायचे आहे हा खरा प्रश्न आहे. आपणच आपले ढोंग ओळखू शकतो .ढोंगासाठी मोठी किंमत मोजावी लागत असूनही ते आपण तसेच जागेवर कसे ठेवू शकतो याचा विचार करावा.

वर्तणूकीच्या या चक्रामध्ये व्यत्यय आणणे आणि ते बदलणे हा पर्याय तुम्ही स्वतःच निवडू शकता.
तुम्ही संवादाचा नवीन मार्ग शोधू शकता. तुम्ही आनंदी राहण्यासाठी सतत नवनवीन शक्यता निर्माण करु शकता. सुसंवादाचा नवीन मार्ग आणि प्रेम आणि करुणेच्या नवनवीन शक्यताच आपल्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत.

*तुमच्या वर्तणुकीच्या पॅटर्न चा अभ्यास करा* - एका प्रसिद्ध अभिनेत्याला विचारले होते. तुम्ही फार तापट आणि रागीट स्वभावाचे आहात. तुमच्या सडेतोड बोलण्यामुळे बरेच लोक दुखावतात . याबद्दल तुमचे काय मत आहे. तर ते म्हणाले ,"असे होते हे मला माहित आहे. पण जायनाका दुखावली गेली तर,जी माणसे दुखावली जातात ती त्याच लायकीची असतात."
असला बेफिकिरपणा,
बेजबाबदारपणा तुम्हाला परवडणारा आहे का .
याच अभिनेत्याला साठीनंतर विचारले होते, आता तुमच्या वागण्या,बोलण्यात काही बदल झाला आहे का. तर ते म्हणाले ,"हो झाला आहे ना. पूर्वी रागावल्यावर मी मोठ्या आवाजात शिवी द्यायचो, आता हळू आवाजात देतो."

तुम्हीही जर असेच वागत-बोलत असाल तर होणाऱ्या लाभाचा आणि मोजाव्या लागणाऱ्या  किंमतीचा हिशोब तुम्हीच लावा.

सामाजिक झाड ( Community tree) अशी एक टर्म वापरली जाते. तुमचे आयुष्य हे जर एक झाड आहे असे मानले तर जन्म झाल्यापासून आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला भरपूर सामाजिक फांद्या फुटतात. जसे की, कुटुंबीय,शेजारी,गाववाले,शाळा- कॉलेज मित्र,शिक्षक,नातेवाईक, नोकरी-प्रोफेशन-उद्योग-व्यापरातले लोक,खेळ,
सहली,परदेश प्रवास, आवडीची क्षेत्र जसे की , सांगीतिक,सामाजिक,सेवाभावी,राजकीय,सांस्कृतिक,आध्यात्मिक क्षेत्र,छंद, पुढे मुलांमुळे निर्माण होणारा लोकसंग्रह,इ. अशा या प्रत्येक फांदीवर कितीतरी लोक जोडले गेलेले असतात. याचाच आपण नेटवर्क असे म्हणतो.
तुमच्या चांगल्या वागण्या-बोलण्यामुळे लोक जोडले जातात तर वाईट वागण्या-बोलण्यामुळे लोक तोडले जातात. केवळ तुमच्या उद्दामपणामुळे, विनाकारण तुम्हीच तुमच्या सामाजिक झाडाच्या किती फांद्या किंवा त्यावरील लोक दुखावले आहेत , नाराज केले आहेत, याचे आत्मपरीक्षण अधून मधून केले जावे.

*सतत तक्रारी किंवा प्रतिक्रियांची सवय*- तुमच्यात जे चांगले आहे त्याचा उपयोग तुम्ही इतरांना डॉमीनेट करण्यासाठी तर करत नाही ना. म्हणजे तुम्ही जर परफेक्टनिस असाल तर जे परफेक्ट नाहीत त्यांना सतत टोचून बोलायचे आणि पाणउतारा करायचा. दुसऱ्यांच्या  कामाबद्दल,
वागण्या-बोलण्याबद्दल,निर्णयाबद्दल तुम्ही सतत तक्रार तर करत नाही ना. सतत प्रतिक्रिया देऊन त्यांना हैराण तर करत नाही ना. तुमच्या तक्रारी, प्रतिक्रिया खऱ्या असतात का खोट्या. का उगीचच स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी तुम्ही असे वागता. तुम्हाला असे वागून खरंच आनंद मिळतो का अघोरी आनंद . तुमची वर्तणूक आणि कृती productive आहे का unproductive याचे आत्मपरीक्षण करायला हवे.

हे ढोंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अहंकार आहे. अहंकार सोडा आणि माणसं जोडा.

योगीराज देवकर.
लेखक आणि प्रेरक प्रशिक्षक.
www.motivationacademy.in

Monday, 1 June 2020

लॉक डाउन मधील माझी कथा

लॉकडाउन मधील माझी कथा.
२२ मार्च २०२० रोजी Janata Curfew झाला त्यापाठोपाठ भारत लॉकडाऊन झाला आणि  स्वयंपाक व स्वच्छता घरकाम करणाऱ्या मावश्या कामाला येणे बंद झाल्या. त्यांच्या गैरहजेरीत स्वयंपाकाची जबाबदारी अनिता मॅडमने घेतली आणि स्वच्छतेची जबाबदारी माझ्याकडे आली.

मॅडमला स्वयंपाकाचा ३१ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्या या कामात सुगरण आहेत. शिवाय मॅडमला बोलायला खूप खूप आवडते त्यामुळे त्यांच्या कामाची प्रसिद्धी सहजासहजी होतच आहे. माझा विषय निघालाच तर त्या म्हणतात यांना फक्त पाणी आणि दूध गरम करता येते, झालं ,संपला माझा स्वयंपाक घरातला रोल. तेव्हा मी विचार केला आपणच आपली कथा लिहावी.

घर स्वच्छता हा एक लहानसा शब्दप्रयोग असला तरी त्याच्या   Role & scope चा विचार केला तर त्यात पुष्कळ कामांचा समावेश होतो. घर झाडणे,पोछा मारणे,भांडी धुणे,शेगडी,ओटा,सिंक,बेसिन,मोरी,बाथरूम,टॉयलेट साफ करणे, टेबल टॉप पुसने, कपडे भिजवणे,वॉशिंग मशीन लावणे,कपडे वाळू घालणे आणि नंतर घड्या घालणे,पिण्याचे पाणी भरणे, कुंड्यांना पाणी घालणे,इ. लॉकडाउन ४.०,५.० वगैरे असा वाढत राहिला तर यात किचन ट्रॉलीज,किचन चिमणी,पंखे,खिडक्यांच्या काचा,आरशे, भिंतीवरील जळमटे,इ. अशी भर पडू शकते.

याशिवाय धोका पत्करून दळण टाकणे आणि आणणे,भाजीपाला,किराणा,मेडिकल अशी बाहेरची कामे पण असतात. यातली काही कामे दररोज असतात,काही दिवसात ३-४ वेळा( भांडी),काही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा,काही गरजेनुसार असतात.

कामवाल्या मावशीला इतकी कामे नसतात पण मी आता कामवाला मामा झालो आहे.

या लॉकडाउन मुळे भारतातील सेलेब्रिटीज वर स्वतःच्या मुलांचे केस कापण्याची वेळ आली आहे तिथे माझ्यासारख्या सामान्यांचे काय असा विचार करून समाधान मानण्याचे हे दिवस आहेत.

आपले शिक्षण कधी न कधी उपयोगाला येते असे म्हणतात ते अगदी खरे आहे. मी प्राथमिक शाळेत शिकत असताना संत गाडगेबाबांचा स्वच्छते विषयीचा एक धडा होता. त्यात झाडू मारताना तो ४५ अंशात धरावा असे शिकविले होते. त्याचा मला आता फायदा होत आहे.
सध्या मी माझे शिक्षण,अनुभव,कला-कौशल्ये,या सगळ्याचा ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उपयोग करत आहे. याशिवाय  मॅडमचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आहेच.
पोछा मारताना कडे,कोपरे आणि सोफा वगैरे हलवून मारला जातो. मॅडमला कामाची जराही देखरेख करावी लागत नाही आणि मॅडमने माझ्या कामाविषयी एकदाही तक्रार केलेली नाही.

अनुभव हा सर्वात मोठा गुरू असतो, जसे की ...
चहा,दुध,भाजीसाठी वापरलेले भांडी थोडावेळ भिजू द्यावीत ,म्हणजे सहज स्वच्छ होतात.
तेलकट,तुपकट भांडी स्वतंत्र धुणे म्हणजे इतर भांडी तेलकट होत नाहीत.
फ्राय पॅन सारखी भांडी रोज न धुता विसळून वापरली जातात,अन्यथा त्याचे कोटिंग निघून जाते आणि त्यासाठीचा स्क्रबर वेगळा असतो.
विम बार भिजत राहिला तर लवकर संपतो, तो कोरडा राहील असे पहावे.
सरफेस क्लीनर  डायल्यूट करून वापरावे, ते कॉनसनट्रेटेड असते.
टेरेस आणि घर पुसायचे कपडे वेगवेगळे असतात.
झाडू मारताना पुढे सरकायचे असते आणि पोछा मारताना मागे.
पुरेसे कपडे साठल्यानंतरच वॉशिंग मशीन लावावी. तसही वॉशिंग मशीनला सध्या फार काम नसते. कारण फॉर्मल कपड्यांचा वापर थांबलेला आहे.
खरंतर  लॉकडाउन मुळे बऱ्याच गोष्टी थांबलेल्या आहेत असे माझे निरीक्षण आहे. घराची बेल,दारावरचे कुलूप,चपला आणि बूट,लिफ्ट,दुचाकी,चारचाकी,फॉर्मल कपडे,कपडे इस्त्री करणे,दाढी करणे,महिलांचे नटने,कोणी आपल्या घरी येणे किंवा आपण कोणाकडे जाणे,तुम्ही कदाचित विसरले असाल...पण तुमच्या त्या नेहमीच्या खऱ्या जबाबदाऱ्या, आणि हो ते तुमचे व्हाट्सअप्प स्टेटस,इ.

काम चुकवायचा काही पळवाटा असू शकतात पण त्याचा शोध अजून मला लागलेला नाही.

इतके सगळे काम केल्याचे काही फायदे होतात. घरात संतुलन राहते .काम करत राहिल्याने वजन नियंत्रणात राहते. वेळ कसा जातो हे कळत नाही. आपण उगाचच बसून फुकटचे खात आहोत असली अपराधीपणाची भावना रहात नाही. घरात बसून का होईना पण आपण स्वच्छ भारत योजनेला हातभार लावत आहोत असे वाटते आणि झोप छान लागते.

असे सगळे असले तरी मॅडम म्हणतात तुमची स्वच्छता ही बाह्यातली असते. तुम्हाला hygiene, hygienic मधले काही कळत नाही. हे ऐकल्यावर असे वाटते की बायका IAS चे कसलेही फॉर्मल ट्रेनिंग नघेता IAS अधिकाऱ्यासारख्या कशा काय वागतात. त्या pampering technique, puncturing technique कुठे शिकलेल्या असतात. त्यांना सर्वंच विषयांचे ज्ञान कसे काय असते. त्यांचा आत्मविश्वास नेहमीच कसाकाय जास्त असतो.  चुकल्या तरी त्याच कशाकाय बरोबर असतात .दुसऱ्याच्या कामातून ISO इतकी दर्जेदार अपेक्षा कशी ठेवतात. हे मलाच काय सर्वांनाच पडलेले कोडे असावे.

बायको ही घरातली गृहलक्ष्मी,राजलक्ष्मी असते . घरातली ती गतिचलित (Kinetic) ऊर्जा असते. यातच याचे उत्तर असावे असे वाटते.

आपण उगीचच एखाद्या कामाला स्टेटस आहे का नाही असा विचार करतो. खरंतर कोणतेही काम तुम्ही जर उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले तर तिथे दोनपैकी एक गोष्ट नक्कीच घडते. एकतर तुमच्या भूमिकेमुळे त्या कामाला प्रतिष्ठा मिळेल किंवा ते काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देईल.

मॉफ खरेदी करून माझे काम हलके करावे असे मॅडम अधून मधून बोलतात,पण आणतील तेव्हा खरे. आपल्याला काय आहे त्या साधनात काम करत रहायचे.

माझे काम एकूणच समाधानकारक चालले असावे असे मला मॅडमच्या वागण्या- बोलण्यातून जाणवते. हा लॉकडाउन जर असाच वाढत राहिला तर मला फक्त एकच भीती सतावत आहे. मॅडम सोसायटीतल्या इतरांकडे माझ्या कामाची शिफारस तर करणार नाहीत ना ?

मुळात मी एक लेखक , प्रेरक , प्रशिक्षक आहे हे मी तसेच तुम्ही पण विसरू नये म्हणून.
लक्षात असुद्या.
घरातच रहा , सुरक्षित रहा , जगाला प्रेरित करा आणि हो राहता ते घर तुमचेच आहे, घरात पडेल ते काम पण करा.
योगीराज देवकर.
www.motivationacademy.in

Wednesday, 8 April 2020

Your well-being एक पत्र

नमस्कार !

कसे आहात ? मजेत ना . असायलाच पाहिजे. आपल्या आयुष्याचा एक काळ असाच मजेचा आणि स्वावलंबनाचा होता. घरातला प्रत्येक सदस्य घरातले कोणते ना कोणते काम करायचा. हळूहळू आपल्याला सेवकांची सवय लागली आणि आपण परावलंबी तसेच आळशी झालो किंवा सुसाट वेगाने सो कॉल्ड प्रगतीच्या मागे लागलो.कोरोनाने आपल्याला ब्रेक लावला आहे आणि स्वावलंबी बनविले तसेच आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत  जागरूक केले आहे . हेल्थ फर्स्ट. हेल्थ इज वेल्थ .इफ हेल्थ इज लॉस्ट, एवरीथिंग इज लॉस्ट. असे म्हणतात,तेव्हा आता आपण आरोग्यपूर्ण बनुया.

जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) १९४८ मध्ये आरोग्याची खालीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे.
' आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणजे शारीरिक,मानसिक किंवा बौद्धिक आणि सामाजिक सुस्थितीची पूर्ण अवस्था आहे आणि केवळ आजार किंवा रोगाचा अभाव नाही .'

शारीरिक स्वास्थ म्हणजे तब्बेत ठणठणीत असणे आणि कोणत्याही अवयवाशी निगडित कसलाही आजार नसणे. यासाठी जोर-बैठका, पुश अप्स, पुल अप्स, सूर्यनमस्कार,योगासने, असे पारंपरिक व्यायाम करा.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे बौद्धिक तसेच भावनिक स्वास्थ्य.  सकारात्मक विचार,(positive)रचनात्मक विचार,(constructive)उत्पादक विचार सरणी ,(productive) जोपासा .  भावनिक स्वास्थ म्हणजे आनंद,आश्चर्य,दुःख,राग,भीती,तिरस्कार किंवा षडरिपु , अशा या स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचे नियोजन करणे तसेच इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे नियोजन करणे,प्रेमाची आणि आनंदाची सदभावना जोपासणे.शुद्ध आणि सात्विक बना आणि आयुष्यात निराशेला थारा देऊ नका. यासाठी प्रेरक साहित्य वाचा , मानसशास्त्र, मानवशास्त्र, आध्यात्मिक पुस्तके वाचा. टीव्ही, डिजिटल मीडियावर चांगले सिनेमे,नाटके पहा. ध्यान करा.

सामाजिक स्वास्थ म्हणजे प्रत्येक सजीवाला (यात निसर्गातली सर्व सजीव सृष्टी आली )सुखाने जगता येईल असे सुरक्षित आणि पोषक सामाजिक वातावरण असणे.राज्यात,देशात,जगात सर्वत्र असे सामाजिक स्वास्थ्याचे, नागरिक शास्त्राचे भान असलेले नागरिक असणे. यासाठी स्वतःच्या अधिकाराबाबत सजग रहा आणि कर्तव्य पार पाडा. माणसे जोडा , सर्वांशी सुसंवाद करा.

पुढील काही दिवस  घरात बसावे लागणार आहे तेव्हा हा वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी ,मित्र- हितचिंतकांसाठी,नातेवाईकांसाठी, देऊया आणि आरोग्यमय जीवन जगुया.

घरात रहा,सुरक्षित रहा, स्वतःचे आणि कुटुंबियांचे स्वास्थ्य जपा.

योगीराज देवकर.
www.motivationacademy.in

Wednesday, 27 November 2019

My Academy

Hi everyone.
Visit me on www.motivationacademy.in
And invite for trainings.