Thursday, 22 September 2011

लाडक्या मेव्हुणी वर आधारित एक विडंबन

  • माझी लाडकी मेव्हुणी सौ. मेघना अबदागिरे हिच्यावर आधारीत तयार केलेले एक विडंबन. लेखक - योगिराज देवकर,
  • पात्र - सौ. मेघना, श्री. विक्रान्त, चि. आर्णव, माझी पत्नी सौ. अनिता, मेघनाचे मम्मी (सौ. सुशिला), पप्पा (श्री. बलभिमराव जाधव) आणि मी.
स्थळ: योगिराज देवकर, म्हणजे आमची सदनिका,
दिनांक: 01 ऑगस्ट 2011, वेळ: रात्री 09 ते 10 पर्यंत.
प्रसंग: जसा घडला तसा नव्हे तर विडंबनात्मक पध्दतीने. 31 जुलै 2011 रोजी रात्री 08 वाजता योगिराज देवकर म्हणजे माझा पुणे-सोलापुर हायवे वर जबरदस्त अपघात झालेला आहे. सिट बेल्ट लावलेला होता त्यामुळे सुदैवाने मी वाचलेलो.
 त्यामुळे सौ. मेघना अबदागिरे, श्री. विक्रान्त अबदागिरे आणि चि. आर्णव विक्रान्त अबदागिरे मला भेटायला आलेले होते.
येताना त्यांनी मिठास मधून छान मिठाई देखिल आणली होती.
मेघना: (दरवाजातुन आत आल्या बरोबर) काय भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मीः मी बोलायला सुरवात करतो.....तेवढयात.
मेघनाः आगं माई (म्हणजे अनिता) एैकलं का आर्णव ना गाणं म्हटलं की नाचायला लागतो.
      ए आर्णव.....ए आर्णव नांच ना.
      बाबाच्या बेंबित घुसलाय भुंगा!
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा.
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा! टुंग!
मम्मी: अग मेघना ‘बाबाच्या’ बेंबीत काय म्हणतेस, मारूती’ च्या बेंबीत असं म्हणं.
मेघना: अगं आर्णव बाबा, बाबा बोलतोना म्हणून ‘बाबा’. आपल्याला काय आर्णव नाचतोय ना.
अनिता: अगं घुसलाय काय म्हणतेस शिरलाय भुंगा असं म्हण.
मेघना: ए आपल्याला काय घुसलय काय आणि शिरलाय काय. आर्णव नाचतोय नां.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: आता बघा, आता बघा ऽ ऽ ऽ ऽ आर्णव
       शेवग्याच्या झाडाला सांगा किती शेंगा!
       टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा.
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा! टुंग!
अनिता: अगं मेघना किती चुकीचे गाणं म्हणते. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, असं आहे ते.
मेघना: ऐ आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा कशा  येतील. शेवग्याच्याच झाडाला शेवग्याच्या शेंगा येतील ना.
अनिता: अगं ते विनोदी गाणं आहे ना म्हणून.
मेघना: आंब्याच्या काय अनं शेवग्याच्या काय आपल्याला कायं आर्णव नाचतोय ना.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: ए आता सगळे, आता सगळे, इकडे बघा, आर्णव.
       शिवाजीच्या दाढीला केस किती सांगा!
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा.
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा! टुंग!
आता मात्र पप्पा (जय भवानी जय शिवाजी): ये मेघना शिवाजीच्या दाढीला नाही,
रावणाच्या दाढीला केस किती सांगा. असं गाणं आहे.
मेघना: जाऊद्या हो आपल्याला काय शिवाजी काय आणि रावण काय. दाढीवाला आहे ना. आणि आपला आर्णव नाचतोय ना.
पप्पा: मेघना रावणाच्या जागेवर महाराजांचे नांव वापरू नको.
मेघना: बरं जाऊद्या, ऽ ऽ ऽ.
मेघना: आर्णव, माझं पिल्लु, माझं कोकरू. (आता मेघनाला कोण सांगणार पिल्लु पक्षाचं, प्राण्याचं असतं आणि कोकरू शेळीचं असतं. शेवटी ती पडली इंगलिश  मिडियमची.)
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: आगं मम्मी, अगं माई, आर्णव ना बरेच शब्द बोलतो.
मेघना: आर्णव म्हण बाबाऽ ऽ ऽ, अेमय दादाऽ ऽ ऽ, शुभम दादाऽ ऽ ऽ.
आर्णव: बाबाऽ ऽ ऽ, दादाऽ ऽ ऽ,
मेघना: माझं वासरू, माझं शिंगरू ऽ ऽ ऽ किती गोड बोलतं.
विक्रान्त: ये मेघना, त्याला पिल्लु, कोकरू, वासरू, शिंगरू  काय पण काय म्हणतेस गं.
मेघना: ते माझं शिंगरूच आहे.
विक्रान्त: ते जर शिंगरू  असेल तर मग आपण दोघे कोण?
मेघना: जाऊ द्या हो? मज्जाऽ ऽ ऽ.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: मम्मी, पप्पा तुम्हाला आर्णवचा दुस-या गाण्यावर नाच बघायचा का?
मम्मी, पप्पा: होऽ होऽ.
मेघना: आर्णव चल आता हात हालव, हात हालव.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      हे   हे   हे   हे   हे   हे  हे  हे.
      ग्यारा महिनोमें ग्यारा तरीकेसे तुझसे प्यार करूंगीरे मैं!
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      हे   हे   हे   हे   हे   हे  हे  हे.
अनिता: मेघना ग्यारा महिनोमें नाही; बारा महिनो में, बारा तरीकेसे तुझसे प्यार जताऊंगी मैं! असं गाणं आहे.
मेघना: अगं माई, आर्णवचा अकरावा महिना चालू आहे ना, म्हणून ग्यारा. आता पुढच्या महिन्यात म्हणायचे बारा.
अनिता: बारा नंतर काय करणार.....
मेघना: आपल्याला काय तेरा, चौदा, पंधरा.... आपला आर्णव नाचतोय ना.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: पप्पा आर्णवच्या पार्टीत मेणू काय ठेवायचा, ठरवाना.
पप्पा: मेघना तुझ्या कार्यक्रमला अजुन 50 दिवस बाकी आहेत. ठरवता येईल.
मेघना: भाऊजी तुम्ही आर्णवच्या पार्टीत ‘इव्हेंट मॅनेज’ करता का? नाहीतर तुम्ही कॉम्पेरिंग करा.
मी: अगं असली जबाबदारी आता अमेय घेईल.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: आर्णव, आर्णव कंबर हालव, कंबर हालव ऽ ऽ ऽ
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      हे   हे   हे   हे   हे   हे  हे  हे.
अनिता: आगं मेघना, किती चुकीच गाणं म्हणते,
            ढींग टिका ढींग टिका नाही.
            ढींक चिका ढींक चिका ढींक चिका हे, असं गाणं आहे.
मेघना: ढींग टिका काय आणि ढींक चिका काय आपला आर्णव नाचतोय ना?
 पुढं काय तर ......
मेघना: आमचा आर्णव, जय श्री माताजी कसं करतो.
विठ्ठल विठ्ठल कसं करतो. हे सर्व काही झालं.
तासाभरापुर्वी मेघना आणि विक्रान्त माझा अपघात झाला म्हणून मला भेटायला आले होते. सुदैवाने मी अपघातातुन वाचलो होतो. त्यामुळे सर्व सुखरूप होतं. अधुन मधुन पप्पा मेघनाला सुचवत होते. अग मेघना भाऊजींचा अपघात कसा झाला एैक. पण पप्पांच आणि माझं दोघांचही या टांग टींग टींगा आणि ढींग चिका ढींग पुढे काही चाललं नाही. रात्री 10च्या आसपास अबदागिरे कुटुंबिय परत गेले. परंतु शेवट पर्यंत मेघनाने माझा अपघात कसा झाला हे मात्र एैकलं नाही.
स्वगत:-‘‘पण मेघनाचे आणि विक्रान्तचे पुत्र प्रेम बघुन मला चि. अमेयचं (माझा मुलगा) लहानपण आठवले. अनितापण काही मेघना पेक्षा वेगळी वागत नव्हती. आणि मी पण काही विक्रान्त पेक्षा वेगळ वागत नव्हतो. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्याचे आई, वडील मुलांवर केवढं प्रेम करतात. त्यांना केवढं जपतात, त्यांना वाढवितात. ही मुलं म्हणजे त्यांना त्यांचा जिव की प्राण असतात. पुढं हे प्राण मोठे होतात आणि त्यापैकी काही आई वडीलांच्या जिवाला खुप त्रास देतात.
 पण मला असं वाटतं, मुलांनी मोठं व्हावं आणि मोठे झाल्यावर स्वतःच्या आई, वडीलां वर असेच प्रेम करावे.
 मुलाने पण म्हाता-या आई वडीलांकडे बघावे आणि म्हणावे आई, बाबा. मम्मी, पप्पा. मॉम, डॅड, नाचा......
              ढींक चिका ढींक चिका ढींक चिका हे.
              ढींक चिका ढींक चिका ढींक चिका हे.
              हे  हे  हे  हे        हे  हे  हे  हे.
              हे  हे  हे  हे        हे  हे  हे  हे.
 बारा महिनोमें बारा तरीखेसे तुमको प्यार जताऊंगा मैं.......
 असा प्रेमाचा प्रकार जर प्रत्येक आई, वडीलांच्या बाबतीतही घडला तर आयुश्य किती समाधानी होईल.’’
  आता दुस-या दिवशी सकाळी.
मेघना: (मोबाईल वर), भाऊजी, अहो तुमच्या अपघाताची सविस्तर बातमी सकाळ मध्ये वाचली. केवढया मोठया अपघातातनं तुम्ही वाचलात. (धन्य झलो मी),
         धन्यवाद!  इति विडंबन - योगिराज देवकर--

Saturday, 20 August 2011

How to setup a micro, small and medium enterprise – a series


Potential entrepreneur should follow following important steps for setting up micro, small or medium enterprises.
1st – selection of product: - It all starts with selection of business opportunity. Business opportunity may be service or trading or products identify such a business opportunity which can generate sufficient profit.
            It may be a raw material based or demand based or foot loose industry. One has to consider following points and take a ‘GO’ or ‘NO GO’ decision.
-         Does the business idea give you immense pleasure or satisfaction, does it fulfills your inner needs like positive feeling.
-         Does it have a market potential in your identified market area.
-         Is it the need of the clients, customers or market?
-         Caring out a basic market survey.
-         Experts’ opinions from Govt. Organizations, consultants, etc.
-         Competitors study.
-         Is it an innovative or creative idea?
-         Discussions with support system.
-         Conceptualizing a business plan.
On each aspect you have to think whether to go ahead or not to go.
            As there are 4Ps of marketing, there are 4ps of project conception also; they are as follows.
1)     Product – Its features, advantages & benefits.
2)     Process – It’s a making of a product what technology is to be used to produce the product.
3)     Place – Location of the business. Earlier it was one of the at most import aspects. But now business men say it is not the location but it is destination.
4)     Partner – support system which will assists you or the financial or technical collaborations.
Choosing a product
Entrepreneur should also consider following aspects while conceptualizing the project.
-         Packaging of the product
-         Branding the product
-         Availability & procurement of raw materials
-         Latest technology available
-         Outsourcing the services
-         Market access
-         Product warranties & guarantees
-         Support system mechanism
-         Incentive and subsidies
-         Availability/cheap labor
-         After sales service
-         Product design & development
-         Latest technologies available with CSIR, etc.
Market availability or development is the key area in product selection. One has to consider following areas.
            Restricted items – items like alcohol, automobiles, gold, and almost 25 items are restricted to start in SSI.
            Banned items – Due to saturation or some statutory requirements few items are banned in SSI. Ex: An audio/video cassette to CDs, to pen drives to documents on Google, etc.
            List of items reserved for exclusive manufacture in SSI – There are hundreds of items in this list. One has to refer this list and understand the vast scope to choose product from SSI field. One may refer this list in District Industries Centre in the district or MSME website.
            Products having export potential – one has to contact foreign chamber of commerce, WTO, EXIM Bank, to understand such potential,
            EXIM Bank has developed an excellent model to conduct the export – product portfolio analysis based on three parameters like;
-         Supply capability in product group.
-         Domestic environment
-         Export market attractiveness
This analysis gives rise to product groups with high potential or low potential.
One also has to be careful about the laws of the country one is exporting to.
            Few examples of business ideas
-         Automatic car washing centers.
-         Shikakai powder
-         Semi or mechanized bricks plants
-         Authorized dealers for 2 wheelers, 4 wheelers.
-         Pressings and laser cutting machines.
Potential entrepreneurs may refer my book titled ‘Business Opportunities, search you will get it!’ published by Continental Publications, Pune. 

Thursday, 18 August 2011

अण्णा हजारे आन्धी है | वो शास्त्रीजी और गांधी है !

अण्णा हजारे आन्धी है | वो शास्त्रीजी और गांधी है !

जन लोकपाल आंदोलन 

१६ ऑगस्ट संध्याकाळी भावे हायस्कूल येथे आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेसाठी पोहोचलो. त्यानंतर बालगंधर्व चौकात जे उत्फूर्त आंदोलन सुरु आहे तिथे बराच वेळ थांबलो.
१७ ला दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ श्री. राधेश्याम जगताप भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पुणे जिल्हा, अध्यक्ष आणि सहकारी आंदोलन करीत आहेत त्यांना भेटलो. आणि नांव नोंदणी केली. त्यानंतर बालगंधर्व चौकात काही वेळ उभा होतो. श्री. सुनील देसाई देखील  बरोबर होते. सहानंतर पुन्हा बराच वेळ बालगंधर्व चौकात आंदोलनात सहभाग घेतला.
१८ आज संध्याकाळी सहा वाजता बालगंधर्व चौकात ते सारसबाग असा कॅन्डाल मार्च आयोजित आहे त्यात आम्ही सर्व कुटुंबीय सहभागी होणार आहोत. सर्वांनी देखील यावे.
पुण्यात जन आंदोलनास विध्यार्थी, सर्व सामान्य नागरिक, महिला, अधिकारी वर्ग इतियादी यांचा मोठा पाठींबा मिळत आहे.

Tuesday, 16 August 2011

भारत सरकारला भारत भ्रष्टाचार मुक्त हवा आहे का?

भारत सरकारला भारत भ्रष्टाचार मुक्त हवा आहे का?
दिल्ली पोलिसांनी श्री. हजारे आणि त्यांच्या सहका-यांना १६ ऑगस्ट पासून उपोषणास परवानगी दिली होती. खरे तर अशा वेळी कोणत्याही अटी लादल्या जात नाहीत, तरी उपोषणाची जागा, १६ तारखेस संध्याकाळी उपोषण मागे घ्यावे लागेल, समर्थकांची संख्या मर्यादित ठेवावी लागेल, लाउड स्पीकर वापरता येणार नाही, अशा जाचक अटी सह हि परवानगी देण्यात आली.
१६, १७, १८, असे तीन दिवस जर अण्णांचे उपोषण सुरु राहिले असते तर त्यास भारतभर आणि भारता बाहेरही जोरदार प्रसिद्धी आणि समर्थन लाभले असते. १८ तारखेस संध्याकाळ नंतर या चळवळीला सरकारला थोपविता आणि थांबविता आले नसते. त्यामुळे नंतर विचार करून सरकारने दुसरा निर्णय घेतला आणि अण्णांना १६ला सकाळीच अटक केली.
सध्याचे सरकार हे कॉंग्रेससह २२ पक्षांचे सरकार आहे. या सरकारलाच योग्य प्रकारचे लोकपाल बिल नको आहे. त्यामुळे या पक्षांचे मंत्री, खासदार आणि त्यांचे समर्थक यांचा अण्णांना पाठींबा असणार नाही. सरकारच्या विरोधात तितकेच पक्ष आहेत. त्यांनी अण्णांना पाठींबा दिला तर सरकार म्हणणार अण्णा अमुक तमुक पक्ष्याचे आहेत. आम्हाला भ्रष्टाचार करू देत नाही का? तर मग तुम्हालाच भ्रष्टाचारी ठरवितो अशी भूमिका हे सरकार घेणार.
अशा वेळी प्रत्येक्ष नागरिकांनीच अण्णांच्या चळवळीला आणि आंदोलनाला विविध माध्यमातून पाठींबा दिला पाहिजे आणि नागरिक हे नक्की करतील, कारण या भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त त्रास नागरिकांनाच होत आहे. फरक फक्त इतकाच कि काही लोक आत्ता करतील तर काही मतदानाच्या वेळी.
सामान्य नागरिकाने सरकारच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेणे प्रचंड अवघड आणि धाडसाचे काम आहे. त्यातही सरकारने जर डोके, कान, डोळे बंद ठेवण्याचीच भूमिका घेतलेली असेल तर बिचारा साधा नागरिक सरकारच्या पुढे काय करणार?
पंतप्रधान सुद्धा सहका-यांच्या आणि उद्योग, शिक्षण, इतियादी क्षेत्रात दैनंदिन होत असलेल्या भ्रष्टाचाराने हतबल झाल्या सारखे बोलतात. आणि नागरिकांनाच आवाहन करतात सावध रहा, त्याग करा. मग हे सरकार त्याच्या तरी नियंत्रणात आहे का? 
आज मला मी या मोहिमेत विशेष काही करू शकत नाही याची खंत वाटत आहे आणि प्रचंड राग हि आलेला आहे. न्याय, सनदशीर मार्गाने हे सरकार जर सत्याग्रह करू देत नसेल तर हे कसले सरकार?
नागरिकांनो ! भ्रःष्टाचार मुक्त भारत करण्याच्या कामाची हि सुरुवात आहे. लोकपाल विधेयकाने काय होणार? असला अपप्रचार हे सरकार करत आहे, त्याला बळी पळू नका. आपण जर अजूनही जागे झाला नाही, रस्त्यावर उतरला नाही, तर हे सरकार अण्णांचे आंदोलन आठवड्याभरात चिरडून टाकेल. त्यानंतर मात्र पुढच्या १०० वर्ष्यात दुसरे अण्णा तयार होणार नाहीत.
या सरकारलाच जनतेचा, लोकपालाचा अंकुश नको आहे. त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार जसा आहे तसा चालू ठेवायचा आहे. बर हे सरकार बदलले तर जे येतील ते यांच्या पेक्षा चांगले असतील याचीही खात्री नाही.
पण एकच होईल प्रत्येक नागरिक जर जागृत झाला तर तो सार्वजनिक संपत्तीचे लचके कोणालाही तोडू देणार  नाही.
मी संसद, राज्य घटना, कायदे इतियादी गोष्टींचा आदर आणि सन्मान करतो. परंतु हि राज्य घटना जर लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारा बनविलेली असेल तर अण्णांचे आंदोलन समर्थनिय आहे.
मी सरकारच्या या कृतीचा निषेद करतो आणि या आंदोलनाला पूर्ण पाठींबा देतो. तुम्ही सर्व जण सुद्धा पाठींबा द्या.

Monday, 1 August 2011

सुदैवाने अपघातातून वाचलो.

     ३१ जुलै २०११ रोजी रात्री ८ वाजता कासुर्डी, यवत जवळ माझ्या गाडीचा अपघात झाला. आय आर बी संस्थेचा हलगर्जीपणामुळे जिथे दोन पदरी रस्ता संपून चार पदरी रस्ता सुरु होतो त्या ठिकाणी जो रस्ता दुभाजक तयार केलेला आहे तिथे कसलाही बोर्ड लावलेला नाही. गाडी दुभाजकावर चढून उलटली त्यानंतर फरफरत जाऊन पुन्हा पलटी झाली. गाडीचे भरपूर नुकसान झाले पण सुदैवाने मला कसलीही इजा झाली नाही.
     परमेश्वर, माझे हितचिंतक, नातेवाईक आणि मित्र तसे ज्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे मी वाचलो.
श्री. सोमेश्वर ठोंबरे, सरपंच, कासुर्डी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मला तात्काळ मदत केली. त्यांचा मी आभारी आहे.
या अपघातातून बोध घेऊन आय आर बी ने रस्ता दुभाजकावर बोर्ड बसवावेत. त्यामुळे यानंतर तरी तेथे अपघात होणार नाहीत.

Friday, 15 July 2011

On the auspicious day of GURUPOURNIMA

On the auspicious day of GURUPOURNIMA I remember my gurus & mentors Mr Suresh Ranade Mr B V Rathod Late Mr Ram Kulkarni Late Mr Manohar Nadkarni Dr V G Patel Dr N P Singh Dr Dinesh Awasti Dr Pradip Bawdekar Mr Ramesh Dave Late Mr Aniruddha Kulkarni Mr Prabhakar Karandikar Mr Prabhakar Deshmukh Mr Rajendra Chavan Mr Hon Ajitdada Pawar Late Dr Appasaheb Pawar Mr Rameshchandra Kanade Mr Ramesh Deokar Her Holiness Sh Mataji Nirmala Devi My beloved late father Anna & mother Aai  & many more books & people who have been guiding me throughout my life. I share my great respect to all of them.

Monday, 4 July 2011

Entrepreneurship Development GOA Centre

Visited KVIB at Junta House on 18th June Road, Panaji, Goa Chamber of Commerce & Industry at N R Bandekar Bhavan, Panaji, Economic Development Corporation at Dr. A. B. Raod, Panaji, Directorate of Industries, Trade & Commerce at Udyog Bhavan, Panaji, GOA-IDC near bus stand Panaji, Goa State Industries Association, Panaji, Agnel ED Institute at Verna, MCED-Goa Centre at Parvari. All these office act as support system to promote business in Goa.